(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • ईश अस्तित्वाची ओढ

    उंच उंच जावूनी झाडे चुंबीत होती गगनाला ।
    चंद्र चांदणे, भव्य पर्वत आणिक नदी नाला ।।

    किती आनंद तो मनी जहाला बघूनी निसर्ग शोभा ।
    गुंग होऊनी नाचू लागलो सुटला चित्त ताबा ।।

    सुंदर वाटे रूप आपले बिंब बघता दर्पणी ।
    पोंच मिळते समाधानाची केवळ अंतर्मनातूनी ।।

    पूजा करीता तल्लीन होई मूर्ती बघूनी देवाची ।
    शक्तीमान ते रूप समजूनी विस्मृती होई स्वत:ची ।।

    निसर्ग, देह वा वस्तू असो, अस्तित्व ईश्वरी जेथे ।
    उचंबळती प्रेम भावना एकरूप होण्या त्याते ।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • झगडणारे जीवन

    गर्भामधूनी बाहेर पडतां, स्वतंत्र जीवन मिळे ।
    जीवन रस हा शोषित होती, आजवरी त्याची मुळे ।।

    निघून गेला पदर मायेचा, डोईवरूनी त्याचा ।
    झेप घेयी तो आज एकला, पोकळीत नभाच्या ।।

    दु:ख क्लेशाचे वार झेलले, कुणीतरी त्याचेसाठीं ।
    आज दुवा नसता सारे पडती पाठी ।।

    तेच रक्त परि फिरत होते, शरीरी त्याच्या सारे ।
    वंशाने जे मिळे त्याला, जीवन झगडा देणारे ।।

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • तुझ्याविना

    उगाच हे नसूनही, दिसायचे असायचे
    तुझ्याविना कसे कसे, जगायचे उरायचे !!

    मनीच भाव आतले, जरा जरा जपायचे
    हळूच पापणीतले, दुःखही पुसायचे !!

    नवेच काही लाडके, तुझ्यापरी नसायचे
    तरीहि दंगदंगुनी, फुलात फुल व्हायचे !!

    रंग जीवनातले, जाहले फिकेफिकें
    खुळेच श्वास चंदनी , स्मरायचे, भरायचे !!

