महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.
साहित्य : दोन वाट्या तांदूळ, अर्धी वाटी मोड आलेली मेथी, हिंग, मोहरी, हळद, तिखट, तेल, वाटणासाठी एक लहान कांदा उभा चिरलेला, 6-7 पाकळ्या लसूण, अर्धा इंच आले, पाव वाटी किसलेले सुके खोबरे.
कृती : तांदूळ धुऊन ठेवा. आले, लसूण, खोबरे तेलावर खरपूस भाजून नंतर त्याचे वाटण तयार करा. तेलात हिंग, मोहरी घालून फोडणी करा. त्यात मोड आलेली मेथी घालून परता. नंतर त्यात धुतलेले तांदूळ, तिखट, हळद, मीठ घालून पुन्हा परता. मग त्यात वरण घालून परता. तांदळाच्या दुप्पट गरम पाणी घालून शिजवा. सर्व्ह करताना ओले खोबरे व कोथिंबीर घालून सजवा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
ओट्याशी उभं राहिल्यावर स्वयंपाक करताना वेळेचे नियोजन करुन आपल्याला वेळ वाचविता येतो. हा वेळ वाचविला तो प्रत्यक्ष स्वयंपाक करताना. पण स्वयंपाक करायच्या आधी बरीच पूर्वतयारी करावी लागते. त्यासाठी देखील बराच वेळ जातो. सकाळच्या वेळी हा वेळ पूर्णपणे वाचवता आला तर? फारच सुखाचं होईल. स्वयंपाकापूर्वीची बरीचशी तयारी आदल्या दिवशी रात्री टी.व्ही. पाहाता पाहाता आपण सहजपणे करु शकतो. त्यासाठी भाजी मात्र आधी आणलेली असायला हवी. आता भाजी खरेदीचेही नियोजन करता येते. पण ते नंतर पाहू. भाजी आणलेली असल्यास रात्री निवडून स्वच्छ करुन ठेवता येते. गवार, फ्लॉवर सारख्या भाज्या आधी खुडून, चिरुन ठेवल्यास सकाळचा वेळ वाचतो.
मिरच्यांची देठ काढून ठेवावीत. कोथिंबीर निवडून धुऊन कोरडी करुन ठेवावी. तोच प्रकार पालेभाज्यांसंबंधात, सकाळी फक्त जिरुन भाजी करायला वेळ लागत नाही. लसूण, कांदे सोलून ठेवणे, दुसर्या दिवशी उसळ करायची असल्यास ती सुध्दा रात्री निवडून फ्रीजमध्ये ठेवता येते. ज्यांची सकाळी डब्यांची घाई असते त्यांच्यासाठी ही तयारी म्हणजे चार हात असल्याप्रमाणे मदतगार ठरते. डबे नसणार्यांसाठी देखील सोयीचे होते.
भाजीबाजारात जाऊन भाजी आणणे हा काय नियोजनाचा विषय आहे का? असे म्हणून कोणी हसेल देखील. मग तसे पाहिले तर कोणताच विषय नियोजनाचा नाही. कामं कशीही होतातच आणि दिवस कसाही पार पडतोच. पण कसेही हे ज्याच्या प्रकृतीला खटकते नियोजन त्यांच्यासाठी असते. कामं व्यवस्थितपणे, ठराविक वेळेत आणि गोंधळ न होता पार पडली तर त्यातील मानसिक समाधान फार मोठे असते. असो, हं ! तर भाजीचं नियोजन ! यासाठी एक छोटी डायरी करा ज्यात आठवडाभराचं नियोजन लिहिता येईल. घरातील लोकांची आवड, बाजारात, ऋतुमानानुसार उपलब्ध भाज्या यांचा विचार करा. सोमवार ते रविवार एकेका भाजीचे नाव लिहा. भाज्यांचे सात प्रकार खरेदी केले की, आज काय भाजी करु? असा आठवड्याचा भाजीचा विषय मनाला त्रास देत नाही. यात भाज्या निवडताना पहिल्या दोन दिवसांसाठी दोन पालेभाज्या नंतर तीन दिवस तीन फळभाज्या आणि शेवटच्या दोन दिवसांसाठी कांदे, बटाटे किंवा डाळीचे वडे असे नियोजन केल्यास रोज भाजीबाजारात जायचा वेळ वाचेल. भाजीबरोबर रोज एखादी उसळ ठेवल्यास उत्तमच. ती कोणती ते ही लिहून ठेवावे. भाजी आणताना आठवडाभरासाठी मिरच्या, कोथिंबीर, आलं, लिंब, लसूण, टमाटा, काकडी हे ही आणावे. सर्व निवडून फ्रिजमध्ये ठेवल्यास आठवडाभर टकते. वेळेला प्रत्येक पदार्थ हाताशी मिळतो.
कढई किंवा पातेले खूप गरम झाल्यावर त्यात फोडणीसाठी तेल घालू नये. तेल जळण्याची शक्यता असते आणि गॅस वाया जातो तो वेगळाच ! गॅसवर कढई ठेवण्यापूर्वी त्यात फोडणीचे तेल घालून कढई गॅसवर ठेवावी. म्हणजे पहिल्या क्षणापासूनच कढई बरोबर तेल तापायला सुरुवात होते. तसेच रवा, दाणे, तीळ, पोहे भाजताना कढईत आधी पदार्थ घालून मग कढई किंवा पातेले गॅसवर ठेवावे. भाजी फोडणीस टाकल्यावर हलवून परतून त्यावर ताट झाकून भाजी शिजवून घ्यावी. भाजी लवकर शिजते. भाजी शिजताना गॅस मंद ठेवावा. मधून मधून पाण्याचा शिपका मारावा. एकदाच भरपूर पाणी घालून भाज्या शिजवू नयेत. तसेच कोणतीही पालेभाजी फोडणीस घातल्यावर त्यावर झाकण ठेवू नये. पालेभाजीचा रंग बदलतो. पालकासारखी भाजी मिनिटभर गरम पाण्यात घालून मग गार पाण्यात लगेच घालून पिळून पाणी काढून चिरुन किंवा मिक्सरमध्ये बारीक करुन भाजी करावी. पालेभाज्या करताना शक्यतो भाज्या शिजवून त्या सर्व पदार्थ घालून शेवटी वरुन फोडणी घालावी. पोळ्या करताना पीठात थोडंसं मीठ घालून कणिक कोमट पाण्यात भिजवून अर्धा तास तशीच ठेवावी. पोळ्या करताना कणकेला तेल लावून चांगली मळावी. पोळी लाटताना वरुन कमीतकमी पीठाचा वापर करावा. पोळ्या संध्याकाळपर्यंत मऊ राहातात.
-- सौ. निलिमा प्रधान
अळीव म्हणजे थंडीतला खुराक आणि बाळंतिणीचं खाणं हे समीकरण आपल्याला माहीत आहे. लोहाने समृद्ध असलेल्या अळिवात कॅल्शियम, बीटा कॅरोटिन आणि प्रथिनंही असतात.
साहित्य- एक जुडी मेथीची पाने धुवून चिरून, चार-पाच वाट्या ताक, अर्धी वाटी बेसन, फोडणीसाठी एक चमचा तूप, जिरे, हिंग, कढीलिंबाची सात-आठ पाने, थोडे आले किसून, १०-१२ लसूण पाकळ्या, तीन-चार लाल सुक्यार मिरच्या, मीठ, साखर चवीनुसार.
कृती- एक चमचा तुपात जिरे, हिंग व कढीलिंबाची पाने घालून फोडणी करावी. त्यात चिरलेली मेथी घालून परतावे. शिजल्यावर ताकात बेसन कालवून शिजलेल्या मेथीवर घालावे. किसलेले आले, चवीनुसार मीठ, साखर घालून छान उकळी येऊ द्यावी, फार घट्ट वाटल्यास थोडे पाणी घालावे.
नंतर चमचाभर तुपात लसूण पाकळ्या व तीन-चार लाल सुक्या् मिरच्या परतून वरून घालावे.
रोजच्या आमटीऐवजी बदल म्हणून वाटीत ही ताकातली मेथी नक्कीच सर्वांना आवडेल.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
निळा रंग आहेच सगळ्यांचा आवडता. निळा रंग म्हणजे वर पसरलेले आकाश व ७१ टक्के पाण्याने व्यापलेली ही भूमी. दोन्हीही निळेच. निसर्गात सर्वात जास्त या रंगाची उधळण केलेली आढळते. शीतल गटात मोडणारा हा रंग मनाला आणि शरीराला शांत व प्रसन्न करतो.
नवरात्रीमध्ये ललिता पंचमीच्या दिवशी काही घरी हे घारगे आणि तांदुळाचे वडे करतात.
काकडीचे घारगे
साहित्य:- १) काकडीचा कीस (काकडी जून असावी), २) गूळ, मीठ, ३) तांदळाचे पीठ, ४) गोडे जिरे, हळद.
कृती:- भोपळ्याच्या घारग्याप्रमाणे पीठ तयार करून हे घारगे करावेत. येथे फक्त भोपळ्याच्या किसाऐवजी काकडीचा कीस वापरावा. घारगे (नारळाचे)
साहित्य – १) १ नारळाचे खोबरे, २) खोबर्याीइतकाच गूळ, ३) तांदळाचे पीठ, ४) गोड जिरे, हळद, मीठ. कृती – नारळाच्या चवात गूळ घालून त्याचा पाक तयार करावा. त्यात जिरे, मीठ व हळद वाटून घालावी व त्याचा घट्ट असा पाक झाला की खाली उतरावा व त्यात मावेल एवढेच पीठ घालावे व भिजवून ठेवावे व १ तासानंतर वडे करावेत.
सूचना – नारळाच्या चवात गूळ, जिरे, हळद घालून मिक्सरमधून चव काढला तरी चालतो. त्यात नंतर गूळ व मीठ घालून पाक करावा व त्यात पीठ घालावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
लाल भोपळ्याचे घारगे
साहित्य:- २ वाटया भोपळा सोलून कीस करून, १ वाटी किसलेला गूळ, तांदुळाचे पिठ, १/२ चमचा तेल, तळणासाठी तेल.
कृती:- प्रथम एका भांडयात भोपळा उकड्ण्यासाठी ठेवावा झाकण ठेवावे भोपळा वाफेवर शिजवावा. भोपळा शिजला की त्यात गूळ घालावा व गूळ पुर्ण एकजीव झाला कि त्यात मावेल एवढे तांदळाचे पिठ घालावे. मिश्रण छान चमच्याने एकजीव करावे. आणि झाकण लावून वाफवून घ्यावे. थंड झाले की छान मळून घ्यावे. थोडेसे तेल लावावे. एका प्लास्टिक पेपर वर तेल लावून छान थापुन पुऱ्या कराव्या. गरम तेलात छान खरपुस तळून काढाव्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
तांदळाचे वडे
साहित्य :- ३ वाट्या तांदूळ, ५०० ग्रॅम गूळ, ४ वेलदोडे पूड, ३ चमचे खोबऱ्याचे काप, ३ चमचे पांढरी चवळी, अर्धा चमचा हळद.
कृती :- तांदूळ तासभर भिजत ठेवावेत. पाणी बदलून चाळणीवर तांदूळ निथळत ठेवावे. वाटल्यास फडक्यावर पसरून ठेवावे. कोरडे होऊ लागले की खलात घालून कुटून घ्यावे. हे तांदळाचे पीठ फिक्या बदामी रंगावर येईपर्यंत भाजावे. भाजून झाले की पीठ मापून घ्यावे. तितकाच गूळ मापून घेऊन बारीक चिरावा. एका पातेल्यात अर्धी वाटी पाणी घेऊन त्यात गूळ घालावा. पातेले चुलीवर ठेवावे. एकीकडे चवळी कोरडी भाजून घ्यावी. गूळ पातळ होऊन विरघळला की त्यात कुटलेले पीठ, हळद व भाजलेली चवळी घालावी. मिश्रण घट्टसर होईपर्यंत चुलीवर ढवळावे. घट्ट झाले की खाली उतरवून त्यावर वेलचीपूड घालावी. मिश्रण निवाले की त्याचे बेताच्या आकाराचे वडे तळून ठेवावे. कुकरमध्ये चाळणीवर केळीचे (किंवा कर्दळीचे) पान धुवून ठेवावे. त्यावर हे वडे ७-८ मिनिटे वाफवावे. गार झाले की लोण्याशी खावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
आले-लसूण बारीक वाटून घ्यावे. लाल मिरच्या चमचाभर व्हिनीगरमधे बारीक वाटाव्या.
• गूळ व्हिनीगरमध्ये विरघळवून ठेवावा. वांगी धुवून पुसून ठेवावी. व त्यांचे १ सें.मी. जाड काप चिरून ठेवावे.
• कल्हईच्या पातेल्यात तेल तापले की मोहरी व हळद घालून त्यावर आले-लसूण तांबूस होईपर्यंत परतावी.
साहित्य: १ किलो ताज्या अननसाचे लहान तुकडे,२५० ग्रॅम खवा,एक-दीड वाटी ताजी घोटलेली साय किंवा क्रीम,५०० ग्रॅम साखर,४ मोठे चमचे तूप,पाव चमचा केशर (ऐच्छिक),१ वाटी पाणी,२-३ चमचे काजू बदामाचे पातळ काप.
कृती:
साखरेत पाणी घालून दोनतारी जाड पाक मंद आंचेवर करावा. पाक तयार झाला की त्यात अननसाचे तुकडे घालावेत. त्यांना सुटलेले पाणीही त्यात घालावे.
मंद आंचेवर अननस शिजवावा. अधूनमधून ढवळावे.
गरम पाण्यात केशर भिजत ठेवावे. उन्हाळ्यात केशर वापरू नये. उष्ण पडते.
अननस शिजत आला की पाकही आळतो व मिश्रण घट्ट होऊ लागते. केशर घालायचे असल्यास त्यात घालावे.
दुसऱ्या जाड बुडाच्या पातेल्यात तूप तापले की अननसाचे मिश्रण घालून परतावे. खवा त्यातच कुस्करून घालावा व मिसळेपर्यंत सतत ढवळावे. ३-४ मिनिटे ढवळून खाली उतरवावे व कोमट होऊ द्यावे.
पुडिंग बोलमधे घालून त्यावर साय व काजू-बदामाचे काप घालावे.
पार्टीसाठी करायचा असल्यास साय किंवा क्रीमऐवजी बरोबर व्हॅनिला किंवा दुसरे रंगसंगती व स्वादसंगती साधणारे आईस्क्रीम द्यावे.
हा हलवा दोनतीन दिवस अगोदर करून ठेवला तरी चालतो. मात्र अननस ताजा, पूर्ण पिकलेला व रसाळ हवा. डब्यातला घेऊ नये.
हे पुडिंग मोठ्या पार्ट्यात करायलाही हरकत नाही.
श्रावण आता संपला. गणपतीही येऊन गेले. आता मत्स्यप्रेमींच्या मेजवान्या सुरु होतील…
साहित्य - दोन ते अडीच वाट्या ताजा कोवळा हुरडा, एक ते सव्वा वाटी भिजलेली हरभराडाळ (काही जण चणाडाळ व मूगडाळ एकत्रित घेतात).
मसाला - आल्याचा मध्यम तुकडा, चार-पाच हिरव्या मिरच्या, थोडी कोथिंबीर, नावाला थोडा गरम मसाला, लसूण (ऐच्छिक), मीठ, साखर, तळणीसाठी तेल.
कृती - हुरडा, डाळी, सर्व मसाला हे घालून मिक्सयरमधून थोडंसं पाणी घालून वाटून घ्यावे. साधारणत- उडीदवड्याच्या पिठाप्रमाणे हे असावं. जरूर वाटल्यास बाइंडिंगसाठी एखादा उकडून रगडलेला बटाटा वा बेसन घालावं. मीठ, साखर, कोथिंबीर (चवीनुसार) घालून त्याचे छोटे छोटे वडे गरम तेलात तळावेत. हे वडे कच्ची पपई, पुदिना, कोथिंबीर, मिरचीच्या आंबट-गोड चटणीबरोबर देतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Copyright © 2025 | Marathisrushti