नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
खळाळून वाहणारी कृष्णा नदी, तिच्या तीरावरील सुंदर दगडी घाट व रेखीव देवळं त्यात चितारली होती आणि त्या पेंटिंगच्या खाली १९६७ मध्ये प्रदर्शित झालेल्या एका मराठी चित्रपटातील गीताच्या दोन ओळी लिहिल्या होत्या……..
तुम्हाला हमखासपणे हसवणार्या नव्या युगातल्या या नव्या व्याख्या…..
दरवळणाऱ्या साजुक तुपाने आपल्या सुवासिक सुगंधाने घरभर रवा आणि साखरेकड़े आनंदाची गोड बातमी आहे अशी वर्दी दिली…मग क़ाय घरभर उत्साह पसरला…सर्वत्र आनंदी आनंद झाला… जो तो उत्सुकतेने वाट पाहू लागला…..
पुण्यात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक जिन्नसचे काही ना काही वैशिष्ट्य असावेच लागते.
खजूर सगळ्या महाराष्ट्रात मिळतात पण...
"आमचे येथे रसाळ खजूर मिळतील" हे फक्त पुण्यात !
एरवी जर्दाळू सगळीकडे, पण
“पौष्टिक जर्दाळू” फक्त पुण्यात मिळतात !
केशरात "असली" केशर फक्त पुण्यात.
सौजन्य म्हणून चहात वेलची घालायची पद्धत उभ्या भारतात असली तरी
"वेलचीयुक्त चहा" ही पाटी फक्त पुण्यात दिसते.
परवा पेणला गेलो तेंव्हा तिथे पाटी पाहिली-
‘गणपती कारखाना’ पण तेच पुण्यात बघितले तर
“आमचे येथे पेणच्या सर्वांगसुंदर गणेश मुर्ती मिळतील”!
एकदा अप्पा बळवंत चौकात चालत असतांना
“चातुर्मासानिमित्त उत्कृष्ट प्रतिच्या दासबोधावर पाच टक्के घसघशीत सूट” अशी पाटी वाचल्यावर उत्सुकतेनं दुकानात शिरलो.
उत्सुकता ही की उत्कृष्ट प्रतीचा वेगळा काही दासबोध समर्थांनी खास या दुकानाच्या प्रमोशनसाठी लिहीलाय की काय? चौकशीअंती कळलं की उत्कृष्ट प्रतीचा म्हणजे कापडी बांधणीतला दासबोध ! समर्थ रामदासांच्या नशीबानं मजकूरात काही बदल नाही.
एका बिल्डरनं “अप्पा बळवंतच्या ‘निसर्गरम्य’ परिसरात स्वस्तात फ्लॅट मिळवा” अशी जाहिरात अगदी कालपरवा केली होती म्हणे!
मला असा विश्वास वाटू लागलाय की जगातील आद्य ऍड गुरू हा पुण्याच्या बोहरी आळी ते नागनाथ पार किंवा हिराबाग ते ओंकारेश्वर
याच पट्ट्यात कुठेतरी जन्मला असणार !
शनिपाराजवळच्या एका दुकानासमोरच्या पाटीवरचा मजकूर वाचून मी कोलमडायच्याच बेतात होतो. ती पाटी म्हणजे
"येथे टिकाऊ आणि दर्जेदार जानवीजोड मिळतील !!!"
पुण्यात याची देही याची डोळा पाहिलेल्या दोन अविस्मरणीय पाट्या!
येथे खास मालवणी पद्धतीने बनवलेले ओरिजनल चायनीज मिळेल.
पुढील अजून कहर...
येथे सेकंडहॅंड कवळ्या स्वस्तात मिळतील !!!
येथे गेलेल्या फटाक्यांना वाती लावून मिळतील.
ह्या सगळ्या पुणेरी विनोदाबरोबर मी स्वत: १ पाटी वाचली होती. आम्ही एका पुलाजवळ थांबलो होताे तिथे दुकानात "येथे वैकुंठालंकार मिळतील" असे लिहिले होते. मी उत्सुकतेने पाहिले की काय असेल तिथे तर काय सांगू? अंत्यविधीला लागणाऱ्या सामानाचे ते दुकान होते.
