(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • नग्नता

  • कोलाहल

    कसा ? व्यक्त करावा
    कोलाहल मनभावनांचा
    विषण्ण व्याकुळ उसासे
    दृष्टांत ! सत्य जीवनाचा ।।१।।

    मूक भोगणे मनगाभारी
    वास्तव ! हेच जीवनाचे
    श्रद्धा , अश्रद्धांचेच द्वंद
    अकल्पी दृष्टांत जीवनाचा ।।२।।

    सत्य ! असत्य ! संभ्रमी
    उद्दिष्ट सारेच स्वस्वार्थी
    जाहल्या बोथट संवेदना
    निर्जीव अर्थ जीवनाचा ।।३।।

    कुणीच कुणाचे नसते
    ब्रह्माण्ड ! मृगजळ सारे
    जगणेच केवळ फुकाचे
    ध्यास उगा मना मुक्तीचा ।।४।।

    कलियुगी सारा दिखावा
    ऋणानुबंध ! सारे वोखटे
    निर्झरी , शुष्क प्रीतभाव
    साक्षात्कार हा जीवनाचा ।।५।।

    प्रारब्धी हेच गूढ जीवनाचे
    ऊनसाऊली सुखदु:खांची
    जन्मा भोगूनी अंती मृत्यू
    कां ? खेळ अनामिकाचा ।।६।।

    -- वि.ग.सातपुते (भावकवी)

    9766544908

    रचना क्र. १४३

    १६ - ११ - २०२१.

  • शुभ दीपावली

     

  • शोध आत्मसुखाचा

    जगलो जरी सारे खेळ प्राक्तनाचे
    तरी अर्थ जीवनाचा कळला नाही

    भाळीचे, भोग भोगले जरी सारे
    हव्यास मनीचा अजूनी सरला नाही

    जडली नाती, जगता जीवन सारे
    गूढ नात्यांचे आजही उकलले नाही

    सत्य ! जन्मदात्यांचेच ऋणानुबंध
    अन्य रक्ताची नाती कळलीच नाही

    सारेच माझे, म्हणता संपला काळ
    ओढ प्रीतीची ती जाणवलीच नाही

    सांगा, या मनालाच कसे सावरावे
    काहूर ! वेदनांचे कधी शमले नाही

    जखमा साऱ्याच अजूनही ओल्या
    लेप प्रीतचंदनी कुठे भेटलाच नाही

    शोधीतो, मीच वाट आत्मसुखाची
    रुसली पाऊले, तरी थांबणार नाही

    -- वि.ग.सातपुते. (भावकवी)

    9766544908

    रचना क्र. ४८.

    १५ - २ - २०२२.

  • ईश्वरी इच्छेनेच

    वळून बघतां गतकाळाला, चकीत झाले मन ।
    घटना घडल्या जीवनामध्यें, राही त्यांची आठवण ।।

    चालत असतां पाऊल वाट, जीवन रेषे वरची ।
    स्वप्न रंगवी मनांत तेंव्हा, भावी आयुष्याची ।।

    परिस्थितीच्या भोवऱ्यामध्यें, पुरता गुरफटलो ।
    फिरणाऱ्या त्या वर्तुळातूनी, बाहेर येवूं न शकलो ।।

    कल्पिले होते नियतीनें, तेच घडविले तिनें ।
    भंग पावले स्वप्नचि सारे, तिच्याच लहरीनें ।।

    असेच घडते जीवनीं सदा, अघटीत-अवचित ।
    समजूनी त्यासी ईश्वरी इच्छा, स्वीकारी आनंदात ।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • व्याकुळल्या भावनांना काव्याचा

