(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • हॅप्पी न्यू Ear

    रोज प्रमाणे एकीकडे दूध कपात ओतत, तर दुसरीकडे सँडविच टिफीन मध्ये भरत रश्मीच्या तोंडाचा पट्टा अखंड सुरू होता . सेंट पीटर्स शाळेत चौथीत शिकणाऱ्या मुलाला अर्थात विहानला आणि ही सगळी हातघाई सुरू असताना सोफ्यावर शांतपणे बसूंन पेपर वाचत बसलेल्या नवऱ्याला म्हणजेच राघवला हे काही नवीन नव्हतं .. कडाक्याच्या थंडीचे दिवस होते त्यामुळें गरम गरम पाण्याचा शॉवर सोडून बाहेर यायचं विहान ला जीवावर आलं होतं.

  • नारळांत पाणी

    देवाची करणी  , नारळांत पाणी
    आगळेंच असलें दुसरें पाहीलें फळ ना कोणी ।।

  • अनपेक्षित धक्का

    नक्षत्रांचे देणे नंतर कार्यक्रम आयोजकांना हे एकदम पटले की फक्त हिंदी मी चांगला गाऊ शकतो. मग मराठी भावगीते, हिंदी चित्रपटगीते यांचे अनेक कार्यक्रम माझ्याकडे आले. हिंदी गझल बरोबरच अनेक कार्यक्रम माझ्याकडे आले. "हिंदी गझल बरोबरच अनेक कार्यक्रमात तुला गाताना पाहून खूप आनंद होतो." माझे गुरू श्रीकांत ठाकरे म्हणाले, "तू एक हजार कार्यक्रमांचे स्वप्न पहातो आहेस हे मला ठाऊक आहे. पण कधी कधी थोडी शंका वाटायची. आता मात्र तुझे स्वप्न नक्की पूर्ण करशील अशी खात्री वाटते.” श्रीकांतजींच्या या शब्दांनी मला जे समाधान लाभले ते शब्दात वर्णन करणे केवळ अशक्य आहे. मी चटकन त्यांना वाकून नमस्कार केला.

    “तुमचा आशीर्वाद असू द्या, मग मी प्रयत्नात कसूर करणार नाही." त्यावर श्रीकांतजी म्हणाले,

    “अरे गुरुचा आशीर्वाद शिष्याबरोबर कायमच असतो. शिष्याने त्यावर अढळ विश्वास ठेवायचा असतो आणि तो सार्थ करायचा असतो.

    श्रीकांतजींची तब्येत अलीकडे ठीक नव्हती. त्यामुळे प्रत्यक्ष गाणे शिकणे थांबले होते. पण वेळोवेळी भेटून त्यांचे मार्गदर्शन मात्र मी घेत होतो. त्यांच्या शब्दांनी नवा हुरूप आला. क्लॅरिअंट इंडिया लिमिटेडसाठी प्रीतमजी घनश्यामानी यांनी माझा गज़लचा कार्यक्रम फरियाज़ हॉटेल, लोणावळा येथील लॉनवर आयोजित केला. ही माझी अत्यंत आवडती जागा आहे. या लॉनवर कार्यक्रम करतांना समोर एक मोठी दरी दिसते आणि पलीकडे चमचम करणारे लोणावळ्याचे अनेक दिवे तर आकाशात तितकेच तारे दिसतात. प्रख्यात निवेदिका मंगला खाडिलकर यांच्यासाठी शिवसेना शाखा बोरीवलीसाठी एक कार्यक्रम केला. माझ्याबरोबर मृदुला दाढे-जोशी, रवींद्र बिजूर आणि सोनाली कर्णिक असे कलाकार होते. कार्यक्रमानंतर खूप उशिरा घरी परतल्यामुळे दुसऱ्या दिवशी बराच उशिरापर्यंत झोपलो होतो. फोन खणखणला आणि मला जाग आली. पलीकडून कोणीतरी सांगत होते. "संगीतकार श्रीकांत ठाकरे यांचे निधन झाले. लगेच दादरला ये." माझा विश्वासच बसेना. केवळ आठ दिवसांपूर्वीच त्यांना भेटलो होतो आणि आज? ताबडतोब दादरला पोहोचलो. माझे मेहुणे विद्याधर यांच्याबरोबर घरी गेलो. वहिनी, जयू, राज सगळे दुःखात बुडाले होते. अनेक मान्यवर मंडळी अंतिम दर्शनासाठी येत होती. भाजपचे केंद्रीय मंत्री प्रमोद महाजन माझ्याबरोबरच प्रवेशले. “फारच धक्कादायक आहे हे," ते म्हणाले. शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अगणित शिवसैनिक आणि असंख्य संगीतप्रेमी यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.

    महाराष्ट्राने एक मोठा संगीतकार गमावला. माझे तर अपरिमित नुकसान झाले होते. श्रीकांतजींबरोबरचा बावीस वर्षांचा सहवास संपुष्टात आला होता. एका वर्षामध्ये माझे दोन्ही गुरू काळाच्या पडद्याआड निघून गेले. घरी परतताना श्रीकांतजींचे शब्द कानात घुमत होते. 'अरे, गुरुचा आशीर्वाद शिष्याबरोबर कायमच असतो. शिष्याने त्यावर अढळ विश्वास ठेवायचा असतो आणि तो सार्थ करायचा असतो.' संगीतकार श्रीकांत ठाकरे यांना सांगितीक श्रद्धांजली वाहणारे दोन कार्यक्रम आम्ही आयोजित केले. एक प्रबोधनकार ठाकरे सभागृह बोरिवली येथे तर दुसरा गडकरी रंगायतन ठाणे येथे. या कार्यक्रमांमुळे हे जाणवले की आता श्रीकांतजी नाहीत, पण त्यांनी निर्माण केलेले संगीत मात्र कायम जिवंत असणार आहे. त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी रसिकांना कायम आनंद देणार आहेत. नाही तरी कलाकार त्याच्या कलाकृतीत कायम जिवंत रहातो हेच खरे. आजही श्रीकांतजींनी स्वरबद्ध केलेल्या गझल गाताना श्रीकांतजी पुन्हा भेटतात. प्रत्येक गझलबरोबर असंख्य आठवणी जाग्या होतात आणि श्रीकांतजींबरोबरचा संवाद पुन्हा सुरू होतो.

