सुमनांजली या काव्यसंग्रहातून…..
विरहार्त रात्र ही,चांदणी नभी चमचमते,
भासे तीही एकटी,
चमकण्यात कमी जाणवते,--!!!
चेहरा तिचा उतरुनी,
निस्तेज ती दिसते,
का बुडाली कुणाच्या विरही,
कोडे मजला वाटते,--!!!
असंख्य तारे तारकापुंजी, अवकाश चांदण्यांनी भरलेले,
चंद्र दिसे ना कुठे जवळी,
रजत किरणांचे लेऊन शेले,--!!!
समूहातून दूरच उभी,
अंतरी कोलाहल उठलेले,
लांबूनही ती दिसते "दुःखी*,
पाणी डोळां साठलेले,--!!!
वाट बघे सुधाकरांची,
जीव पहा कसा लावते,
तळमळत आत आत सारखी, सख्याची कल्पना करते,--!!!
मिलन दूर,- दर्शन नाही, अधिकाधिक उदास वाटते,
वाट पाहत साजणाची, चमचमण्याचा देखावा करते,--!!
गायब माझा राजा कुठे,
विचार करते अंतर्यामी ,
स्थानाहून ना ढळणे,
धोरण तिचे मनोमनी,--!!!
इथे धरणीवरती मी,
राजसा, तुझी वाट पाहते,
कढ पचवत विरहाचे, जिवाशिवांचीच ओढ लावते,--!!
© हिमगौरी कर्वे
सूत :
प्रभुरामांच्या मानसमूर्तिस करुनी अभिवादन
आदिकवी वाल्मीकि आदरें रचतीं रामायण ।। १
निनादे जगतीं रामायण ।।
करुण क्रौंचवध समोर बघुनी
कवितारूपें प्रगटे वाणी
अमर जाहलें व्याधाप्रत ऋषिवर्यांचें भाषण ।। २
वरदहस्त श्रीवाग्देवीचा
सहजसिद्ध प्रासादिक भाषा
सज्ज कथाया रघुनाथांचें लोकोत्तर जीवन ।। ३
मर्यादापुरुषोत्तम रघुवर
नरपुंगव, अद्वितिय धुरंधर
जगा दिव्य आदर्श चिरंतन कौसल्यानंदन ।। ४
आश्रमात शुभब्राह्ममुहूर्तीं
रामकथा ऋषिवर्य सांगतीं
आतुर श्रोतृगणानें पुढलें ओसंडे प्रांगण ।। ५
-- - सुभाष स. नाईक
सोडून दे अहंकार तुझा
लाचार आहेस आपल्या परि
पूर्ण जीवन तुला न मिळे
न्यूनता राहते कांहीं तरी...१
धनराशि मोजत असतां
वेळ तुजला मिळत नसे
शरीर संपदा हाती नसूनी
मन सदा विचलित असे...२
शांत झोपला कामगार तो
दगडावरी ठेवूनी डोके
देह सुदृढ असूनी त्याचा
पैशासाठी झुरतां देखे...३
उणीवतेचा कांटा सलूनी
बाधा येत असे आनंदी
म्हणून खरे समाधान ते
लाभत नसते मग कधी...४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
गायत्री मंत्रांबद्धल अनेक लोकांना कुतूहल असते. पण त्याबद्दलची विशेष माहिती नसते. बहुतेक लोकांना ‘ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं’ ही सविता गायत्री म्हणजे सूर्य गायत्री माहिती असते. मूळ सूर्य गायत्री मंत्राशिवाय पण अशा खूप गायत्र्या आहेत. त्या या लेखात संकलित करण्याचा प्रयत्न केला आहे. गायत्र्या वेगवेगळ्या देवतांच्या असतात. सर्व ठिकाणी एकवाक्यता नाही.
रंगाच्या उधळूनी लाटां, नाचल्या किती गोपिका,
आज पंचमी, रंगात नाहली,
विलक्षण गोकुळाची कळा,||
श्रीहरी नावातच हिरवा,
निळा रंग गगनाचा,
आभाळभर पसरलेला,
रंग शोभे तो निळ्या'चा,
अस्तित्त्व' त्याचे आसमानी,
आणि सखाहरी तो धरणीचा,|| २ ||
गोपिका आज नाचल्या
टाकुनी सगळ्या बंधना
जिवाशिवांचे' बनले ''अद्वैत'''',
विसरून साऱ्या तनांमनां,
कृष्णा'सम तो कोण सवंगडी,
मिळेल त्यांना नेमका,---???
रंगवुनी टाकती, भान विसरती,
माखवुनी टाकती एकमेकां,
समर्पणा'ची 'तऱ्हा'च न्यारी,
गोकुळीचाच, वाजे डंका,---!!!! || ४ ||
सगळ्या एकजीव, एकतान,
एकरूप एकप्राण'
एकमेव ध्येय आणि
एकच ते 'पंचप्राण',----!!!
शरीरे अनेक रंग खूप,
रुपे' -- वेगळी तयांची,
आत्म्या' मधला, एकच कान्हा,
एकच दिसे फक्त श्रीरंग,''''----!!! || ५ ||
खेळती बेधुंद' गोपिका
जशा रमुनी गोकुळा,
तशीच भोगती सर्व,
इंद्रिये इह'-- सुखां,
अतृप्त'खेळे आत्मा,
त्यात सतत सारखा,
होई देहा'चेचगोकूळ'
आत्मा'कृष्णसखा''',!!
हिमगौरी कर्वे. ७७७ ५०८५६५७.
गोविंदराव पटवर्धन यांचा जन्म २१ सप्टेंबर १९२५ रोजी गुहागर जवळ असलेल्या अडूर या कोकणातल्या गावी , त्यांच्या आजोळी झाला. ते १९३० च्या सुमारास मुंबईला आले . त्यांचे शिक्षण मुबईतील आर्यन एज्युकेशन स्कुलमध्ये झाले. १९४२ साली मॅट्रिक झाल्यानंतर ते १९४७ साली पोलीस खात्यात नोकरीला लागले. उपजिवेकेसाठी त्यांनी पोलीस खात्यात नोकरी केली परंतु त्यांची खरी निष्ठा संगीतावरच होती.
ही वात्रटीका आहे , लिहावी वाटली ,पटली म्हणुन लिहीली.
Copyright © 2025 | Marathisrushti