स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज झी मराठी वाहिनीवरील २२ नोव्हेंबरचा भाग अख्या महाराष्ट्रासाठी काळजात हात घालून मनी हंबरडा फोडणारा होता. आज खूप दु: ख झाले एका युग पुरषाचा अंत पहिल्यादा मी अनुभवला... आशा महान युग पुरुषास माझ्या जाणता राज्यास विनम्र अभिवादन..
माझे शब्द रूपी काव्यपुष्प अर्पण करतो... काही चुकल्यास माफी मागतो ..एक शिवप्रेमी मावळा....
चिरून तो काळाचा पदडा
सह्याद्री पुन्हा गहीवरणार
जाणता राजा शिवछत्रपती
अवतार विलीन तो होणार...
केले उभे हे स्वराज्य त्यांनी
लेक जिजाऊ मातेचा तो असा..
मुघली शासन मोडीत धरी
झुंजे वाघ सह्याद्रीचा तो असा..
नथ मस्थक झाली ती युगे
अखंड स्वराज्य श्रीची रे ईच्छा..
हाती धरून एक एक मावळा
केली स्वराज्याची पुर्ण ईच्छा..
सह्याद्री चौफेर पराक्रम त्याचा
दुमदुमली मराठी माती अशी
गड ,बुरुज देहहरवून देई लढा
बलिदानी लाल झाली माती अशी..
चरित्र शिवाजीचे ऐकता
चैतन्य प्रत्येक रे मनी पेटे..
धकधक करुनी धमण्या
अस्मिता ह्दयी, ती दहक पेटे..
असा वाघ जेव्हा गडबडला
काळाचा ओघ तो जणू चढला
अचानक रोग रुपी शुत्रूचा
नकळत हल्ला देवाला अडला..
ओठी एक नाव ते शुंभू शुंभू
एक बाप असा व्याकूळ झाला..
भेद काळाचा नाही कधी कळला
माझ्या राजाचा प्राण आडकला..
शुंभू राजे होते तेव्हा पन्हाळी
रायगडाला लागली हो जिव्हाळी
राजघराण्यातील सगळे दु:खी
राज्य कारभाऱ्याच्या देव जाप मुखी..
लागे मनी चाहूल शुंभू राजास
मन बोले, देई हाक पित्यास..
अस्वस्थ झाले पुत्र युवराज
कुठे काही घडतं ?.. काय ते राज .?
चाले प्रयत्न शरर्थीचे , वैद्य लढे
एक एक अनुभव आज मागेपढे
नाही असर होई जेव्हा ती दवा
सगळ्यांनी मग मागितली दुवा...
नाही कामी आली दवा, दुवा
स्वराज्याचा प्राण तो हरवला
खेळी आज काळाची ही अशी
माझा जाणता राजा हरवला....
उमाकांत कळे
अकोला
९९२२८५५५३९
http://umakantk.blogspot.com
“आम्ही साहित्यिक” फेसबुक ग्रुपवरुन
November 23, 2018
भिंत ओलेती मनाची
तुझ्या आठवणी झिरपलेल्या,
धुळीत थेंब टपोरे , देती आठव
ओल्या बटा तुझ्या झटकलेल्या,
तुझ्या हास्याची जाळी काढी
नक्षी त्या छताला,
प्रतिबिंब तुझे झळकते
जेव्हा पाहतो स्वतःला,
किती भकास उदास
तुझ्याविना घर मनाचे गं
जन्म देण्यास आतूर
जडावलेले गर्भ घनाचे गं,
झाली जीर्ण वास्तू मनाची
तुझे येणे होत नाही,
अवकळा येते त्या घरास
जिथे स्त्रीचे पाऊल फिरत नाही,
किती किती वाटते तुला लेखणीत बांधावेसे
पुन्हा नव्याने तुला जुने काही सांगावेसे
कित्तीदा भास झाला तू येऊन गेल्याचा
मनाचा उघडा दरवाजा पुरावा होता तू गेल्याचा,
आत्मा कधीचा पाण्यात ठेऊन बसलेला ,
उंबरठ्यावर एक तांब्या उपडा हीं घातलेला
कधी वळत नाहीत तुझी पावले इथवर
प्रतिक्षा हीं किती काळाची न कुठंवर
वास्तू कोसळण्याआधी जमेल का ग तुला येणे
बांधू नव्याने घर , रचू पुन्हा नवे गाणे
साद देतो हि अंतिम अन प्रतिक्षाहीं थकलेली,
अक्षरे बोलावती तूज , विरहात माखलेली..