    -- ..... मी मानसी

  • प्रत्येकाला इथं दुःख असतं

    प्रत्येकाला इथं दुःख असतं
    असतं फक्त ते दिसतं नसतं,
    हास्य वरवर सगळीकडे असं
    म्हणून त्यात ते कळतं नसतं..
    गैरसमज करणं इथं तर
    खूप सोप्प सहज असतं,
    किंवा गैरसमज करुन
    घेणं नित्य रोज होतं असतं..
    तू मला बोलला मग मी
    राग तुझ्यावर तो धरेन,
    दोन शब्द तुला जास्त बोलेन
    हेच हल्ली मग सगळीकडे दिसतं..
    दुसऱ्याला गृहीत धरण
    सहज मग होतं असतं,
    जबरदस्तीच गणित त्यात
    नकळत सहज घडतं असतं..
    हक्काने रागवणार ओरडणार
    मोठं माणूस आपुलकीच नसतं,
    झाली चूक तर दाखवणारं आता
    आयुष्यात मोठं माणूस समोर नसतं..
    नातं पण हल्ली उलगडत नसतं
    एकमेकांना काय हवे कळतं नसतं,
    साधा गजरा आणण पण प्रेम आहे
    जुन्या पिढीतील हे प्रेम आता माहीत नसतं..
    दोघांचं चुकलं जरास कुठे हल्ली तर
    ओरडण राग हे नवरा बायकोत होतं,
    भांडण राग ह्यात वेळ सगळा जातो
    प्रेम करायला मग अबोला सोबत उरतो..
    फास्ट दुनियेत सगळचं फास्ट मग
    पैसा जवळ खूप ह्यातच सुख कळतं,
    गरजा कमी करुन थोडं तडजोड करुन
    आनंद मिळतो हे मग साधं गणित न कळतं..
    घरी आणि बाहेर पण नित्य हेच
    सगळीकडे घडतं ते असतं,
    हक्क आणि राग ह्यात पटकन रुसणं
    पण समुजन घेणं दुसऱ्याला होतं नसतं..
    कुणीही आवडून जावं सहज मनात
    अशी लोकं भेटणं आयुष्यात छान घडतं,
    नशिबात असेल तितकं दान मिळतं
    हेच तर जीवनाचं अंतिम सार ठरतं
    कुणी मनात गोड आवडून जावं
    अस हल्ली लोकांचं वागणं होतं नसतं,
    आणि आवडलं मनापासून कुणी तर
    ते सांगणं पण हल्ली कठीण असतं..
    मोह व्हावा अगदी साध्या गोष्टींचा
    पण त्या गोष्टी मिळणं अवघड ठरतं,
    देव करतो रचना ही अशी निराळी
    नशीबाचा दैव फेरा काय ते मग समजतं..
    मरणं सोप्प सहज हल्ली झाले
    जगणं फार कठीण होऊन बसलं,
    करोना कधीही घालेल घाला आता
    भीतीच हे संकट थोडं मनात असतं..
    कोण कधी फटकन जाईल
    कुणाला हे कधी माहीत नसतं,
    आज आहे क्षण आपला आनंदाचा
    तरुण म्हातारं काही मरणदारी नसतं..
    आज करते स्वाती कविता ही
    पण उद्या माझं ही मरणं येऊ शकतं,
    नसेल मग मी ह्या जगात अशी
    कधीही श्वास जाऊ शकतो..
    हेच अंतिम सत्य आयुष्यात
    भरवसा जगण्याचा जरा नसतो,
    नको राग द्वेष कटुता भांडण सारे
    मेल्यावर मग हळहळ करणं उरतं..
    जीवनाचे सूत्र हे सहज साधे
    माणूस अवघड ते करतो,
    समजून न घेणं दुसऱ्याला मग
    गैरसमजाचं दुष्ट चक्र ते फिरतं..
    वाचा कविता ही रसिकहो
    मनात किल्मिश कधी नसावं,
    येईल मरणं माझे कधीही मग
    काळ समोर कधी येऊ शकतो..
    निसर्ग,फुलं,पाऊस,काव्यांत
    मन सहज बेधुंद मुक्त करावं,
    कुणी आवडलं मनापासून मग
    हृदयात गोड बंदिस्त करावं..
    कविता झाली माझी मोठी खूप
    तरी रसिकहो वाचा तुम्ही सारे हो,
    गंध कवितेचा मनात माझ्या नेहमी
    स्वातीच्या प्रेमात राहील तारा हृदयस्थ..
    -- स्वाती ठोंबरे.
  • प्रतिक्रिया

    क्रियेला प्रतिक्रिया, ध्वनीला प्रतिध्वनी ।

    तत्व ते सनातन, दिसे नित्य जीवनी ।। १

    फेकतां जोराने, आदळे भिंतीवरी ।

    प्रवास परतीचा, होई तुमचे उरीं ।। २

    शिवी वा अपशब्द, दिले कुणासाठी ।

    येऊनी धडकतील, तुमचेच पाठीं ।। ३

    प्रेमाने बोलणे, सुंगध आणिते ।

    आनंदी लहरी, मनां सुखावते ।। ४

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • सुखाच्या सरींनी मन हे बावरे

    सुखाच्या सरींनी मन हे बावरे
    किती प्रेमळ माझा बाप रे
    वळणा वळणावर साथ त्याचीच रे
    भविष्यातिल संकंटांना
    मिळो तुझीच ढाल रे

    सुखाच्या सरींनी मन हे बावरे
    आईच्या प्रेमळ छायेत वाढले रे
    सुसंस्कारीत मन माझे घडविले रे
    समाजात वावरतांना तिने मला जपले रे

    सुखाच्या सरींनी मन हे बावरे
    सख्या तुझ्या संगतित मी बेभान रे
    झुलवतोस सुखी झुल्यावर दिनरात रे
    मी नाहीच माझी,आता सर्वस्वी तुझीच रे

    सुखाच्या सरींनी मन हे बावरे
    वार्धक्याच्या कुशी तरीही,मी बिंन्धास्त रे
    असो दुखणे-खुपणे,नाही चिंता मला रे
    सुखलोलुप होता काया,मी संतृप्त झाले रे

    -- सौ. माणिक शुरजोशी

  • आनंद’ भावना

    ध्येय असावे तुमचे नेहमीं

    आनंद मिळवण्याकडे

    'आनंद ' हाचि ईश्वर असतो

    समजून घ्याहो हे कोडे ।।१।।

    शरीर देई 'सुख ' तुम्हांला

    क्षणिक ते तर असती

    सुखाच्या पाठीशी छाया असते

    'दुःख ' तयाला संबोधती ।।२।।

    सुखाबरोबर नाते असते

    सदैव अशाच दुःखाचे

    वेगळे त्यांना कुणी न करती

    जाणा तत्त्व हे जीवनाचे ।।३।।

    'आनंद ' भावना असे एकटी

    नसे तेथे दुजी भावना

    'मोक्ष' तयाला म्हणती कुणी

    आस्तित्व त्याचे तुमच्याच मनां ।।४।।

    व्यर्थ जातील प्रयत्न तुमचे

    'आनंद' शोधता बाहेरी

    विसरुन जाता जर देहाला

    मिळेल तुम्हां ते अंतरी ।।५।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • अहंकार

    लाभले असता सर्व काही..
    त्याची कधी मोजदाद केली नाही..
    जे थोडेसे काही मिळाले नाही..
    त्याची मात्र मोजणी थांबली नाही..।।..१

    मन मोकळे कधी ठेवले नाही..
    फक्त स्वानंदात रमलो..
    मी , फक्त मीच एकटा सर्वज्ञ..
    हा अहंकार कधी सोडला नाही..।।..२

    काय म्हणावे अशा प्रवृत्तीला ?..
    अरे झाडा सारखे जीवन असावे..
    जे जे आहे , ते ते सर्व देत रहावे..
    सर्वांती उमजावे , इथे आपुले काही नाही..।।..३

    ©️वि.ग.सातपुते.( भावकवी)

    9766544908

    रचना क्र.५२ / ६-४-२०२१.

  • सासरीं जाण्याऱ्या मुलीस उपदेश-

    कोणते दुःख तुला छळते
    अकारण कां व्यथित होते ।।धृ।।

    प्रेमळ छत्र पित्याचे असतां
    गेले जीवन तुझे बागडतां
    लाड पुरविले आईने तव
    शिकवीत असतां आनंदी भाव
    आठव सारे याच क्षणीं ते ।।१।। अकारण तूं कां व्यथित होते

    बांधून घेतां राखी हातीं
    आश्वासन तुजला मिळती
    पाठीराखा भाऊ असूनी
    येईल तुजसाठीं धावूनी
    कसली शंका मनांत येते ।।२।। अकारण तूं कां व्यथित होते

    संसार भरला सुख-दुःखानी
    घे शिरावर तुझ्याच समजूनी
    जीवन मार्गी होता बदल
    नको होऊस वेडे चंचल
    सावध असूं दे चित्र तुझे ते ।।३।। अकारण तूं कां व्यथित होते

    नाते गोते वाढवीत जावे
    सर्वामध्यें प्रेमळ व्हावे
    छत्राखालती होती आजवर
    छत्रचि बनावे तूं इतःपर
    संस्काराचे मधूर फळ येते ।।४।। अकारण तूं कां व्यथित होते

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • कोण ती स्फूर्ती देवता ?

    मजला नव्हते ज्ञान कशाचे, पद्यामधल्या काव्य रसाचे ।

    कोठून येते सारी शक्ती, काव्य रचना करूनी जाती ।।

    अवचितपणे विचार येतो, भावनेशी सांगड घालीतो ।

    शब्दांचे बंधन पडूनी, पद्यरूप जातो देऊनी ।।

    सतत वाटते शंका मनी, हे न माझे, परि येई कोठूनी ।

    असेल कुणी महान विभूती, माझे कडूनी करवून घेती ।।

    तळमळ आता एक लागली, जाणून घ्यावी शक्ती आगळी ।

    अर्पीन माझे प्राण त्याला, स्फूर्ती देवता जो मज झाला ।।

    -- डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०