(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • पक्षी – मुलातले प्रेम

    स्वैर मनानें भरारी घेई, पक्षी दिसला आकाशीं ।

    स्वछंदामध्यें विसरला , काय चालते पृथ्वीशीं ।१।

    एक शिकारी नेम धरूनी, वेध घेई पक्षाचा ।

    छेदूनी त्याचा एक पंख, मार्ग रोखी उडण्याचा ।२।

    जायबंदी होवूनी पडला, जमीनीवरी ।

    त्वरीत उचलून पक्षाचे, पाय बांधे शिकारी ।३।

    ओढ लागली त्यास घराची, भेटन्या मुलाला ।

    आजारी असूनी पुत्र त्याचा, चिडचिडा तो झाला ।४।

    चकित झाला बघूनी मुलाला, अंगणी खेळतांना ।

    बघत होता रोज त्याला रडत असतांना ।५।

    झाडा वरती दोन पक्षी, नाचुन गात होते ।

    मुलास त्याच्या आनंद देवूनी, रिझवीत होते ।६।

    गहींवरूनी गेला दृष्य बघूनी, पक्षी- मुलातले प्रेम ।

    सोडून दिला हातातला पक्षी, लावून त्यास मलम ।७।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • ईश्वरी इच्छेनेच

    वळून बघतां गतकाळाला, चकीत झाले मन ।
    घटना घडल्या जीवनामध्यें, राही त्यांची आठवण ।।

    चालत असतां पाऊल वाट, जीवन रेषे वरची ।
    स्वप्न रंगवी मनांत तेंव्हा, भावी आयुष्याची ।।

    परिस्थितीच्या भोवऱ्यामध्यें, पुरता गुरफटलो ।
    फिरणाऱ्या त्या वर्तुळातूनी, बाहेर येवूं न शकलो ।।

    कल्पिले होते नियतीनें, तेच घडविले तिनें ।
    भंग पावले स्वप्नचि सारे, तिच्याच लहरीनें ।।

    असेच घडते जीवनीं सदा, अघटीत-अवचित ।
    समजूनी त्यासी ईश्वरी इच्छा, स्वीकारी आनंदात ।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • मातीमध्ये हात घालतो त्याला कळते (गझल)

    मातीमध्ये हात घालतो त्याला कळते
    मातीची सल केवळ शेतकऱ्याला कळते

    प्रेमामध्ये पडतो अन् जो जळून जातो
    प्रीत खरी त्या वातीच्या धाग्याला कळते

    जगणाऱ्याला अशीतशी ती कोठे कळते ?
    जगण्याची किंमत तर मरणाऱ्याला कळते

    मोठा नाही घाव गड्या बघणारा म्हणतो
    किती टोचते हे त्या लढणाऱ्याला कळते

    दिशा एकही राहत नाही हातामध्ये
    तेव्हा कोठे वादळ नावाड्याला कळते

    ©®_ महेश मोरे (स्वच्छंदी), सातारा
    9579081342

  • प्रतिक्रिया

    क्रियेला प्रतिक्रिया, ध्वनीला प्रतिध्वनी ।

    तत्व ते सनातन, दिसे नित्य जीवनी ।। १

    फेकतां जोराने, आदळे भिंतीवरी ।

    प्रवास परतीचा, होई तुमचे उरीं ।। २

    शिवी वा अपशब्द, दिले कुणासाठी ।

    येऊनी धडकतील, तुमचेच पाठीं ।। ३

    प्रेमाने बोलणे, सुंगध आणिते ।

    आनंदी लहरी, मनां सुखावते ।। ४

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • दुःख

    दुःख असे मानव निर्मित

    जाणती हे सगळे

    परि दुःखात शोक करिती

    हे कुणा न कळे

    आपण कर्म केलेले

    आपणचि भोगतो

    फळ कर्माचे आलेले

    तेच आपण चाखतो

    आहे तुजसी हे ज्ञान

    माहीत सर्वाना

    खंत द्यावी सोडून

    नको दाखवूं भावना

    इतरांसाठीं आहे

    ती भावना उदरीं

    सहानुभूती पाहे

    इतर जनांचे पदरी

    शोक भावना दाखवी

    तुझ्या दुःखाची

    नसतां तुज निर्दयी ठरवी

    हीच भीति जनाची

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • मूलमंत्र सुखाचा

    निरपेक्ष, निस्वार्थी जीवन
    मुलमंत्र परमानंदी सुखाचा

    जे घडते, ती प्रभुची ईच्छा
    करू नये, संताप जीवाचा

    स्वेच्छेने, जगु द्यावे सकला
    जगणे अधिकार प्रत्येकाचा

    अटकाव, बंधनांचा नसावा
    हाच विवेकी मार्ग शांततेचा

    मन:शांती! केवळ तडजोड
    नसावा संघर्ष वादविवादाचा

    सूत्र, मौनं सर्वार्थ साधनम
    मुलमंत्र! हाची धागा सुखाचा

    सर्वांशी सदा सुखानंदी रहावे
    मनी रुजावा मुलमंत्र सुखाचा

    -- वि.ग.सातपुते. (भावकवी)

    9766544908

    रचना क्र. ४७.

    १४ - २ - २०२२.

  • माझं काही.. उरलं नाही.

    माझं काही......... उरलं नाही.'

    जीवनांत या जगण्यासारखं,
    फार काही राहिलं नाही....
    निराश झालं आहे मन,
    आत्ता काही उरलं नाही....
    नाही नोकरी - नाही पैसा,
    फक्त होता आधार तुझा....
    पण.... तुझ्या जाण्यानं,
    तो - ही आत्ता राहिला नाही....
    जीवनांत मी इतरांसारख,
    फार असं काही केलं नाही....
    फक्त तू.. अन् तुझा विचार,
    तुझ्याविनं काही पाहिलं नाही....
    माझं माझं म्हणावं असं,
    माझं काही राहिलंच नाही....
    एक - होतं प्रेम माझं,
    ते ही तुला कळलं नाही....
    "जीवनात या जगण्यासारखं,
    माझं काही राहिलं नाही "

    -- गजानन साताप्पा मोहिते

  • मिठापरी जीवन

    खारेपणा हा अंगी असतां,

    कोण खाईल केवळ मीठ,

    परि पदार्थाला चव येई,

    मिसळत असता तेच नीट ।।१।।

    जीवन सारे खडतर ते,

    भासते मिठासम मजला,

    केवळ जीवन बघता तुम्हीं,

    पेलणें अवघड सर्वाला ।।२।।

    तेच जीवन सुसह्य होई,

    ‘आनंदात’ जेंव्हां मिसळते,

    हर घडीच्या प्रसंगामध्ये,

    समाधानाचे अंकूर फुटते ।।३।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • न्याय देवते

    कुठे तु गेलीस न्याय देवते, जगास सोडूनी याच क्षणी
    अन्यायाची कशी मिळेल मग, दाद आम्हाला या जीवनी

    परिस्थितीचे पडता फेरे, गोंधळूनी गेलीस आज खरी
    उघड्या नजरे बघत होती, सत्य लपवितो कुणीतरी

    दबाव येता चोहबाजूनी, मुस्कटदाबी होती कशी
    शब्दांना परि ध्वनी न मिळता, मनी विरताती, येती जशी

    बळी कुणाच्या पडली तू गे, मार्ग रोखीले तुझे कसे ते
    अपयश येता सत्यालाही, म्हणू कसा तूज ‘न्याय देवते’

    आज न आले यश जरी, न्याय येईल उफाळूनी
    अंतिम विजय हा सत्याचा, जाणीव आहे ह्याची मनी

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०

  • निसर्गावर अवलंबून

    कितीही सारी धडपड करशी,
    लाचार ठरतो अखेरी,
    जाण माणसा मर्यादा तव,
    आपल्या जीवनी परी ।।१।।

    क्षणाक्षणाला अवलंबूनी,
    जीवन असे तुझे सारे,
    पतंगा परि उडत राहते,
    जसे सुटत असे वारे ।।२।।

    निसर्गाच्याच दये वरती,
    जागत राहतो सदैव,
    कृतघ्न असूनी मनाचा तूं,
    विसरून जातो ती ठेव ।।३।।

    निसर्गाच्या मदती वाचूनी,
    जगणे शक्य नसे तुजला,
    जीवन कर्में करीत असतां,
    आठवित जा प्रभूला ।।४।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com