-- अँडव्होकेट ऐश्वर्या वैजापूरकर
(नावासहित share करावी)
September 10, 2018
रक्तातुनी गुण-दोष उतरतो, वंश परंपरेने
व्यक्तीतील स्वभाव धर्म, जाणता येतो रक्ताने...१,
मनांतील विचार मालिका, कृत्य करण्या लाविती
सभोवतालच्या परिस्थिती रूपे, रक्ताला जागविती...२,
कर्म फळाच्या लहरींना, रक्त शोषून घेई,
ह्याच गुणमिश्रीत रक्तामधूनी, बिजे उत्पन्न होई....३,
बिजांचे मग रोपण होवूनी, नव जीवन येते
स्वभाव गुणांची मालिका, अशीच पुढे जाते...४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
January 25, 2020
एकेकटे पाहून झाडं तोडता तुम्ही
दाटी असता वृक्षाची ......
अटकता ,लटकता ,
भटकता तुम्ही ....!
-- श्रीकांत पेटकर.
कौशल
March 24, 2019
।। विषय जरी दारु असला तरी !
।। कविता सुंदर आहे न घेणाऱ्यालाही हसवेल !
।। पिऊन थोडी चढणार असेल
।। तरच पिण्याला अर्थ आहे
।। एवढी ढोसून चढणार नसेल
।। तर आख्खा खंबा व्यर्थ आहे
।। मी तसा श्रध्दावान
।। श्रावण नेहमी पाळतो
।। श्रावणात फक्त दारू पितो
।। नॉनव्हेज मात्र टाळतो
।। ज्याची जागा त्याला द्यावी
।। भलती चूक करू नये
।। पिताना फक्त पीत रहावं
।। चकण्यानं पोट भरू नये
।। वेळच्या वेळी आपण ओळखावी
।। आपली आपली आणिबाणी
।। लाज सगळी सोडुन देऊन
।। ग्लासात घ्यावं लिंबुपाणी
।। पिऊन तर्र झाल्यानंतर
।। काय खातोय ते कळत नाही
।। खाल्ल्यानंतर बिलामधली
।। टोटल कधी जुळत नाही
।। अशीही वेळ असते जेंव्हा
।। कोणीच आपला नसतो
।। म्हणून आपण प्यायला जातो
।। तर नेमका ड्राय डे असतो
।। असं उगीच लोकांना वाटतं
।। की दुःख दारूत बुडून जातं
।। दुःख असतं हलकं हलकं
।। अल्कोहोलसोबत उडून जातं!
।। एकदा प्यायला बसल्यानंतर
।। तुझं-माझं करू नये
।। तुझी काय, माझी काय
।। नशा कधी सरू नये
।। तुला जायचंच असेल तर निघून जा ,
।। जाण्यासाठी भांडू नकोस
।। प्यायची नसेल तर पिऊ नको ,
।। पण दारू अशी सांडू नकोस
।। स्कॉच प्यावी कोरी, कच्ची
।। बर्फ नको, सोडा नको
।। उंच आभाळी उडण्यासाठी
।।पंख हवे... घोडा नको !
।। फॉरीन लिकर कितीही प्यावी
।। काही केल्या चढत नाही
।। देशी आपली थोडीशीच प्यावी
।। दोन दोन दिवस उतरत नाही
।। पिणं असतं आगळा उत्सव
।। त्याचा उरूस होऊ नये
।। प्यायला नंतर आपला कधी
।। वकार युनूस होऊ नये
।। घरी बसून दारू प्यायचे
।। खूप सारे फायदे असतात
।। हॉटेलमधे, बिल भरायचे
।। काटेकोर कायदे असतात
।। आम्ही कधीच दारूमधे
।। दुःख आमचं बुडवत नाही
।। दारू नेहमी शुध्दच ठेवतो
।। भेसळ आम्हाला आवडत नाही
।। हवा तसा मी चालतो आहे
।। कोण म्हणतंय ' जातोय तोल ?
।। माझ्या मित्रा, माझ्या इतकी
।। पचवून दाखव, नंतर बोल!
।। प्रत्येक पार्टीत आपण बोलवावे
।। काही ' न ' पिणारे मित्र
।। पार्टीनंतर आपल्याला
।। आपल्या घरी नेणारे मित्र
।। पिणाऱ्यांनी समाजाचा
।। कुठलाच कायदा पाळू नये
।। जेंव्हा, जिथे, जशी वाटेल
।। प्यायचा मोह टाळू नये
।। ग्लासी लागेल ते ढोसत असतो
।। पानी लागेल ते चरत असतो
।। जेंव्हा माझं बिल कोणी
।। दुसराच माणूस भरत असतो
।। काय होतंय, कुठे होतंय
।। काही केल्या कळत नाही
।। एकदातरी वेळ अशी
।। पिणाऱ्यांना टळत नाही
।। प्रत्येकानंच आपला आपला
।। जसा घ्यायचा असतो श्वास
।। तसा प्रत्येकानं आपला
।। सांभाळायचा असतो ग्लास....
