(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • जीवनात किती रंग

    जीवनात किती रंग,
    पहावे,अन उधळावे,
    सुख दुखांचे सोहाळे,
    किती साजरे करावे ,--!!!

    विविधरंगी मनसोक्त जगावे,
    मिसळून त्यांच्यात तसेच होणे, पाण्याचाही रंग स्वीकारे,
    सूज्ञही किती शहाणपणे,--!!!

    अनेक अंगे जीवनाची,
    कशी निरखून पहावी,
    कंगोरे त्यातील अनुभवत,
    पखरण पैलूंचीच करावी,--!!!

    बालपणाचा रंग तो,
    किती निर्व्याजपणाचा,
    कुठला नाही मुलामा,
    फक्त पारदर्शीपणाचा,--!!!

    लाल हिरवा गुलाबी,
    पिवळा केशरी जांभळा,
    आयुष्य नवे ,हरेक दिवशी,
    तारूण्याचा स्पर्श आगळा,--!!!

    कर्तृत्वाचा रंग वेगळा,
    कायमचाच चढत असे,
    आयुष्य बदलूनच सारे,
    सर्वदूर की पसरे,--!!!

    देशप्रेमाचा रंगही,
    नागरिक तो जपे,
    सदैव आपल्या झेंड्याला,
    झुकून सलाम ठोके,--!!!

    वृद्धत्वाचा रंग चढता,
    सर्वच रंग फिके,
    दिसती फक्त डोळ्यांना,
    जर्जर ती शरीरे,--!!!

    जीवन जसे टाकते,
    उधळून सारे रंग,
    एकच रंग राहतो,
    राहे मागे निस्संग,--!!!

    हिमगौरी कर्वे.©

  • प्रतिक्रिया

    क्रियेला प्रतिक्रिया,

    ध्वनीला प्रतिध्वनी ।

    तत्व ते सनातन,

    दिसे नित्य जीवनी ।।१।।

    फेकतां जोराने,

    आदळे भिंतीवरी ।

    प्रवास परतीचा,

    होई तुमचे उरीं ।।२।।

    शिवी वा अपशब्द,

    दिले कुणासाठी ।

    येऊनी धडकतील,

    तुमचेच पाठीं ।।३।।

    प्रेमाने बोलणे,

    सुंगध आणिते ।

    आनंदी लहरी,

    मनां सुखावते ।।४।।

    -- डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • जुळे

    दोघे मिळून आलां
    हातात घेऊन हात
    हाताळूनी परिस्थितीला
    करण्या त्यावर मात

    दोघांची मिळूनी शक्ति
    दुप्पट होत असे
    सहभागी होतां, युक्ति
    यशाची खात्री दिसे

    एकाच तेजाची तुम्ही बाळे
    बरोबरीने आलां जगती
    रवि-किरण होऊन जुळे
    प्रकाशमान बनती

    ओळखुनी जीवन धोके
    यशाच्या मार्गांत
    गाडीची बनूनी चाके
    सतत रहा वेगांत

    एकाचे पाठी जाता दुसरा
    यश अल्पची मिळे
    एकत्र मिळूनी काम करा
    तुम्ही आहांत जुळे

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • माफी

    जिव्हाळा नि आपुलकी
    जा! तूझ्या वाट्यास नाही
    तुझ्याबद्दल लिहून मी
    का संपवू लेखणीची शाई
    आता पुन्हा मवाळ झालास
    आलासच ना माझ्या दारी
    कितीही कारले गुळात भिजले
    तरीही कडू चव सोडणार नाही
    इतके घाव वर्मी बसले
    भळभळती जखम ठायीठायी
    फुंकर घालण्या उशीर झाला
    आता तुज कधीच माफी नाही
    जाऊ द्या, माफी देऊ,
    सोडून देऊ सारे कमलपत्री
    म्हणणे सोपे वागणे अवघड
    कशी विसरू त्या अश्रूंच्या रात्री
    आला गेला इथेच सारे
    सोन्याच्या राशी कुणी नेत नाही
    इतकेच करुया, गेल्यावर म्हणती
    चांगला होता तो एक भाई!!
    -- वर्षा कदम.
  • ‘वारी संसाराची’

    कडकड भांडली अन तरातरा गेली बडवायला
    थंड्यानं ऐकलं अन लागला बेशरम हादडायला
    तिने राग काढला याने पोटात ढकलला
    ती केकाट हा मुकाट विठ्ठल रुख्माई

    वाट ती पाहते तहान भूक विसरून
    येऊ द्या कुणी गेला हा विसरून
    तिने कढ काढला याने कड लावली
    ती मुकाट हा सुसाट विठ्ठल रुख्माई

    ताटा खालचं मांजर करून नाचवते फार
    खरं करतो स्वतःचच कबुल करून हार
    ती याची सावली हा मुलखाचा आवली
    ती पावली याला गावली विठ्ठल रुख्माई

    -- कुप्रसाद

  • सुन्न एकांत

    सजलेले घर हे सुंदर
    सजलेल्या चारभिंती
    सुन्न सारे, मनही सुन्न
    एकांती बोलती भिंती ।।१।।
    नाही, काही उणे इथे
    दरवळ सारा सुखांती
    तरी, जीव घुसमटतो
    शांतता पोखरते भिंती ।।२।।
    जीव सुखे जरी नांदतो
    मन, शोधिते विश्रांती
    व्याकुळ हा जीव सारा
    याचितो नित्य मन:शांती ।।३।।
    जगण्याची एक स्पर्धा
    अविश्रांत चाले जगती
    सौख्याचीच सारी नशा
    उद्विग्न आज चारभिंती ।।४।।
    स्पंदने आज सरावलेली
    साशंक, जगी भावप्रीती
    खुंटलेली ओढ नात्यांची
    एकांती मुसमुसती भिंती ।।५।।
    -- वि.ग.सातपुते.(भावकवी)
    9766544908
    रचना क्र. ७१.
    ५ - ३ - २०२२.
  • स्वामींची प्रेमळ माया

