(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • नर्मदामैय्याची लेकरं

    डॉ. सुलभा (पागे ) केंकरे यांनी केलेले हे ललित लेखन आहे. कथा, व्यक्तिचित्रे आणि तिसरा विभाग ललित लेखांचा आहे. त्यांतून लेखिकेने अनेक विषय हाताळले आहेत.

      February 18, 2024


  • माशी ग माशी…….!!!

    माशी ग माशी

    मानू तुझे आभार कसे?

    अशीच बसत जा तू,

    सगळ्यांना कर वेडे-पिसे…………!!!

      July 5, 2014


  • कावळे (कथा) – भाग 1

    उपनगरातील भर वस्तीत, आजूबाजूला नवीन नवीन भव्य काँक्रिटच्या इमारतींच्या गराड्यात हा आमचा एकमेव बंगला, वासंती व्हिला’. येणाऱ्या जाणाऱ्यांच्या डोळ्यात भरल्याशिवाय रहात नाही. एखादं मरायला टेकलेलं जनावर, कधी मरतंय याची वाट पाहत, आजूबाजूच्या परिसरात, कावळे वाट पाहत बसतात तसे ‘बिल्डर’ नावाची आधुनिक कावळे जमात या बंगल्यावर डोळा ठेवून आहे. अर्थात मी चांगला खमक्या आहे आणि जोपर्यंत मला ‘वासंती’ची साथ आहे तो पर्यंत तरी मी या कावळ्यांना अजिबात भीक घालणार नाही, घालतही नाही.

      July 14, 2022


  • पिठापूर – कुरवपूर यात्रा – भाग ३

    किती अथांग आणि भव्य दृश्य होतं ते! ही अथांगता आणि भव्यता निसर्गच आपल्याला शिकवत असतो. पण एका चहासाठी आडून स्वतःचा खुजेपणा जास्तच जाणवतो. गाडीचा पुढचा प्रवास सुरू झाला आणि मन अधीर झाले.

