महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.
दीड आंब्याच्या साली काढून फोडी करा. अर्धा आंबा सजावटीसाठी वगळा. अननसाच्या स्लाइसेसमधला कठीण भाग काढून टाका आणि मग मोठे तुकडे करा. एक दोन स्लाइसेस सजावटीसाठी वगळा.(हे आंब्याच्या सिझन साठी), पुदिन्याची पाने स्वच्छ धुवून बोटानीच थोडी चुरडा.
खाकरे हाताने हव्या त्या आकारामध्ये चुरून घ्यावेत. त्यात चुरमुरे, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिरची वाटण, मीठ, लिंबूरस घालून मिश्रण चांगले एकजीव करावे. वरून हवा तो सॉस घेऊन भेळ कालवावी व सर्व्ह करावी.
उत्तर. नाही... यामागे फक्त गणेशाला प्रिय एवढेच त्याचे महत्त्व नाही.
भाद्रपद महिना हा वास्तविक पावसाळ्याचा जोर संपत येत शरद ऋतूतील ऊष्म्याकडे घेऊन जाणारा काळ. लवकरच अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्र येईल आणि त्याच बरोबर शरदाचे कडक ऊन ज्याला सर्वसामान्य भाषेत 'अॉक्टोबर हीट' असे म्हणतात तो काळ सुरू होईल. किंबहुना यंदा पाऊस कमी झाल्याने ऊन्हाचा जोर वाढलेला आत्ताच जाणवत आहे. या ऊष्म्याने पित्ताचा प्रकोप होतो. त्यातच वर्षाऋतूत वातही वाढलेला असतो. पावसाळ्यात अग्निही मंद होतो. अशा मंद अग्निसाठीच लंघनरूपी वेगवेगळी व्रते सांगितली आहेत. या व्रतांच्या निमित्ताने चातुर्मासातील देवपूजनाचे फळ मिळतेच, तसेच उपवासाने पोटास आराम मिळून पचनही बिघडत नाही. व्रते नसताना मात्र हवे तसे सण साजरे करा वा जड पक्वान्ने खा असा संदेश मात्र मुळीच नाहीये. उलट या वाढलेल्या वात-पित्ताला काबूत ठेवण्यासाठीच नारळ-खोबरे-तांंदूळ-गहू-साखर-गूळ-साजूक तूप असे आहारातील नेहमीचेच घटक, लाभदायक तरीही पौष्टिक, तृप्तीकारक पदार्थांचे सेवन करावे असे सांगितले आहे. गौरीसाठी घावन-घाटले हेही तांदूळपिठी, गूळ, खोबरे यांचाच संयोग.
मोदकाचे घटक, त्यांचे उकडणे वा तळणे हे संस्कार हे सर्व देशापरत्वे बदलते. किनारपट्टीला उष्णता असते पण हवा दमट असते, तसेच नारळाचा मुबलक वापर असतो - अशावेळी आहारात दुसऱ्या स्नेहाची फार आवश्यक आहे असे नाही आणि म्हणूनच किनारपट्टीपर तळणीचे पदार्थ कमीच व उकडून करायचे पदार्थ जास्त. पीठा, मोदक, कोळकटै हे पदार्थ सागरी किनारपट्टीवरचेच.
याउलट - देशावर - रूक्षता जास्त म्हणून स्नेहाचे प्रमाण आहारात जास्त असावे लागते यासाठीच तळणीचे पदार्थ व जेवणात तेलबियांच्या वापराचे प्रमाणही जास्त. म्हणूनच तळणीचे मोदक व गौरीसाठी पोट भरायला फराळाचे पदार्थ हेही त्याचसाठी.
वर्षभर या ना त्या कारणांनी, निमित्तानी, सणा-समारंभाला वा कोणताही आनंद साजरा करायला गोड पदार्थांचे नियोजन केले जातेच. श्रीखंड, गुलाबजाम, पुरणपोळी याखेरीज पनीर पासून बनविलेले पदार्थ यांची मोठी चलती आहे. भरीसभर व लगेच उपलब्ध, सर्वांना आवडतात म्हणून केक व पेस्ट्रीज्ची नवी नवी दुकानेही उघडत आहेत व बरकतीत चालतच आहेत. या सगळ्यात आपण आपल्या परंपरा त्याजून वा सोयीस्करपणे बाजूला सारून आपलेच नुकसान करत असतो.
तेव्हा नेवैद्य ना मग तो कोणताही गोड पदार्थ असे आपण सोयीचे करून घेतले असले तरीसुद्धा इतर कोणतेही पक्वान्न असताना निदान गणपतीत तरी मोदकांची उणीव भासतेच, कितीही विकतचे मोदक आणले तरी किमान एक दिवसतरी घरी मोदकांचा घाट घातला जातोच आणि तो घालायलाच हवा.. स्वतःसाठी आणि घरातील सर्वांच्या-आमंत्रितांच्या तब्येतीसाठीही.
अशा या मोदकांनी आपले वात-पित्त आटोक्यात आले असतील, रूक्षता-कोरडेपणा, अतिरिक्त उष्णता कमी केली असेल, रसादि सात धातूंचे पोषण करून, शरीरास आवश्यक स्निग्धता, तृप्ती दिली असेल, बळ दिले असेल, पौष्टिक असूनही वजन वाढवले नसेल असा विश्वास मला आहेच. तुम्हांलाही साजूक तुपाची धार मोदकांवरून घेताना व मनापासून त्यांचा आस्वाद घेताना फक्त Calories, fats, proteins, etc. etc. चे आकडे डोळ्यापुढे न दिसता - व कोणतीही बोच वा खंत वा अपराधी न वाटता आपल्या पूर्वजांना आजच्या नित्य-नूतन संशोधनातून विचार बदलणाऱ्या Dieticians पेक्षा जास्त बुद्धि-प्रज्ञा व मानवाची-त्यांच्या येऊ घातलेल्या पिढ्यांची जास्त काळजी होती हा विश्वास वाटून त्यांचे मनापासून आभार मानावेसे वाटले तरच हे मोदकपुराण पचले असे म्हणेन मी. आत्तापर्यंतच्या पिढ्यांनी त्या प्रथा-संकेत विश्वासाने आपल्या पिढी पर्यंत पोचवले यासाठी त्या पिढ्यांचे-पूर्वजांचे आभार मानू या.
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ - वैद्य तनुजा गोखले
साहित्य : पाव किलो मैदा, १ मोठा चमचा कसुरी मेथी, २ चमचे तीळ व तेवढाच ओवा हातावर खरडून घ्यावा. आवडीप्रमाणे तिखट-मीठ, तळायला तेल ३ वाट्या, तसेच ७ मोठे चमचे मोहनासाठी तेल
कृती : प्रथम मैदा चाळून घ्यावा. मग तो एका तसराळ्यात ठेवावा. त्यात तेलाचे कडकडीत गरम मोहन घालावे. तसेच तिखट - मीठ, तीळ व ओवा त्यात घालावा. मग मैद्याला हे सर्व तेलासह चांगले चोळावे. कसुरी मेथी चुरून घालावी. आता मैदा पाण्याने अगदी घट्ट भिजवावा व २ तास झाकून ठेवावा. या गोळ्याचे ४ ते ५ सारखे भाग (गोळे) करावेत. १ गोळा घ्यावा व त्याची ओट्यावर (तेल लावून) मोठी पोळी लाटून, लहान वाटीने सारख्या आकाराच्या पुऱ्या लाटाव्यात व मध्यम आचेवर बदामी रंगावर खमंग तळाव्यात. त्या कागदावर टाकाव्यात म्हणजे जास्तीचे तेल कागदाला लागेल. या पुऱ्या खुसखुशीत व चविष्ट लागून १०-१२ दिवस छान राहतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
आता हळू हळू हुरडा बाजारात दिसायला लागला आहे. हुरडा डिसेंबर ते जानेवारी या महिन्यात चांगला हुरडा उपलब्ध असतो. रब्बी हंगामात थंडीच्या मोसमात ज्वारीचे दाणे हिरवट, परंतु दुधाळ अवस्थेच्या पुढे जाऊन पक्व होण्याच्या अगोदरच्या अवस्थेत कोवळे असतात, त्या वेळेला भाजलेले अतिशय चवदार, मऊ आणि गोडसर लागतात, त्यास ज्वारीचा हुरडा असे म्हणतात.
आले-लसूण बारीक वाटून घ्यावे. लाल मिरच्या चमचाभर व्हिनीगरमधे बारीक वाटाव्या.
• गूळ व्हिनीगरमध्ये विरघळवून ठेवावा. वांगी धुवून पुसून ठेवावी. व त्यांचे १ सें.मी. जाड काप चिरून ठेवावे.
• कल्हईच्या पातेल्यात तेल तापले की मोहरी व हळद घालून त्यावर आले-लसूण तांबूस होईपर्यंत परतावी.
साहित्य: १ कप गव्हाचं पीठ, २ टीस्पून बेसन, ३ टेबलस्पून बाजरीचं / ज्वारीचं पीठ, १/२ टीस्पून हळद, १/२ टीस्पून लाल तिखट, १/२ टीस्पून हिरव्या मिरचीची पेस्ट, २ टीस्पून तीळ, १/२ टीस्पून धनेपूड, १/४ टीस्पून जिरेपूड, १ १/२ टीस्पून साखर, १ टीस्पून मीठ, २ टीस्पून आलं-लसूण पेस्ट, २ टीस्पून तेल (मोहन), १ कप मेथीची पाने, चिरून, पीठ मळण्यासाठी दही (अंदाजे १/४ कप), तांदळाची पिठी/ गव्हाचं पीठ लाटताना लावण्यासाठी.
कृती: परातीत गव्हाचं पीठ घ्या. त्यात बेसन, ज्वारी किंवा बाजरीचं पीठ घाला. मीठ,साखर आणि इतर मसाले घाला. तीळ,आलं-लसूण पेस्ट आणि २ चमचे तेल घालून हाताने एकत्र करा. बेसन आणि मोहन घातल्यामुळे ठेपले मस्त खुसखुशीत होतात. मेथीची पाने घालून एकत्र करा नंतर चमचा चमचा दही घालत घट्ट पीठ मळून घ्या. तासभर पीठ झाकून ठेवा आणि मग लाटायला घ्या. पीठाचे लिंबाच्या आकाराचे समान गोळे करा आणि तांदळाचं पीठ लावून ७"-८" व्यासाचे गोल ठेपले लाटा. तवा गरम करा आणि ठेपले दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घ्या. आवडत असेल तर भाजताना किंचित बटर किंवा तूप लावा. गरम गरम ठेपले छुंदा किंवा चिंचेच्या चटणी बरोबर सर्व्ह करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
साहित्य - २ वाट्या मटार (उकळलेल्या पाण्यात घालून मऊ झालेला), पाव वाटी वा १२५ ग्रॅम पनीरचे लांबट वा चौकोनी तुकडे, दोन मोठे कांदे, एक टोमॅटो, एक चमचा लसूण व अर्धा चमचा आले पेस्ट हे सर्व तव्यावर १ चमचा तेलावर परतून, गार करून पेस्ट करून घ्या. मीठ, अर्धा छोटा चमचा गरम मसाला, पाणी.
कृती - प्रथम पॅनमध्ये तेल घालून त्यावर कांदा टोमॅटोची तयार पेस्ट परतून घ्या. ५ मिनिटे परतल्यावर शिजवलेला मटार, मीठ गरम मसाला घालून उकळा व पनीरचे हव्या त्या आकाराचे तुकडे घाला व २ मिनिटे भाजी गरम करून सर्व्ह करा. ही भाजी दाट ग्रेव्हीचीच छान लागते. त्यामुळे अगदी कमी पाणी घाला.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
आंबे फक्त सिझनमध्ये मिळतात त्यामुळे हल्ली बाजारात आमरसाचे डबे मिळतात. त्यात अवधूत ह्या नावाचा डबा घ्यावा. ताजे आंबे व डब्यातील रस ह्यामध्ये फरक असतो. परंतु त्यातील रसाचे पण मोदक चांगले होतात. सीझनमध्ये हा रस आटवून ठेवला की वर्ष-दोन वर्षे सुध्दा चांगला राहतो. मग आपल्याला केव्हाही त्याचा उपयोग करुन घेता येतो. फक्त पिठीसाखर मोदक तयार करताना मिक्स करायची.
रामायण काल म्हणजे अन्नसमृद्धीचे युग होते असे वर्णन वाङमयात आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti