नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
या दोन-तीन महिन्यानंतर मी गाण्याचे काम पुन्हा सुरू केले. विवेक देशपांडे यांच्या ‘निष्पाप’ या मराठी चित्रपटासाठी विश्वास पाटणकर यांच्या संगीत दिग्दर्शनामध्ये मृदुला दाढे-जोशी बरोबर एक द्वंद्वगीत मी रेकॉर्ड केले. याचवेळी विश्वास पाटणकर यांचा मुलगा मिथिलेश पाटणकर याने कवी ग्रेस यांच्या गाण्याला त्याने बांधलेली अतिशय सुंदर चाल ऐकवली. मिथिलेश त्यावेळी शाळेत होता. सातवी-आठवीत असेल. पण उत्तम संगीतकाराचे गुण वडिलांकडून जन्मजातच त्याने घेतले होते
समर चे वडील म्हणजेच किशोरीलाल पाठक हे शिस्तीचे दुसरं नाव होतं. भरतपूर मधल्या सरिता आश्रम आणि त्या आश्रमाच्या शाळे साठी त्यांनी आपलं उभ आयुष्य वेचलं होतं. शाळेत गणित आणि शास्त्र हे विषय शिकवताना त्यांनी केवळ अभ्यास एके अभ्यास आणि शिस्त हेच दोन मार्ग अवलंबले होते.. अर्थात शाळेच्या ह्या शिस्ती मध्ये घरात देखील एकुलत्या एक समर साठी कसली ही सवलत नसायची , जो अभ्यास आणि शिकवण शाळेतील इतर मुलांसाठी होती तीच समर साठी असायची .

काल हस्तकलेचा तास होता. वर्गातल्या मुलांनी रंगीबेरंगी जाड कार्डशीटचे कागद आणले होते. मुले म्हणाली आज आम्ही या कागदाचा ट्रे करणार आहोत. तर काही मुले म्हणाली आम्ही कागदाचं छोटसं भांडं करणार आहोत. इतक्यात सिमरन म्हणाली, “या कागदातून तुमच्यासाठी काय करू?” आता बाकीची मुलेपण चिवचिवू लागली. “सर्वांनी मिळून माझ्यासाठी, काडेपेटीच्या आकारापेक्षा थोडसं मोठं असं कागदाचं भांडं तयार करा. पण लक्षात ठेवा हे भांडं करताना कुठेही गोंद वापरायचा नाही. कागदाच्या घड्या घट्ट घालायच्या आणि गोंदाऐवजी दोन पेपरक्लीप वापरायच्या. असं म्हणताच मुले म्हणाली, ‘नक्की!’ पण तरीही हात उंचावत रोहन म्हणाला, “पण गोंद वापरला तर काय होईल?” या प्रश्नावर वर्गात शांतता पसरली.
या भूकंपाची महत्ता रिश्टर मापक्रमानुसार ७.५ होती. या धक्क्यामुळे कोयना धरणाला कोणताही गंभीर धोका पोहचला नाही. फक्त धरणाच्या भिंतीवरचा निरीक्षण मनोरा पडला व कोयनानगरमधील कच्च्या बांधणीच्या सर्व इमारती पडल्या.
संगीताची ताकत आपल्याला आनंदी किंवा दुःखी करून जाते. काहीवेळा कार्यालयातून दमून-भागून घरी यावे आणि आरामखुर्चीत विसावत हाती कॉफीचा मग घ्यावा आणि कानांवर मस्त संगीत असावं, एवढंच मर्यादित सुख आपल्याला अपेक्षित असते. उत्तम संगीत आपल्या जीवनाच्या सगळ्या परिघांना (शारीरिक, मानसिक, भावनिक) स्पर्शून जाते. संगीत प्रत्येक सहृदय व्यक्तीच्या मनाचा एक अदृश्य भाग असते आणि सांस्कृतिक वास्तव तसेच वारसाही असते.
दोन क्षणिका -साजण/ सजणी तुलना – (१) डास/ (२) वीज
त्या वेळी फक्त दूरदर्शन होते. तेही जेमतेम चार तास. त्यामुळे आज दिसणारी इतर मराठी आणि हिंदी चॅनेल्स आणि त्यावर होणाऱ्या झी सारेगमप आणि इंडियन आयडॉलसारख्या संगीत स्पर्धा त्यावेळी अस्तित्वातच नव्हत्या. आज या गोष्टीचे आश्चर्य वाटेल कदाचित. पण १९८० साली ही वस्तुस्थिती होती. त्यामुळे संगीतामध्ये पुढे येण्यासाठी धडपडणाऱ्या माझ्यासारख्या मुलामुलींना आंतरमहाविद्यालयीन गायन स्पर्धा हाच पर्याय उपलब्ध होता. सायन मेडिकल कॉलेजमध्ये शिकत असलेल्या डॉ. महादेव भिडे आणि डॉ. मुकुल आचार्य या माझ्या मित्रांनी त्या कॉलेजमध्ये आयोजित होणाऱ्या अश्वमेध या स्पर्धेबद्दल सांगितले आणि त्या स्पर्धेत मी भाग घ्यावा असा आग्रहही केला. आमच्या कॉलेजतर्फे मी या स्पर्धेत गाण्यासाठी गेलो. ही स्पर्धा माझ्या पुढील आयुष्यात किती मोठे परिवर्तन आणणार आहे याची पुसटशी कल्पनादेखील त्यावेळी मला नव्हती. स्पर्धा बरीच मोठी होती. जवळजवळ 142 गायक-गायिका या स्पर्धेत गाण्यासाठी आले होते. या स्पर्धे चे एक परीक्षक होते संगीतकार श्रीकांत ठाकरे. सुप्रसिद्ध गायिका शोभाताई गुर्टू यांनी त्यांच्या गायलेल्या 'उघड्या पुन्हा जहाल्या जखमा उरातल्या' 'माझिया प्रियाला प्रीत कळेना' यासारख्या गझलांचा मी फॅन होतो. त्या आणि सुमारास सौ. मानसी कणेकर या गायिका गझल शिकवण्यासाठी माझ्या घरी येत असत. श्रीकांतजींना परीक्षक म्हणून पाहिल्यावर मी या स्पर्धेत एक गझल गाण्याचा धाडसी निर्णय घेतला. स्पर्धा सकाळी 9.30 वाजता सुरू झाली. माझा गाण्याचा क्रम दुपारी सुमारे 12 वाजता लागला. मी रंगमंचावर गाण्यासाठी बसलो. गझलच्या सुरवातीला दोन ओळींचा एक शेर पेश केला आणि आता गझल सुरू करणार तोच सभागृहातील वीज गेली. त्यामुळे दिवे आणि मुख्यतः साऊंड सिस्टिम बंद पडली. दोन मिनीटे मी स्टेजवरच बसून राहिलो. इतक्यात तो बंद पडलेला वीजपुरवठा परत सुरू झाला आणि परीक्षकांनी मला पुन्हा गाण्याची खूण केली. मधल्या दोन मिनिटात मी त्या शेरची वेगळी चाल मनात बांधून ठेवली होती. तेव्हा पुन्हा संधी मिळताच मी त्या सुरवातीच्या शेरच्या दोन ओळी निराळ्या चालीत पेश केल्या आणि गझलला सुरवात केली. आयत्या वेळच्या माझ्या प्रयोगामुळे मला भरपूर टाळ्या मिळाल्या आणि मी आनंदात गझल पूर्ण करून रंगमंचावरून उतरलो. स्पर्धा पूर्ण झाल्यावर निकाल जाहीर करण्यासाठी श्रीकांत ठाकरे रंगमंचावर आले. मला बक्षीस मिळणार अशी मला आशा होती. एकूण पाच बक्षिसे होती. ठाकरेसाहेबांनी शेवटून नावे जाहीर करायला सुरुवात केली. पाच-चार-तीन-दोन. नावे जाहीर झाली. पण मला बक्षीस नव्हते. हार्मोनियमची साथ करणाऱ्या विवेक दातारकडे मी प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले. तोच श्रीकांतजीचे शब्द माझ्या कानावर पडले. 'या स्पर्धेच्या पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक मी त्या मुलाला देत आहे, ज्याने आयत्यावेळी गाण्यात खंड पडल्यावरही त्याचा फायदा घेऊन गझलच्या आधीचा शेर निराळ्या चालीत सादर केला. अनिरुद्ध जोशी.' मला अतिशय आनंद झाला. आज माझ्या आवडत्या आणि नावाजलेल्या संगीतकारांच्या हस्ते मला पारितोषिक मिळणार होते. श्रीकांतजींनी माझे अभिनंदन केले. माझी विचारपूसही केली आणि त्यांच्या घरी गाणे ऐकवण्यासाठी येण्याचे निमंत्रण दिले. हे त्यांचे निमंत्रण माझे आजचे सगळ्यात मोठे पारितोषिक होते.
- अनिरुद्ध जोशी

लेखक म्हणून मी जेव्हा लिहायला लागलो तेव्हा कथानकं , मांडणी , शैली , पात्रं , प्रसंग , संवाद यांचं महत्व काय आणि कसं असतं , त्यात शब्दांचा वापर किती जपून करावा लागतो हे अर्थातच आपोआप मनावर ठसलं गेलं होतं. वादविवाद स्पर्धा , वक्तृत्व स्पर्धा आणि परीक्षेच्या काळातही गुरुवर्य बाबीराव गोडबोले सरांच्या घरातील ज्ञानभांडाराचा मला खूप उपयोग झाला. – उगवतीच्या काळातील ह्या कळा विसरता येत नाहीत .
अनेक जन्मानंतर मानवी जन्म मिळतो असे म्हणतात. सृष्टितील सर्व जीवसृष्टित मानवी जन्म हा सर्वश्रेष्ठ बुद्धिजीवी जन्म मानला जातो परमेश्वराने माणसाला विवेकबुद्धी, वाचा, स्मरणशक्ती, श्रद्धा, भक्तिप्रीती, वात्सल्य, जिव्हाळा, निःस्पृहता, निर्मलता, विश्वास, त्याग, कृतज्ञता, नम्रता, परोपकार, साहस अशा अनेक सुसंस्कारी संस्कारशक्ती जन्मताच प्रदान केल्या आहेत.
त्याच संस्करण होण म्हणजे संस्कार!!
संस्कार हे करून होत नाहीत ते घडावे लागतात त्यासाठी जीवनात उत्तम विवेकी सहवास लाभावा लागतो.
जन्मता:च आपल्याला मातृपितृत्वाच्या वात्सल्याचा दैवी स्पर्श होतो ही ईश्वरीय लीला आहे आणि आपले जीवन सुरु होते हे वास्तव आहे. घरात आईवडिल तर बाहेरील जगगात गुरुजन, नातेवाईक,शेजारी, पाजारी, मित्रत्व यांचा नैसर्गिक सहवास लाभतो आणि आपल्याला शिशु, शैशव, बाल्य, पौगण्ड, तारुण्य, ग्रहस्थ, वृद्धत्व ही जीवनावस्था लाभते हे वास्तव आहे.
माझी ९० वर्षाची प्रसन्न वदनी सुंदर अशी सरस्वती नावाची पणजी होती. अगदी तरतरीत पहाटे ३।। लाच उठायची. आकाशाकड़े पाहुन नमस्कार करायची, बाजेवरुन खाली जमिनीवर पाय ठेवताना रोज ' पादस्पर्शम क्षमस्वमे ' म्हणायची, तळहात चोळून चेहरा उजळून ' कराग्रे वसते लक्ष्मी ' म्हणायची .
या तिच्या संस्कारी आचरणाने तीचं सारं आयुष्य सर्वार्थानं कृतार्थ झालं..! अगदी निरोगी, निरामय सुखानंदी झालेलं हे मी स्वतः पाहिले आहे. तिची लौकर उठण्याची व तो मंत्र म्हणण्याची सवय आजही मला तिच्याच संस्कारी सहवासामुळे लागली.
तो संस्कारी सहवास मला माझ्या शिशु अवस्थेत लाभला. आजही स्मरतो आहे. हे स्मरणीय, उदात्त अनुभव म्हणजेच संस्कार..!!
आजच्या वास्तव कलियुगात समृद्धी आहे, पण अपेक्षित मन:शांति, समाधान नाही. नाती, मैत्र, प्रेम, आस्था, जिव्हाळा काहीच उरले नाही. माणसातील माणुसपण, आज हरवले आहे. याला कारण एकच संस्कार आणि संस्कृतीचे अध:पतन, ह्रास झालेला आहे. त्यासाठी पारंपारिक संस्कारांचे बीजारोपण सर्वत्र होणे अनिवार्य आहे. मानवी जीवनात संस्कारांच महत्व अनन्य साधारण आहे. जीवनाच्या आदर्श नीतिमुल्यांचा बीजांकुर हा सुसंस्कारातच आहे हे निर्विवाद..!!!
जीवात्म्याच्या गर्भधारणेपासुनच संस्कारांच महत्व आहे. म्हणूनच संस्कारांचे संस्करण होणं ही आपल्या सुखी जीवनातील इतिकर्तव्यता आहे संसारत प्रत्येकाला आपलं कुटुंब, मुलं उत्तम, कर्तुत्वसंपन्न होवून सदैव सुखऐश्वर्यात रहावित असे वाटत असते. आणि असे सुंदर उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी त्या मुलांवर उत्तम संस्कार होणेही गरजेचे असते. पूर्वी हे घडतही असे कारण पूर्वी घरातील वातावरण किंवा सहवास देखील संस्काराला पोषक असा होता.एकत्र कुटुंब पद्धती नांदत होती निश्चिंतता होती.
आजकाल विज्ञानामुळे आकाशात उंच उड़णे, सातासमुद्रापार सहज जाणे सारे जग कवेत घेणे हे आता मानवाला जमले आहे. पण कल्पनेला सहेली बनवून विवेकाच्या वाटाडयाला सोबतीला घेवून जमिनीच्या मातीवर संयमाने तोल सांभाळून चालणे देखील जमणे गरजेचे आहे. त्यासाठीच मात्र उत्तम संस्कारांची आवश्यकता आहे.
भौतिक सुखानं सारं जग आज सुखाधिन समृद्ध झाले आहे. पण माणसातली परस्पर आत्मिक आनंद देणारी ओढ़, आत्मीयता, नाती, प्रेम, वात्सल्य, संवाद पूर्णत्वाने लयास गेल्याचे जाणवते आहे. याचा विचार सर्व सुजाण व्यक्तिन्नी केला पाहिजे.
केवळ संस्कारांच्या कथा, गोष्टी ऐकुन किंवा वाचून संस्कार होत नाहीत. तर संस्कार हे सहवासातूनच घडावे लागतात. त्यासाठी उत्तम सहवास लाभणे महत्वाचे असते. हे सुंदर सत्य आहे. भारतीय संस्कृतीमध्ये सोळा संस्कारांचे महत्व विशद केले आहे. मानवी जीव सर्वार्थाने आदर्शभूत कसा असावा त्या साठी साऱ्या जीवनात संस्कार कोणते असावेत याचे मूल्यमापन या सोळा संस्कारातून केलेले दिसून येते.
कुठलीही व्यक्ती कधीही घाणीच्या साम्रज्यात राहू इच्छित नाही. तिला सुंदर मोहक वातारणात, सुखात रहायला आवडते हा मानवी स्वभाव प्रकृती आहे. मग अशावेळी सर्वच दुर्गुणांचा तसेच दुष्प्रवृत्तीचा समूळ त्याग करून फक्त सगुण सदगुणांची कास धरणे हे उत्तम संस्कारांचे कल्याणकारी लक्षण आहे. द्योतक आहे. आणि असे उदात्त जीवन उत्तम सुसंस्कारित सहवासातूनच लाभते.
याचे उदाहरण देताना......
गुरुवर्य डॉ. न.म.जोशी सरांनी एका कार्यक्रमात सांगितलेली एक गोष्ट सांगून मी हा लेखांक थांबवीत आहे. एका गावात, एका मोठ्या वाड्यात एक सद्गृहस्थ रहात होते. आपल्या घरातील देवपूजा ते रोज करत असत. रोज प्रात:काळी उठायचे . स्नानग्रहात जाताना वाड्याच्याच अंगणात असलेल्या बागेतील फुले काढून आणण्यासाठी सुंदर फुलांची परडी घेवून जात असत.
शुचिर्भूत स्नान झाले की त्या परडीत पत्री, फुले,बेल, तुळस गोळा करून आपल्या वाडयातील माजघरात असलेल्या देवघरात येवून यथासांग मनोभावे देवपूजा करीत असत. ही त्यांची श्रद्धेय दिनचर्याच होती.पण एक दिवस ते अनावधानाने ते नित्याची फुलांची परडी घेवून जाण्यास विसरतात. वयस्कर असल्यामुळे पुन्हा स्नानगृहातून माजघरापर्यंत परत येवून ती फुलांची परडी घेवून येण्याचा कंटाळा करतात. पर्याय म्हणून नेहमी प्रमाणे स्नान झाल्यावर आपल्या अंगावरच्या उपरण्याचा सोगा करून त्यातच फुले, पत्री वगैरे गोळा करतात माजघरात देव्हाऱ्यापाशी येतात नेहमी प्रमाणे यथासांग पूजाही करतात. एव्हड्यात त्यांचे एक परमस्नेही घरात त्यांना भेटावयास येतात. ते मित्र दिवाणखान्यात बसलेले असतात. त्यांना सुंदर सुगंध येत असतो. तिथुनच ते त्यांच्या मित्राला विचारतात " अरे दत्ता केवढा सुंदर सुवास येतो आहे अरे कुठले अत्तर तू लावलेले आहेस ?
तेंव्हा दत्तोपंत म्हणतात नाही रे बाबा मी कुठलेच अत्तर लावलेले नाही. पण अरे मी आज सकाळी आंघोळीला जाताना फुलांची परडी नेण्यास विसरलो होतो. म्हणून आज या उपरण्यातच फुले गोळा करून आणली . त्या पारिजात, गुलाब, चाफा, मोगरा, बकूळ फुलांचाच सुगंध या उपरण्याला येतो आहे, मीही आज मोहरुन गेलो आहे.........
मित्रहो, त्या उपरण्यात काही क्षण फुले गोळा झाली तर त्या फुलांचा सहवास त्या उपरण्याला लागला आणि *ते उपरणं सुगंधित झालं !!!
सात्विक गंधित संस्कार त्या उपरण्यावर झाला. तेंव्हा जीवनात तुम्हाला लाभलेल्या सुंदर, विवेकी निर्मोही, निष्पाप, प्रेमळ, आणि वात्सल्यपूर्ण सहवासाचा संस्कार तुमचं जीवन सर्वार्थाने सुंदर कृतार्थ करीत असतो. म्हणून विवेकी, वैचारिक उत्तम सहवासात राहण्याचा प्रयतन मनुष्याने करावा.
हे मात्र खरं.!!
असा सहवास लाभणं देखील एक दैवयोग असतो
हेच संस्कारांचे महत्व आहे....
इति लेखन सीमा
– वि.ग.सातपुते. (साहित्यिक)
अध्यक्ष, महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे
दिनांक : २५-७-२०२२
कवटी फुटल्याचा आवाज झाला. रात्र गारठत होती. सगळी मंडळी आपापली बूड झटकत त्या मसणवट्यातून उठून घराकडे निघाली. त्याला झाडाआडून दिसत होते. चितेच्या लाकडांनी चांगलाच पेट घेतला होता. सर्वत्र सामसूम झाल्याची खात्री करून, तो अंधारातून बाहेर आला. चितेजवळ जाऊन बसला. त्या लाल ज्वाळांचा प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर उष्ण हवेचे झोत मारत होता. क्षणभर त्याला त्या उष्ण लहरी काहीतरी सांगताहेत असे भासले.
Copyright © 2025 | Marathisrushti