कळप
सतत फिरे चक्र निसर्गाचे
सुख दु:खाचे...१,
एका मागूनी दुसरा असती
पाठोपाठ येती...२,
प्रत्येक वस्तूची छाया असते
पाठलाग करिते....३,
सुखाचे जाता काही क्षण आनंदी
समाधानाची होई गर्दी....४
लगेच अनूभव येतो दु:खाचा
काळ जाई निराशेचा...५,
पूनरपी येता सारे सुख
विसरूनी जातो दु:ख....६,
जे होत असते ते बऱ्यासाठी
म्हणती समाधाना पोटी...७,
समाधान शोधणे हेही सुख
त्यातच जगती अनेक...८
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
December 14, 2019
जखमी होऊन पिल्लू पडले, घायाळ, केविलवाणे, करुण आवाजी साद घाले,
आईस बोलावे सारखे,
पक्षीण भोवती घिरट्या घाले, चोचीने त्यास गोंजारी,
कळेना तिला काय जाहले,
कसे पडले ते खाली ,--?
करूण साद ती ऐकून कोणी,
धावत आला दयावंत,
अती गरीब असूनही,
पक्षिणीस भासे देवदूत,
हळुवार हाते पिल्लाला,
जवळ घेऊन कुरवाळी,
साशंक मनाने पक्षीण मात्र,
सारखी हिंडे भोवताली,
नाजुकशा स्पर्शाने जाणवे,
इवल्या पिल्लाच्या शरीरी,
दिसे,-- कांटा रुतलेला,
बघून कोवळ्या पिल्लाला,
त्यांतील होई देव जागा,--!!
पिल्लू सारखे वेदनेने,
तडफडून रडत असे,
पक्षीण घायाळ जखमेवाचून,
तो असहाय्य जीव असे,--!!!
प्राण तिच्या डोळ्यात सारे,
डोळ्यातूनच बोलत असे,
येई कींव दयावंता,
बाजूस करे तो काटा,
वर लावी औषध त्याला,
विचार केवढा मोठा,--!!!
घेऊन जाई घरी पिलास,
पक्षीण येत असे पाठी,
पिल्लू ठेवले कापसात,
उपचार करण्यासाठी,
पक्षीण येई रोज तेथे,
करत मुक्त संचार,--!!!
घास पिल्लाला भरवे ,
आता भरोसा तिला फार,
खूप काळ मध्ये जाई,
पिल्लू तिथल्या तिथे हिंडे,
आईस बघून तेवढे ,
उडण्यास सज्ज होई,--!!!
एक दिवस आला असा,
पिल्लू घरातल्या घरात उडे,
पक्षीण घेऊन जाई त्याला, मानवतेचे देणे केवढे,--!!!
हिमगौरी कर्वे.©
May 2, 2019
विचारांच्या उठती लहरी, वलये त्यांची होत असती ।
सुविचारांची वलये सारी, नभाकडे जात दिसती ।।१।।
पवित्र निर्मळ विचारांच्या, तरल अशा लहरी असती ।
अशुद्ध साऱ्या विचारांची, जड लहरी तळांत राहती ।।२।।
फार पूरातन काळी देखील, उकल दिसते या गोष्टीची ।
पवित्रतेच्या सर्व स्थळांनी, शोधली जागा शिखरावरची ।।३।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
October 18, 2018
जाई जुईचं अलगद बहरण
की मंद निशिगंधाच दरवळण,
गुलाबाच टवटवीत होणं की
प्राजक्ताचं दवात ओलं भिजणं..
June 17, 2022
गोड शब्द बोबडे, लकब त्याची मनास आवडे,
शब्दांची भासली जाण, नव्हते भाषेचे अजुनी ज्ञान,
भावनांचा उगम दिसला, मनी व्यक्त होई हालचालीतूनी
रागलोभ अहंकारादी गुण, दिसून येती जन्मापासून
देश-वेष वा जातही कुठली, सर्व गुणांची बिजे दिसली
हळूहळू बदले बाह्यांग जरी, उपजत गुण राही अंतरी
प्रसंग घडता अवचित , बाह्य जगाला विसरतो
उफाळून येती सुप्त भावना, मानवी धर्माच्या त्या जन्मखुणा.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
May 8, 2019
June 4, 2011
बारा महिने वर्षाचे
चोचले आमच्या जीभेचे
दोन हात गृहिणीचे
असतात अन्नपूर्णेचे
चैत्रामध्ये चैत्रगौरी,
चणे खिरापत घरोघरी
गुढी पाडव्याला पानामध्ये
हवी असते बासुंदीपुरी
वैशाख, ज्येष्ठ बेगमीचे,
वाल, पापड, सोड्याचे
बाजारात मिळती खूप,
घरच्या मसाल्याचे अप्रूप
आषाढ येतो पावसाचा,
मच्छी, भजी तळण्याचा
तिखटीला मटणवडे,
अमृत फिके त्याच्यापुढे
श्रावणराजा महिन्यांचा,
श्रीकृष्णाच्या जन्माचा
करतो आम्ही उपासतापास,
भरल्या केळ्याचा येतो वास
अश्विनात बसले घट,
कामे उरका पटापट
देवीच्या नैवेद्याला पानी
हवाच खीर कानोला
जमलच तर भरले घावन,
अष्टमीला समिष भोजन
कार्तिक-मार्गशीर्ष लग्नसराई,
पक्वानांना तोटा नाही
पौष म्हणजे संक्रांत आली,
गुळपोळीची तयारी झाली
तिळावरती आला काटा,
मेळाव्यात तिळगुळ वाटा
माघाच्या थंडीसाठी
गरम रस्स्याची लागते वाटी
फाल्गुनात होळी-रे-होळी,
घरोघरी तेलपोळी
नारळाचं दुध, तुपाची धार,
आमच्या जीभेचे चोचले फार
कोलंबी भात, शेवाळाची कणी,
मुगाचं बिरडं करतं का कोणी ?
भरलीचिंबोरी, मटणबिर्याणी,
वासानेच तोंडाला पाणी
किती, किती घेऊ नांव,
खाद्यसंस्कृतीचा हा गाव
उरलीच नाहीत काही नावे,
म्हणूनच केले ते निनावे..
सुधा मोकाशी - ठाणे
May 12, 2024
गेले ज्यांचे जीव तडफडून
कशी होईल याची भरपाई
जीव जपला जो जीव लावून
गेला निघून तो ऑक्सिजनपाई
किती होणार अशा दुर्दैवी घटना
कधी थांबणार मृत्यूचे तांडव
कुठे गेली मुले आटवून पाना
तर इथे सर्वत्र गळती आसवं
दुःख झेलण्या मजबूत माती
विसरण्या सारे खुले आकाश
दूर राहिली ती नाती गोती
दिवस व रात्र झाले भकास
वेळ कोणावर नको यायला
आता कंपते सारे शरीर
काळानेच जर घातला घाला
तर मग कुठे मिळेल आधार
रा. ना. जाधव, परळी वैजनाथ
May 8, 2021
किती खाल्ला मार, किती खाल्या शिव्या याची गणतीच नव्हती.
एकच गोष्ट सतत कानी पडत होती.
उनाड आहे, बावळट आहे, धडपड्या आहे, तडफड्या आहे, मूर्ख कुठचा.
भडीमार होत होता आईकडून शब्दांचा..
आम्ही होतो बालपणीच गांधीवादी.
एका गालांत कुणी मारली तर दुसरा गाल पुढे करणारे.
मुकाट्यानें मान वर न करता सारे शब्द पचविणारे.
खेळणें, कुदणें, उड्या मारणें,
त्यातच ढोपर, कोपर, हातपाय फुटून जाणें, भळभळा रक्त वाहायचे.
पण सांगा रडून कुणाला ?
कारण ते असायचे स्वतःच्याच प्रतापाचे...
निमुटपणें बाजूस बसून, सहन करायचे
आणि कुणास समजू नये, म्हणून माती टाकायचे.
भरत होत्या साऱ्या जखमा हलके हलके.
न भरून कसे चालायचे ?
मस्तीची रग, खेळातील धडपड आणि
स्वत:च डॉक्टर बनून जखामाबद्दल वाटणारी मायेची कढ.
सारे तुटून पडायचे, घाव बरे करण्यासाठी.
* * *
... संध्याकाळची वेळ, सूर्य अस्ताला चाललेला.
किती घटका राहील्या होत्या, त्याला डुबण्यासाठी !
विचार करितो मी. शांत बसून पंचाहत्तरीच्या काठी.
हातपाय खाजवितो, कुरवाळीतो, सुरकुतलेल्या कातड्याकडे बघतो.
मध्येच नजर खिळून राहते, ती जखमांच्या वणावर.
कितीतरी लहान मोठ्या आकाराची.
ज्यावर दिसत होती चित्रे आठवणीची.
प्रत्येक वणावर होता एक इतिहास, एक घटना, एक जबरदस्त प्रसंग.
कोडगे बनून केलेली मस्ती, आईचा मार, शिव्या आणि बाबांचा राग.
पण आज सारे काही मनाला आनंदीत करून टाकणारे.
शरिरावरले वण बनले होते एक जीवन आलबंम.
नेत होते भूतकाळांत.
जो होता निश्चित आणि उपभोगलेला.
त्यात भविष्यकाळाची अनिश्चितता नव्हती, कि वर्तमान काळाची क्षणिकता.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
October 2, 2017
कुठे शोधू तुला, ध्यास लागला मनी
वाटे मजला, तू बसलास लपुनी
इंद्र धनुष्याचे रंग, आकर्षक वाटती
बघण्यात दंग, लक्ष वेधुनी घेती
ओढ्याची झुळझुळ, पडे कानावरी
ऐकून नाद मंजुळ, मना वेडे करी
फुलातील गंध, तल्लीन करी मना
होऊनी मी धुंद, विसरे सर्वाना
फळातील रस, देई मधुर स्वाद
उल्हासी मनाला, देऊनी आनंद
वाऱ्याची झुळूक, रोमांचकारी
देई देहा सुख, अल्हाद्कारी
रंग, गंध, रस, स्पर्शात, तुझ्या अस्तित्वाची जाण
तू लपलास गुणांत, तुला शोधणे कठीण
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
October 18, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti