दुपारचे भोजन करूनी, आडवा झालो थोडासा
झोप लागूनी त्याच क्षणी, थंडावल्या साऱ्या नसा....१,
वाम कुक्षीच्या आधीन जाता, जग विसरलो सारे
स्वप्न पडूनी सुंदर मनी, वाटे आनंद देणारे.....२,
पाटी-पुस्तक हाती घेवूनी, पोषाख घाली शाळेचा
घेवूनी गेलो कन्येस माझ्या, नाद जिला शिकण्याचा....३,
खूप शिकूनी मोठी होईन, बाबा तुमच्या एवढी
खावू पुस्तक खेळणी आणा, बडबडीत तिच्या गोडी....४,
आई नको, परि तुम्हीच या, माझी शाळा सुटताना
टाटा करित गोड वदलि, शाळेमध्ये शिरताना....५,
येत असता घरि परत, दुकानी एका शिरलो
बराच खावू आणि खेळणी, घेवूनी मी परतलो....६,
उत्सुकतेने बघत असता, कुणीतरी हालविले
हाय वेड्या ! हे तर स्वप्न, तिनेच जे तोडले.....७,
क्षणभर आवक् झालो मनी, स्वप्न भंग पावतां
खंत वाटली उगाच एक, अपूरी इच्छा राहतां....८
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
तुझ्या शिवाय जगणं नाही रे,श्वास घेणं ही अवघड आहे रे....
तुझ्या शिवाय जगणं नाही रे,स्वप्न पाहणं ही अवघड आहे रे....
तुझ्या शिवाय जगणं नाही रे,कोणत्याही गोष्टीत मन रमवने ही अवघड आहे रे....
तुझ्या शिवाय जगणं नाही रे,स्वतःला सांभाळणं खूप अवघड झाले रे....
स्वतःला शोधत आहे पण ठाऊक नाही कोणत्या दुनियेत हरवलि आहे रे....
तुझ्या विना जग काय मी स्वतः अधुरी भासायला लागली आहे रे.....
मी माझ्यात तुझ्यातला तू शोधती आहे रे....
तू दिलेल आपलंपण शोधती आहे रे...
तुझ्या शिवाय जगणं नाही रे,हे तुला का नाही
समजले.......
मला असे अधुरे सोडून जाताने एकदाही मी
नाही का रे आठवले .....!
---- मयुरी ----
पूजा पाठ करीत असतां पूजा गेलो विसरुनी
प्रभुचरणी ध्यान लागतां भान गेले हरपूनी
पूजेमधल्या विधीमध्यें बहूत तास घालविले
मनी घेऊनी आनंदे पूजा कर्म केले
पूजेमधली सर्व कृतिं कटाक्षाने पाळली
नेटकेपणासाठी योग्य साधने जमविली
वर्षामागून वर्षे गेली पूजाअर्चा करुनी
खंत मनी राहून गेली झालो नसे समाधानी
मूर्ती समोर बसूनी एक चित्त झालो
ध्यान अचानक लागूनी स्वतःसी विसरलो
आनंदाचा मार्ग मिळाला देई खरे समाधान
पूजा विधीतील भावाला असे महत्वाचे स्थान
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
बरेच दिवस झाले
काही लिहिले नाही
तुझ्या आठवणीत...
तुझी ती आठवणच
हरविली नाही ना ?
माझ्या आठवणीत...
कित्येक कविता मी
सहज रचल्या आहेत
तुझ्या आठवणीत...
कित्येक कविता मी
सहज सोडल्या आहेत
तुझ्या आठवणीत...
माझ्या आयुष्यातील कित्येक
वर्षे वाया गेली
तुझ्या आठवणीत...
मी राहात होतो
तुझ्या नाजूक हृदयातील
माझ्या आठवणीत...
आठवणीतील माझी तू
तुझा मी राहतील
जगाच्या आठवणीत...
©निलेश बामणे
खळी पडून गालावरी सुंदर तूं दिसते
आनंदाचे भाव दर्शनी मधूर तूं हांसते ।।१
इवले इवले ओठ फूलपाकळ्यांपरि
लांब लांब केस काळे भुर भुर उडती मानेवरी ।।२
मोत्यासारखे दांत भासे कुंदकळ्या
बदामाचा आकार मिळे तुझ्या डोळ्या ।।३
इंद्रधनुष्याचा बाक दिसे भुवयाला
चाफेकळीची शोभा मिळाली नाकाला ।।४
चमकते अंगकांती फाटलेल्या झग्यातूनी
दिसते निसर्गाची देणगी तुझ्या गरीबीतूनी ।।५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
लाभला जीवा निखळ मैत्र
सुखावलो सदासर्वकाळ
सुखही होते , दुःखही होते
भोगभोगले प्रारब्धाचे खेळ.....
भाळी पान्हाच मातृत्वाचा
निर्भयी आधार पितृत्वाचा
नव्हती कशाची खंतवेदना
स्पर्श निर्मली सात्विकतेचा....
अंगणीचा सडा संस्कारांचा
मीत्वास , दूर सारित राहिला
नुरली अपपर भावनां अंतरी
बीजांकुर मानवतेचा रुजला....
लागला जन्म सारा सार्थकी
जाणवला साक्षात्कार ईश्वरी
ब्रह्मातची ब्रह्मनाद ब्रह्मानंदी
गीतातुनी स्त्रवली मधुर पावरी....
रचना क्र.
१३१/१/१०/२०२३
-वि.ग.सातपुते.(भावकवी)
( 9766544908 )
खंत वाटली मनास
कळला नसे व्यवहार ।
शिकला सवरला
नाही जाणला संसार ।।१।।
पुढेच गेले सगे सोयरे
आणिक सारी मित्रमंडळी ।
घरे बांघूनी धन कमविले
श्रीमंत झाली सगळी ।।२।।
वेड्यापरी बसून कोपरी
रचित होता कविता ।
कुटुंबीय म्हणती त्याला
कां फुका हा वेळ दवडीता ।।३।।
सग्यांच्या उंच महाली
बैठक जमली सर्व जणांची ।
श्रेष्ठ पदीचा मान देवूनी
कौतुके झाली कवितांची ।। ४।।
व्यवहारी निर्धन जरी तो
विराजमान मनीं दुजांचे ।
ईश्वरी चैत्यन्न स्फुरले जे जे
गुंफूनी ठेविले हार तयांचे ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
स्वप्न पहावीत...
नाही कोण म्हणतंय ?
स्वप्नं जरूर पहावीत.
इतकी सारी पहावीत की
त्यांची ढिगारे व्हावीत.
भान ठेवून उघड्या डोळ्यांनी
त्या स्वप्नांकडे पहावं.
निर्धाराच्या अचूक बाणाने
त्या स्वप्नांना वेधावं.
स्वप्नांसाठी आजच्या वर्तमानाला
निरर्थक नाही मारावं.
उद्यासाठी आजच्या क्षणाला
व्यर्थ नाही टाळावं.
अशक्य अश्या स्वप्नांसाठी
शरीराने जरूर थकावं.
पण न खचता मनानं
पून्हा धैर्यानं उठावं.
तुटलेल्या मोडलेल्या स्वप्नांसाठी
कधी नाराज नाही व्हावं.
नव्या उमेदीने नव्या स्वप्नांकडे
दृढविश्वासाने पहावं.
स्वप्नांना कसं स्फूर्तीनं अन्
अगदी आनंदानं हाकावं.
अस होऊ नये की त्या स्वप्नांसाठी
बिचाऱ्या निद्रेनेच थकावं.
हरवलेल्या त्या स्वप्नांसाठी
कधी व्यर्थ नाही झुरावं.
नव्या अशा स्वप्नांसाठी झोपेला
अगदी शांत मनाने भरावं.
डॉ.सुभाष कटकदौंड
होऊन गेले नकळत सारे,
सुचले मला काहीच नाही,
होकार फक्त मनाचा,
मेंदूला त्याची कल्पना नाही…
समाज ठेवतो सतत नावं,
करतो त्याची कुजबूज…!
असते ती फक्त छोटीशी चूक,
वारंवार बसतो चर्चेचा त्याला मारा,
करतो एक,भोगतो एक,
मात्र मज्जा बगतो समाज सारा…
अहो, खरं कोन? समाज की मी?
या प्रश्नाचं उत्तर मात्र दडून बसतं
ज्याला जसे पाहायचे तो तसाच बघतो,
जो सरळ तो वाकडा,
अन् वाकडा तो सरळ दिसतो,
माझ्या आरशात मी एकटीच दिसते,
समाज मात्र सतत डोकावत असतो.
– श्र्वेता संकपाळ.
Copyright © 2025 | Marathisrushti