सुमनांजली या काव्यसंग्रहातून…..
अगदी मॉर्डन कॉलेज कुमारांचे
बसले एक टोळके गाडीत समोर
हासत होते, खिदळत होते, गप्पा मारीत होते,
ऐकण्यासारखे होते परंतु सांगण्यासारखे नव्हते.
स्टेशन येताच सारे उतरले
तेव्हा मी एकास विचारले
“आपल नाव सांगता ?”
उतरता उतरता ऐकू आले
“ मी आहे मिस निता ”
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
कसे मानूं उपकार निसर्गा तूझे मी
उघडोनी जीवन द्वार आलास तूं कामी
तुझ्या मोरानें दाखविले नृत्य राघूच्या वाणीनें शिकविले सत्य
कोकीळेचे गान सप्तसुरांच्या लहरी चित्रकलेचे ज्ञान इंद्रधनुष्या परि
मुंग्याची वारुळे दाखवी वास्तूकला कोळ्याची जाळे शिकवी हस्तकला
घारीची भरारी स्वछंद केले मनां मैनेच्या उदरीं जाणला प्रेमळपणा
विजेची चपळता चंचल बनवी धबधब्याची प्रचंडता श्रेष्ठत्व जाणवी
निसर्गातील विवीधता देई माणसा ज्ञान
करी त्यास मदत, आनंदी होण्या जीवन
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
बेधुंद दरवळता गं गंधबकुळी
अजूनी होतो सारा भास तुझा
मनहृदयी अलवार बिलगणारा
अविस्मरणीय, तो स्पर्श तुझा
किती? काय? कसे स्मरावे
धागे आठवांचे किती उसवावे
मर्मबंधीच साऱ्या रेशीमगाठी
उलगडता, सहजी भास तुझा
भावगंधले ते स्पर्श मयूरपीसी
अव्यक्त! सारे झरते शब्दांतूनी
उमलताच लाघवी प्रितकळ्या
लोचनी घट्टमिठीचा भास तुझा
ब्राह्ममुहूर्तीची ही मधुरम स्वप्ने
गोकुळी राधामीरा कृष्णसखा
मंतरलेल्या साऱ्या कातरवेळी
मुग्ध पावरीत मंजुळ सूर तुझा
-- वि.ग.सातपुते( भावकवी)
9766544908
रचना क्र. १३४
१४ - १० -२०२१.
वेळ येता उकलन होते, साऱ्या प्रश्नांची
जाणून घ्या हो थोडे तुम्ही, रीत निसर्गाची...१,
जेंव्हां तुम्हाला यश ना मिळते, एखाद्या प्रश्नी,
वेळ नसे योग्य आली, हेच घ्यावे जाणूनी...२,
प्रयत्न सारे चालूं ठेवतां, यश ना मिळे
कांहीं काळासाठी थांबवा, प्रयत्न सगळे...३,
काळ लोटतां प्रयत्न होती, पुनरपि सारे,
उकलन होवून गुंत्यांची, आख्खे निघती दोरे...४,
कुणी म्हणती ग्रह अनूकुल, ह्या घटनेला
हीच वेळेची किमयासारी, कशी कळे कुणाला....५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
आत्म्याला ओढ असते ईश्वराच्या मिलनाची
जाण सदैव राहते प्रभुमय स्वरुपाची ।।१।।
अंशात्मक भाग असे आत्मा हा परमात्म्याचा
उत्कंठ ते आकर्षण गुणस्वभाव तो त्याचा ।।२।।
आत्म्यास पडले असे बंधन ते शरीराचे
जीवन कार्ये करुनी प्रयत्न करी मुक्तीचे ।।३।।
मुक्त होई त्या क्षणीं अनंतात समावतो
परमेश्वरि रुपांत विलीन होऊन जातो ।।४।।
आत्मा मुक्त होत असे देहकर्म फळावर
चांगले कर्म नसता नविन देह घेणार ।।५।।
दोन प्रकारांनी आत्मा प्रभू समर्पण होतो
देह मृत वा सजीव असतांना हे साधतो ।।६।।
ध्यान साधना करणारे उतरती समाधीत
त्याच क्षणी शरिराला आत्मा असे सोडीत ।।७।।
देह सोडूनी भुवरी आत्मा येई बाहेरी
क्षणिक काळा करितां मिलन होई ईश्वरी ।।८।।
समाधी असे साधन प्रभू मिलन होण्याचे
देह समाधीत जाणें सार असते जिवनाचे ।।९।।
जिवंतपणीच तुम्हीं प्रभूमय होत असे
आनंदी नितांत क्षण खराखुरा तोच असे ।।१०।।
आत्म चिंतन करुनी आत्म ज्ञान प्राप्त होई
तोच ईश्वर असूनी दुजा ठिकाणीं तो नाहीं ।।११।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
धुळ साचते
पुस्तकावर,टि.व्ही.वर
खिडक्यांवर,दारावर
आणि
कुलुपावर
धुळ करते कब्जा सार्यांवर...
किती दिवस झालेत
माणसांचा घरात नाही वावर
घरमालक
मस्त गेलाय फिरायला
घर सोडून वार्यावर....
धुळ पसरते चादर
सार्या वस्तूवर
आणि
कुणी आलंच तर
ठसे उमटणार घरभर
ठेवते नजर चोरावर..
धुळंच सांभाळते
सारं घर तुम्ही घरी नसल्यावर...
-- श्रीकांत पेटकर
(मागील वर्षी आजच्या दिवशी.. १०/१०/२०१७ला केलेली कविता )
https://www.facebook.com/shrikant.petkar.5
`आम्ही साहित्यक फेसबुक ग्रुप'चे लेखक श्री रघू देशपांडे, नांदेड, यांची ही रचना
बोललो जेव्हा मनीचे
ते न त्यांनी ऐकले ।
आज म्हणती बोल काही
मौन जेव्हा घेतले ।।
...मी मानसी
प्रेम जिथे निःस्वार्थ फुलते, तिथे विठ्ठल हसरा दिसे,
श्रद्धेच्या त्या निर्मळ ओंजळी, रुक्मिणीचे प्रेम वसे.
नसती तिथे शब्दांची भाषा, डोळेच बोलती साऱ्या कथा,
एका स्पर्शात विश्व सामावे, प्रेमच ठरते जीवनव्यथा.
अहंकाराचे गळुनी बंधन, मन जेव्हा निर्मळ होते,
विठ्ठलनामाच्या गजरामध्ये, भक्तीचे गगन उजळते.
सुख-दुःखाच्या प्रत्येक वाटे, हातामध्ये हात असावा,
रुक्मिणीच्या अढळ श्रद्धेने, विठ्ठल अंतरी नांदावा.
प्रेम म्हणजे देह नव्हे रे, आत्म्याचा तो श्वास असतो,
श्रद्धेच्या अखंड ज्योतीमधुनी, जीवनाचा प्रकाश फुलतो.
करुणा, क्षमा, समर्पण जेथे, देवत्व तेथे जागे होते,
प्रेम तिथे विठ्ठल नांदतो, श्रद्धा रुक्मिणी रूपे फुलते.
पंढरी दूर नसते कधीच, भाव जर अंतरी शुद्ध असे,
प्रेमाच्या त्या पवित्र मंदिरात, विठ्ठल-रुक्मिणी सदैव वसे.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे
मो:- 9011841212
Copyright © 2025 | Marathisrushti