वेलींना तो आधार होता, वृक्ष वाटला दणकट परि
बुंधा ज्याचा किडूनी गेला, कोसळणार मग कधीतरी
नष्ट करिल तो तरूवेलींना, धरणीवरती आडवा होता
सौंदर्य दिले लताफूलांनी, सारे कांहीं विसरूनी जाता
वेलींनो आणि झुडपानों, सोडूनी घ्या तो आधार पोकळ
स्वतंत्रपणे तुम्ही जगण्या , स्वावलंबनाचे टाका पाऊल
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
अगदी मॉर्डन कॉलेज कुमारांचे
बसले एक टोळके गाडीत समोर
हासत होते, खिदळत होते, गप्पा मारीत होते,
ऐकण्यासारखे होते परंतु सांगण्यासारखे नव्हते.
स्टेशन येताच सारे उतरले
तेव्हा मी एकास विचारले
“आपल नाव सांगता ?”
उतरता उतरता ऐकू आले
“ मी आहे मिस निता ”
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
कोणते दुःख तुला छळते
अकारण कां व्यथित होते ।।धृ।।
प्रेमळ छत्र पित्याचे असतां
गेले जीवन तुझे बागडतां
लाड पुरविले आईने तव
शिकवीत असतां आनंदी भाव
आठव सारे याच क्षणीं ते ।।१।। अकारण तूं कां व्यथित होते
बांधून घेतां राखी हातीं
आश्वासन तुजला मिळती
पाठीराखा भाऊ असूनी
येईल तुजसाठीं धावूनी
कसली शंका मनांत येते ।।२।। अकारण तूं कां व्यथित होते
संसार भरला सुख-दुःखानी
घे शिरावर तुझ्याच समजूनी
जीवन मार्गी होता बदल
नको होऊस वेडे चंचल
सावध असूं दे चित्र तुझे ते ।।३।। अकारण तूं कां व्यथित होते
नाते गोते वाढवीत जावे
सर्वामध्यें प्रेमळ व्हावे
छत्राखालती होती आजवर
छत्रचि बनावे तूं इतःपर
संस्काराचे मधूर फळ येते ।।४।। अकारण तूं कां व्यथित होते
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
जन्मापासूनी बघतो तूला
परि जन्मापूर्विच ओळखले
रोप लावले बागेमध्ये
फूल तयाने दिले
चमकत होती नभांत तेंव्हा
एक चांदणी म्हणूनी
दिवसाही मिळावा सहवास
हीच आशा मनी
तीच चमकती गोरी कांती
तसेच लुकलुकणे
मध्येच बघते मिश्कीलतेने
हासणे रडणे आणि फुलणे
चांदणीचा सहवास होता
केवळ रात्रीसाठी
दिवस उजाडतां निघून गेली
आठवणी ठेवून पाठी
नको जाऊस जरी ही इच्छा
परि जाशील सोडून दुजा घरी
आठवणीसाठा देत जा मजला
दिलासा तोच हे समाघान धरी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
आले कोवळे किरण कांचनी
चराचर सारे , सुखात नाहले...
भावनांच्या कळ्या उमलल्या
अधरी शब्दलाघव ते प्रसवले...
रिमझिमणाऱ्या, श्रावणधारी
कृष्णमेघ सावळे बरसबरसले
हिरवळलेल्या या तृणांकुरातून
चैतन्य जीवा तोषवित राहिले...
लागताच चाहुल विश्वंभराची
रूप ब्रह्मांडाचेही भारावुन गेले...
झरझरता श्रावण आत्मरंगला
स्वर शब्दमार्दवी दाटुनी आले...
व्याकुळता, अंतरीची निरागस
मन दिगंतरी सारे भावुक झाले...
–वि.ग.सातपुते .(भावकवी)
9766544908
रचना क्र. १८७
४/८/२०२२
जीवा जगण्याचीच एक आंस
गोविंदराव पटवर्धन यांचा जन्म २१ सप्टेंबर १९२५ रोजी गुहागर जवळ असलेल्या अडूर या कोकणातल्या गावी , त्यांच्या आजोळी झाला. ते १९३० च्या सुमारास मुंबईला आले . त्यांचे शिक्षण मुबईतील आर्यन एज्युकेशन स्कुलमध्ये झाले. १९४२ साली मॅट्रिक झाल्यानंतर ते १९४७ साली पोलीस खात्यात नोकरीला लागले. उपजिवेकेसाठी त्यांनी पोलीस खात्यात नोकरी केली परंतु त्यांची खरी निष्ठा संगीतावरच होती.
सारेच भरभरून आहे
हवे तेच लाभले नाही
जीव हा व्याकुळलेला
जीवास स्वास्थ्य नाही।।१।।
श्रद्धेत विश्वास नाही
दगडातही, देव नाही
वेड्याच साऱ्या आशा
जीवनास अर्थ नाही।।२।।
अस्तित्व! सारेच शून्य
असे जगणेच विमनस्क
कितीदा ? कसे सावरावे
हवे तेच लाभले नाही।।३।।
हव्यास हा जगण्याचा
आज सारा व्यर्थ आहे
निष्ठुर भोगणे प्रारब्धाचे
त्याविण मुक्तता नाही।।४।।
मनेच आज दुभंगलेली
वोखट्याच प्रीतभावनां
स्वार्थात, गुरफटलेल्या
निस्वार्थ प्रीतभाव नाही।।५।।
-- वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908.
रचना क्र. ६.
६ - १ - २०२२.
Copyright © 2025 | Marathisrushti