    - अनिरुद्ध जोशी

  • कुस्करलेली कळी – उमललेले फुल – १५

    बिकट परीस्थिती बेतली की लहान मुले ज्यास्त खंबीर बनतात. हा निसर्ग नियमच आहे. मौशुही त्याला अपवाद नव्हती जोगना तिची आई व मैत्रीण अशा दोन्ही भूमिका बजावत होती.

  • पर्जन्य काल समीप येता (सुमंत उवाच – १०५)

    सुमंत जयंत परचुरे. 

    पावसाळा जवळ आला, आता नालेसफाई कधी होणार? परत या वर्षी मुंबई तुंबणार का? किती दिवस ट्रेन बंद राहणार पावसामूळे? या सारख्या अनेक चिंता लोकांना सतावू लागतात आणि मग त्यावर काही ठोस उत्तर मिळाले नाही की मग लोकं व्यवस्थापनाच्या नावाने खडे फोडायला सुरुवात करतात.

  • अ. भा. मराठी नाट्य परिषद, ठाणे शाखेचा प्रवाह

    ठाण्यातील समाजातून वेगवेगळे कलाकार निर्माण झाले पाहिजेत हीच जिगिषा, तळमळ मनांत ठेवून वि. रा. परांजपे व सन्मित्रकार स. पां. जोशी या द्वयींनी पुढाकार घेऊन अ.भा.म.ना. परिषद, ठाणे शाखेची स्थापना १ ऑक्टोबर १९७९ रोजी केली. तो विजया दशमीचा शुभ दिवस होता.

  • एक पाऊल ओल्या वाळूंत – भाग १

    “लक्ष्मी“ असं तिचं नांव होतं. लक्ष्मी म्हणजे संपत्तीची देवी. कौतुकाने त्या नावाचं रूपांतर ‘लक्की’ – इंग्लिशमध्ये “सुदैवी’’ किंवा “नशीबवान” असं झालं. हे नांव सोपं, सुटसुटीत आणि लक्षांत रहाण्यासारखं होतं. तिच्या वडलांना – श्री.रंगनाथ पै यांना ते समर्पक वाटलं होतं. तिच्या आधी जन्मलेली चार मुलं बाल्यावस्थेत मरण पावली होती. सहाजिकच तिच्या आईवडलांना तिच्यावर जास्त माया होती शिवाय तिच्या जन्मानंतर रंगनाथ पै यांच्या हाटेलच्या धंद्यात भरभराट झाली आणि ते अधिक श्रीमंत झाले.

  • व्याख्या ज्या हसवतील…..

    तुम्हाला हमखासपणे हसवणार्‍या नव्या युगातल्या या नव्या व्याख्या…..

  • आय लव्ह यु …

    विजय ! म्हणजे तुझा लग्नसंस्थेवर विश्वासच नाही ? यामिनीने विचारलेल्या या प्रश्नात जोर होता. त्यावर विजय म्हणाला, ‘ लग्न संस्थेवर माझा विश्वास नाही असं मी म्हणालो तर तू म्हणशील अरे लग्नसंस्था नसती तर तुझा जन्मच झाला नसता हा आता तू जो विचार करतोयस तो वेचार करायला ! पण मी स्पष्टच सांगतो ! कुत्री मांजरे कुठे लग्न करतात तरी त्यांचा वंश वाढतो ना ? आमचा वंश वाढवा म्हणून आम्ही लग्न करतो ! अरे पण वाढलेला वंश पाहायला असतो कोण ? तसही म्हणतात की प्रत्येकाचा वंश दहा पिढ्या झाल्या की संपतो. तुला सांगतो कालच मला माझ्यापेक्षा आठ दहा वर्षांनी लहान असणारा मित्र भेटला होता समाजाच्या नजरेत अंत्यत साधा भोळा भोळसट पण त्याने जे जे उकिरडे फुकले आहेत त्याबद्दल ऐकून मला पेलाभर पाण्यात डुबून मरावस वाटत होत. प्रत्येक आईवडिलांच्या नजरेत आपली मुलं धुतल्या तांदळाची असतात पण ती तशी असतातच असं नाही, आजचे आई- वडील आपल्या मुलांची लग्ने ठरवत नसतात तर फक्त नगाला नग जुळवू पहात असतात. त्यातही अज्ञानामुळे चुकीचे नग जुळवितात.

  • माझी घोडसवारी

    साल कुठलं नेमकं आठवत नाही पण उन्हाळ्याच्या सुट्टीत आत्याच्या गावी गेलो होतो.नुकताच नोकरीला लागलो होतो.सकाळच्या अकरा वाजल्या असतील . इकडच्या तिकडच्या गप्पा चालू होत्या रविवारचा दिवस असल्याने डवरी पतर भरण्यासाठी ( वाळलेल्या भोपळ्याचे पात्र,डमरु त्रिशूळ वगैरे घेऊन) भिक्षा मागण्यासाठी आला होता.त्यांच वय बरंच झालं होतं पण तरीही ते घोड्यावरून फिरत असतं.मला नवागत बघून विचारलं.