-- संकलन : अशोक साने
फेसबुक, WhatsApp यासारख्या माध्यमातून दररोज येणारे चांगले लेख तुमच्यासाठी शेअर करतो.. लेखकाचे नाव माहित नाही.
शिव्या ह्या लोखंडा सारख्या असतात, नाही वापरल्या तर त्यांना गंज चढतो...
राग आल्यावर योग्य शिव्या घातल्या की राग शांत होतो...
योग्य माणसाला योग्य वेळी योग्य शिवी घातली की आत्मसमाधान मिळतं...
शिव्या सोडून जगात असे कोणतेही शब्द नाहीत ज्यांनी राग शांत होतो...
शिव्या द्या , पण त्या योग्य वेळी योग्य व्यक्तीला योग्य द्या...
प्रश्न ...शिव्यांचा जन्म कसा झाला?
उत्तर :- शिव्या खाण्याच्या लायकीच्या लोकांचा जन्म झाला त्याच क्षणी शिव्यांचा जन्म झाला...
१११ मराठी सभ्य – शिव्या.
१) नालायक ....
२) मुर्खा....
३) बावळट....
४) डुक्कर ....
५) टरमळया
६) नरसाळया....
७) सुरनळया....
८)दळभद्री....
९) दलिंदर....
१०)फुकटया
११) कुत्र्या....
१२) वकटया....
१३) बावळया....
१४) गाढव....
१५) बुचकळ्या
१६) ये गाजर ....
१७) उड़ानटप्पू...
१८)छमिया....
१९) बोंगाडया....
२०) पोंग्या
२१) माठया....
२२)बैल ....
२३) बैलोबा...
२४) सुक्क्या....
२५) ठोल्या..
2६) मोट्या
२७) म्हासाड...
२८) सांड ....
२९) हूडडिंगा....
३०) धटिंगन...
३१) आवाकाळी....
३२)मंद
३३) ढिल्या...
३४) च्यायला..
3५) मायला...
३६) बायल्या....
३७) गाभ्न्या...
३८) च्यामारी
३९) कान्या ...
४०) कापिंदर ....
४१) एपितर...
४२) झेंडू....
४३) जाड्या....
४४) बाचक्या
४५) ढेरपोट्या....
४५) थेरड्या....
४६) शेळपट....
४७) मेंगळट....
४८) ढेम्स्या...
४९) सुक्कड
५०) खेकड्या....
५१) डुरक्या....
५२) झिन्ग्या....
५३) बेडूक....
५४) झिपऱ्या...
५५) टकल्या
५६) बेशरम....
५७) बदमाश...
५८) निर्लज्ज...
६०) निलाजरा...
६१) बिनडोक..
६२) टमरेल
६३) खटारा....
६४) भागुन्या...
६५) टपरी...
६६) छपरी....
६७) तुसाड्या...
६८) नसान्या..
६९)बडबड्या..
७०) सापळ्या .
71)मोक्कर...
72)बधीर....
73)गेंड्या...
74)वेड्या...
75)येड्या..
76)येडपट...
77)मेंटल
78)सर्किट...
79)चक्रम..
८०) भेकड..
८२) घनचक्कर...
८३) फाटीचर...
८४) फाटक्या...
८५) खुळ्या...
८६) भामट्या..
८७) राक्षसा...
८८) कडमडया...
८९) दारुड्या..
९०) बेवड्या...
९९) पेताड...
१००) डाम्बिस.
१०१) भवाने...
१०२) डाकिन...
१०३) चेटकीण..
१०४) टकल्या...
१०५) मरतुकड्या..
१०६) ढोरा...
१०७) खप्पड..
१०८) बहिऱ्या..
१०९) मुक्या
११० ) फुकड्या..
१११) अल्लड
रोजच्या व्यवहारात वापरा आणि आपली सभ्यता जपा.
लाभले भाग्य आम्हास,
बोलतो मराठी.
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी.
धर्म पंथ जात एक जाणतो मराठी,
एवढ्या जगात माय मानतो मराठी..!!!
आताशी विशेष नाही, पण लहानपणी मैना खेरने स्वत:चा असा दबदबा निर्माण केलेला होता.
मातीकडून घेतलेल्या जीवनरसाचं देणं, सुगंधाच्या रूपात निसर्गाला परत करायचंय. उपकारांची परतफेड करायची आहे याची जाणीव आहे त्याला. कृतघ्न व्हायला…तो काही माणूस नाही नं.
कारने प्रवास करतांना पुढच्या वाहनाच्या पाठीमागे काय लिहिलंय हे वाचण्याची अनेकांना आवड असते .
प्रसाद कुमठेकर यांच्या ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ या येऊ घातलेल्या कथासंग्रहातून साभार ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ पार पब्लिकेशन्स
एका ब्राम्हणाने पत्नीला विचारले...
" पाणी छान आणि थंड आहे..
आपल्या घरात फ्रिज नाही, कुठुन आणलेस..?"
पत्नी म्हणाली - "शेजारच्या कुंभारा कडुन.!"
ब्राम्हण - काय..? त्या शुद्राचे पाणी मला पाजलेस,
तुला लाज वाटत नाही...? आपण ब्राम्हण आहोत...
आपल्याला शुद्राचे काही चालत नाही..?"
पत्नी म्हणाली - ( घाबरली व म्हणाली )" मला माफ करा, या पुढे अशी चुक होणार नाही....
दुस-या दिवशी...
ब्राम्हण म्हणाला ; "अग... जेवायला वाढ..!"
पत्नी म्हणाली - काही नाही..!"
ब्राम्हण म्हणाला - "काय...? पोळी केली नाही..?"
पत्नी म्हणाली - " नाही....! कारण...
तवा व चुल शुद्र लोहाराने व चुल कुंभाराने बनवलेली असल्याने मी त्या वस्तू फेकून दिल्या..!"
ब्राम्हण म्हणाला- "वेडी आहेस काय..? बरं दुध आण..!"
पत्नी म्हणाली - "मी दुध फेकुन दिले कारण....
ते शुद्र गवळ्याने दिले.
ब्राम्हण म्हणाला- मी म्हटले 'उद्या पासुन दुध आणू नकाे'
आम्हांला शुद्रांचे काही चालत नाही..!"
ब्राम्हण म्हणाला- (किंचाळला..) " काय...?"
ब्राम्हण म्हणाला- "बरं..बर" .. झोपायला खाट लाव..!"
पत्नी म्हणाली - "मी खाट तोडून टाकली व लाकडे जाळुन टाकली. मेलं शुद्राचं काहीच नको आपल्याला..!!"
ब्राम्हणाने डोक्याला हात लावला..
ब्राम्हण म्हणाला :- "अरे... ईथली धान्याची पोती कुठ आहेत..?''
पत्नी म्हणाली -"मी धान्य लोकांना वाटून टाकले कारण...ते आपण कुणबी शुद्रां कडुन घेतले होते. नकोच ते आपल्याला ..!"
ब्राम्हणाला भाेवळ आली व म्हणाला, " माझे आई... घरात काहीच दिसत नाही. वस्तू कुठं गेल्या..?"
ब्राम्हणाची पत्नी म्हणाली - "नाथ... घरातली प्रत्येक वस्तू कुण्यातरी शुद्रांनेच बनवली आहे.त्यामुळे मी त्या तोडून- मोडून जाळून टाकल्या..!" ब्राम्हण मोठयाने ओरडला म्हणाला," अरे आपण पार भिकारी झालो...एवढे घरंच काय ते उरले आता...!"
पत्नी म्हणाली," नाथ... चिंता करू नका, मी आपल्या आज्ञे पुढे नाही, मी हे घर दान करून टाकले आहे.
कारण... हे घर त्या शुद्र गवंडी वडार व शुद्र मजुरांनी बांधले होते, नकोच बाई आपल्याला शुद्राचे."
"नाथ.... चला आपण जंगलात जावू
कारण...इथे सर्व शुद्र आहेत, भिक्षा काय शुद्राला मागायची..? नको नको..!"
ब्राम्हण चक्कर येवुन खाली पडला, "हे देवा...
मी तर पार शुद्रापेक्षा अतिशुद्र आहे. माझ्याकडे कांहीच नाही, मीच खरा शुद्र आहे, माझे पानही शुद्रा शिवाय हालत नाही...
देवा...!! खरे उच्च शेतकरी...
सर्व अठरा पगडं जातीच महान व वंदनीय आहेत,
मी मात्र काहीच कामाचा नाही..!"
Copyright © 2025 | Marathisrushti