नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

जयराम शेट यांचं आयुष्य एखाद्या चित्रपटासारखं होतं. त्यांच्या आयुष्यात सगळे रंग होते म्हणजे असं म्हणता येईल की हा माणूस आयुष्य भरभरून , उत्साहात , आनंदात आणि दिवसरात्र काबाड कष्ट करून जगला होता. ज्याला आपला आदर्श ठेवावा असा उद्योगपती होता.
प्रसिद्ध लेखक व पु काळे त्यांच्या वपुर्झा या पुस्तकात असं म्हणतात कि, माणसाला काही ना काही छंद हवा. स्वप्नं हवीत. पुरी होणारी किंवा कायम अपुरी राहणारी. त्यातून तो स्वतःला हरवायला शिकतो. सापडायला शिकतो. हे ‘हरवणं-सापडणं’ प्रत्येकाचं निराळं असतं.
१९६४ च्या “शगुन ” मधील खय्याम ने संगीतबद्ध केलेलं हे गीत त्याच्या पत्नीने (जगजीत कौर ने) गायलेलं ! गीतकार- हिंदीतला आजवरचा ऑल टाइम ग्रेट – साहीर ! (त्याच्या नंतर गुलज़ार , मग जावेद , मग निदा फाजलीं – ही माझी यादी )
“याच सुमाराला पप्पांच्या एका नातेवाईकाने डाव साधला. रमेश कामत असं त्याचं नांव. त्याचाही हॉटेल व्यवसाय होता. माझ्या आईशी लग्न व्हावे अशी त्याची इच्छा होती, म्हणजे त्याकाळी त्याला भरपूर हुंडा मिळाला असता, शिवाय आजोबांची इस्टेट. पण दामू आज्जांनी मम्मीकरतां पप्पांची निवड केली हे त्याला खटकलं होतं. त्यांने गोड बोलून पप्पांकडून पर्सनल सिक्यूरिटी पेपर्स वर सह्या घेतली व तो पैसे खाऊन परागंदा झाला. पप्पांकडून बॅंकेने पैसे वसूल करून घेतले. पप्पाना वाईट परिस्थितीला तोंड द्यावं लागलं. अशावेळी सिक्वेरा साहेबांनी मला मदत केली. त्यांचं सर्व कर्ज फेडलं.”
” त्याची उतराई करण्याकरता तूं सिक्वेरा साहेबांशी लग्न केलंस, होय नां ?” सुरेशचा प्रश्न.
“सिक्वेरा साहेबांना एक मुलगा होता. विल्यम्स सिक्वेरा. तो कँंसरने आजारी होता. त्याच्या आईने- सिक्वेरा साहेबांच्या दिवंगत पत्नीने विल्यमचं लग्न करून देण्याची जबाबदारी सिक्वेरा साहेंबावर टाकली. शिवाय त्यांच्या वाटेची प्रॉपर्टी भावी सुनेच्या नांवाने करण्याची अट घातली. त्यांच्या निधनानंतर सिक्वेरा साहेबांना मला विचारल. मी होकार दिला. विल्यम्स शी माझं लग्न झालं. त्यानंतर दोनच महिन्यानंतर तो वारला. सिक्वेरा साहेब अलीकडेच वारले. त्यांची प्रॉपर्टीही माझ्या नांवाने झाली…..”
शेवटी काहीही नवीन पर्यायी पदार्थ आले तरी देखील आपण दोन भेळींची ऑर्डर दिल्यानंतर भेळवाला मुठीने मुरमुरे त्या पातेल्यात टाकण्यापासून ते शेवटी मोजून चारच खारेदाणे भेळीवर टाकेपर्यंत त्याच्या हस्तकौशल्याकडे पहात राहण्यात जी मजा आहे, ती शब्दांत वर्णन करणे अशक्य आहे.
नायिका म्हणून तिचा पहिला चित्रपट होता, ‘रिक्शावाला’ तो काही फारसा चालला नाही. ‘यादों की बारात’ या मल्टीस्टार चित्रपटात तिच्यावर ‘लेकर हम दिवाना दिल.’ हे गाणं चित्रीत केले गेले. या गाण्यामुळे तिला प्रसिद्धी मिळाली व चित्रपट निर्मात्यांची तिच्यासाठी रांग लागली.
‘साहित्यिक’ ज्ञानेश्वर आणि वाङ्मयीन भाषा-वैविध्य व त्या अनुषंगानें एकाच रचनाकाराच्या भिन्नभिन्न भाषास्वरूपाची , (आणि अन्य क्षेत्रातील सृजनशील व्यक्तीँची) उदाहरणें यांची ओळख करुन देणारे सदर….
” ओ मेरे सनम ——– ” शिवरंजनी मधील ही श्रवणीय रचना कायम लक्षात राहिली आहे ती अनेक कारणांनी ! मोडतोड झालेलं नातं ( गुपित फुटल्यानंतरचं) सांधण्यासाठी वैजयंती सहारा घेते शिवरंजनीचा ! शैलेंद्रचे घायाळ आणि नेमके क्षमायाचना करणारे शब्द ! कधी नव्हे ते शिवरंजनीच्या सुरावटीला सतारीची साथ ( तेथे व्हायोलिन वगैरे अधिक जुळलं असतं कदाचित), वैजयंतीचे नृत्य आणि लताचा स्वर. तिची सुरुवातीची आलापी जीवघेणी आणि येऊ घातलेल्या प्रसंगाचा मूड सेट करणारी.
कुणाला वडिलोपार्जित मालमत्ता भरपूर मिळते तर कुणाला काहीच मिळत नाही. पण आडनावाचा वारसा मात्र नको असला तरी मिळतो. आडनाव कसंही असलं तरी ते जन्मभर आपल्या नावासमोर लावावंच लागतं. काही आडनावं भारदस्त असतात तर काही लाजिरवाणी असतात.
मागच्या लेखात सेल्फी बद्दल लिहिले तेव्हा अनेक लोकांनी प्रतिक्रिया भेटल्यावर दिल्या , तर कोणी फोन केला. विशेषतः तरुण मुलांना बरे वाटले निदान सेल्फिची थोडी तरी बाजू कोणी मांडणारा आहे. काही सत्य असतात ती कधीच लपवता येत नाही प्रत्येकजण आपापल्या कुवतीनुसार त्याचे विश्लेषण करतो किवा समर्थन-विरोध काहीही असू शकतो.
Copyright © 2025 | Marathisrushti