कीटक ते लहान असूनी
रहात होते फळामध्यें
विश्व तयाचे उंबर फळ
जीवन घालवी आनंदे......... १
ब्रह्मांडाची त्याची व्याप्ती
उंबराच्या नसे पलिकडे
ज्यासी ते अथांग समजले
बघूनी त्या एका फळाकडे ...........२
माहित नव्हते त्या कीटकाला
झाडावरची अगणित फळे
सृष्टीतील असंख्य झाडे
कशी मग ती त्यास कळे .............३
आपण देखील रहात असतो
अशाच एका फळावरी
हीच फळे असंख्य असूनी
असंख्य झाडे विश्वावरी ...............४
डॉ. भगवान नागापूरकर
१९२-१००३८४
e-mail- bknagapurkar@gmail.com
तारूण्याच्या उंबरठ्यावरी, ज्योत प्रेमाची पेटून जाते
बाह्यांगाचे आकर्षण परि, वयांत त्या भूरळ घालते...१,
प्रेमामधली काव्य कल्पना, शरिर सुखाच्या नजीक ती
किंचित होतां देह दुर्बल त्याच प्रेमाची घृणा वाटती...२,
प्रेम हवे तर प्रेम कर तूं, मूळे असावी अंतर्यामी
मना मधली ओढ खरी ती, येईल अखेर तीच कामीं...३,
अंतर्मनातील प्रेम बंधन, नाते त्याचे अतूट असते
देहामध्यें बदल घडूनही, प्रेम मनींचे फुलत राहते....४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
नव्हतो कधींही कवि वा लेखक कसे घडले कांहीं न कळले
साहित्य सेवेचा गुण मिळूनी काव्य मजला सूचू लागले १
वाङ्मयाविषयी प्रेम होते वडीलांना त्या काळी
अथांग ज्ञान त्यांनी मिळविले पुस्तके वाचूनी सगळी २
खो – खो मधल्या खेळा सारिखे खो देत ते गेले बसूनी
साहित्याची ठेव सोपवूनी मज ते गेले चटकन निघूनी ३
गोंधळून गेलो होतो मनीं नव्हते ज्ञान कांहीं मजला
बरसत असतां त्यांचे ज्ञान छिद्रे होती मज झोळीला ४
कुणीही नसता मार्गदर्शक घडत होते सारे अवचित
चेतना देण्यास मज लागी आशिर्वाद त्यांचा होता सतत ५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
तू ऑनलाईन आलीस की
सुचते मला कविता
तू ऑफलाईन झालीस की
रुसते माझी कविता
तुझ्या एका रिप्लायसाठी
झुरते माझी कविता
तुझ्या एका स्माईलने
फुलते माझी कविता
-- विजय रतन गायकवाड
निसर्गाचा अप्रतिम ठेवा, नदीकाठच्या पर्वत शिखरीं ।
बाह्य जगाचे वातावरण, धुंदी आणिते मनास भारी ।।
त्याच वनी एकटे असतां, परि न लाभे एकांत तुम्हांला ।
चित्तामध्यें वादळ उठतां, महत्त्व नव्हते बाह्यांगाला ।।
खडखडाट सारा होता, दैनंदिनीच्या नित्य जीवनी ।
समाधानी जर तुम्हीं असतां, शांतता दिसते त्याच मनीं ।।
एकांततेची खरी कल्पना, मनावरती अवलंबूनी ।
अंतर्मन शांत असतां, बाह्य एकांत बघेना कुणी ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
-- वर्षा कदम.
पहिला पाऊस मुठीत पकडण्याचा निरर्थक प्रयत्न करत होतो … मुठीत सापडला पण ! निसटलाही अगदी तिच्यासारखा …
खारेपणा हा अंगी असतां,
कोण खाईल केवळ मीठ,
परि पदार्थाला चव येई,
मिसळत असता तेच नीट ।।१।।
जीवन सारे खडतर ते,
भासते मिठासम मजला,
केवळ जीवन बघता तुम्हीं,
पेलणें अवघड सर्वाला ।।२।।
तेच जीवन सुसह्य होई,
‘आनंदात’ जेंव्हां मिसळते,
हर घडीच्या प्रसंगामध्ये,
समाधानाचे अंकूर फुटते ।।३।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
थांब विज्ञाना, नको लावूस शोध
नष्ट करुनी भावना, नको गमवू आनंद / धृ /
उंच मारुनी भरारी
पोहंचला चंद्रावरी
दाही दिशा संचारी
नष्ट केलास तू , चांदण्यातील आनंद १
थांब विज्ञाना, नको लावूस शोध
फुलांतील सुवास
फळांतील मधुर रस
पक्षांचा रम्य सहवास
नष्ट केलास तू, निसर्गातील सुगंध २
थांब विज्ञाना, नको लावूस शोध
नदीतील संथता
ओढ्यातील चपळता
धबधब्यातील प्रचंडता
रोखलास प्रवाह तू, घालूनी बांध ३
थांब विज्ञाना, नको लावूस शोध
शरिराची योजना
गुंतागुंतीची रचना
श्रेष्ठत्व दिले ज्ञाना
भावना व विचार यांचा, निर्माण केला वाद ४
थांब विज्ञाना, नको लावूस शोध
तुझ्या शोधांतील झेप
क्षणिक सुखाची झोप
परि करी निसर्गा ताप
नको करुं तूं, ईश्वरी दयेचा प्रवाह बंद ५
थांब विज्ञाना, नको लावूस शोध
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
कणकण भारत कोसळताना पाहुन अंतरी कळवळला।
कौटिल्याचा ज्ञानदिप तो मार्ग दावितो आम्हाला॥धृ॥
सिमेवरती उभा सिकंदर फिकीर तयाची कोणाला ।
धनानंद हा तुकडे फेकुन जमवीत बसला श्वानांना।
नंदकुळाचा नाश करीन मी भिष्म शब्द तो धगधगला।।१।।
जिंकाया जग इर्षा धरुनी समरांगणी तो तळपतसे।
सिंकदराला विश्वविजेता कोण मूढ तो म्हणवितसे।
गर्व तयाचा चाणक्याने सिमेवरती उतरविला।।२।।
राजनितीचे सुत्र नवे मग विश्वपटावर मांडियले
अखंड भारत पाहीन डोळा शब्द कृतीतुन अवतरले।
सेल्युकस मग सिमेवरती काही मिनिटांत लोळविला॥३॥
कसे नियंत्रित राखावे या राष्ट्राला मग एकवटुन।
सुत्रबध्द ते केले सारे ज्ञान आपुले ग्रंथातुन।
अलौकिक तो अजुनी आहे ग्रंथ जगातील ठरलेला॥४॥
- रणजित हिर्लेकर
Copyright © 2025 | Marathisrushti