(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • भावनेच्या आहारीं ।

    नको बनूस अविचारी

    जाऊनी भावनेच्या आहारी ।।धृ।।

    प्राणीमात्राच्या जगती श्रेष्ठत्व तुला लाभले

    विवेक करण्या मनी यश तुला साधले

    नको घेऊं ऊंच भरारी ।।१।।

    जाऊनी भावनेच्या आहारी

    प्राण्यास असे भावना साथ नसे विचारांची

    विचार आणि भावना साथ मिळाली दोन्हीची

    नको बनूस अहंकारी ।।२।।

    जाऊनी भावनेच्या आहारी

    बरे वाईट यांची जाण घ्यावीस तूं ओळखूनी

    राहूं नकोस विसंबून आत्मविश्वास गमवूनी

    नको जाऊस दारोदारी ।।३।।

    जाऊनी भावनेच्या आहारी

    प्रयत्न करिता यश मिळे विश्वास ठेवा मनी

    ज्ञानानी प्रश्न सुटती सगळे महत्व घे तूं जाणूनी

    कां मनाचा गोंधळ करी ।।४।।

    जाऊनी भावनेच्या आहारी

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    e-mail- bknagapurkar@gmail.com

      September 5, 2018


  • जीवनाची उपयोगिता

    अल्प वर्षे राहिली, उम्मीदपणाच्या हालचालीची ।

    मना वाटते आगळे करावे, उरली वर्षे जीवनाची....१,

    वृधत्वाचा काळ गांजता, साथ न देयी शरीर कुणाला ।

    मना मारूनी बसावे लागे, एक जागी सर्वाला....२,

    निसर्गरम्य स्थळ निवडूनी, मर्यादेत जगावे जीवन ।

    दुजास कांहीं येईल देता हेच ठरवावे आजमावून...३,

    बरेच केले स्वत:साठीं, समाधान परि नाहीं लाभले ।

    दुजास मिळतां आनंद येई, खरे तत्त्व आज जाणले....४,

    जेंव्हां असते स्वत: करीता, स्वार्थी भाव लपला असे ।

    दुजासाठी करीता सारे , स्वार्थी भाव राहील कसे ?....५,

    शेवटचे सरते जीवन, ईश चरणी समर्पण व्हावे ।

    अंतिम विनंती हीच, दुजाच्या सेवेतच निघून जावे...६

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      April 22, 2020


  • ती तशी शाळेतली

    ती तशी शाळेतली
    तो ही तसाच
    ती दोघे नेहमी
    बोलताना दिसतात
    संपूर्ण नवखेपण
    जाणवत होते
    त्यांच्या बोलण्यावरून...
    एक दिवशी त्याचा हात
    तिच्या
    हातात आला..
    आणि मग सुरवात झाली..
    नवखेपण जाण्याची ती
    खुण होती......
    त्यानंतर..त्यांनतर
    बरेच काही घडणार होते...
    प्रेमाच्या बाराखडीला
    सुरवात तर झाली....
    पुढे काय झाले....
    तुम्ही विचारणार ना ,
    उत्तर तुमच्याकडेच आहे
    तुमच्या स्वभावात ?
    -- सतीश चाफेकर.

      December 14, 2021


  • विश्वासाचा कडेलोट

    लोहगडाच्या त्या कड्यावरून
    आज फक्त एक देह कोसळला नाही,
    कोसळला विश्वास,
    कोसळली स्वप्नं,
    आणि प्रेमाच्या नावावर उभं असलेलं
    माणुसकीचं मंदिरही ढासळलं.

    ज्याच्या हातात आयुष्यभराची साथ होती,
    त्याच हातांनी जर अंधाराची वाट दाखवली,
    तर जखम रक्ताची नसते,
    ती आयुष्यभर वाहणाऱ्या वेदनेची असते.

    तेव्हा मनात एकच प्रश्न उसळतो...

    प्रेम जर शेवटी प्राणच हिरावून घेणार असेल,
    तर अश्वत्थाम्यासारखं
    युगानुयुगे एकटं भटकण्याचं दुःखही स्वीकारावं.
    कारण एकटेपण जगायला शिकवतं,
    पण विश्वासघात जगण्याचं कारणच हिरावून घेतो.

    प्रेम म्हणजे मालकी नव्हे,
    प्रेम म्हणजे समर्पण.
    प्रेम म्हणजे संशय नव्हे,
    प्रेम म्हणजे निस्सीम विश्वास.

    जिथे विश्वासाचा कडेलोट होतो,
    तिथे प्रेम आधीच मृत झालेलं असतं.
    उरतात फक्त आठवणी,
    आणि न भरून येणाऱ्या जखमा.

    म्हणून प्रेम करा
    पण इतकं निर्मळ,
    की त्यातून कोणाचाही अंत नव्हे,
    तर नव्या आयुष्याची पहाट जन्माला यावी.

    कारण...
    खरं प्रेम कोणाचा जीव घेत नाही,
    ते शेवटच्या श्वासापर्यंत जगण्याचं बळ देतं.

    •ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
    मो:- 9011841212

      July 13, 2026


  • संचित

    जसे रंग फुलांफुलांचे
    तसेच रंग मनामनांचे..

    नित्य उमलुनी गंधाळावे
    दरवळावे श्वास सुखाचे..

    मनफुलांचे नाते आगळे
    स्पर्श तयांचे मोरपीसांचे..

    निर्माल्यातही सुख आगळे
    जीवन हे, भाग्य भाळीचे..

    जगण्याचे हे क्षण कृतार्थी
    संचित सारे हे गतजन्मांचे..

    -- वि.ग.सातपुते. (भावकवी )

    9766544908

    रचना क्र.२३७

    १६ /९/२०२२

      September 21, 2022


  • एखादा श्वासही

    तुझी पावलं माझ्या दारावरून जाताना
    मी पुसली नाही कधी तुझी पाऊलवाट
    नि ठरवलं नव्हतं येणं
    कधीच त्यांच्यामागून |
    मस्त रंगले होते मी माझ्यातच
    माझं काही मला खरंच द्यायचं नव्हतं
    पण तुझी पावलं थबकली माझ्या दारात
    तेव्हा देऊन बसले सारंच मंत्रमुग्धेप्रमाणं
    माझे प्राण...माझे श्वास.....माझं जगणं...
    आता दूर गेलास तर
    माझे प्राण नसतील माझ्याजवळ संपवण्यासाठीसुध्दा
    एखादा श्वासही तुझ्याकडून उसना घ्यायला हवा !

    -सौ. राजलक्ष्मी देशपांडे

      April 7, 2023


  • आयुष्याच्या वाटेवर काटे अनेक येतात

    आयुष्याच्या वाटेवर
    काटे अनेक येतात,
    कठीण प्रसंग येता मग
    स्वामी मार्ग दाखवितात..
    येते हमखास प्रचिती
    कळत नाही काही तेव्हा,
    लीला असते स्वामींची ही
    आशीर्वाद असतो तो तेव्हा..
    होतील चुका अनेक
    जीवनात पुन्हा पुन्हा,
    स्वामी घेतील पदरात
    दुःख दूर करतील तेव्हा..
    नको राग नको लालसा
    स्वामींची होता कृपा,
    मन होईल प्रेमळ,निर्मळ
    आपोआप आपुले तेव्हा..
    काय असेल ती अनुभूती
    घ्यावे अनुभव अनेकदा,
    अक्कलकोटी दर्शनास येता
    भारुन जाईल मन तेव्हा..
    नको काही अधिक जीवनी
    मागणे हे स्वामी समर्था,
    स्मरण राहावे नित्य तुमचे
    राहो वरदहस्त सदा तुमचा..
    नतमस्तक व्हावे तुमच्या चरणी
    निःशब्द डोळ्यांत पाणी येऊ दे तेव्हा,
    तुमचेच बोल आहे पाठीशी सदा
    स्वामी तुमची आहे सदा अगाध लीला..
    ||अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगिराज सद्गुरू श्री परब्रह्म स्वामी समर्थ महाराज की जय||
    ||अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त||
    ||श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ||
    -- स्वाती ठोंबरे.

      November 26, 2021


  • काय होते बाबासाहेब……

    दीन,दलित,गोरगरीबांची
    आई होते बाबासाहेब .
    पिचलेल्या,ठेचलेल्यांची
    दाई होते बाबासाहेब.
    दाबलेल्या आवाजाचा
    हुंकार होते बाबासाहेब.
    तार नसलेल्या विणेचा
    झंकार होते बाबासाहेब.
    प्रयत्न..प्रयत्न...प्रयत्न
    यशस्वी प्रयत्न होते बाबासाहेब.
    मोजून मोपून सांगायचे तर
    अक्षरश: चौदावे रत्न होते बाबासाहेब.
    अंधाराला प्रकाशाशी जोडणारी
    नाळ होते बाबासाहेब.
    दांभिकतेच्या कानाखालचा
    जाळ होते बाबासाहेब.
    प्रज्ञा,शील,करूणेचे
    बीज होते बाबासाहेब.
    सुभेदार रामजींच्या कष्टाचे
    चीज होते बाबासाहेब.
    बुद्ध,कबीर,फ़ुलेंचा
    सार होते बाबासाहेब.
    लवलवत्या लेखणीची
    धार होते बाबासाहेब.
    निद्रिस्त लाव्हा पाहून
    खूप दु:खी होते बाबासाहेब.
    संस्कृतीला ढुसण्या देणा्रा
    ज्वालामुखी होते बाबासाहेब.
    महाडच्या चवदार तळ्याची
    निळाई होते बाबासाहेब.
    डोळ्यातल्या आभाळाची
    जळाई होते बाबासाहेब.
    बुद्धांच्या करूणेचा
    सागर होते बाबासाहेब.
    शाहू महाराजांच्या लढ्याचे
    आगर होते बाबासाहेब.
    यारांचे यार आणि
    दुश्मनांचे मित्र होते बाबासाहेब.
    वेरूळ्च्या लेण्यातील
    कोरीव होते चित्र बाबासाहेब.
    मनुस्म्रुतीला भस्म करणारी
    आग होते बाबासाहेब.
    शेळपट जिणं नाकारणारे
    वाघ होते बाबासाहेब.
    सवितेची कविता,
    लेकरांची रमाई होते बाबासाहेब.
    थकल्या-भागल्या जीवासाठी
    प्रेमळ भिमाई होते बाबासाहेब.
    किती सांगु?किती नाही?
    काय होते बाबासाहेब?
    नको नको रे हा नादानपणा
    नक्की बघत असतील बाबासाहेब !!
    सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
    मोबा. ९९ २३ ८४७ २६९

      March 30, 2010


  • समजले मला प्रेम लोपले आहे

    मूळ हिंदी कविता ‘ जानती हूँ प्रेम कम-कम हो रहा है ‘ ; कवियत्री- शार्दूला झा नोगजा,सिडनी,ऑस्ट्रेलिया ; मराठी अनुवाद- विजय नगरकर

      November 5, 2021


  • पुंडलिकाचे दैवत

    आईबापाच्या सेवेमध्यें, पुंडलीक रंगला,

    उभा विठ्ठल दारावरती, हेच तो विसरला ।।धृ।।

    आईबाप हे दैवत ज्याचे,

    रुप पाही त्यांच्यात प्रभूचे ।

    सेवा करीत आनंद लूटतां, तल्लीन जो जहला

    उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला ।।१।।

    निद्रेमध्यें असतां दोघे,

    मांडी देऊनी आपण जागे ।

    कशी मोडू मी झोप तयांची, प्रश्न विचारी भगवंताला,

    उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला ।।२।।

    वीट देऊनी विठ्ठलासाठीं,

    उभे केले त्या जगजेठी ।

    आपण गेला घेऊन त्यांना, स्नानाकरीता चंद्रभागेला,

    उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला ।।३।।

    आठ्ठाविस युगे गेली उलटूनी,

    कटीवरती हात ठेवूनी ।

    पांडूरंग बघे वाट तयांची, भक्तितच जे विसरती जगाला,

    उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला ।।४।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      March 12, 2021