    व्याकुळल्या भावनांना काव्याचा
    मोहर हलकेच अंतरी फुलला
    तो बहर अवचित गंधित तुझा
    अन जीव माझा धुंद झाला..
    ती सांज ओढ कातर क्षणाची
    जीव तुझ्यात नकळत धुंदावला
    आरक्त लोचनात थेंब अश्रूचा
    अलगद दुःख मिटवून गेला..
    का बहरल्या दग्ध चेतना
    प्राजक्त हलकेच होरपळला
    न फुलल्या कळ्या काही
    वेदना मनात अबोल उरल्या..
    काव्यांचे प्रेम शब्दांवर सजले
    काव्यांत जीव आल्हाद गुंतला
    हा वडनवाळ उध्वस्त एकाकी
    भावना करपून खेळ संपला..
    ही कातर संध्या गूढ अशी
    देहाचा पाला पाचोळा झाला
    आलास तू जीवनात अनामिक
    अबोध वाटा तुझ्यात हरवल्या..
    न उमलले फुल गंधित मोहित
    पश्चिमेचा वारा स्तब्ध झाला
    गेले दुःख अलगद मनात रडवून
    मंद दिव्याचा पेट शांत फडफडला..
    सुकल्या रातरणीचा आवेग
    सकाळी न बहर कुठला राहिला
    रात्रीच्या डोहात अचेतन भाव
    गर्भित मन देही होम पेटला..
    का मीच जळते वणव्यात एकाकी
    काहूर पेट अंतरी निःशब्द जाहला
    कसली शिक्षा ही अबोध क्षणांची
    व्याकुळ भाव माझा व्यक्त अधुरा..
    सरली सांज केशरी आकाश न्हाली
    क्षितीजाच्या छटा अनामिक भासल्या
    काळोखात जीव अस्वस्थ अबोल
    दुःखाचा कढ व्यापून आयुष्य उरला..
    सांज केशरी भेसूर भयावह ही
    आकाशी काळोख तमेचा उरला
    कुणी पांथस्थ आला अवचित
    मोह त्याचा हृदयस्थ रडवून गेला..

    -- स्वाती ठोंबरे.

  • मन फुलारू

    घन आषाढी, गगन सावळे
    मीलना आसुसलेली वसुंधरा
    चिंबचिंबला पाऊस ओला
    स्मृतींच्या झरझरती जलधारा...।।

    हिरवळलेली सुंदरा अनुपम
    माहोल लोचना दीपविणारा
    धुंद क्षण क्षण, मन फुलारू
    ऋतुवर्षाचा, सोहळा न्यारा...।।

    जीवा जीवाला झुलविणारा
    बेधुंद मृदगंधला अवीट वारा
    प्रीतभावनांचा स्पर्श अनावर
    अधिर, प्रीतासक्ती गंधणारा...।।

    शब्दाशब्दातुनी ओढ लाघवी
    अंतरात झुळझुळतो प्रीतझरा
    घन आषाढी, गगन सावळे
    मीलना आसुसलेली वसुंधरा...।।

    रचना क्र. ६३
    ३०/६/२०२३
    -वि.ग.सातपुते. (भावकवी)

    9766544908

  • गाठोडे चोरणारा साधू

    निराश असा एक माणूस नदीकाठी बसला होता. बाजूला त्याचे गाठोडे पडले होते. नदीच्या प्रवाहाकडे तो उदासपणे पहात होता. तेवढ्यात एक साधू तिथे आला आणि त्याच्या शेजारी उभा राहिला. दोघांची दृष्टादृष्ट झाली. त्या माणसाच्या डोळ्यात अश्रू आलेले पाहून साधू सहानुभूतीने त्याची विचारपूस करू लागला.

    तो माणूस म्हणाला, 'माझे नशीबच वाईट आहे. जवळ पैसे नाहीत, कष्ट उपसूनही वीट आला आहे. जगण्यात आता रस उरला नाही. आपल्या बोलण्यावर साधू काही तरी उपदेश करील, कदाचित एखादा आशीर्वाद देईल, एखादा चमत्कारही घडविल ज्यायोगे आपली स्थिती सुधारेल, या अपेक्षेने तो माणूस साधूकडे पहात होता. साधूच्या चेहऱ्यावर मात्र कोणतेही भाव दिसले नाहीत. काही न बोलता साधूने एकवार इकडेतिकडे नजर टाकली आणि त्या माणसाला काही कळायच्या आत अचानक त्याचे गाठोडे उचलून धूम ठोकली. साधूच्या या अनपेक्षित वागण्याने तो माणूस एकदम गोंधळला, बावरला, उठला आणि आपल्या चपला तिकडेच टाकून जीवाच्या आकांताने त्या साधूमागे पळत सुटला. साधूचा बराच पाठलाग केला तरी त्याला काही गाठता येईना.

    बऱ्याच अंतरावर रस्ता एका बाजूला वळला होता. आता तर साधूने गति वाढविली तो दिसेनासाही झाला. तो माणूस वळणावर आला तर एका झाडाखाली आपले गाठोडे पडलेले त्याला दिसले. धापा टाकतच तो गाठोड्याजवळ आला आणि संशयाने त्याने ते उघडूनही पाहिले. सर्व वस्तू तशाच असल्याचे दिसल्यावर तर त्याला आश्चर्य वाटले. तोच झाडामागून तो साधूही पुढे आल्यावर तर तो अधिकच कोड्यात पडला.

    साधू हसत हसत म्हणाला, जीवनाला कंटाळला असताना आणि निराशेने घेरले असतानाही या यःकिंचित गाठोड्यासाठी तुला माझा पाठलाग करावासा वाटला. त्या पाठलागात तुझ्यातले नैराश्य, तुझ्यातले दुर्मुखलेपण आणि जगण्यातली उदासी तर कुठल्याकुठे दूर पळाली! हे गाठोडे मिळविण्यासाठी जसा तू प्रयत्न केलास तसाच प्रयत्न एखादे ध्येय समोर ठेवून तू मोठ्या उमेदीने केलास तर तुला जीवनात रस वाटेल!

    ध्येयाशिवाय जीवनाला दिशा नाही की जीवनात रसही नाही!

  • आयुष्य वाया घालू नका

    दवडू नका आयुष्य तुम्ही, वेळ घालूनी असा तसा,
    पदरी येई निराशा तुमच्या, गेला क्षण तो येईल कसा....१,

    मर्यादेतच जीवन असूनी, गतीमान ते असते बघा,
    स्वत: भोवती केंद्रीत होता, कसे जाणाल इतर जगा....२,

    इच्छा असते वाया न जावे, आयुष्य सारे विनाकारण
    हर घडीला विचार असावा, इतरांसाठी असते जीवन....३,

    जेंव्हां तुम्ही सेवा करिता, इतर मनाचे भाव जाणूनी
    तेच अर्पण होत असते, सारे एकत्र ईश्वर चरणी .....४

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • या कातरल्या क्षणांना

    या कातरल्या क्षणांना,
    सय तुझी येते,--
    उन्हाची तप्त काहिली,
    चटकन् दूर होते,
    वारा धुंद वाही,
    ढग जाती प्रवासी,
    अधूनमधून बिजलीही,
    उगा आपुले दर्शन देई,
    अशा वेळी आठवे मज,
    सोनेरी प्रभेची सांज,
    याच समुद्रकिनारी,
    वाजली मिलनाची गाज,
    नभ सुंदर सोनबावरे,
    होते भेटीस साक्षी,
    कूजन करीत बागडती,
    पक्षी आनंदें वृक्षी,
    किनारा दूरवर तटस्थ,
    उभ्याने राखी सागराला,
    मिलनाची किती उदाहरणे,
    ठेवून समोरी चंद्राला,---!!!
    या मंतरलेल्या क्षणांना,
    आठवे चांदणी उगवती,
    प्रेमाखातर सुधाकराच्या,
    नशेत त्या नाचती -गाती,
    तिच्यावर चढली धुंदी,
    आजही मज नीट स्मरे,
    इकडे धरणीवर खाली,
    कुणी प्रेमवीर गात फिरे,
    अशी चांदणी नाचती-गाती,
    इथेच त्याला ओढत आणी,
    खळाळूंन उत्तेजित होई,
    निळ्याशांर लाटांचे पाणी,--!!!!

    ©️ हिमगौरी कर्वे.