नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
आधीच रविवारचा सुटीचा दिवस. त्यातही अमर पार्टी हॉल निमंत्रकांनी भरलेला होता. राजू-राणीचे मित्रमैत्रिणी डॉ. शरदचे हॉस्पिटलमधील कर्मचारी, आदी संबंधितांनी बाळ संदेशच्या वाढदिवसाला फार शोभा आणली होती. राणी त्याच हॉस्पिटलमध्ये बरीच वर्षे परिचारिकेचे काम करीत होती. साहाजिकच साऱ्यांची ती लाडकी होती. राजेंद्र म्हणजे राजू हा तर डॉ. शरद यांचा अगदी जवळचा, मग काय विचारता? परकेपणा कुठेच नव्हता. कडक, शिस्तीची पण प्रेमळ व कामसू राणीने साऱ्यांचीच मने जिंकली होती. राजू-राणीच्या बाळाचा वाढदिवस म्हणजे जणू घरचाच कार्यक्रम.
सूर्य म्हणजेच रवी, हा स्वयंप्रकाशी व तेजस्वी ग्रह आहे. तारांगणातील माझ्यासारखे असंख्य ग्रह, हे चंद्रासारखे परप्रकाशी आहेत. अशा रवीचे थोडे जरी प्रकाशकिरण ज्याच्या अंगावर पडले, तो धन्य झाला. मी ही असाच एक.
त्याच काय झालं होत कि, नेहमी प्रमाणे एकदा सर्दी झाली. दोन दिवसांनी कानठळी बसली! औषधाने आठवड्यात आणि बिनऔषधाने सात दिवसात सर्दी कमी होते, हा आजवरचा अनुभव होता. आम्ही या अनुभवावर विसंबून रेटून नेलं. ‘जो इतरावरी विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला!’ या युक्तीची सत्यता पटली! येथे मला माझ्या अनुभवानेच दगा दिला. कानाला ऐकू येईना! सर्दी यथाअवकाश कमी झाली. पण कानांनी आपले कार्य बंदच ठेवले. त्यात भर म्हणजे दोन्ही कानातून, म्हणजे आतूनच आवाज येऊ लागले, तेही वेगवेगळे!
आजपर्यंत ज्या ज्या लेखकांनी मराठी भाषेत गड किल्ल्यांच्या माहितीवरील ग्रंथ प्रकाशित केले आहेत त्यामध्ये चिं. ग. गोगटे यांचे नांव सर्वप्रथम येते. त्यामुळे चिंतामण गंगाधर गोगटे यांना आद्य दुर्ग अभ्यासकच म्हणले पाहीजे. इ.स. १८९६ पर्यंत महाराष्ट्रातील किल्ल्यांविषयीच्या माहितीचे कोणतेही मराठी भाषेतील पुस्तक लिहिले गेले नव्हते. गोगटे यांच्या ग्रंथाचा काळ हा इतिहासाचार्य राजवाडे यांचे ग्रंथ प्रकाशित होण्यापूर्वीचा होता.

आता विजयला पटले होते मेहनत तर गाढवही खूप करतो म्हणून त्याला मान मिळत नाही रस्त्यावर आयुष्यभर रक्त आठवून मेहनत करणारे कामगार कधीही श्रीमंत होत नाहीत. श्रीमंती ही नशीबातच असावी लागते.

आज मात्र माझी सटकली.. आमचे लग्न ठरत होते, सांगून आली होती.. म्हटले आधी भेटावे आमचीच जातवाली मच्या घरी जातवालीच हवी ना.. मिळाली एकदा
शुटींग सकाळी आठला सुरु झालं होतं.. मला जायला थोडा उशीर झाला.. तोपर्यंत भरत जाधवचा सीन शूट झालेला होता.. साधा झब्बा व धोतर नेसलेल्या अभिनेत्याची व माझी, ती दुसरी ‘भरत-भेट’ होती.
स्वर - मंच ॲकॅडमीपासून इतके दिवस कधी दूर राहिलो नव्हतो. पुन्हा एकदा सर्व पूर्ववत सुरू केले आणि मग कार्यक्रमांना सुरुवात केली. 'नज़राना गीत - गज़लोंका' हा नवीन कार्यक्रम आयोजक मोहन पवार यांच्यासाठी केला. अजून काही कार्यक्रमांसाठी महाराष्ट्राबाहेर गेलो. २७ फेब्रुवारी २०१० रोजी मराठी अभिमान गीत प्रकाशन सोहळा ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये संपन्न झाला. यावेळी आम्ही मराठी अभिमान गीताचे जाहीर गायन केले. यानंतर 'गौरवशाली महाराष्ट्र-पन्नास वर्षे' या दूरदर्शनवरील चर्चासत्रात मी भाग घेतला.
माझे मित्र हेमंत रणदिवे यांचा मुलुंडमधील 'सेरेमोनियल हॉल' हे माझे कार्यक्रम करण्याचे एक आवडते ठिकाण आहे. विशेषतः हिंदी गझलच्या मैफलीसाठी हा एक आदर्श हॉल आहे. २७ जून २०१० रोजी याच सेरेमोनियल हॉलमध्ये मी गझलचा कार्यक्रम केला. हा माझा ८५०वा जाहीर कार्यक्रम ठरला.
निर्माते किरण कुलकर्णी यांच्या भक्तीसंगीताच्या अल्बमसाठी मी एक गीत १२ जुलै २०१० रोजी रेकॉर्ड केले. संगीतकार विनय राजवाडे होते.
रेकॉर्डिंग संपवून दुपारी साडेबारा वाजता मी बाहेर पडलो तर अनेक मिस्ड कॉल मोबाईलवर दिसले. माझे मामा सुरेश धनवटकर यांचे भिवंडीला निधन झाले होते. ताबडतोब भिवंडीला पोहोचलो. माझा हा एकच सख्खा मामा होता. लहानपणापासूनच्या अनेक आठवणी मामा-मामीच्या भिवंडीच्या घराशी निगडित होत्या. माझ्या आईचा हा धाकटा भाऊ असल्याने आईलाही जबर धक्का बसला. माझी मामेभावंडे दीपक आणि ज्योती, शुभामामी, आम्ही सर्वच जण दुःखात बुडालो. पुढील आठ दिवस मी गाण्याचे कोणतेही काम केले नाही.
एक दिवस माझा संगीत संयोजक मित्र सुभाष मालेगावकर याचा फोन आला. “अनिरुद्ध ‘अनफरगेटेबल मदन मोहन' करतोय. तुझी गरज आहे.
" 'सुभाष अरे कार्यक्रमाचा मूड नाहीये." मी काय झाले ते सांगितले. ते ऐकून घेतल्यावर सुभाष म्हणाला,
“शो मस्ट गो ऑन आणि मला सांग मदन मोहनच्या गझल तू नाही तर दुसरे कोण गाणार?” सुभाष नेमकेच बोलतो. मदन मोहनच्या गाण्यांचे अवघड पीसेस वाजवताना त्याच्यासमोर नोटेशनचा कागद नसतो. सगळे पीसेस त्याला पाठ आहेत. सुभाषचे म्हणणे मान्य करून मी पुन्हा कामाला लागलो. 'अनफरगेटेबल मदन मोहन' चा शो अप्रतिम झाला. या गाण्यांनी जादू केली आणि माझा संगीतप्रवास पुन्हा वेगाने सुरू झाला.
-अनिरुद्ध जोशी
त्याचा आईस काय माहिती, इथली झाडे एका स्वार्थी माणसाने कापून टाकली आहेत. त्याची आई इथे आली – झाड व वेली दिसली नाहीत – पण अंडी घालण्याची वेळ झाली असल्या मुळे त्याचा आईला गमल्यातल्या एका रोपट्यावरच अंडी घालावी लागली असेल. झाडा एवजी बैठकीच्या खोलीत त्याचा जन्म झाला. एखाद रात्र आपल्या जन्मस्थानी घालवून तो पुढच्या प्रवासासाठी निघून केला असता. जिवंत राहीला असता तर पुढच्या पिढी साठी अंडी घालण्यास परत इथआला असता. पण ते होण आता शक्य नाही. भारी मनाने फुलपाखराला उचलले आणि बाहेर फेकले. पुन्हा वाश बेसिन वर येऊन हात धुऊ लागलो. लेडी मेकबेथची आठवण आली. कितीही हात धुतले तरी आपण या पापातून मुक्त होऊ शकतो का? असा विचार मनात आला.
एक काळ असा होता की, चित्रपटाचं शुटिंग म्हटलं की, त्या ठिकाणी कॅमेरा, कॅमेरामन, डायरेक्टर, कलादिग्दर्शक, ध्वनीमुद्रक, नृत्यदिग्दर्शक, स्थिरचित्रण करणारा, माईक धरणारा, मेकअपमन, लाईटमन, रिफ्लेक्टर्स, हेअरड्रेसर, स्पाॅटबाॅईज, सर्व तंत्रज्ञांचे सहायक व कलाकार अशांची ‘जत्रा’ असायची.
Copyright © 2025 | Marathisrushti