      April 28, 2022


  • डॉ. शांताराम कारंडे यांच्या ‘वेश्या’ या कवितेचे रसग्रहण

    डॉ. शांताराम कारंडे यांच्या ‘आयुष्य’ या नुकत्याच प्रकाशित झालेल्या कवितासंग्रहातील माझी सर्वात आवडती म्हणजे माझ्या मनाला भावलेली कविता ‘वेश्या’ या कवितीचे रसग्रहण मी येथे लिहणार आहे. आपल्या या कवितेत डॉ.शांताराम कारंडे सुरवातीच्या चार ओळीत लिहतात...
    मी पण एक स्त्री आहे,
    अडगळीत पडलेली
    ‘वेश्या’ म्ह्णतात मला,
    पोटासाठी अडलेली
    या चार ओळीतून कविला सुचवायचे आहे की वेश्येकडे समाजाने एक उपभोगाची वस्तू म्ह्णून न पाहता एक स्त्री म्ह्णून पाहायला हवे जसे आपण आपल्या आया - बहिणींकडे पाहात असतो. आणि त्या जे काही व्यवसाय म्ह्णून करत आहेत आहेत ते आपल्या पोटापाण्यासाठी आपल्या मनाविरूद्ध करत आहेत हे ही लक्षात घ्यायला हवे.
    इच्छा मन भावना माझ्या,
    सार्‍या काही मेलेल्या
    उरल्या – सुरल्या त्याही,
    किंमत मोजून गेलेल्या
    या पुढच्या चार ओळीत
    या ओळीतून कविने हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की कोणतीही स्त्री स्वतःच्या मर्जीने वेश्या झालेली नसते. वेश्या होण्यापूर्वी तिने आपल्या मनाला आपल्या भाव-भावनांना आवर घातलेला असतो असं नाही तर तिने त्यांचा गळा घोटून त्यांना ठार मारलेले असते. इतक करूनही जर काही भावना जिवंत राहिल्याच तर त्याही त्या त्यांना पैशाच्या बदल्यात विकाव्या लागलेल्या असतात.
    उघड्या डोळ्यांनी अनुभवतो,
    स्वतःवरील बलात्कार...
    तरीही आशेवर जगतो,
    घडेल काही चमत्कार...
    या पुढच्या ओळींमध्ये कवितेत दडलेली दाहकता जाणवते. कोणतीही स्त्री स्वतःच्या मर्जीने वेश्या झालेली नसते त्यामुळे तिचा जेंव्हा जेव्हा पुरूषांशी शारीरिक संबंध येतो तेंव्हा प्रत्येक वेळी तो तिच्या मनाच्या विरूद्धच असतो त्यामुळे त्या प्रत्येक वेळी तिला तिच्यावर बलात्कार झाल्याचाच अनुभव येत असतो. पण ती हे सारं निमूटपणे सहन करत असते. आणि कधी तरी आपली सुटका करणारा कोणीतरी आपल्या आयुष्यात येईल या आशेवर जगत असतात. हे कवीने अगदी नेमक्या शब्दात मांडलेले आहे.
    रोजच होतो मधुचंद्र,
    तरीही हक्काचा नसतो कोणी
    मंगळसूत्र फक्त शोभेला,
    कुंकवाचा नसतो धनी
    या ओळीत कवीने वेश्यांच्या मनाला हात घालण्याचा प्रयत्न केलेला आहे मधुचंद्र या गोष्टीला प्रत्येकाच्या जीवनात एक वेगळे महत्व असते. पण वेश्या व्यवसाय करणार्‍या स्त्रियांना तो अनुभव जीवघेणा वाटत असतो कारण त्यांच्या मनाविरूद्ध त्यांचा रोजच मधुचंद्र होत असतो.
    वेश्या व्यवसाय करणार्‍या काही स्त्रिया विवाहित ही असतात पण त्यांच्या नवर्‍यांनीच त्यांना या व्यवसायात ढकलेले असते अथवा यांच्या जीवावर ते जगत असतात बांडगुळासारखे. ते त्यांच्या कुंकवाचा आधार फक्त नावाला असतात प्रत्यक्षात त्यांना त्यांचा आधार कधीच मिळत नाही.
    पोटच्या आमच्या गोळ्याला,
    नावं नसतं बापाचं
    जन्माआधीच मरण,
    भोगतो आमच्या पापाचं
    या चार ओळीत वेश्यांना होणार्‍या मुलांची बाप म्ह्णून कोणी जबाबदारी घेत नसतो आणि समाज त्यांच्याकडे एक पाप म्ह्णूनच पाहात असतो आणि पुढे जाऊन ते पापीच होणार हे त्यांच्या जन्मा अगोदरच गृहीत धरतो हे कवीने सुचविले आहे.
    तारूण्यात आमच्या,
    जगण्याला असतो ‘अर्थ’
    म्हातारपणात मात्र
    जगणंच होतं व्यर्थ
    जो पर्यंत वेश्या व्यवसाय करणार्‍या स्त्रिया तरूण असतात तोपर्यत त्यांचा उपभोग घेणार्‍यांचा राबता असतो पण त्यांचे तारूण्य ओसरले की सारेच त्याच्याकडे पाट फिरवतात आणि त्यांच्या जगण्यालाही काही अर्थ उरत नाही हे कविने या चार ओळींतुन अगदी सहज सुचविले आहे.
    लखलखत्या प्रकाशात असताना,
    आंम्ही स्वतःच करायचो अंधार
    आता रोज सूर्य उगवतो तरी,
    आयुष्याचा झालाय अंधार
    या कवितेच्या शेवटच्या चार ओळीत कवी
    सुचवतो की काही स्त्रियां आपल्या सौंदर्याच्या अभिमानात आणि तारूण्याच्या जोशात आणि पैशाच्या हव्यासापायी स्वतःच्या मर्जीनेही वेश्या व्यवसाय व्यवसाय म्ह्णून स्वीकारतात त्यांच्या वाटयाला ही शेवटी फक्त अंधारच येत असतो हे सत्य मांडलेले आहे.

    लेखक – निलेश बामणे

      February 22, 2016


  • चीनचे भारताविरुद्ध दुष्प्रचार युद्ध, अपप्रचार युद्ध, मानसिक युद्ध आणि त्याला भारताचे प्रत्युत्तर

    “मराठीसृष्टी” आणि “आम्ही साहित्यिक”चा उपक्रम
    ब्रिगेडियर हेमंत हेमंत महाजन यांचे फेसबुक लाईव्ह व्याख्यान
    विषय : चीनचे भारताविरुद्ध दुष्प्रचार युद्ध, अपप्रचार युद्ध, मानसिक युद्ध आणि त्याला भारताचे प्रत्युत्तर
    China's disinformation war, propaganda war and psychological war against India and India's counter reply....

    “मराठीसृष्टी” आणि “आम्ही साहित्यिक”चा उपक्रम
    ब्रिगेडियर हेमंत हेमंत महाजन यांचे फेसबुक लाईव्ह व्याख्यान
    विषय : चीनचे भारताविरुद्ध दुष्प्रचार युद्ध, अपप्रचार युद्ध, मानसिक युद्ध आणि त्याला भारताचे प्रत्युत्तर
    China's disinformation war, propaganda war and psychological war against India and India's counter reply....

      July 7, 2020


  • एका सैनिकाची गोष्ट

    एका युध्दातली ही कथा आहे. एक सैनिक आपल्या तुकडीपासून चुकतो. रस्ता जंगलातला असतो. सैनिक आपल्या तुकडीचा खूप शोध घेतो. त्याला कोणी भेटत नाही. जंगलभर फिरुन फिरुन तो अगदी दमून जातो.

      August 12, 2024


  • दूतघटोत्कच

    भासांचे एक अंकी नाटक. उत्सृष्टिकांक हा याचा रूपकप्रकार. काही अभ्यासकांच्या मते व्यायोग रूपकप्रकार आहे, परंतु या रूपकाची लक्षणे उत्सृष्टिकांकाला अधिक लागू पडणारी आहेत या नाटकातील सर्व पात्रे ही महाभारतातील प्रसिद्ध पात्र असली तरी कथानक संपूर्णत: कवींच्या कल्पनेतून साकारलेले आहे.घटोत्कचाने दूत म्हणून कौरवां कडे जाणे असा या नाटकातील प्रसंग मूळ महाभारतात नाही.

      June 18, 2026


  • वर्तमान काळांत जगा

    काळाला तीन भागांत विभागले जाते. भविष्य, भूत आणि वर्तमान काळ. भविष्य काळ अर्थात येणारा भावी काळ आणि भूत काळ गेलेला अर्थात मागचा काळ. दोन्ही काळाच्या मध्यभागी येणाऱ्या व जाणाऱ्या सिमा रेषेवर ज्याचे अस्तित्व मानले गेले तो वर्तमानकाळ. त्यामुळे वर्तमानकाळाचे मोजमाप किती वेळेचा तो काळ ह्याचे परीमाण ठरवीणेकेवळ शक्य नाही. येणारा काळ जो ज्या क्षणाला जातो तेव्हांच भविष्यकाळाचा भूत काळ बनतो. आणि तो परिवर्तनाचा क्षण कदाचित् त्याला वर्तमान काळ नांव देता येईल. परंतु खऱ्या अर्थाने त्याचे अस्तित्व नसल्यासारखेच असेल मानवाने वर्ष महीने दिवस तास मिनीटे सेकंद आणि सेकंदाचा हजारावा भाग मॅक्रो सेकंद हा यांत्रीक साधनानी केला आहे. परंतु मानवाच्या बुद्धी अनुभवाने त्या Micro Second चा केंव्हाच अनुभव घेणे शक्य नाही. ते शरीराच्या कोणत्याच हलचालीमध्ये मोजता येणार नाही. म्हणूनच वर्तमान काळ मोजणयाच्या क्षमतेत येत नाही. काळ आला नी गेला. त्या दोन क्रियाच्या मधली कालपनीक दुभंगमारी रेषा काठ वा कुंपण म्हणा हवे तर. उपनिषदामध्ये तर वर्तमान काळाचे अस्तित्व पण दाखविले नाही. इतका तो क्षणीक वा नामधारक झालेला आहे. तरीही अध्यात्मीक क्षेत्रात मानवी जीवनात संसारात वर्तमान काळाला अत्यंत महत्व दिले गेले आहे. प्राप्त झालेले आहे.

