नको बनूस अविचारी
जाऊनी भावनेच्या आहारी ।।धृ।।
प्राणीमात्राच्या जगती श्रेष्ठत्व तुला लाभले
विवेक करण्या मनी यश तुला साधले
नको घेऊं ऊंच भरारी ।।१।।
जाऊनी भावनेच्या आहारी
प्राण्यास असे भावना साथ नसे विचारांची
विचार आणि भावना साथ मिळाली दोन्हीची
नको बनूस अहंकारी ।।२।।
जाऊनी भावनेच्या आहारी
बरे वाईट यांची जाण घ्यावीस तूं ओळखूनी
राहूं नकोस विसंबून आत्मविश्वास गमवूनी
नको जाऊस दारोदारी ।।३।।
जाऊनी भावनेच्या आहारी
प्रयत्न करिता यश मिळे विश्वास ठेवा मनी
ज्ञानानी प्रश्न सुटती सगळे महत्व घे तूं जाणूनी
कां मनाचा गोंधळ करी ।।४।।
जाऊनी भावनेच्या आहारी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
September 5, 2018
अल्प वर्षे राहिली, उम्मीदपणाच्या हालचालीची ।
मना वाटते आगळे करावे, उरली वर्षे जीवनाची....१,
वृधत्वाचा काळ गांजता, साथ न देयी शरीर कुणाला ।
मना मारूनी बसावे लागे, एक जागी सर्वाला....२,
निसर्गरम्य स्थळ निवडूनी, मर्यादेत जगावे जीवन ।
दुजास कांहीं येईल देता हेच ठरवावे आजमावून...३,
बरेच केले स्वत:साठीं, समाधान परि नाहीं लाभले ।
दुजास मिळतां आनंद येई, खरे तत्त्व आज जाणले....४,
जेंव्हां असते स्वत: करीता, स्वार्थी भाव लपला असे ।
दुजासाठी करीता सारे , स्वार्थी भाव राहील कसे ?....५,
शेवटचे सरते जीवन, ईश चरणी समर्पण व्हावे ।
अंतिम विनंती हीच, दुजाच्या सेवेतच निघून जावे...६
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
April 22, 2020
December 14, 2021
लोहगडाच्या त्या कड्यावरून
आज फक्त एक देह कोसळला नाही,
कोसळला विश्वास,
कोसळली स्वप्नं,
आणि प्रेमाच्या नावावर उभं असलेलं
माणुसकीचं मंदिरही ढासळलं.
ज्याच्या हातात आयुष्यभराची साथ होती,
त्याच हातांनी जर अंधाराची वाट दाखवली,
तर जखम रक्ताची नसते,
ती आयुष्यभर वाहणाऱ्या वेदनेची असते.
तेव्हा मनात एकच प्रश्न उसळतो...
प्रेम जर शेवटी प्राणच हिरावून घेणार असेल,
तर अश्वत्थाम्यासारखं
युगानुयुगे एकटं भटकण्याचं दुःखही स्वीकारावं.
कारण एकटेपण जगायला शिकवतं,
पण विश्वासघात जगण्याचं कारणच हिरावून घेतो.
प्रेम म्हणजे मालकी नव्हे,
प्रेम म्हणजे समर्पण.
प्रेम म्हणजे संशय नव्हे,
प्रेम म्हणजे निस्सीम विश्वास.
जिथे विश्वासाचा कडेलोट होतो,
तिथे प्रेम आधीच मृत झालेलं असतं.
उरतात फक्त आठवणी,
आणि न भरून येणाऱ्या जखमा.
म्हणून प्रेम करा
पण इतकं निर्मळ,
की त्यातून कोणाचाही अंत नव्हे,
तर नव्या आयुष्याची पहाट जन्माला यावी.
कारण...
खरं प्रेम कोणाचा जीव घेत नाही,
ते शेवटच्या श्वासापर्यंत जगण्याचं बळ देतं.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
July 13, 2026
जसे रंग फुलांफुलांचे
तसेच रंग मनामनांचे..
नित्य उमलुनी गंधाळावे
दरवळावे श्वास सुखाचे..
मनफुलांचे नाते आगळे
स्पर्श तयांचे मोरपीसांचे..
निर्माल्यातही सुख आगळे
जीवन हे, भाग्य भाळीचे..
जगण्याचे हे क्षण कृतार्थी
संचित सारे हे गतजन्मांचे..
-- वि.ग.सातपुते. (भावकवी )
9766544908
रचना क्र.२३७
१६ /९/२०२२
September 21, 2022
तुझी पावलं माझ्या दारावरून जाताना
मी पुसली नाही कधी तुझी पाऊलवाट
नि ठरवलं नव्हतं येणं
कधीच त्यांच्यामागून |
मस्त रंगले होते मी माझ्यातच
माझं काही मला खरंच द्यायचं नव्हतं
पण तुझी पावलं थबकली माझ्या दारात
तेव्हा देऊन बसले सारंच मंत्रमुग्धेप्रमाणं
माझे प्राण...माझे श्वास.....माझं जगणं...
आता दूर गेलास तर
माझे प्राण नसतील माझ्याजवळ संपवण्यासाठीसुध्दा
एखादा श्वासही तुझ्याकडून उसना घ्यायला हवा !
-सौ. राजलक्ष्मी देशपांडे
April 7, 2023
November 26, 2021
March 30, 2010
मूळ हिंदी कविता ‘ जानती हूँ प्रेम कम-कम हो रहा है ‘ ; कवियत्री- शार्दूला झा नोगजा,सिडनी,ऑस्ट्रेलिया ; मराठी अनुवाद- विजय नगरकर
November 5, 2021
आईबापाच्या सेवेमध्यें, पुंडलीक रंगला,
उभा विठ्ठल दारावरती, हेच तो विसरला ।।धृ।।
आईबाप हे दैवत ज्याचे,
रुप पाही त्यांच्यात प्रभूचे ।
सेवा करीत आनंद लूटतां, तल्लीन जो जहला
उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला ।।१।।
निद्रेमध्यें असतां दोघे,
मांडी देऊनी आपण जागे ।
कशी मोडू मी झोप तयांची, प्रश्न विचारी भगवंताला,
उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला ।।२।।
वीट देऊनी विठ्ठलासाठीं,
उभे केले त्या जगजेठी ।
आपण गेला घेऊन त्यांना, स्नानाकरीता चंद्रभागेला,
उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला ।।३।।
आठ्ठाविस युगे गेली उलटूनी,
कटीवरती हात ठेवूनी ।
पांडूरंग बघे वाट तयांची, भक्तितच जे विसरती जगाला,
उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
March 12, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti