नारळांत पाणी

देवाची करणी  , नारळांत पाणी
आगळेंच असलें दुसरें पाहीलें फळ ना कोणी ।।



(नारळीपौर्णिमेनिमित्त बालकाव्य)

(चाल : बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना)

देवाची करणी , नारळांत पाणी

आगळेंच असलें दुसरें पाहीलें फळ ना कोणी ।।

नारळाला पाहुन्

करीं फळाला पकडुन्

आश्चर्यचकीत होती

सगळे, गुण याचे ऐकुन् ।

सगळे, गुण याचे ऐकुन् ।

दगडासम हा बाहेरुन्

पण अति-मृदु असतो आतुन्

म्हणुनच कां पसंत केलें

नर-वानर-देवांनी ?

नर-वानर-देवांनी ?

नारळा श्रीफळ म्हणती

अतिशय पवित्र गणती

देवाची आरती होतां

त्याचा प्रसाद वाटती ।

त्याचा प्रसाद वाटती ।

नारळात गोड पाणी

खोबरेंही साखरेवाणी

तृप्ती, संतोष मिळती

सेवन दोहोंचें करुनी ।।

सेवन दोहोंचें करुनी ।।

नारळ आणीन मी

शेंडी काढीन मी

नैवेद्य दाखवूनी

सर्वां देईन मी ।

सर्वां देईन मी ।

चवीनें खोबरें खाइन्

अमृतसम पाणी पीइन्

वाखाणिन निसर्गाच्या

चमत्काराची करणी ।।

चमत्काराची करणी ।।

– – –

— सुभाष स. नाईक
Subhash S. Naik

Author