    सर्व श्रेष्ठ काळ म्हणजे वर्तमान काळाला समजले गेले आहे. दोन अ-सत्या मधले एक सत्य समजले गेले आहे. ईश्वरी अनुभवाची प्रचीती, मनाच्या शांततेचा सर्वोतम क्षण, आनंद उपभोगण्याचा खरा काळ, म्हणजे केवळ वर्तमान काळच असेल. भविष्य काळ सदा अनिश्चीततेच्या लाटेवर आरुढ झालेला असतो. त्याच्या कोणत्याच क्षणाच्या सत्यतेची कल्पना करता येत नाही. एक सत्य म्हणून निश्चीत म्हणून कुणालाही समजणे शक्य नाही. तर्कज्ञानाला मर्यादा असतात.जरी ते ईश्वरी वा नैसर्गिक चक्रामधले असले तरी मानवासाठी काल्पनीक अनिश्चीत म्हणूनच अ-सत्य असा तो काळ असतो.

    भूत काळ तर तुमच्यापासून दुर गेलेला असतो. पून्हा कधीही न येणारा न मिळणारा. तो फक्त फोटो अल्बमप्रमाणे आठवणीच्या कप्यात कोरला जाऊन तुमच्या जीवनातील प्रसंगाची चाळवा चाळव करण्याच्या फक्त कामाचा ठरतो. निश्चीत परंतु गेलेला काळ. म्हणून तुमच्यासाठी शेवटी एक अ-सत्य म्हणूनच समजला जातो. अनुभवाच्या फक्त मर्यादा असतात. कारण येणारा प्रत्येक क्षण अर्थात भविष्य काळ सतत नाविण्याचे प्रयोग करीतच येत असतो. त्यामुळे गेलेला क्षण वा भूतकाळ वर्तमान काळाच्या सत्यतेला साथ देण्यास सक्षम रहात नाही. म्हणूनच तो एक असत्य विचारांत जातो. हाती फक्त राहतो तो वर्तमान काळ. एक सत्य, चैतन्यमय, चंचल Ever moving period. भविष्य काळ त्याला स्पर्श करताच त्याचे रुपांतर भूतकाळांत होऊन जाते.

    बुद्धीचा जीवंतपणा म्हणजे विचारांच्या लाटा सतत निर्माण करणे. विचार उत्पन्न होणे व त्याचा लय होणे. भविष्य काळाच्या चक्रात उत्पन्न होणारे विचार एका मागोमाग एक उत्पन्न होतात. ते वर्तमान काळाच्या सिमेवर आदळत भूतकाळाच्या दालनात निघून जातात. शरीर मनाला वासना-इच्छा शक्तीचे वरदान असते. ती नैसर्गिक क्रिया शक्तीचा एक भाग असते. शरीर मनाला सतत चैतन्यमय उर्जा शक्तीमध्ये गुंतवून ठेवण्याचे काम ह्या वासना शक्तीमुळे होत राहते.

    वासना लाटाप्रमाणे उत्पन्न होत असतात. त्यातून निर्माण केला जातो उद्देश वा हेतू ( Object ). हा उद्देश शरीर मनाच्या हलचाली निर्माण करतो. भविष्यातले विचार व भूत काळांत आठवणीच्या दालनात गेलेले विचार, विचार म्हणून कदाचित मार्गदर्शक होऊ शकतील. परंतु 'क्षणाचा' 'वेळेचा ' विचार करताना वर्तमान काळावरची तुमची पकड सत्याचे दर्शन घडवणारी ठरते.

    सतत उत्पन्न होणाऱ्या विचारांना थोपून धरण्याचा प्रयत्न करणे व उत्पन्न झालेले विचार त्वरीत बाजूस सारणे ह्या दोन प्रक्रिया आहेत. तुमच्या मनाच्या चंचल स्वभावाने ह्या दोन्हीही क्रिया सतत होत राहतात. त्या क्रियांच्या होण्यामध्ये बाधा निर्माण करणे म्हणजेच मनाला स्थिर करण्याचा प्रयत्न करणे. विचार रहीत वातावरणाची निर्मीती करणे. Objectless Thought चे वातावरण निर्माण करणे. वर्तमान काळाचे खऱ्या अर्थाने अस्तित्व जाणणे ह्यालाच म्हणतात. शरीरासाठी मनासाठी तुम्ही एका बाजूने भविष्याला जणू थांबवित असता व भूतकाळाला दुर सारुन ( काल्पनीक ) फक्त वर्तमान काळांत असतात. आणि हाच सत्याचा काळ असेल. ह्यालाच अनंत Infinite म्हणता येईल. यांत्रीक पद्धतीने ह्याचे मोजमाप करतां येणार नाही. परंतु आत्म्याच्या स्थरावरचा हा अनंत काळाचा क्षण असेल. ह्या ठिकाणी मिळणाऱ्या आनंदाला सिमा नसेल. Ecstasy of Joy हे सर्व फक्त ध्यान प्रक्रियेमध्ये Meditation मध्येच शक्य आहे. योग धारणा, प्राणायाम, अन्तःकरणातील मनाचा संकल्प जर मजबूत असेल, प्रयत्न तळमळीचे असतील तरच तुम्हाला वर्तमान काळामध्ये जगण्याचा खऱ्या अर्थाने अनुभव मिळू शकतो.

    वर्तमान काळात विचार उत्पन्न होऊ शकत नाही. कारण भविष्यातील विचार झेपाऊन लगेच भूत काळांत जातो. त्यामुळे विचार रहीत काळ अर्थात शांतता ( Silence ) हाच वर्तमान काळाचा प्राण बनतो. ह्याच शांततेमध्ये ईश्वरी शक्तीचे आधीष्ठान वास करीत असते. ध्यान धारणेच्या सुरवातीला तुमची केलेली ईश्वरासाठीची प्रार्थना व संकल्प हा ध्यानावस्तेधील शांतता सफल करण्याचा प्रयत्न करते. शब्दाच्या ताकतीने जे साध्य होत नाही ते अव्यक्त स्थितीमुळे अर्थात शांततेच्या काळांत पूर्ण होऊ शकते. सतत वर्तमान काळांत जगा म्हणतात ते ह्याचसाठी. Experience the present by Objectless Silence.

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    e-mail- bknagapurkar@gmail.com

      December 7, 2014


  • ज्येष्ठत्व नको पण कायदा आवर!

    “काका आपल्या अंधश्रद्धा विशेषकांसाठी तुम्ही कायदामंत्री श्री. खुशालरावजी चिंधडे यांची घेतलेली मुलाखत आपल्या वाचकांना फारच आवडली. वाचकांची नुसती पत्रावर पत्र येताहेत.”

    रोजची पहाटचे संपादक, विशेषांक सम्राट, सूर्याजीराव रविसांडे आपले वार्ताहर काका सरधोपट यांच्यावर फारच खूश झाले होते.

    “होय साहेब, कायदेमंत्र्यांनी अंधश्रद्धा निमूर्लन कायद्यामध्ये अंधश्रद्धावाले आणि अंधश्रद्धा निर्मूलनवाले या दोघांचेही कसे समाधान केले आहे ते अगदी छान पटवून दिले होते.”

      July 12, 2022