(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • नाजूक वेली

    नाजूक नाजूक वेली मनीं तु माझ्या बसली //धृ//

    हिरवी साडी अंगावरी खडी रंगीत किनारी
    ठिपके चमकती पांढरे त्या साडीवरती पसरे
    आकर्षक साडी नेसली //१//
    नाजूक नाजूक वेली मनीं तु माझ्या बसली

    शरीर तुझे बांकदार रुप तुझे मनोहर
    चपळाईने तूं वाढते दूर जाण्या झेपावते
    वाकड्या चालीत शोभली //२//
    नाजूक नाजूक वेली मनीं तु माझ्या बसली

    मिष्किलपणें तूं हासते विनम्रतेने वाकून जाते
    पसरवूनी तुझा सुगंध करी सर्वाना तूं धुंद
    राणी ठरतेस बागेमधली //३//
    नाजूक नाजूक वेली मनीं तु माझ्या बसली

    बघूनी नभीचे तारे भेटण्या तुझे मन हावरे
    परि खंत वाटे तुजला आधार हवा चढण्याला
    नको उंचावू इच्छा आपुली //४//
    नाजूक नाजूक वेली मनीं तु माझ्या बसली

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • इये मुंबईचिये नगरी .. मध्यरंग (सन – १९९५)

    मुंबईची कथा आणि व्यथा सांगणारी ही कविता श्री द्वारकानाथ शंकर उर्फ जयंत वैद्य यांनी सर्वप्रथम १९८२ साली लिहिली. जसजसा काळ पुढे गेला तसे संदर्भ बदलले, मुंबईसुद्धा बदलली. या कवितेचा हा मध्यरंग १९९५ मध्ये लिहिला गेला.व्यवस्थापन सल्लागार असलेले श्री वैद्य हे अवघे पाउणशे वर्षाचे तरुण आहेत. त्यांचे नजिकचे मित्र त्यांना DS या टोपणनावाने संबोधतात.

  • वाटतो आहे नकोसा पिंजरा !

    वाटतो आहे नकोसा पिंजरा!
    लागली तृष्णा नभाची पाखरा!!

    संपली नाही प्रतीक्षा जन्मभर
    वाट बघणाराच झालो उंबरा!

    स्वप्न सोनेरी कुठे तू हरवले?
    काळजाचा शोध कानाकोपरा!

    तू नको बोलूस काही, शांत बस
    सांगतो आहे कहाणी चेहरा!

    तूच माळायास नाही राहिली....
    पार कोमेजून गेला मोगरा!

    ही मुखोट्यांचीच दुनिया वाटते....
    कोण खोटा, कोण अन् आहे खरा?

    प्रेत म्हणते, का रडू यांच्यापुढे?
    एकही यांच्यात नाही सोयरा!

    खूप भिरभिरला, अखेरी श्रांतला....
    शोधतो वारा स्वत:ला आसरा!

    नाव मी येवू दिले नाही तुझे...
    का तुझा आवाज झाला कापरा?

    थेंबही आडात पाण्याचा नुरे....
    वासुनी ‘आ’ पाहतो बघ पोहरा!

    -- प्रोफेसर

    प्रा. सतिश देवपूरकर

  • गुरुदत्तची अजरामर कलाकृति-प्यासा

    एक गाणे तर चक्क मोहमद रफीने कंपोज केले आहे. सचिनदा आले नव्हते, रफीने आधी नकार दिला होता. साहीर आला होता व ते रेकोर्ड झाले नसते तर रेकोर्डिंगचे पैसे वाया गेले असते, ते गाणे होते “तंग आ चुके है “

  • शंख-शिंपले

    जिथे नदी किनारी शंख-शिंपले शोधले
    वाळूत खेळताना किती किल्ले बांधले // धृ //

    त्या दिवसांची आठवण येता, तुला ना विसरावे
    स्पर्श होता तुझ्या बोटांचा, पुन्हा सर्व आठवावे
    परंतु हा भास आता, स्वप्न वाटे चांगले //१//

    ते थोडेसे दिवस सुखांचे, भुर्रकन उडुन गेले
    जीवनात सात रंगांचे - इंद्रधनुष्य बनवुन गेले
    दिवस - रात्र, पुनर्भेटीचे वेध लागून राहीले //२//

    दिवस गेले, ऋतू बदलले- प्रेम पुन्हा न झाले
    तू सांगितलेल्या मार्गावरुन, जीवन निरंतर चाले
    एक दिवस आहे मिलनाचा, हे हृदयी मी जाणले //३//

    श्री. सुनील देसाई
    २०/०६/२०२२

  • सर्वांची काळजी

    मुसळधार ती वर्षा चालली, एक सप्ताह तो होवून गेला

    पडझड दिसली चोहीकडे, दुथडी वाहतो नदी-नाला...१,

    काय प्रयोजन अतिवृष्टीचे ? हानीच दिसली ज्यांत खरी

    निसर्गाच्या लहरीपणानें, चिंतीत झाली अनेक बिचारी....२,

    दृष्टी माझी मर्यादेतच, विचार तिजला अल्प घटकांचा

    विश्वचालक काळजी करि, साऱ्या चौऱ्यांशी लक्ष योनींचा....३

    -- डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • निसर्ग व्याप्ती

    उंच चढूनी हिमालयी, झेंडा तो रोविला

    गीरीराजाचे शिरावरी, विजय संपादिला

    उंचाऊनी बघे मानव, अथांग जगताला

    विज्ञानाच्या जोरावरती, अंतराळात गेला

    युगा युगाचा चंद्रमा, केला अंकित त्याने

    त्याच्या देही ठेवी पाऊल, मोठ्या अभिमानाने

    अगणित दिसती गृहगोल, त्याचा दृष्टीला

    सीमा न उरली आता मग, चौकस बुद्धीला

    चकित होतो प्रथम दर्शनी, विज्ञाना बघता

    दिसून येती अनेक गुढे, एक एक उकलता

    किती घेशी झेप मानवा, उंच उंच गगनी

    वाढत जातील क्षितिजे, तितक्याच पटींनी

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • येरझारा

    जगता, जगता जगती
    अनामिका शोधीत राहिलो..

    हितगुज अव्यक्त मनाशी
    नित्य मीच करित राहिलो...

    वळणा वळणावरुनी
    अज्ञाना उलगडीत राहिलो...

    नेत्री केवळ ध्यास तुझा
    येरझारा घालीत राहिलो...

    कधीतरी भेटशील एकदा
    भक्तीभावनां जपत राहीलो...

    वेडी आशा वेडी आसक्ती
    नकळे तुझ्यात मग्न राहिलो

    रचना क्र. ९०
    २९/७/२०२३
    -वि.ग.सातपुते.(भावकवी)
    9766544908

  • तरंग

    “सुमनांजली” या काव्यसंग्रहातून…

  • खरी स्थिती

    मला नाही मान मला नाही अपमान,

    हेच तूं जाण तत्व जीवनाचे....१

    कुणी नाही सबळ कुणी नसे दुर्बल

    हा मनाचा खेळ तुमच्या असे....२

    कुणी नाही मोठा कुणी नसे छोटा

    प्रभूच्या ह्या वाटा सारख्याच असती....३

    विविधता दिसे ती कृत्रिम असे

    निसर्गाची नसे ती वस्तूस्थिती....४

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com