(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • सेवाव्रती

    कर्माशी निष्ठा ठेऊन निर्मोही आचरण करत निवृत्त होणाऱ्या असंख्य पोलिस कर्मचाऱ्यांचे परब जमादार हे एक प्रातिनिधिक उदाहरण. खिसा कसा कापला आहे हे पाहून कोणत्या ‘लाईन’ वरचा आरोपी आहे हे ओळखणारे , कडी कशी तोडली आहे हे पाहून आणि चोराने काय नेलं या पेक्षा काय सोडून गेला हे पाहून आरोपींचा नेमका अंदाज बांधणारे आणि काही तासात केस उघडकीला आणणारे unsung heroes या DCB CID ने पाहिले आहेत.

  • ठाण्याचे अभिनेते

    सहा दशकांची नाट्यपरंपरा लाभलेल्या ठाणे शहरात होऊन गेलेल्या आणि सध्या रंगभूमीवर आपल्या अभिनयाची जादू दाखवणाऱया सर्व अभिनेत्यांची दखल घ्यायची तर त्यासाठी स्वतंत्र ग्रंथच लिहावा लागेल. नाट्यसंमेलनाच्या स्मरणिकेच्या माध्यमातून ठाण्यातील काही निवडक, प्रातिनिधीक अभिनेत्यांचा घेतलेला हा ओझरता आढावा.

  • खरे सुख अंतरी

    सुख हे मृगजळ, फसविते सर्वांला खेळ चालतो त्याचा, चकविणे मनाला …१,
    बाह्य वस्तूंचे सुख, क्षणिक असते,

  • टॅटू

    अरे हे काय गोंदवून घेतलंस दंडावर?? एका मित्राला त्याच्या दंडावर केलेली रंगीबेरंगी कलाकारी अभिमानाने दाखवत असताना बघितल्यावर विचारले. रंगीबेरंगी नव्हतं फक्त लाल आणि काळपट हिरव्या रंगात कसली तरी सिँहाच्या तोंडासारखी आकृती होती.

  • एकटी

    तिचं “घड्याळ” सुद्धा “त्यांच्याच वेळेप्रमाणे” चालायचं …. दिवसामागून दिवस जात होते ….सुरवातीला सोसायटीत , शेजारी पाजारी, देवाधर्माचं करण्यात किंवा TV बघण्यात थोडा वेळ जायचा पण जसं वय वाढू लागलं तसा त्या सगळ्याचाही उबग येऊ लागला , “एकटेपणा” जाणवू लागला …. आपली हक्काची आणि जवळची माणसं दूर असल्याची खंत वाटू लागली

  • साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग १२)

    यातूनच साहित्य , कला संस्कृती यांची जवळीकता , अभिरूची जन्माला आली .. त्यात आणखी जी भर पडली ती माझ्या मुद्रणाच्याव्यवसायामुळे कारण प्रत्यक्षात अनेक साहित्यिक भेटण्याची त्यांच्या सह्या घेण्याची संधी मिळाली .. तेंव्हा पासुनच ही साहित्याभिरूचीची मशागत ही माझ्या पौगण्डावस्थेपासुुनच सुरु झाली हे स्व. कवयित्री शांताबाईं शेळके यांचे वाक्य आज सार्थ वाटते .!… जीवनाला सर्वार्थानं पोषक असा मार्गदर्शक सहवास योगायोगाने लाभला …हेच परमभाग्य ! घरातील वातावरण देखील याला कारणीभूत होते ..!!!!

  • ब्लाइंड स्पॉट

    आज आमच्या आईच्या कौतुक सोहळ्यासाठी तुम्ही आवर्जून आलात त्यासाठी सगळ्यांचे खूप आभार. तशी ती इथल्या प्रत्येकाची बहीण, मामी, मावशी, आत्या , मैत्रीण अशी कोणी ना कोणीतरी आहेच. तिच्यावरच्या प्रेमापोटीच तर तुम्ही इतक्या आयत्या वेळेस कळवून सुद्धा आला आहात पण तरीही सगळ्यांना प्रश्न पडला असेलच की आज हे तिचं कौतुक नेमकं कशासाठी आहे ??? …. ती काही कोणी मोठी उद्योजिका किंवा मोठ्या हुद्दयावर वगैरे नाही.

  • रेकॉर्डिंग आणि अल्बम

    ठाणे जिल्हाप्रमुख आणि आमदार एकनाथ शिंदे यांच्या लग्नाच्या २५व्या वाढदिवसानिमित्त गाण्याचा कार्यक्रम मी सादर केला. दुसऱ्या दिवशी सकाळी संगीतकार चिनार खारकर भेटायला आला. गेल्या वर्षीच्या चित्रपट 'मानसन्मान' नंतर आम्ही एकत्र काम केले नव्हते.

    "सर आपण नव्या पद्धतीच्या हिंदी गाण्यांचा अल्बम करू या. यात गझल नसतील. तुमच्या नेहमीच्या स्टाईलहून अगदी वेगळ्या रचना असतील." चिनार म्हणाला. प्रियांकाही ॲकॅडमीत होती. तिने ही कल्पना उचलून धरली आणि आम्ही एका नव्या अल्बमच्या तयारीला लागलो. लवकरच २० एप्रिल २००९ रोजी या अल्बमचे पहिले गाणे माझ्या आवाजात रेकॉर्ड झाले. यानंतर कौस्तुभ सोनाळकर या तरुण संगीतकारासाठी मी एक हिंदी गाणे रेकॉर्ड केले. जून २००९ मध्ये चिनार-महेशने दोन नवी हिंदी गाणी माझ्या आवाजात रेकॉर्ड केली. या रेकॉर्डिंगसाठी बरेच श्रम घ्यावे लागले. कारण ही हिंदी गाण्यांची नवी स्टाईल होती. या पद्धतीने गाणे अजिबात सोपे नव्हते. या सर्व नवीन प्रोजेक्टसमुळे माझी कार्यक्रमांची गती मंदावली.

    १५ सप्टेंबर २००९ रोजी जिल्हा परिषद अभियंता संघटनेसाठी अभियंतादिनानिमित्त मी गाण्याचा कार्यक्रम केला. यामुळे मी इंजिनियरसुद्धा असल्याची पुन्हा एकदा जाणीव झाली. नंतर 'रजनीगंधा' या वैशालीताई सोनाळकरांच्या अल्बमच्या प्रकाशनासाठी गाण्याचा कार्यक्रम आम्ही सादर केला. या कार्यक्रमाला लोकसत्ताचे संपादक कुमार केतकर, रवींद्र लाटकर आणि शास्त्रीय गायक उपेंद्र भट यांची उपस्थिती लाभली. मग 'सुहाना सह्याद्री अंताक्षरी नवरात्री सेलिब्रिटी स्पेशल'मध्ये मी गायलो. माझ्याबरोबर माधुरी करमरकर, आनंद सावंत, योगिता गोडबोले, दिपक चव्हाण हे इतर कलाकार होते. संगीत संयोजन प्रशांत ठाकरे यांचे होते. हा कार्यक्रम रसिकांना फार आवडल्यामुळे या कार्यक्रमाचे निर्माते विद्युत शहा यांनी दिवाळी सेलिब्रिटी स्पेशलसाठीही आम्हा कलाकारांना परत बोलावले. अजून एक रंगतदार एपिसोड आम्ही केला. या कार्यक्रमाचे निवेदक अभिनेते अतुल परचुरे आणि गायिका नेहा राजपाल होते. नंतर माझे मेहुणे आयोजक विनायक पटवर्धन यांच्यासाठी गीत-गझलचा कार्यक्रम पुण्याला केला.

    २०१० या वर्षाची सुरुवात 'अत्रे कट्टा'च्या कोपरी उद्यान, ठाणे येथील कार्यक्रमाने झाली. हा गझलचा कार्यक्रम अतिशय रंगला. रसिक श्रोत्यांची भरघोस उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली. अशी जोरदार सुरुवात झाल्याने या वर्षात काहीतरी चांगले होणार असे मला वाटायला लागले आणि नेमके तसेच घडले. अनेक टीव्ही चॅनल्सवर आता संगीताच्या स्पर्धा सुरू झाल्या होत्या. या स्पर्धांमध्ये ऑडिशन देण्यासाठी स्वर-मंच ॲकॅडमीच्या अनेक मुलामुलींना मी घेऊन जाऊ लागलो. त्यात अनेक जणांना यश मिळू लागले अमी शहा या माझ्या विद्यार्थिनीला टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन अशी अनेक बक्षिसे मिळाली. माझी मुलगी शर्वरी 'रिन मेरा स्टार सुपरस्टार' या स्टारप्लसच्या संगीतस्पर्धेसाठी मुंबईत वीस हजार मुलांमधून निवडली गेली. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी शर्वरी आणि माझी पत्नी प्रियांका एक महिना अंधेरीला रहात होत्या. कोमल करंदीकर, राधिका जोगळेकर आणि दर्शना घळसासी यांनाही अनेक स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळाली. या निमित्ताने या स्पर्धांच्या अनेक आयोजकांशी परिचय झाला. माधवी ही यातील एक कुशल आयोजक!

    -अनिरुद्ध जोशी

  • त्याच्या पत्नीची मृत बहिण (संक्षिप्त रूपांतरीत कथा ३०)

    असे अनेक कलाकार, साहित्यिक, सिने दिग्दर्शक, चित्रकार होऊन गेले की ज्यांची एखादी निर्मिती लोकांनी डोक्यावर घेतली व पुढे तो तशीच उत्तम निर्मिती न केल्यामुळे नामशेष झाला. कांही “वन फील्म वंडर” नट, दिग्दर्शक होऊन गेले. लेखकाने ही गोष्ट ह्याचा उपहास करण्यासाठी लिहिली आहे. सारखीच उच्च दर्जाच्या निर्मितीची अपेक्षा चुकीची आहे, हे त्याला सांगायचं आहे. “लेडी आॕर टायगर” (वाघ की सुंदरी) ही पूर्वी आलेली कथा फ्रँक स्टॉकटनचीच आहे.
  • वळण आणि सवय

    वळण आणि सवय या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. काही गोष्टी शिकवाव्या लागतात तर काही उपजतच असतात. त्यामुळे एखाद्याला तुम्ही हे केले नाही. असे करायला हवे होते. असे ताशेरे ओढणे बरोबर नाही. आपलेही आत्मपरीक्षण करावे.