(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • श्रीरामाची शिवपूजा

    हरि हराचे पुजन करतो ।

    दृष्य दिसे बहुत आगळे ।।

    प्रभूकडूनी प्रभूची सेवा ।

    सर्वजणां ही किमया न कळे ।।

    शिवलिंगापुढती ध्यान लावी ।

    डोळे मिटूनी प्रभू श्रीराम ।।

    सुंदर सुबक चित्रामध्ये ।

    व्यक्त होई ह्रदयातील प्रेम ।।

    श्रीराम प्रभूच्या पूजेवेळीं ।

    आत्मरुप उजळून आले ।।

    शिवलिंगातील रामस्वरुप ।

    एक होऊनी मग गेले ।।

    कोण भक्त आणि ईश्वर कोण ? ।

    भासे मनी हे अवघड कोडे ।।

    परम बिंदूवर भक्ती असता ।

    ईश्वर भक्त दूजा न सांपडे ।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      July 4, 2017


  • यक्ष स्वर्गलोकीचा…

    रम्य नील अंबरी लकाकतात तारका मंद्र सप्तकातुनी सतार चंद्र छेडतो

      July 12, 2026


  • दिवाळी

    अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये लिहिलेली ही कविता


    आली दिवाळी आली दिवाळी
    दिव्या दिव्यांच्या लावून ओळी
    रंगा रंगाने खुलवु रांगोळी
    आली दिवाळी आली दिवाळी... ।। १ ।।

    लाडू करंजी ती कडबोळी
    शेव चिवडा अन् शंकरपाळी
    काटेरी चकलीची मजा निराळी
    आली दिवाळी आली दिवाळी... ।। २ ।।

    अभ्यंगस्नान पहाटेच्या वेळी
    उटण्याचा आलेप गंध दरवळी
    सुरसुऱ्या फुलबाजी झाल्या उतावळी
    आली दिवाळी आली दिवाळी... ।।३।।

    चांदण चुरा सजला आभाळी
    दिव्यांची आरास आसमंत उजळी
    आकाश कंदिल समृद्धी उधळी
    आली दिवाळी आली दिवाळी...।।४।।

    आली सोनपावलांनी लक्ष्मी सांजवेळी
    सौख्य, समृद्धी हौस ही आगळी
    पाडव्याचा सण पतीला ओवाळी
    आली दिवाळी आली दिवाळी...।।५।।

    भाऊ आला माझा मंगलवेळी
    लाविते टीळा चंदन भाळी
    स्वप्नांना त्याच्या मिळो यशाची झळाळी
    प्रेमाचे नाते जपते ही दिवाळी
    आली दिवाळी आली दिवाळी... ॥६॥

    (अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मधून)

      June 22, 2022


  • सुखाचा छंद

    सुखाचा छंद,न लागो जीवाला
    आहे तो निवारा, अपुला बरा
    मोहविते कायम, सुखाची जरतार
    वेदनेचे ठिगळ, मिरवूया जरा
    सुखावते सारे,फुलणारे रंगपिसारे
    एकचि रंग सावळा, अपुला बरा
    दुखावते मन, यातना कठीण
    गोंजारु तयाला, लाडाने जरा
    सुख हे क्षणिक, मृगजळ जाण
    शोधावा निवारा, समाधानी खरा
    तुझे माझे काही, कमी नि अधिक
    आहे त्यात सुख, मानावे जरा!
    -- वर्षा कदम.

      November 12, 2021


  • माझा जन्म

    माझाच जन्म व्हावा
    म्ह्णून माझ्या आई-बापाचं मिलन झालेलं नव्हतं...
    माझ्या जन्माचं कोडं
    त्यांना आणि मलाही कधी उलगडलं नव्हतं...
    माझा जन्म आता
    मला, माझ्या आई-बाबाला आणि जगालाही ओझं ठरलं होतं...
    मला शक्य असतं तर
    या जगात जन्माला येणंच मी स्वतःहून नाकारलं असतं...
    किती बरं झालं असतं
    या जगात जन्माला येणं न येणं हे आपल्या हातात असतं...

    © कवी – निलेश बामणे ( एन.डी.)

      June 6, 2017


  • चुकीचे तर्क

    मोठ-मोठ्याने आरडत ओरडत, स्वत:शीच बोलत होता
    विचार जरी गतिमान होते, विषय तोच तो घोळत होता.....१,

    तऱ्हेवाईक बघूनी वागणे, खुळा त्याला समजत होते
    वेडेपणाचा प्रकार समजूनी, दुर्लक्ष्य त्याजकडे करीत होते...२,

    वृक्षाखाली बसूनी एकटा, डोळे मिटूनी शांत दिसला
    त्याच विषयाचा विचार मनी, चक्र गतीने घोळू लागला...३,

    बाह्यांगाची बघूनी शांतता, ज्ञानी त्यास समजू लागले
    मतप्रदर्शनी तर्क आधार, चुकीचे घेणारे ते ठरले...४

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      April 7, 2017


  • प्रकट दिन

    असे कसे प्रकट होतात
    काही संतजन
    ज्यांना नसतात मायबाप
    नसते जन्मतारीखही
    प्रकटू देत त्यांचे त्यांना
    भेटू देत त्यांना भक्तही बापुडे हजारोंनी
    मला काय त्याचे....

    पण म्हणतो
    देशासाठी
    देशाच्या सिमेवरही
    प्रकट व्हा हो संतानो
    असेच युध्दाचे वेळी
    हजारो संख्येनी !

      February 27, 2019


  • सांजवात

    लोचनी सांजवात आठवांची
    झाली व्याकुळ कावरी बावरी...

    तव निर्मली रूपात मी हरवलो
    सांगना कसा परतु मी माघारी...

    तुच लाविलास जीवास जीव
    ओथंबुनी, ओघळतेस अंतरी...

    आत्म्यास जाणवतो स्पर्श तुझा
    हे सत्य मौनी कवटाळीतो उरि...

    हुरहुर ती, हरएक क्षण सोबती
    जगविते लोभस संध्याकिनारी...

    होता नि:शब्द , वादळ अंतरीचे
    मग हॄदयी, घुमते हरिची बासुरी...

    -- वि.ग.सातपुते (भावकवी)

    9766544908

    रचना क्र. २५४

    १०/१०/२०२२

      October 16, 2022


  • गोवरी दहन की लाकूड दहन

    दहनासाठी लाकडाचा प्रघात कधी सुरु झाला हे सांगणे कठीण आहे, पण काही समाजांचे निरीक्षण केल्यावर असे आढळते की फार पूर्वी गोवरी दहन हिच परंपरा होती, त्याची काही उदाहरणे खाली नमूद केली आहेत, तसेच बऱ्याच वेळेस संभाषणात, "अर्ध्या गोवऱ्या मसणात गेल्या" या वाक्यप्रचाराचा वापर केला जातो, हेही लक्षात घेतले पाहिजे.

    विदर्भात कोष्टी किव्वा हलबा समाजात पारंपारिक पद्धतीत दहनासाठी गोवरीचाच वापर करतात, आणि हि प्रथा त्यांच्यात हजारो वर्षापासून चालू आहे. मध्य प्रदेशात सर्व छोट्या गावात खूप सुंदर प्रथा आढळून आली, खेडेगावात जेव्हा एखाद्या व्यक्तीचे निधन होते तेव्हा त्या गावातील प्रत्येक घरातून किमान २५-५० गोवऱ्या अंत्ययात्रेत सहभागी होणाऱ्या लोकांच्याकडे सुपूर्द केल्या जातात, अथवा स्वतःच्या घराबाहेर त्या घेऊन जाण्यासाठी ठेवल्या जातात, प्रेत यात्रा रस्त्यातून जाताना अश्या तर्हेने घराबाहेर जमा केलेल्या गोवऱ्यावरच मृत व्यक्तीचे दाह संस्कार केले जातात. ही प्रथा या गावातून अनादी काळापासून जोपासली जात आहे, यातून मृत व्यक्तीचा आदर केला जातो, तसेच याचा अर्थ असा आहे कि भारत भूमीत गोवरीवरच अंत्य संस्कार करण्याची प्रथा होती.

    आपल्या देशात प्रत्येक लाकूड दाह्संस्कारच्या वेळेस उपस्थीत लोक गोवरीचा तुकडा टाकून, प्रतिकात्मक गोवरी दहन केले समजून घरी जातात, पण याच लोकांना पूर्ण गोवरी दहनाचा पर्याय दिला तरीही लाकडासाठीच हट्ट धरतात, यात सुशिक्षित - अशिक्षित हा भेदभाव नाही. समाज परिवर्तन करण्यास वेळ लागतोच हे आम्ही जाणून आहोत, त्यासाठी आमची संस्था जोमाने काम करत आहे, आणि त्यात अपेक्षित यश येऊ लागले आहे.
    आता भारतीय समाज लाकूड दहानाकडे कधी वळला याचा मागोवा घेऊया.

    साधारण १००० व्या शतकापासून यवन भारतावर वारव्वार हल्ला करू लागले आणि अधिक, अधिक भूमी काबीज करू लागले, त्या पूर्वी या देशात लोकसंख्येच्या ४-५ पट जास्त दुध देणाऱ्या गाई - म्हशी सारखी जनावरे होती, त्यामुळे दुध व दुग्ध पदार्थ कोणीही विकत नसत कारण प्रत्येक घरात ते मुबलक असे. आपण कृष्णाच्या मथुरा-वृंदावन कथांमधून हे वाचलेले आहेच, तसेच आपल्या पौराणिक कथेतही राजे लोक प्रजेला बक्षीस अथवा भेटीच्या रुपात गाई देत असत, याचा अर्थ गाईला अन्यनसाधारण महत्व होते हे सिद्ध होते, व गाय पूजनीय मानल्यामुळे तिची कत्तल होत नसे.

    यवनांना गाईचे मांस खाणे निषिद्ध नसल्यामुळे, ज्या प्रदेशात त्यांनी हल्ला केला तिथल्या गाई मारून खाण्यास सुरुवात केली, त्यामुळे शेणाची उपलब्धता कमी झाली. तसेच लढाईमुळे मरणाऱ्यांची संख्या नेहमीपेक्षा कित्तेक पटीने वाढली, व सामुहिक दहनविधी करण्याची वेळ आली, अश्या विधीत मोठ्या प्रमाणात गोवऱ्या पुरवणे कठीण झाल्यामुळे, पर्याय म्हणून लाकडे वापरण्यास सुरुवात झाली, आणि लाकूड दहन या प्रथेने जन्म घेतला. येणाऱ्या काळात लढायांची संख्या वाढत गेली, मोठ्या प्रमाणात माणसे मारली जाऊ लागली, त्यामुळे सामुहिक दहन वाढत गेले, लाकडाचा वापर सर्रास होऊ लागला, व लाकूड दहन प्रथेला पूर्ण मान्यता मिळाली.
    मी वेळोवेळी आधीच्या लेखातून सांगितले आहे, तरीही परत सांगतो की हिंदू धर्माच्या कोणत्याही ग्रंथात लाकूड दहनानेच मोक्ष मिळतो असे कुठेही लिहिलेले आढळले नाही. या ग्रंथात मोक्ष प्राप्तीसाठी दहन क्रिया आवश्यक आहे हे मात्र जरूर लिहिलेले आहे, याचा अर्थ हा होतो की दहनासाठी कोणतेही इंधन चालते.

    आधुनिक जीवन शैलीचा विचार केल्यास ग्यास दाहिनी सोयीची आहे, ज्यामध्ये २ तासात रक्षा मिळते. ज्यांना याचा आक्षेप असेल त्यांनी गोवारीचा वापर करावा हि माझी आग्रहाची विनंती आहे. गोवारी दहनाचे फायदे मी या पूर्वीच्या लेखात दिलेले आहेत, आपल्या शंका समाधानासाठी ते जरूर वाचावे.

    आज लोकसंख्या ज्या वेगाने वाढत आहे, त्या प्रमाणात पारंपरिक इंधन उपलब्ध होणे येणाऱ्या काळात फार कठीण होणार आहे, याचा विचार करता, आम्ही आणखी एक इंधन प्रकार समोर आणला आहे, हे शेतातील तुराटी, पराटी किव्वा agrowaste पासून बनवलेल्या विटा आहेत ज्याला मोक्षकाष्ठ असे नाव दिले आहे. याचा वापर नागपूर मध्ये मोठया प्रमाणात सुरु झाला आहे, ज्यामुळे पारंपरिक इंधनाचा होणारा तुटवडा कमी करण्यात यश आले आहे. यातून शेतकरी अर्थार्जन करू शकेल, ज्यातून त्याच्या प्रार्थमिक गरजा भागू शकतील, तसेच प्रदूषणावर आळा बसण्यास मोलाची साथ लाभेल.

    विजय लिमये (9326040204)

      July 26, 2016


  • ओळखा पाहू मी कोण?

    जेथे जातो,
    तेथे मी खातो,
    संपूर्ण खात्याला
    मी बरबटवतो,
    ओळखा पाहू मी कोण?

    भाषणबाजी करतो,
    नारेबाजी करतो,
    लोकांना भडकविण्याचे
    काम मी करतो,
    ओळखा पाहू मी कोण?

    लोक येतात,
    लोक जातात,
    मागितलेली माहिती
    देण्याचे टाळतात,
    ओळखा पाहू मी कोण?

    -- मयूर तोंडवळकर

      May 10, 2013