।। समस्त दारू पिणा-यांना सादर अर्पण
May 16, 2019
May 2, 2022
खोलीमध्ये कोंडूनी मांजर, हाती घेई काठी ।
मारून टाकण्यासाठी तीला, लागला तो पाठी ।।
अतिशय भीत्री असूनी ती, जीवासाठी पळे ।
हतबल होता पळून जाण्या, मार्ग तो ना मिळे ।।
उपाय नसता हाती कांहीं, चमत्कार घडे ।
सर्व शक्तीनी त्याच्यावरती, तुटून ती पडे ।।
उडी मारूनी नरडे धरले, दोन्ही पंजानी ।
मृत्यूचाच तिने गळा घोटला, शक्ती युक्तींनी ।।
प्रत्येकामध्ये सुप्त असते, शक्ती लपलेली ।
अवचित वेळ पडता दिसे, बाहेर आलेली ।।
मदत देतो निसर्ग तुम्हां, संधी बचावासाठी ।
जीवनासाठी झगडत रहा, शिकवण ही त्याची ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
October 28, 2016
मातीमध्ये हात घालतो त्याला कळते
मातीची सल केवळ शेतकऱ्याला कळते
प्रेमामध्ये पडतो अन् जो जळून जातो
प्रीत खरी त्या वातीच्या धाग्याला कळते
जगणाऱ्याला अशीतशी ती कोठे कळते ?
जगण्याची किंमत तर मरणाऱ्याला कळते
मोठा नाही घाव गड्या बघणारा म्हणतो
किती टोचते हे त्या लढणाऱ्याला कळते
दिशा एकही राहत नाही हातामध्ये
तेव्हा कोठे वादळ नावाड्याला कळते
©®_ महेश मोरे (स्वच्छंदी), सातारा
9579081342
November 5, 2020
दिसत नाही मला माझं गांव
जगाच्या नकाशात
मला लाज वाटते त्याची
मी खंतावतो...
मी फिरतो जगभर
धुंडाळतो नवनवी शहरं
करतो वाहवाई
तिथल्या सुधारणांची
करतो घाई
माझं गांव 'तसं' बनवण्याची
आणि बघतो स्वप्नं
निवृत्तीनंतरच्या वास्तव्याची
येतो गांवात सारखे-सारखे
करु लागतो बदल 'तिथल्यासारखे'
बदलतं गांवाचं रूप
काय सांगू त्याचं अप्रुप?
पोस्ट करतो त्याच्या प्रकाशफिती
सांगतो त्याची माहिती
शहरातून लोक येतात
नवी 'संस्कृती' देवून जातात
जगाच्या नकाशात
आता माझंही गांव दिसू लागतं...
आता मी येतो कायमचा
मनांत जुन्या आठवणी
करतो त्याची उजळणी
बालपणीच्या, सवंगड्यांच्या
घराच्या, परिसराच्या..
ह्याच्या, त्याच्या..
मला जगायचं असतं ते सगळं
पुन्हा तसंच ... जगावेगळं
पण तसं होत नाही
जुनं काही मिळत नाही
सगळं सगळं बदललेलं असतं
मी खंतावतो..
म्हणतो...
"आता गांव पहिल्यासारखं राहिलं नाही"
-- मी मानसी
मानसी कावले
June 22, 2020
किती गोड आणि किती गूढ भाषा
जशी चांदण्यांची नभीं राऊळे
किती खोल अशी किती भूल पाडी
तुझी शब्दगंधा, तिचे सोहळे
असे काव्य जेथे व्यथा भरजरी
किती दुःख आणि किती वेदना
असा रौद्र शृंगार हा भावनांचा
जिथे नांदते ही जुनी वंचना
तुझी सांज प्यारी तुझ्या चंद्रखुणा
तुझ्या काव्यभाषेत डोकावती
अक्षरांतूनी अर्थ जिथे वाहतो
तिथे भव्य दिव्य तुझी निर्मिती
अशी वाहणारी असंख्य काव्ये
जिथे अर्थ येतो अक्षरांपुढे
तुझी वाट शोधून मी घालतो
पाऊलखुणांना तुझ्या साकडे
© योगेश उगले
November 13, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti