(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • नऊ रंगाच्या पैठण्या

    गणेशोत्सव मंडळांमध्ये असलेल्या स्पर्धेचे स्वरुप नवरात्रोत्सव मंडळांमध्ये सुध्दा बघायला मिळते आहे. गरबा नाच करणाऱ्यांसाठी विविध व आकर्षक बक्षिसे, रंगीबेरंगी साड्या, पैठण्या , फॅन्सी ड्रेस आणि मग बक्षीस समारंभ आणि पुरस्कार सोहळे. नऊ दिवस कार्यक्रमांची नुसती रेलचेल सुरू असते.

  • आळशी उंट आणि हुशार कोल्हा

    फार फार वर्षांपूर्वी एका वाळवंटात एक उंट राहात होता. भगभगीत वाळवंटात पोटापाण्यासाठी उंटाला खूप भटकावे लागत असे. एकदा त्याला आपल्या पूर्वजन्मातल्या काही गोष्टी आठवल्या. पूर्वजन्मी आपण खूप जपतप केले. खूप पुण्य जमा झाले.

  • मला भावलेला युरोप – भाग ९

    दो लब्जो की है,
    दिल की कहानी,
    याद है मोहब्बत,
    याद है जवानी.
    ‌ये कश्ती वाला,
    क्या गा रहा था,
    कोई उसे भी,
    भी याद आ रहा था.
    लाला लाललाला लाला लाला‌‌ऽ
    लाला...

    माझ्या वयाच्या साधारण १३,१४ व्या वर्षी अमिताभ व झिनत या जोडीवर चित्रित झालेला हा मुव्ही मी बघितलेला. द ग्रेट गॅम्बलर च्या उपरोक्त गाण्याने रसिकांच्या मनावर गारुड केले होते. कित्येक वर्षांपूर्वी बघितलेल्या या गाण्याचा सीन जशाचा तसा आठवला.या गाण्यातील गंडोला, ज्याला आपण होडी म्हणतो यात आज बसण्याची संधी मिळणार होती. व्हेनिस शहरामध्ये पोहोंचल्या नंतर .

    ‌‌ मला वाटतं या शहराला याच गाण्यांमुळे, 'द सिटी ऑफ रोमान्स'असे म्हटले जात असावे. ‌ व्हेनिस शहर नव्हे ,आयलँडच (बेट) ते!कारण चोहोबाजूंनी पाण्याने वेढलेले हे शहर. पाण्याला तेवढ्यापुरते बाजूला सारत या शहराची वस्ती उभी राहिली असणार,यावर पूर्ण विश्वास बसतो. शहरात प्रवेश करतानाच मुळी,बऱ्याच लोकांना सामावून घेणाऱ्या एका वॉटर बस चा पंधरा मिनिटं प्रवास करावा लागतो. हा प्रवास आपल्याला व्हेनिस आयलॅंड वर घेऊन जातो. तेथून थोडे चालत जाऊन आपण पोहोचतो, गंडोला राईड च्या स्टेशन वर.

    येथे पोहोचल्यावर मात्र व्हेनिसला 'कालव्यांचे शहर' का म्हणत असावेत? याची प्रचिती येते.तार्किकतेवर घासून मत मांडावयाचे म्हटले, तर पाण्याचे साम्राज्य पुर्विच असावे तेथे. पाण्याला बाजूला सारत शहराची निर्मिती झाली असावी. हे माझे म्हणणे मी मांडलेले आहेच. पण वस्ती झाल्यानंतर आपल्याला आता दिसू लागते ते पाणी कालव्यांच्या रूपात.

    ‌येथे दळणवळणासाठी भरपूर होडी वजा गंडोला नामक पाण्यातली वाहनं उपलब्ध आहेत.शिवाय पर्यटकांसाठी हे एक आकर्षणाचं केंद्रबिंदू आहेच. या गंडोला मध्ये राईड करून किमान प्रत्येक भारतीय स्वतःला अमिताभ आणि झिनत या रुपात बघत असणार. यात वादच नाही. सुरुवातीला वाॅटर बस मधून स्वच्छ दिसणारे पाणी,गंडोला चा प्रवास चालू झाला की, काहीच वेळात ती जेव्हा शहराच्या आतल्या भागात जाऊ लागते, त्यावेळी अतिशय अस्वच्छ दिसते. किंबहुना,आपण का करतोय ही राईड?असा प्रश्न पडून अंतर्मुख व्हायला होते. या भागातील पूर्वीची रहाती घरं आता हॉटेल्स मध्ये रूपांतरीत केलेली आहेत.तेथील सांडपाण्याची व्यवस्था याच वाहत्या पाण्यात सोडलेली आहे हे जेंव्हा आपल्याला लक्षात येते, तेव्हा आपण नाल्यांतून फिरत आहोत असा भास होतो.त्यामुळे 'दुरून डोंगर साजरे'या म्हणीमध्ये चपखल बसेल अशी ही राईड आहे.

    ‌‌ लंडन पासून ईन्सब्रूक पर्यंत बघितलेल्या अनुभवलेल्या स्वच्छतेचे, इटलीमध्ये आल्यानंतर विसर्जन झाले किंवा काय अशी शंका मनात येते.आपण भारताच्या जवळ जात आहोत, हे पण लक्षात येते. इटलीतील अस्वच्छते मुळे.

    गंडोला मधून दिसणारा शहराचा लूक मात्र छान आहे.वाहत्या पाण्यातील हे शहर दुरुनच बघावयास मजा येते.

    राईड संपवून तेथेच आसपास असणाऱ्या,ग्लास फॅक्ट्री ला आपण भेट देतो. येथे उच्च तापमानावर द्रवरूप काचेला आकार देत विविध प्रकारची काचेची उपकरणे, प्राणी,मोठमोठे फ्लॉवर पॉट, वगैरे वस्तू बनवताना आपल्याला प्रत्यक्ष बघता येते. हे बघत असताना आपल्याकडच्या मातीची भांडी बनवणाऱ्या कुंभारी कलेची मात्र आवर्जून आठवण होतेच.चकाकणारी रंगीबेरंगी पानाफुलांच्या डिझाईन्स ने बनवलेल्या वस्तू खूपच महागड्या.केवळ विंडो शॉपिंगचा आनंद घ्यावा.

    व्हेनिस मध्ये मर्यादित आकारमानाची जमिनीची उपलब्धता आहे. म्हणून गर्दीही भरपूर असते. येथे आपण ओरिएंटेशन टूर ज्या वेळी करतो त्यावेळी,अति उत्कृष्ट नमुन्यांची बांधकामं आपल्याला बघावयास मिळतात.खरोखरच अचंबित व्हायला होते.

    सेंट मार्क्स स्क्वायर मध्ये तर तिन्ही बाजूंनी प्रचंड संख्येने आर्चस् असणाऱ्या व इमारतींवर माणसांचे मोठेच मोठे पुतळे असणाऱ्या लांबच लांब वास्तू बघून डोळे विस्फारायला होतात. बॅसिलिका चर्च ची वास्तु प्रचंड मोठी. बांधकाम कलेचा सुंदर नमुना आहे.याच ठिकाणी,सुर्य,चंद्राच्या भ्रमणाच्या गतीवर आधारित घड्याळ व बारा राशी यांमधील गणित एका प्राचीन ईमारतीवर कोरलेले आहे.

    इटालीत प्रवेश केल्यानंतर या देशांना समृद्ध इतिहास असल्याच्या खुणा ठिक ठिकाणी दिसू लागतात.प्रवेश घेण्यापूर्वीच आम्हाला सुशांतने येथील गर्दी तसेच पॉकेट मारीची दाट शक्यता असल्याची कल्पना दिली होती. त्यामुळे जवळचे पैसे, पासपोर्ट सांभाळण्याकडे आपोआपच लक्ष केंद्रित व्हायचे. गोरे गोमटे लोक सुद्धा चोर असतात, हे ऐकून आश्चर्य वाटले.

    इटली मध्ये आणखी एक वेगळेपण जाणवले ते सॅनिटरी सिस्टीम मध्ये! टॉयलेट मधील दोन कमोड्सची असणारी पध्दत सुरुवातीला आपल्याला चक्रावून टाकते. तसेच वाॅश बेसिनच्या पाण्याची तोटी चालू बंद करण्यासाठी, आपल्याकडे चार चाकी गाड्यांना जसा क्लच असतो, तसा पायाने चालू बंद करण्याचा क्लच बघून गंमत वाटली. डेंटिस्टच्या पेशंट तपासावयाच्या खुर्चीला अशी पद्धत उपयोगात आणली जाते. हे लगेच लक्षात आले.अशा पद्धतीने कालव्यांच्या शहरात बराच वेळ घालवत, आइस्क्रीमचा आस्वाद घेत पुन्हा वाॅटर बसने आम्ही आमच्या बसथांब्याजवळ जाऊन मुक्कामासाठी पाडोवा येथे आलो.
    हे शहर, येथील हॉटेल जरी चांगले होते, तरी इतर ठिकाणी डिनर किंवा ब्रेक फास्ट ची जशी व्यवस्था होती तशी काही या देशात कुठेच मिळाली नाही, हेच खरे.

    सकाळी काहीतरी खाऊन ब्रेकफास्टचा अनुभव घेतला, आणि पिसा या ठिकाणी जावयास निघालो. रस्त्यात फेरारी गाड्यांच्या म्यूझियम ला भेट दिली.सचिन तेंडुलकरला बक्षीस मिळालेल्या फेरारी गाडी विषयी ऐकले होते.पण या अतिसुंदर म्युझियमला भेट देऊन, १९५९ सालापासून ते, २०१५ सालापर्यंतच्या गाड्यांचे सर्व मॉडेल्स अगदी जवळून बघितले.आवडलेल्या गाड्यांबरोबर फोटो शूटिंग करण्याची हौस भागवून घेतली. 'दुधाची तहान ताकावर' म्हणतात तसेच.

    इटलीतील आणखी काही आकर्षणं बघण्यासाठी येथील लहरी निसर्गाबरोबर पिसा येथे प्रयाण केले. युरोपात आत्तापर्यंत वाजली नाही, तेवढी थंडी, गार हवेच्या रुपांत आम्हाला येथे जाणवत होती. शिवाय मधेच उन्हाचे चटके तर अचानक पावसाच्या सरी, असा अनुभव. आणि निसर्गाचा लहरीपणा येथे जास्त दिसून आला.

    तुलनेने इतर देशांपेक्षा इटलीत अस्वच्छता दिसून आली. याचा मी आवर्जून उल्लेख केला.पण बाकी युरोपात राखली जाणारी स्वच्छता, वाखाणण्याजोगीच.ठिक ठिकाणी डस्टबिन्स. रस्त्यांवर तुम्हाला जराही धूळ, कचरा नावालाही सापडणार नाही. टॉयलेट्स बाथरूम्स अगदी सार्वजनिक ठिकाणची सुध्दा आरशासारखी चकचकीत. पेपर नॅपकिन्स ची मुबलकता. त्यामूळे युरोपात फिरताना स्वच्छता गृह म्हणजे आल्हाददायक अनुभव होता. बऱ्याच ठिकाणी वॉशरुम वापरावयास खिशाला चाट बसायची. पण असे असतानाही टॉयलेट्स मध्ये कमोड स्प्रे ची व्यवस्था न ठेवता,टिश्यू पेपर्स वर एवढा खर्च का केला जातो?हे कोडे काही सुटत नाही. पाण्याची कमी असावी हे पुष्टी देणारे कारण अजिबातच नाही यासाठी. पण ही आपल्याला अजिबात पचनी न पडणारे गोष्ट आहे. हे अगदी खरे.

    भाग ९ समाप्त
    क्रमश:

    © नंदिनी म. देशपांडे.

  • गुलकंदी’ शरद गटणे

    व्यक्ती आणि वल्ली’ मधील ‘पुलं’चा सखाराम गटणे सर्व रसिक वाचकांना परिचित आहे. तो ‘पुलं’चा आज्ञाधारी शिष्य होता, मला भेटलेल्या शरद गटणेंचा मी आज्ञाधारी ‘शिष्य’ आहे!

  • गोमुचा डीसकाउंटेड स्मार्टफोन (गोमुच्या गोष्टी – भाग ३)

    मी ऐकलं होतं की स्मार्टफोनवर बरीच ॲप्स डाऊनलोड करून घ्यावी लागतात. मग ती वापरतां येतात. पण त्यासाठी मला फोनवर कुठेच इंटरनेट सांपडेना. खूप खटपट केली. पण फोनवर ठराविक तीच चित्रं वगैरे दिसायची. टच फोन होता. पण वारंवार टचटच करूनही कांही त्या मोबाईलला दया येत नव्हती.

  • वाचावीत अशी १०० पुस्तके

    मराठीतील १०० वाचनीय पुस्तके..

  • संधिप्रकाशातील सावल्या – ४ : तू भ्रमत आहासी वाया

    गेल्या काही दिवसातल्या संधिप्रकाशातल्या सावल्यांचा गोष्टी अनेकांच्या कानावर गेल्या होत्या. त्यामुळं सगळे उत्सुकतेनं आले होते. उत्सुकता नावालाच, प्रत्येकजण भलंमोठं प्रश्नचिन्ह घेऊन आला होता. पण सुरुवात कुठून करायची हे कुणाच्या लक्षात येत नव्हतं.

  • एक आघात

    या नंतर मात्र पुढील महिन्यात मी एकही कार्यक्रम घेतला नव्हता. माझा सख्खा चुलत भाऊ प्रकाश याचे लग्न १ डिसेंबर १९९१ ला ठरले होते. त्यामुळे जोशी परिवारात प्रचंड धावपळ सुरू होती. लग्न भिवंडीला होते आणि दोनच दिवसांनी मोठ्या स्वागत समारंभाचे आयोजन पुण्याला करण्यात आले होते. दिवस गडबडीत जात होते. लग्नाच्या आदल्या दिवशी म्हणजे ३० नोव्हेंबरलाच आम्ही सर्वजण भिवंडीला रवाना झालो. माझ्या मामाकडेच आम्ही उतरलो होतो. १ डिसेंबरचा दिवस लग्नाच्या धामधुमीतच संपला. संध्याकाळी मी आणि माझी पत्नी प्रियांका स्वागत समारंभाच्या आयोजनात मदत करण्यासाठी काकाबरोबर पुण्याला निघालो. धावपळीने थकून गेल्यामुळे आई आणि भाऊ मात्र एक दिवस विश्रांती घेऊन मगच पुण्याला येणार होते. त्यामुळे ते ठाण्याला परत गेले. १ डिसेंबरला रात्री एक वाजता आम्ही पुण्याला पोहोचलो. हास्य, विनोद, चेष्टा, मस्करी सतत सुरू होती. त्यानंतर गप्पा रंगल्या. शेवटी रात्री अडीच वाजता निजानीज झाली. बरोबर पहाटे सव्वाचार वाजता पुण्याला फोन आला. भाऊंना हार्टअॅटॅक आला होता आणि त्यांना हॉस्पिटलला नेण्यात येणार होते. मी आणि प्रियांका तातडीने ठाण्याला परत निघालो. माझा धाकटा चुलतभाऊ प्रमोद त्याची इंजिनियरींगची परीक्षा सोडून आमच्याबरोबर निघाला. सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. पुण्याहून निघण्यापूर्वीच माझ्या सासऱ्यांचा फोन आला. ते डॉक्टर होते. त्यांनी जे सांगितले ते माझ्यावर विलक्षण आघात करणारे होते. हॉस्पिटलमध्ये नेतानाच भाऊंची जीवनयात्रा संपली होती. फक्त ठाण्याला येईपर्यंत प्रियांकाला आणि इतर कुणालाच हे सांगू नका, अशी त्यांनी विनंती केली. गाडीमध्ये प्रियांका आणि प्रमोद मला समजावत होते की, आपण लवकरच ठाण्याला पोहोचू आणि भाऊही लवकरच ठीक होतील. मी काय बोलणार? मला नशीबाने एकदम पोरके करून टाकले होते. कायम त्यांच्याबरोबरच रहाणारे आम्ही भाऊ गेले त्या रात्री नेमके त्यांच्यासोबत नव्हतो. १ डिसेंबर १९९१ ला आमच्या घरचे लग्न आणि मग २ डिसेंबर १९९१ हा माझ्या आयुष्याला धक्का देणारा दिवस ठरला.स्मशानात जमलेल्या तमाम लोकांसमवेत आम्हां सर्वांना माझे भाऊ निरोप देत होते. त्यांचे असे अचानक निघून जाणे आम्हा सर्वांनाच अत्यंत धक्कादायक होते. मला ते नेहमी सांगत, "आज मी उभा असल्यामुळे माझ्या सावलीत तुला सगळे कसं छान छान दिसतेय. पण एके दिवशी मी नसेन आणि मग तुला सगळं कसं स्वच्छ-स्वच्छं, खरं-खरं दिसायला लागेल." आज तो दिवस आला होता. या एका दिवसाने सारे बदलले. आमचे घर बदलले. माझी आई बदलली. व्यवसाय बदलला. सर्वात लहान प्रियांका एकदम मोठी, कर्ती झाली. भाऊंच्या सावलीत खेळणारे, बागडणारे माझे व्यक्तिमत्त्व, माझे गाणे, माझे बोलणे एकदम प्रौढ झाले.

    भाऊ असताना अनेक सामाजिक संस्थांमध्ये भाऊंशी वादावादी करणारे लोक, भाऊ किती मोठे होते, ते मला सांगायला लागले. भाऊंनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये अडचणी आणणारे लोक त्यांचा स्मृतिदिन साजरा करण्यासाठी आग्रह धरू लागले. भाऊंनी सांगितलेली एक एक गोष्ट आता मला पटायला लागली. ते अनेकदा म्हणत, “आज तुला कदाचित माझे बोलणे पटणार नाही, पण काही वर्षांनी तुला ते नक्कीच पटेल. फरक इतकाच असेल की, ज्या दिवशी तुला ते पटेल आणि तू मला सांगायला येशील, तेव्हा ते ऐकायला मी नसेन."

    भाऊंनी मला काय दिले? या जगात स्वतःच्या हिंमतीवर उभे राहण्याचा आत्मविश्वास दिला. एक भक्कम असा पाया दिला. त्यांनी केलेल्या अनेक सामाजिक कामांमधून जोडलेल्या माणसांचा मदतीचा हात दिला. त्यांचा मी एकुलता एक मुलगा असलो, तरी आई-भाऊंनी माझ्या मागे एक जिवलगांचा प्रचंड परिवार उभा केला. त्यामुळे मला कधीच एकटे वाटले नाही. आज परत भेटले तर भाऊ मला काय सांगतील? सुरेश भटांच्या गझलचा एक शेर ऐकवतील,

    काय सांगावे तुला मी, काय मी बोलू तुझ्याशी,
    राख मी झाल्यावरी, गीते तुला माझी स्मरावी...

    -अनिरुद्ध जोशी

  • माझा चड्डी यार – भाग २

    आम्ही दोघे एकाच वर्गांत व एकाच शाळेत. जिल्ह्याचे ठिकाण बीडचे. असे ऐकले की बीडचे पुर्वीचे नाव चंपावती नगरी होते. तेथेच चंपावती विद्यालय ही शाळा स्थापन झाली होती. त्याच शाळेंत आम्ही दोघे आठवीच्या वर्गांत होतो. त्या वेळी तोच शाळेमधला सर्वांत मोठा वर्ग समजला जाई.

  • ही पण “श्रीं” ची च इच्छा !

    माझ्या आगामी “झंझावात” या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरीतील काही भाग इथे प्रस्तुत करत आहे.