    स्वामींची प्रेमळ माया
    असेल कृपा छाया,
    भक्तांना मिळेल सदा
    मायेचा अथांग ओलावा
    गजानन महाराजांची कीर्ती
    करुणाकर प्रेमळ मूर्ती
    शांत चित्ती भाव मुखी
    लाभेल कृपा प्रसाद मस्तकी
    मिळेल निश्चित अनुभूती
    ठेवावी श्रद्धा अंतकरणी,
    अक्कलकोट स्वामींची महती
    शेगाव नगरी पावन ती पंढरी
    -- स्वाती ठोंबरे.
  • बाप विठूराया

    आषाढी कार्तिकी

    जसा पाहतसे वाट

    तसा माझा बाप

    गावी उभा राऊळी

    डोळ्यात जशी विठूच्या

    प्रतीक्षा लेकरांची

    म्हाताऱ्या बापाचीही

    अवस्था तीच

    त्याला तरी आहे

    विटेची सोबत

    थकलेला माझा बाप

    उरे एकाकी

    आणावे वाटते

    शहरात त्याला

    पण नाही हवा

    म्हणे मानवत

    उमगते मला

    तगमग त्याची

    पण भ्रांत पोटाची

    करी हतबल

    गावच्या मातीशी

    त्याची नाळ जुळलेली

    अन् शहराच्या बेड्या

    माझ्या पायी बांधलेल्या

    समजून घेतो बाप

    अडचणी साऱ्या

    दडवून दुःख

    ठेवी अंतरात

    भक्ताच्या मनीचे विठू

    जाणतसे गुज

    तसे माझे मन जाणे

    बाप विठूराया

    - महेन्द्र कोंडे

    (व्यास क्रिएशन्स च्या ज्येष्ठविश्व / ज्येष्ठत्व साजरा करणारा दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)

  • मुक्तछंद

    आलास, ये वरूणराजा
    वाट पाहतो आहोत,
    अगदी चातकागत,---
    थोडा रेंगळ आमच्यासमवेत, भिजवून टाक धरणीला,
    तुझ्या संततधारेने,
    अरे तिला संजीवन दे रे,--!!!
    ती तडफडत्ये उन्हाने,
    रणरणतेपण खाते रे तिला, नखशिखांत भिजू देत तिला,
    तुझ्या जलप्रवाहांनी,---
    तरसता, पोळलेला तडफडतां, माणसाचाही आत्मा,---
    होईल संतुष्ट तिच्या भिजण्याने, धरती एकदा तृप्त होऊ दे,
    चराचर सृष्टी होऊ दे समाधानी,
    तू फक्त ये ,-ये -आणि ये,
    रेंगाळत रहा पृथ्वीवर,---
    बास, आजच्या घडीला,
    नकोच आणखी काही,
    डोळा लावून बसलेत,
    आभाळाकडे सगळे,--!!!!
    पाणी बरसू देत,जोरदार,
    होईल धरती ओलेती,
    सगळीकडे होईल हिरवेगार,
    चारच दिवसात फक्त,
    संपेल सगळा रखरखाट,
    तप्तपणा, काहिली,
    जीवाची कासाविशी,
    थांबतील घामाच्या धारा ,--!!!!

    तुझ्या धारा बरसल्या की,
    तुझ्या धारा बरसल्या की,--!!!

    हिमगौरी कर्वे.©

  • मी आणि WhatsApp

    मला WhatsApp वापरायला लागून वर्ष झाले तरी ...

    मी 'लाइक' केला नाही, मी 'ईमोजी' निवडली नाही,

    मी एकही साधा मेसेज 'फॉर्वर्ड' केला नाही ||1||

    मी उपदेश केला नाही, मी सुवचन धाडले नाही,

    मी आजवर विनोदी चुटका रवाना केला नाही ||2||

    मी 'दैनिक शुभेच्छा' चालवले नाही, मी भविष्य कथिले नाही,

    मी ‘नेट'वरची रंगीत फुले पाठविण्यात रंगलो नाही ||3||

    मी सेल्फी काढला नाही, तो डीपीत टाकला नाही,

    मी वर्षभरात माझा स्टेटस बदलला नाही ||4||

    मी साहित्यिक धुंडाळला नाही, मी बातमी प्रसारली नाही,

    मी राजकरण्यांच्या करणीत कधीच डोकावलो नाही ||5||

    मी केक वितरला नाही, मी बुकेही बांधला नाही,

    मी वाढदिवशी कोणावरही ‘Wish’ प्रयोग केला नाही ||6||

    मी 'HBD' केला नाही, मी 'वा.दि.हा.शु.' ही केला नाही,

    मी 'वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा' करायला मात्र चुकलो नाही ||7||

    मी काहीच केले नाही, मी तरीही निर्दोष नाही,

    मी आलेले मेसेज डिलीट करण्याच्या शापातुन मुक्त नाही ||8||

    - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

    श्री. संदीप खरे यांच्या काव्य रचनेशी साधर्म्य राखून लिहिले आहे.

    -- रविंद्रनाथ गांगल