मित्रांनो, "तुझा चेहरा" ही मराठी प्रेम कविता आपल्यासाठी सादर करीत आहे. मराठी कविता आवडली तर share करायला विसरू नका.
"माझी डायरी " या आपल्या चॅनलला अवश्य Subscribe करा. "माझी डायरी" आपल्यासाठी आणखी नव्या कविता-गझल-कथा घेऊन येत आहे.
https://youtu.be/8s4BlfJ1-5U
घटना घडली एके दिवशी प्रभू बसले जेवण्या,
रुख्मिणी त्यांचे जवळी होती वाढण्या ।।१।।
चट्कन उठूनी ताटावरुनी धावत गेले दारीं,
क्षणिक थांबूनी तेथे येऊनी बसले पाटावरी ।।२।।
प्रश्न पडला रुखमिणीस काय गडबड झाली,
श्रीकृष्णाची धावपळ तिजला नाही कळली ।।३।।
चौकशी करतां कृष्ण बदले कहाणी एका भक्ताची,
हरिनाम मुखी नाचत होता काळजी नव्हती लोकांची ।।४।।
वेडा समजोनी त्यासी दगड कुणी होते मारीत,
हरिनाम नाही सोडले वाहात असूनी रक्त ।।५।।
धावलो होतो त्याचेसाठीं करण्या त्याला मदत,
परि लहू बघूनी अंगावरती दगड घेतला हातात ।।६।।
समर्थ झाला आता तो रक्षण करण्या स्वतःचे,
हरिनाम सोडता मुखातून कारण नव्हते मदतीचे ।।७।।
ही झाली छोटी कहाणी सांगे जीवनाची तत्वे,
सर्वस्व अर्पिता प्रभूसी विश्वास ठेवा त्याते ।।८।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
विश्वामध्ये वावरतां, भोंवती विश्व पसारा ।
रमतो गमतो खेळतो, जीवन घालवी सारा ।।
संबंध येई हर गोष्टींचा, गोष्टी येथें अगणित ।
प्रत्येक निर्माण करी, आपलेच विश्व त्यांत ।।
जीव निर्जीव विखूरल्या, वस्तू अनेक ।
आगळ्या त्या परि ठरे, एकाचीच घटक ।।
विश्वामध्येच विश्व असते, राहून बघे विश्वांत ।
समरस होता त्याच विश्वाशी, निसर्गमय सारे होत ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
तू कोणाची का होईना
तुझ्या हृदयातील एक जागा
मोकळी राहायलाच हवी...
मी जिवंत असेपर्यत तुला
माझी आठवण यायलाच हवी ...
मला गमावल्याची किंमत
तुला काळायलाच हवी ...
माझ्या समोर येता
तुझी नजर झुकायलाच हवी...
तुझ्या आयुष्यात एकदा
तू माझी मदत मागायलाच हवी...
माझे सर्वस्व पणाला लावून
मी ती तुला करायलाच हवी...
कवी - निलेश बामणे, ( बी डी एन )
खिन्न मनानें बसला होता, उन्हांत एका खडकावरी ।
डबके घाण पाण्याचे, वातावरण दुषित करी ।।
किड्या-मुंग्यांचे वारूळ तेथें, आणिक पडला काडी कचरा ।
नजिक येईना वाटसरूं कुणी, बघूनी सारा गालिच्छ पसारा ।।
सोडून देऊनी निवारा , नदीकांठच्या शिखरीं गेला ।
निर्मळ करूनी जागा, आश्रम त्याने एक बांधला ।।
बाग फुलवूनी सुंदर तेथें फळा फुलांना येई बहर ।
राघू मैना मयुर पक्षी, गाऊनी नाचती तालावर ।।
निसर्गरम्य सौंदर्य ठेवा, बाळगला जो त्या परिसरी ।
धुंद राही तो सदैव तेथें विसरूनी इतर जनांपरी ।।
जमू लागले वाटसरू, घेती विसावा कांहींक्षण ।
विनानिमंत्रित येत होते, बघूनी प्रसन्न वातावरण ।।
लाभे प्रभू सहवास त्यांना, निर्मळ देही पवित्र मनी ।
तोच येईल तुम्हा भेटण्या, देह मंदिर केवळ बघूनी ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
झालाही असेल कदाचित जन्म एका स्त्रिचा पुरूषापासून
पण विश्वातील तो एक पुरूष सोडला तर
समग्र पुरूष जातीला जन्म स्त्रियांनीच दिला...
स्त्रिला जन्म देताना पुरूषाला
वेदना झाल्या असतील – नसतील ही पण
पुरूषांना जन्म देताना स्त्रियांना होणार्या वेदना
पुरूष वर्षानुवर्षे पाहतच आला...
स्त्रियांनी पुरूषांना फक्त जन्मच दिला नाही
तर खायला दाणा, राहायला आसरा, प्रेम,
जिव्हाळा आणि संस्कारही दिला...
पुरूषांनी स्त्रियांना आपल्या मनात,
हृद्यात आणि प्रसंगी देव्हार्यातही बसविला
पण आपल्या बरोबरीला कधीच उभा नाही केला...
आजही का करावा लागतोय संघर्ष स्त्रिला
आपल्याच अस्तित्वासाठी परूषांसोबत
तीच कारक असताना पुरूषांच्या अस्तित्वाला...
का करावी लागतेय पुरूषांना व्यक्त आपली कृतज्ञता
स्त्रियांच्या प्रती फक्त जागतिक महिला दिनाला...
समग्र विश्वाची मालकीन असणारी स्त्रीच
का शोधतेय एक निमित्त
स्वतःची ओळख जगाला सांगायला...
जागतिक महिला दिन
खरं म्ह्णजे साजरा करण्याची
गरजच का भासावी जगाला...
कवी – निलेश बामणे.
प्रसवते रोज कविता
कां कशी कोण जाणे...
मीही, होतो संभ्रमित
कसे जमते व्यक्त होणे...
मन हे चंचल पाखरू
त्याचेच कां फडफडणे...
अंतरी काहूर कल्लोळ
भावनांचेच ते प्रसवणे...
मीच शब्दातुनी मांडतो
अव्यक्ताला सहजपणे...
आज हा छंद जीवाला
रिझवितो, हळुवारपणे...
आनंद हा एक आगळा
सहजसुकर होते जगणे...
रचना क्र. ५९
२७/६/२०२३
-वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
अध्यात्म ही भारतीयांची शक्ती, मानसिक स्वास्थ्य व आत्मिक बळ प्राप्त करून देणारं माध्यम ! जगात वैज्ञानिक क्रांती झाली, तरी भारतीयांनी आपली अध्यात्माची परंपरा सोडलेली नाही. कॅनडात आलेल्या बहूसंख़्य लोकांमध्ये पदवीधर त्यातही तांत्रिक शिक्षण घेतलेल्यांची संख्या अधिक…. नोकरीच्या निमित्तांने त्यांनी देश सोडला; परंतु आपली आध्यात्माची परंपरा कायम जतन केली.
करून कापण्याची वेळ आली तर मी ते नक्कीच करेन. आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयीचा इतरांना त्रास होता कामा नये या मताचा मी आहे. प्रत्येकानेत्याला जे खायला आवडत तेच खायला हवं पण पदार्थांच्या प्रेमात पडता कामा नये.प्रसंगी एखादा पदार्थ खाणं टाळता ही आलं पाहिजे आता मला उदया डॉक्टरने तू चहा पिऊनकोस म्ह्णून सांगितल तर मी नाही पिणार.
Copyright © 2025 | Marathisrushti