नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
कॉलेजच्या नोटीस बोर्डावर गॅदरींगची नोटीस लागली होती.हे जस समजल तसं गण्यानं टुन्नकन उडीच मारली.गण्या कॉलेजमधील सांस्कृतिक कार्यक्रमांत नेहमीच पुढं पुढं करायचा.गण्यालं नाटकात काम करायची लय हौस होती.तसं पाहिलं तर लहान पणापासुनच गण्याच्या अंगात अभिनयाची गोम वळवळ करायची.तर असा हा गणेश उर्फ गण्या रणवीर नाटकाचा प्रचंड शौकीन होता.गल्लीत गणपती बसले की गण्याच्या ग्रुपचा नाटकाचा एक कार्यक्रम हमखासच असायचा.गण्याला आपली कला लोकांपुढं पाजळायलं लय भारी वाटायचं. श्रीराम लागु,विक्रम गोखले,दाजी पणशीकर ते हल्लीच्या प्रशांत दामले पर्यंत त्याने सर्वांचे नाटकं पाहिले होते.नाटकाचा शौकीन असलेल्या गण्याला चित्रपटांविषयी मात्र प्रचंड राग होता.तो नाटकाला अभिजात कलाकृती मानायचा तर चित्रपटाला कलेला लागलेला कलंक मानायचा.तस गण्या नाटकात चांगलं काम करायचा पण कुठल्या प्रेक्षकांपुढं काय सादर करावे हे गणित त्याला कधीच जुळले नाही.त्यामुळे नेहमीच त्याची फजीती व्हायची.एकदा असच गल्लीतल्या रसीक प्रेक्षकांपुढं गण्यानं कुठलंतरी एक प्रायोगीक नाटक सादर केलं.विषय ग्रामस्थांच्या डोक्यावरून गेलाच पण नाटकातले काही संवाद देवा धर्माविरोधात आसल्यानं पब्लीक खवताळली आण मग त्यांनी जे गण्याचा समाचार घेतला ते गण्या आठ दहा दिवस तरी खाटेला चिकटुनच राहिला होता.
नातवाच्या खेळणीमधील एक खेळणी हाती लागली. एक गोल पुंगळी दोन्हीकडे पारदर्शक काचा.एका बाजूने बघीतले तर दुसऱ्या बाजूला अनेक लहान लहान रंगीत काचांचे तुकडे. त्यामधून अनेक कलापूर्ण डिझाईन दिसायचे. अतीशय मनोहर व मनास आनंदीत करणारे प्रक्षेपण असे. मात्र गमतीचा भाग असा की आतील रंगीत तुकड्याची हालचाल झाली की दिसणाऱ्या डीझाईनमध्ये त्वरीत बदल होत असे. प्रत्येक डिझाईन तसेच मनोहर व आकर्षक. फक्त एक गोष्ट प्रखरतेने लक्षांत आली की "दृष्य " सतत बदलत, मनोहर असे परंतु एकदा बघीतलेले दृष्य पून्हा तेच व तसेच म्हणून केव्हांच दिसले नाही. दिसू शकणार नव्हते. रंग संगतीची सतत उधळण होत असे. विविधते मधला तो आनंद टिपला जाई. ज्यांत केव्हांच नव्हती स्थिरता. तोच तोपणा. अस म्हणतात की "आनंद " हेच फक्त ईश्वरी सत्य आहे. आनंद म्हणजेच ईश्वरी दर्शन. आनंद हा भावनेचा सर्वात उच्य असा अविष्कार असतो. त्यांत इतर भावने प्रमाणे कोणताही विरोधाभास नसतो. आनंद हा चेतना स्वरुपांत व्यक्त होतो. कोणत्याही सभोवतालच्या दृष्य अदृष्य वस्तूमधून जाणीव देणाऱ्या, मन उल्हासीत करणाऱ्या चेतनेमध्ये आनंद असतो. कोलीडोस्कोप मधून क्षणाक्षणाला बदलत जाणाऱ्या परंतु प्रत्येक प्रक्षेपित दृष्यामध्ये आनंद समावलेला आहे. बदलते स्वरुप ही चिंतेची बाब वाटते. कारण ज्याच्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित होते. आनंदाचा ठेवा हाती लागतो. ज्याच्यात आनंद अर्थात ईश्वरी रुप बघीतले जाते. तो ढगांच्या हालचालीप्रमाणे स्वरुप बदलत जातो. मग स्थिरता समोर नसेल तर एकग्रता कशी होणार. ह्यातच त्याला समजले पाहीजे. कारण "आनंद " याचे स्वरुप लहरी, लाटा, छटा ह्यानी अनुभवण्याचा, जाणण्याचा प्रकार आहे. ज्यांत बदलणारी संकल्पना आहे. परमेश्वरला जेव्हां निर्गुण रुपांत समजले जाते. त्याच वेळी कोणतेही रुप, कोणताही आकार, कोणते ही मोजमाप, कोणतेही वर्णन त्याला लागु पडत नाही. ज्या ठीकाणी असा प्रयत्न होतो तो निर्णय केलेला विचार असतो. असत्यात तो जाऊन बसतो. म्हणूनच असे मान्य झालेले आहे की परमेश्वर अनुभव येणे, जाणीव होणे हे शक्य आहे. परंतु प्रत्यक्ष बघणे कदापीही, केव्हांही सत्य असून शकत नाही. कारण तो फक्त आनंदमय आहे. सतत बदलणाऱ्या छटांत, गुणधर्मांत, एक उर्जा शक्तीच्या रुपांत
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

प्रतिष्ठीत घरांतून रस्त्यावर आलेल्या दोन भिकाऱ्यांची कथा. भिकारी असले तरी त्यांचीही कांही तत्त्वं आहेत. कॅप्टनला मित्राचा विश्वासघात करणं, हे महापाप वाटतं तर मरेला असा विश्वासघात करण्यात कांहीच चूक वाटत नाही. मरेला पैशासाठी कुणाही स्त्रीचा स्वीकार करण्याची तडजोड गैर वाटते, त्या तत्वासाठी तो काकाच्या इस्टेटीवरचा हक्क सोडतो तर खायला मिळावं म्हणून कॅप्टन कुरुप फळवालीला पटवायला जातो.
डॉ.शांताराम कारंडे आणि माझी पहिली भेट एका कवी संमेलनात झाली होती. त्या कवी संमेलनाचे आयोजक तेच होते. तेंव्हा पहिल्या भेटीतच ते मला भावले होते. मला जो भावतो तो कोण आहे कसा आहे ही गोष्ट माझ्यासाठी गौण असते. मला जो भावतो त्याचा मी त्याच्या गुणदोषासह स्विकार करतो. पण डॉ.शांताराम कारंडे यांच्यातील फक्त गुणच माझ्या दृष्टीक्षेपात आले. त्या कवी संमेलनातच मी पहिल्यांदा त्यांच्या चारोळ्या वाचल्या होत्या आणि त्यांना बोलताना ही ऐकल होतं. त्यांच्या चारोळ्या मला प्रचंड आवडल्या होत्या. ते एक उत्तम कवी आहेत याबद्दल वादच नाही. पण कवी म्हटला की तो स्वप्नात अथवा कल्पनेत गुंतलेला असतो असा सर्वसाधारण लोकांचा समज असतो त्यांचा हा समज मला नाही पण कारंडे साहेबांना पाहिल्यावर नक्कीच दूर होतो.
त्यांची आणि माझी पुर्वीची कोणतीही ओळ्ख नसतानाती ती व्यक्ती मला पहिल्याच भेटीत आवडली त्याला आणखी एक कारण असावं ते म्ह्णजे मला राजकारणातील दोनच व्यक्ती आवडतात एक आदरणीय बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे राजसाहेब ठाकरे का ते मला स्पष्टपणे नाही सांगता येणार पण मला माझे आवडते चित्रपटातील हिरो कोण ते लगेच सांगता येत नाही पण राजकारणातील या दोन व्यक्ती माझ्यासाठी कधीच बदलत नाहीत माझा राजकारणाशी फारसा संबंध नसतानाही. त्यावेळी डॉ. शांताराम कारंडे यांनी नुकताकच मनसेत प्रवेश केला होता आणि याची मला कल्पना होती. त्यामुळे कदाचित एका वेगळ्या चष्म्यातून मी त्यांच्याकडे पाहिले ही असेल. त्यापुर्वी त्यांची मला आर्कीटेक आणि कवी इतकी ओळख असली तरी ते भविष्यातील ते एक चांगला राजकारणी म्ह्णून आपली ओळख निर्माण करतील याची मला तेंव्हा ही खात्री वाटत होती. आता ते साहित्य आणि कलेच्या क्षेत्रासोबत आपले अनेक उदयोगधंदे सांभाळत राजकारणातही यशस्वी घोडदौड करीत आहेत.
डॉ. शांताराम कांरंडे आणि माझी जवळीक जरी साहित्यामुळे असली तरी त्यांच्यातील राजकारणीही मला प्रचंड भावतो. एक साहित्यिक म्ह्णून मला त्यांच्याबद्दल आदर आहेच पण एक राजकारणी म्ह्णूनही ते मला तितकेच आदरणीय आहेत हे महत्वाचे आहे. एखादया र्तमानपत्रात, साप्ताहिकात अथवा मासिकात त्यांचा लेख दिसला की मी तो पुर्वी ही आवर्जून वाचायचो आणि आजही वाचतो आणि तो वाचल्यावर ही व्यक्ती समाजकारण आणि राजकारण यात प्रचंड व्यस्थ असतानाही साहित्य निर्मितीसाठी वेळ काढते याचे मला विशेष कौतूक वाटते. त्यांचे लिखाणातील सातत्य खरोखरच स्तुती करण्यासारखेच आहे. नाहीतर मी शेकडो कवीता लिहल्या पण एखादया महिन्यात एक ही कविता लिहली नाही की स्वतःशीच म्ह्णतो हया महिन्यात मला कविता लिहायला वेळ्च मिळाला नाही. डॉ.शांताराम कारंडे यांना मधल्या काळात मी कधीही प्रत्यक्ष भेटलो नव्हतो. आमच्या भेटीच माध्यम बर्याीचदा साहित्य हेच होत. राजकारणी म्ह्णून समाजकारणात त्यांचा सक्रीय सहभाग जेंव्हा वर्तमानपत्राच्या माध्यमातून सातत्याने वाचनात येतो तेंव्हा त्यांच्या बद्दलचा माझ्या मनातील आदर आणखी वाढतो. मी राजकारणापासून शकयतो दूरच राहतो. पण तरी ही माझा आणि राजकारणाचा संबंध हया ना त्या कारणाने येतच असतो. पण डॉ. शांताराम कारंडे आणि माझी भेट पुन्हा राजकारणामुळे नाही तर बर्यााचदा साहित्यामुळेच झाली. डॉ.शांताराम कारंडे यांना त्यांना भेटलेल्या लोकांना त्यांच्या नावासह लक्षात ठेवण्याची सवय आहे नव्हे हा त्यांच गुणच म्ह्णावा लागेल. डॉ.शांताराम कारंडे एक राजकारणी, उदयोजक, कलाकार आणि साहित्यिक म्ह्णून किती मोठे आहेत हे जाणून घेण्याची मला कधी गरजच भासली नाही कारण एक माणुस म्ह्णून ते फारच छान आहेत. समाजातील सर्वसामान्य लोकांनाच नव्हे तर साहित्याकांनाही मदत करण्याचा जणू त्यांनी विडाच उचलेला असावा.
मुंबईतीलच नव्हे तर महाराष्ट्रातील बरेचसे साहित्यिक त्यांना राजकारणी म्ह्णून कमी तर साहित्यिक म्ह्णून अधिक ओळखतात आणि त्यांची ही ओळख त्यांना मिळालेले असंख्य साहित्यिक पुरस्कार अधोरेखीत करतात. हा लेख वाचताना कदाचित वाचकांना प्रश्न पडला असेल की मी अचानक डॉ.शांताराम कारंडे यांच्यावर लेख का बरं लिहला असेल. त्याला एक खास कारण आहे मला गुरूतुल्य असणार्यां माझ्या या मित्राचा नव्हे तर वडिल बंधूचा 28 मार्च रोजी वाढदिवस होता. त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त भेट काय दयावी हा माझ्यासमोर एक यक्ष प्रश्न होता. त्यांना मी लवकरच माझा पुढचा कविता संग्रह सस्नेह अर्पण करणार आहेच पण तत्पुर्वी काय करावे म्ह्णून मी हा लेख लिहण्याचा प्रपंज केला. आमच्या माझे व्यासपीठ या मासिकाचे आज जरी ते सहसंपादक असले तरी आमची भेट धावपळीतच होते निवांत म्ह्णता येईल अशी चर्चा आमच्यात कधीच होत नाही आणि माझी तशी इच्छा ही नसते कारण त्यांच्या वेळेची किंमत ठरलेय आणि ती किंमत मी जाणलेय त्यामुळे त्यांच्या वेळेची किंमत माझ्याठायी ही जास्तच आहे. राजकारणात असतानाही शत्रू नव्हे तर मित्र गोळा करणारा म्हणून त्यांची ओळ्ख निर्माण होत असेल तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. भविष्यात एक लोकप्रिय राजकारणी म्हणून ते आपली ओळख निर्माण करतील याची मला खात्री वाटते. लोकांच्या सेवेत अहोरात्र उपलब्ध असणारे डॉ.शांताराम कारंडे हे आपले समाज सेवेचे व्रत यापुढे ही तसेच सुरू ठेवतील याची मला खात्री वाटते. मी व्यक्तीशः एक राजकारणी म्ह्णून नाही पण समाजाचा एक घटक, त्यांचा एक हितचिंतक अथवा समर्थक म्ह्णून कधीतरी त्यांच्या मागे उभा दिसेनही. डॉ. शांताराम कारंडे हे नवोदित साहित्यिकांसाठी अंधारात कोठेतरी दुरवर जळणार्याउ दिव्यासारखे असले तरी तरी ते साहित्यिकांना फक्त आशेचा किरण दाखवित नाहीत तर प्रत्यक्षात मदतही करतात हे मी प्रत्यक्ष अनुभवातून सांगू शकतो. आज डॉ.शांताराम कारंडे ज्या - ज्या क्षेत्रात आहेत त्या - त्या क्षेत्रात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविलेला आहे याबद्दल कोणाचे ही दुमत नाही. प्रचंड धावपळ कामचा व्याप असतानाही कविता वाचताना त्यांच्या चेहर्याहवरून ओसंडणारा आनंद जेंव्हा मी प्रत्यक्ष पाहिला तेंव्हा एक कवी म्ह्णून मी खर्याय अर्थाने त्यांच्यासमोर नतमस्तक झालो आणि मी स्वतःशी पुटपुटलो...
कारंडे साहेब...
तुंम्हाला म्ह्णू मी राजकारणी की कवी
साहित्यिक, कलाकार की बुध्दीजीवी...
तुंम्हाला म्ह्णू मी रसिक की उत्साही
मित्र, बंधू की माझा सोबती...
एकाच रस्त्यावरून वर्षानुवर्षे
चालणारे आपण आहोत सहप्रवासी...
आपले ध्येय आपल्या आवडीनिवडी
आपले आचार-विचार आणि स्वप्ने आहेत निराळी...
विचारमंथन करून आपण दोघेही नकळ्त
बाहेर काढतोच सुविचार जगासाठी...
त्या सुविचारांनीच जोडली गेली आहेत
आपली आपल्या सभोवतालची सारी नाती...
तुमच्या वाढदिवसा निमित्त मी ही
भेट दिली तुंम्हाला फक्त शब्दांची...
त्या शब्दातून तुमच्याप्रती अगदी सह्ज
व्यक्त होणार्याम माझ्या प्रेमाची....
लेखक – निलेश बामणे.
युरोपातील सर्व शहरात सायकलींचे प्रमाण खूपच आहे यापूर्वी असा उल्लेखही आलाय. नेदरलँडमध्ये मध्ये तर,तीन मजली लांबच लांब सायकल स्टॅंड बघून आश्चर्य वाटले. तेथे सायकलींसाठी, फोर व्हीलर साठी आणि पायी चालण्याऱ्यांसाठी एकाच रस्त्यावर स्वतंत्र समांतर ट्रॅक्स आहेत .रहदारी एवढी शिस्तीची की,कोणीही ट्रॅक सोडून चुकूनही जाणार नाही.
सिग्नल तोडणे हा प्रकार औषधाला सुद्धा सापडणार नाही. कोणतेही वाहन नसेल, रस्ता निर्मनुष्य असेल तरीही सिग्नल तोडून जाणारा ईसम तुम्हाला अजिबात दिसणार नाही. ग्रीन लाईट येईस्तोवर तो नक्कीच थांबतो.मला सर्वात जास्त भावलेली गोष्ट म्हणजे, पादचाऱ्यांना तेथे चालताना खूपच सुरक्षित वाटते. झेब्रा क्रॉसिंगवरून रस्ता क्रॉस करताना सिग्नल नसेल तरीही दोन्ही बाजूची वाहतूक अक्षरशः थांबते.पादचाऱ्यांसाठी एवढा रिस्पेक्ट येथेच बघावयास मिळाला.शिवाय पायी चालणारांना घाई असेल तर सिग्नल पोलवर असणारे विशिष्ट बटण प्रेस करुन वाहनांना थांबवण्याची विनंतीही करता येते. एकाच रस्त्यावर एवढे सारे ट्रॅक्स म्हणजे विचार करा किती छान असतील हे रस्ते!
रस्त्यांवर अतिक्रमण, फेरीवाले,मोठे मोठे बॅनर वगैरे गोष्टी तर बादच आहेत तिकडे. वाहतुकीच्या वेळी दोन वाहनांमधील ठराविक आंतर ठेवण्याची पद्धत खूपच कौतुकास्पद. इंचभरही कमी जास्त अंतर दिसणार नाही. पार्किंग काय सुंदर व्यवस्था आहे म्हणून सांगू !कोणतीही गाडी काढावयास कोंडी होणार नाही याची पूर्णपणे काळजी घेत मोठ्या मोठ्या मोकळ्या जागांवर शिस्तीत गाड्या पार्क केलेल्या दिसतात.जणू काही गाड्यांची शेतंच असावीत ती!
अशी सगळी वाहतूक व्यवस्था आहे म्हणूनच की काय, युरोपात छोट्या छोट्या बाळांना त्यांचे आई-बाबा कडेवर घेऊन फिरताना दिसलेच नाहीत कधी. छान छान बाबा गाड्यांमध्ये बसत ही गुबगुबीत गुलाबी बाळं डोळे किलकिले करत टुकूटुकू बघत बाहेर फिरण्याचा आनंद लुटत असतात.
जर्मनीच्या कोलोन शहरातील कॅथॅड्रल ची भेट संपवून आम्ही आता निघालो होतो ते आल्प्स पर्वतांच्या रांगांमधून सफर करत, करत थेट स्विझरलँड या स्वप्न भूमीवर पाऊल ठेवण्यासाठी. प्रचंड दाट अशा उंच उंच झाडांनी व्यापलेल्या ब्लॅक फॉरेस्ट मधून वळणावळणाच्या वाटेने चालू असणारा हा प्रवास, खूपच मोहरून टाकणारा ठरला. या पर्वतांवर जंगलांमध्ये असणारी झाडी एवढी दाट आहे, की झाडाच्या वरच्या शेंट्यांना सुद्धा सूर्यप्रकाश दिसत नाही.म्हणून झाडाच्या पानांचा रंग काळपट हिरवा दिसतो.दुरुन तर तो आपल्याला काळाच वाटतो.म्हणूनच हे ब्लॅक फॉरेस्ट.
जंगलाचे सौंदर्य बघत बघत रस्त्यात द्रुबा या ठिकाणी आम्ही थांबलो. अगदी जुने वाटणारे, पावसाच्या पाण्याच्या माऱ्याला सतत तोंड देत, खंबीरपणे उभे असणारे,जमिनीपासून थोडे उंच असे संपूर्णपणे लाकडात बनवलेले एक घर आम्ही बघितले. हे लाकडीच पण मजबूत घर म्हणजे, स्वित्झर्लंडमध्ये पारंपरिक पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या जगप्रसिद्ध 'कूकु क्लॉक्स 'ची फॅक्टरी होती ती. लाकडातच बनवलेली पण वेगवेगळ्या आकारांची घड्याळं होती ती. या सर्व घडाळ्यांमध्ये समान असणारा धागा म्हणजे छोटा चिमणीवजा पक्षी.दर तासाला घरट्यातूनतून तोंड बाहेर काढावा तसा बाहेर आपला "कुकू"असा आवाज काढतो.म्हणूनच ही 'कुकू क्लॉक्स'.अगदी एक करोड पर्यंत किंमती असणारी ही पारंपारिक घड्याळं जगभर निर्यात होतात.
कालानुरूप यांच्या रचनेत बदल ही होत गेलाय पण बनवली जातात आजही लाकडातच.
निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य डोळ्यांनी पित पित, मधूनच सोबतीला पावसाची संगत.पर्वत राजीं वरून वाट काढणारे धवल पाण्याबरोबर मंजुळ नाद करणारे असंख्य झरे. हा प्रवास अव्याहत असाच चालूच रहावा संपूच नये कधी असे वाटणारे हे सौंदर्य मन आणि शरीर दोन्ही हलकं हलकं बनवत अंगावर रोमांच उभे करत होता. कुठेही नजर टाकली तरीही ते दृश्य कॅमेरात बंदिस्त करावयास हवेच. असे वाटणारा हा वेड लावणारा निसर्ग.
थोडीशी जरी सपाट जमीन दिसली तरीही, तेथे असणारे झोपडीवजा एखादं दोनच घरं, त्या घरांमधील माणसं कधीच दिसले नाहीत बाहेर तो भाग निराळा.पण अगदी एखादेच घर असेल तरीही पहाडांवर त्या घरात पर्यंत पोचण्यासाठी व्यवस्थित बांधलेला डांबरी रस्ता खूपच कौतुक वाटले या सर्वांचे. कायम अशा संपन्न निसर्गाच्या संगतीने राहणाऱ्या तेथील लोकांचा हेवा वाटला क्षणभर. स्वित्झर्लंडच्या माउंट टिटलिस कडे नेणाऱ्या या प्रवासामध्ये जाताना हृराईन वॉटरफॉल आहे. हा जर्मनी मधूनही आपल्याला बघता येतो आणि स्विझर्लंड मधूनही. अर्थातच दोन्हींची रुपं वेगवेगळी.नेउह्यूनसेन मधून दिसणारा या वॉटर फॉलचा नजारा, म्हणजे खरोखर वर्णन करावयास शब्द अक्षरश: थिटे पाडणारा....
निसर्गाच्या नानाविध आविष्कारांचा आस्वाद घेत घेत हृराईन नदीवर असणारा हा धबधबा म्हणजे निसर्ग सौंदर्याचा रुद्राविष्कार. तरीही हे दृश्य तेथेच खिळवून ठेवत होते हेही तेवढेच खरे.
धबधब्यापर्यंत पोहचण्यासाठी हिरवट निळसर पाण्याने खळखळून वाहणाऱ्या नदीतून आम्ही दहा-पंधरा मिनिटं बोटीतून प्रवास केला असे म्हणण्यापेक्षा, या नदीच्या विशाल पात्रातून नदीची अनेकानेक रूपं निरखत निरखत धबधब्याच्या पायथ्याशी जाऊन पोहोंचलो. अतिशय उत्कंठा वाढवणारा हा क्षण. आपल्या मनात एकाच वेळी असंख्य भावनांची मांदियाळी निर्माण करणारा ठरतो.एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर आणि बऱ्याच मार्गांवरून पण अतिशय उंचावरून पडतानाचे हे फेसाळलेले शुभ्र असे पाणी खोल खाली पडत असताना त्याच्या भेसूर आवाजामुळे उरात धडकी भरवते.सुरुवातीला निसर्गाच्या या अतिसुंदर रुपाला आपण अगदी जवळून बघत आहोत, या जाणिवेने होणारा आनंद तर रोमांच उठवणारा. त्याच वेळी पाण्याच्या प्रचंड वेगामुळे संपूर्ण वातावरणात सर्व दूरपर्यंत पसरणाऱ्या दवांमुळे अतिशुभ्र रंगाच्या धुक्यातून आपण जात आहोत, हा होणारा भास रोमहर्षकच!या दवांमध्ये न्हाऊन निघण्याचा अनुभव अविस्मरणीय.
धबधब्याच्या रौद्र रूपाचे दर्शन आपण विविध पातळ्यांवरून घेतो ना,तेव्हा आपला हात जर निसटला तर.... या जाणिवेने जीवाचेच पाणी पाणी होते मात्र. अगदी उंच असणाऱ्या सुळक्याच्या एका टोकावरुन ज्यावेळी हा धबधबा आम्ही डोळ्यात साठवत होतो, त्या वेळी खरोखर निसर्गाला साष्टांग दंडवत घालावा असेच वाटले होते. किती अप्रतिम सौंदर्य होते ते!या निसर्गापुढे आपण माणूस म्हणजे अगदीच क:पदार्थ याची प्रचिती आली. नि क्षणभरात मनाला चिकटून बसलेला हा मी गळून गेला.....
निसर्गाचा हा अद्भुत आविष्कार, आमच्या डोळ्यात,मनात, आणि स्पर्शातही शक्य तेवढा साठवून घेत आम्ही बोटीने पुन्हा नदीच्या काठावर येऊन पोहोंचलो. आमच्या गाडी बरोबर अतिसुंदर असा झ्यूरिच लेक संथपणे वाहता वाहता गर्द हिरव्या झाडांची हिरवाई, आकाशाची निळाई ,ढगांची धवलाई नि हवेची लहराई सोबत घेऊन वाहात होता.आजुबाजूच्या घरांचे प्रतिबिंब सुद्धा स्वतःमध्ये सामावून घेणाऱ्या या लेकच्या कडेकडेने आम्ही सायंकाळपर्यंत पोहोंचलो ते ल्यूझर्न या स्वर्गलोकीच्या उंबरठ्यापर्यंत !
भाग ५ समाप्त
क्रमश:
© नंदिनी म. देशपांडे

आदीबद्रीचे मंदिर कर्णप्रयाग-रानीखेत रस्त्यावर कर्णप्रयागापासून १८ कि.मी. आहे. बसेस, जीप इ. वाहनांची या मार्गावर वर्दळ असते. आदीबद्रीचे मंदिर हे चौदा मंदिरांचे संकुल असून साधारण ५० x २० मी. क्षेत्रावर पसरले आहे. ही सर्व मंदिरे चौथऱ्यावर स्थापीत असून त्यातले सर्वात महत्त्वाचे मंदीर म्हणजे आदीबद्रीचे! मंदीर फारसे मोठे नाही पण मंदिरावरील शिल्पकाम सुरेख आहे. मंदिराच्या गर्भगृहात साडेचार ते पाच फूट उंचीची चतुर्भुज शंख, चक्र, गदा धारण केलेली श्री विष्णूची उभी मूर्ती आहे. विविध अलंकारांनी नटलेली ही शिल्पकलेचा एक सुंदर नमुना आहे. मुर्तीसमोर श्रीविष्णूचे वाहन गरूडाची हात जोडलेली उभी मूर्ती आहे. प्रवेशद्वारावर गंगा-यमुना, नृत्यांगना, मदनिका, सिंहमुख तसेच गणपती इ. मूर्ती कोरलेल्या आहेत तर खांबांवर घटपल्लवाच्या प्रतिमा कोरल्या आहेत. प्रांगणातील इतर मंदिरांत लक्ष्मीनारायण, गणपती, महिषासूरमर्दिनी इ. देवतांची स्थापना केली आहे. आदीबद्रीची मूर्ती ही साधारण १० व्या शतकातील असावी, असा एक अंदाज आहे.
ह्या संकुलातील मंदिरे लहान असली तरी खूप छान आहेत. विशेषतः दुसरे, चौथे, सहावे, सातवे व चौदावे मंदीर शिल्पकलेच्या दृष्टीने उल्लेखनीय आहे. मंदिराच्या निर्मितीवरून ही सर्व मंदिरे गुप्तकालाच्या अखेरच्या पर्वात बांधली असावीत व मूळ संकुल १६ मंदिरांचे असावे, असा एक अंदाज आहे.
आदीबद्री मंदिराच्या आवारात व मंदिरात पूर्वी अनेक सुंदर मूर्ती होत्या. त्या बहुतेक चोरीला गेल्या आहेत. इतकेच कशाला मुख्य मंदिरातील श्रीविष्णूची मूर्ती चोरण्याचा प्रयत्न झाला होता पण ग्रामस्थांच्या जागरूकतेमुळे तो फसला. 'नशीब त्या भगवान श्रीविष्णूचे!' आणखी काहीच बोलता येत नाही. पण ह्या सर्व गोष्टीला आपली बेफिकिरी व निष्काळजीपणा कारणीभूत आहे हे निश्चित, आपल्या संपन्न संस्कृतीचा वारसा सांगणाऱ्या अनेक गोष्टी गायब होतात व आपण शांत राहतो. फार तर निषेध व्यक्त करतो व परदेशातील लोकांनी त्यांच्या वस्तू किती छान ठेवल्या ह्याचे कौतुक करतो.
आदीबद्रीजवळ बेणीताल हा तलाव व गैरसैन येथे गढवाली राजाचा जुना किल्ला आहे.
-प्रकाश लेले
डॉक्टर जेनर जोसेफ हे प्रसिद्ध बालरोग तज्ञ व शास्त्रज्ञ होते. निसर्ग प्रेमी होते. त्यांनी आपले घर समुद्र किनाऱ्यावर बांधले होते. रोज सूर्यास्त समयी ग्यालरीत बसून समुद्राच्या पैलतीरी आकाशातून मावळनाऱ्या सूर्याला बघताना त्यांना खूप आनंद वाटत असे.

वाघाला रक्ताची चटक लागली की जस होत, तस आमच्या परिसरातील लोकाना झाल होत. निम्म्या किमतीत वस्तू मिळतात म्हणजे काय? तीन महिने दुकान सुरु होऊन झाले होते. त्यामुळे निम्म्या किमतीत मिळालेल्या वस्तू लोकांच्या घरोघरी दिसू लागल्या होत्या.
झिरमिळ्यांची पगडी घालून शास्त्रीबुवा आणखीच उंच वाटत. पावणे सहा फुट उंच, साठीनंतरही प्रकृती ठणठणीत असणारे, लांब, काळ्या बटणांचा पांढरा डगला घालणारे, कपाळावर गंध लावणारे, काळा चष्मा घातलेले, शास्त्रीबुवा नेहमी धीर गंभीर वाटत.
त्यांचे खरे आडनाव काय होते, ते तिथे कोणालाच ठाऊक नव्हते. लोक त्यांना शास्त्रीबुवा म्हणूनच ओळखत. त्यांचे शिक्षण कुठे झाले होते, शास्त्री हे त्यांचे नाव होते की पदवी होती.
हे कांही कुणाला माहीत नव्हते. वाड्यांतील एका छोट्या खोलीत ते रहात पण नेहमी ते ह्याच वेशांत लोकांना दिसत. शास्त्रीबुवांच्या दरवाजावर “इथे जन्मकुंडली, हस्तरेषा, चेहरा, यांवरून भविष्य सांगितले जाईल.” घरावर अशी छोटी पाटी असली तरी मोठ्या रस्त्यावर एका छानशा दुकानांत शास्त्रीबुवांच ‘ॲाफीस’ होतं.
गेले चार दिवस मुंबईतील कमलाबेन हॅास्पिटल चुकीच्या कारणासाठी पेपरांत गाजत होतं. हॅास्पिटलच्या प्रसूती विभागातून तीन दिवसांच बाळ गायब झालं होतं. तिथल्या नर्स, मेट्रन, डॅाक्टर, ह्या त्याबद्दल कांहीच सांगू शकत नव्हत्या. हॅास्पिटल मोठ्या उद्योगपतीचे असल्यामुळे प्रथम त्यांनी ही बातमी दाबून टाकण्याचा प्रयत्न केला गेल्याचा आरोपही हॅास्पिटल मॅनेजमेंटवर होत होता.
Copyright © 2025 | Marathisrushti