महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.
आजकाल घरोघरी मिक्सर असले आणि सगळ्या वाटण्याघाटण्यासाठी त्यांचाच वापर होत असला तरी एकेकाळी चटण्या खलबत्त्यात कुटूनच केल्या जायच्या. खलबत्त्यात कुटून केली जाणारी शेंगदाण्याची चटणी आणि मिक्सरमध्ये भरडून केली जाणारी शेंगदाण्याची चटणी यांच्या चवीत जमीन अस्मानाचा फरक पडतो.
साहित्य : अर्धा किलो मैदा, पाऊण वाटी तुपाचे गरम मोहन, तळणीसाठी तूप किंवा रिफाइण्ड तेल, तीन वाट्या साखर, अर्धा चमचा वेलदोडा पावडर.
कृती : मैद्यात गरम तुपाचं मोहन घालून मैदा आणि मोहन एकत्र कालवावे. नंतर थोडेथोडे पाणी घालून पुरीच्या कणके इतपत घट्ट भिजवावे. पीठ अर्धा तास झाकून ठेवावे. नंतर पीठ मळून त्याच्या जाडसर पोळ्या लाटाव्या. बोटाइतक्या लांब-रुंद पोळीच्या पट्ट्या कापाव्या. मध्यम गॅसवर तुपात तळाव्यात. फार तळून कुरकुरीत करू नये. नॉनस्टिक पॅनमध्ये साखर घेऊन बुडेपर्यंत पाणी घालावे. पक्का पाक झाल्यावर त्यात वेलदोड्याची पावडर आणि तळलेल्या पारी घालाव्या. ताटाला तुपाचा हात लावून पारी ताटात काढाव्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
ज्वारीच्या लाहय़ांमध्ये कचकच असते म्हणून त्या पाण्यातून काढून घ्याव्यात. म्हणजे त्यातील वाळू पाण्यात निघून जाते.
प्रथम तिन्ही प्रकारच्या भोपळी मिरच्या, ब्लॅक ऑलिव्ह्स, कॉर्न, मशरुम्स किसलेल्या मोझ्झरेल्ला चिझ मध्ये तेलावर मंद आचेवर परतून घ्यावे. नंतर त्यात चवीनुसार मीठ व चिली फ्लेक्स, ओरिगानो टाकावे.
आंबे फक्त सिझनमध्ये मिळतात त्यामुळे हल्ली बाजारात आमरसाचे डबे मिळतात. त्यात अवधूत ह्या नावाचा डबा घ्यावा. ताजे आंबे व डब्यातील रस ह्यामध्ये फरक असतो. परंतु त्यातील रसाचे पण मोदक चांगले होतात. सीझनमध्ये हा रस आटवून ठेवला की वर्ष-दोन वर्षे सुध्दा चांगला राहतो. मग आपल्याला केव्हाही त्याचा उपयोग करुन घेता येतो. फक्त पिठीसाखर मोदक तयार करताना मिक्स करायची.
साहित्य -
एक खवलेला नारळ
दोन पेले पातळ पोहे
मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर
एक बारीक चिरलेला कांदा
एका लिंबाचा रस
एक चमचा किसलेली कैरी
तीन चमचे साखर
चार हिरव्या मिरच्या
मोहरी
चिमूटभर हळद
हिंग
तेल
चवीपुरतं मीठ
कृती
एक ओला नारळ फोडून त्यातील पाणी बाजूला काढावे. नारळ खवून घ्यावा. कांदा, कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी. एका लिंबाचा रस काढावा. हिरव्या मिरच्यांचे मध्यम आकाराचे तुकडे करावे. कैरी किसून घ्यावी.
एका मोठ्या बाऊलमध्ये बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, लिंबाचा रस, खवलेला नारळ, साखर, चवीपुरते मीठ,चमचाभर कैरीचा किस, नारळातील पाणी सर्व एकत्र करून सारखे करावे. ५ - १० मिनिटे तसेच झाकून ठेवावे.
छोट्या कढईत डावभर तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग आणि चिमूटभर हळद घालावी. मिरच्यांचे तुकडे घालून गॅस बंद करावा.
या मिश्रणात २ पेले पातळ पोहे घालून कालवावे. नंतर त्यावर तयार केलेली फोडणी घालावी. सर्व एकत्र कालवून अर्धा तास दडपून झाकून ठेवावे.
सर्व्ह करताना डिशमध्ये हे दडपे पोहे घालून वरून थोडी कोथिंबीर घालावी
-- निलिमा प्रधान
९८२०३१०८३०
साहित्य : तीन वाट्या उपवासाच्या भाजणीचे पीठ, चवीपुरते तिखट, जिरेपूड एक चहाचा चमचा, चहाचे दोन चमचे लोणी, मीठ, तूप.
कृती : मंद गॅसवर पातेल्यात दोन वाटी पाणी उकळत ठेवा. त्यात जिरेपूड, तिखट, मीठ, लोणी, घाला. पातेल्यातील पाणी उकळले की पातेले खाली उतरावा. पीठ चाळा, भाजणीचे पीठ त्यात हळूहळू सोडा चांगले कालवा. नंतर मिश्रण झाकून ठेवा. थंड झाल्यावर हे पीठ पसरट भांड्यात (परातीत) काढा. चांगले मळून घ्या. कढईत तूप गरम करा. सोऱ्यात चकलीचा साचा घालून या तयार केलेल्या पिठाच्या चकत्या पाडा. तळा. गरम असतानाच दह्याबरोबर खा.
साहित्य :- दीड कप कणीक, पाव किलो पनीर, अर्धा चमचा कांदा मसाला, अर्धा चमचा जिरे पूड, अर्धा चमचा धणेपूड, अर्धी वाटी चीज स्प्रेड, अर्ध वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, दोन मिरच्या बारीक चिरून, अर्धा चमचा साखर , अर्धा कप मैदा, डाळीचं पीठ पाव कप , लाटायला मैदा, एक कांदा बारीक चिरून, एक डाव तेल , तूप वरून सोडायला .
कृती :- कणीक , मीठ , मैदा आणि डाळीचं पीठ एकत्र करून डावभर गरम तेल घालून मऊ भिजवावं . पनीर किसून त्यात कांदा , कोथिंबीर , मिरच्या , धने-जिरे पूड , कांदा मसाला , साखर घालून हलक्या हातानं मिसळावं . भिजवलेल्या पीठाचे दहा गोळे करून त्याच्या पातळ पोळ्या लाटाव्यात . मग एक पोळी घेऊन तिच्या अर्ध्या भागावर चीज स्प्रेड हातानं लावावं . त्यावर पनीर मिश्रण पसरवावं व पोळीच्या उरलेल्या अर्ध्या भागनं ते झाकून कडा दाबून चिकटवाव्या . त्यावरून हलकेच लाटणं फिरवावं व तव्यावर तूप सोडून अशा घडया केलेले पराठे भाजावेत . लोणचं किंवा पुदिन्याच्या दह्याबरोबर दयावेत
कलिंगड स्वच्छ धुऊन पुसून घ्या. कापून साली व त्यातील बिया काढा. गर काढा. नंतर सर्व पदार्थ मिक्सरमधून काढा. भांड्यात ओता. ग्लास भरा. वरुन बर्फाचा चुरा घाला. फ्रिज असेल तर थंड करुन प्यायला द्या.
गाजराचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. गाजर हे ‘अ’ जीवनसत्वाने समृद्ध असते. गाजर खाल्ल्याने आतडय़ांच्या तक्रारी दूर होतात. तसेच चेहर्यासाठीही गाजर उपयुक्त आहे. शरीरात पाणी कमी झाल्यास गाजराच्या रसाने ती उणीव भरून काढली जाते. हृदय रोगांवर रामबाण इलाज आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti