पृथ्वीचे प्रेमगीत ही कुसुमाग्रजांची एक निसर्गवत्सल, स्थल-कालातीत आणि नितांतसुंदर रचना आहे. ही कविता अन्यभाषिकांपर्यंत पोहचविण्याचा हा प्रयत्न. या हिंदी भाषांतराचे ‘कवितापण’ वाढविण्याच्या दृष्टीने बदल सुचवावेत अशी प्रार्थना.
कळतंच नाही आजकाल काय झालोय आपण, कसे झालोय आपण !! तेच तेच रहाटगाडगं ढकलत “रटाळ” झालोय आपण !!
शरीर एक साधन, साध्य करण्या प्रभूला
ठेवूनी ती आठवण, चांगले ठेवा देहाला...१
व्यायाम व आहार, असतां नियमित
सुदृढ ते शरीर, असते मग बनत...२
सुदृढ असता देह, करावे मनाला शांत
टाळत असतां मोह, न येई तो भावनेत...३
षडरिपू हे विकार, काढा विवेकांनी
निर्मळ ठेवा शरीर, पवित्रता राखूनी...४
देह आहे मंदीर, गाभारा तो मन
आत्मा तो ईश्वर, आनंद देई आंतून...५
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
पाऊस कधी मला समजलाच नाही.
किचकीचणाऱ्या डबक्यात,
मिचमीचणाऱ्या दिव्यात
कडाडणाऱ्या ढगात
कसला आलाय रोमांच.
पण
झुलणाऱ्या पानांत
मातीच्या तहानलेल्या सुवासात
निरागस टपोऱ्या थेंबांत
पाऊस कधी मी बघितलाच नाही.
आणि जेव्हा उधळली बरसात
गहिऱ्या प्रेमात
अबोल स्पर्शात
मनातल्या वादळात
गच्च डोळ्यांत,
पाऊस तेवढा चांगला पुन्हा कधी मला समजलाच नाही.
-- कल्याणी
वाढदिवस स्वातंत्र्याचा, जो-तो बघ गात आहे –
‘सर्व लोक खूष येथें , सर्व सुशेगात आहे’ ।।
पुढे पुढे काळ चाले, पुढे पुढे दुनिया जाई
आणि पहा देश अपुला कसा कुठे जात आहे !
कोटि-कोटि देव ठाकत धनवंताच्यासाठी
कोण इथें दीनासाठी ? तो पुरा अनाथ आहे ।।
महापूर-भूकंपांनी जनजीवन नासे पुरतें
फक्त एवढेंच ? बाकी सर्व-सर्व शांत आहे ।।
कितिही आक्रंदा येथें , ढिम्म न कोणी हलतें
हात कटी ठेवुन निर्मम पंढरिचा-नाथ आहे ।।
कुठल्याही विषयामध्ये कितवा-ही असुं दे नंबर
उच्चरवें गर्जूं , ‘भारत पहिला जगात आहे’ ।।
- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
बघा बघा तो रवि चालला, अतिशय वेगानें ।
पूर्व दिशेला चंद्रही येई, त्याच तन्मयतेने ।।
युगानु युगें लपंडाव हा, त्यांचा चालला असे ।
भावांमधली शर्यत बघूनी, गम्मत परी भासे ।।
मोठा भाऊ रवि त्याला, पकडण्या धांव घेई ।
लहान भाऊ चंद्र असूनी, निसटून मात्र जाई ।।
संताप येता लाल होऊनी, रवि जाई तापूनी ।
परि शांत असे चंद्र बघा, राग घेई गिळूनी ।।
लहान असूनी थकून जाई, कांही काळ जाता ।
नभीं न येतां घरींच झोपे, थकवा जाण्या करीता ।।
विश्रांतीचा काळ घालवूनी, हलके हलके येई ।
पुनरपि त्यांचा खेळ बघतां, आनंद मनास होई ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bbbknagapurkar@gmail.com
प्रदीप निफाडकरांची गझल
ओढ लागली आतां मजला, माझ्या सासरची //धृ//
बाळ चिमुकले गोजिरवाणे, त्यांना दाखविण्याची
धन दूज्याचे म्हणूनी घेतले
परके त्यासी नाही समजले
बालपणीं जे प्रेम जमविले
क्षणांत मजला तेच मिळाले
भासली नाहीं उणीव तेथे, आईच्या मायेची //१//
ओढ लागली आतां मजला, माझ्या सासरची
खट्याळ भाऊबहीण येथें
दिर नणंद तसेच तेथे
बहीण वहीनी एकच नाते
हट्ट पुरविण्या दुजे नव्हते
पदोपदीं करुन देई, आठवण भावंडाची //२//
ओढ लागली आतां मजला, माझ्या सासरची
संसार दुःखे स्वशिरीं घेऊनी
सुख वाटले सदैव त्यानीं
मान मिळे मज पुन्हां सत्वरी, त्यांच्या सेवेची //३//
ओढ लागली आतां मजला, माझ्या सासरची
सासरीं गेले सोडूनी बालपण
दुज्यासाठीं करण्या समर्पण
फुलणें फळणें खरे जीवन
हवे निसर्गा हेच ते धन
माहेर सासर एकची मिळूनी, ठरले मी भाग्याची //४//
ओढ लागली आतां मजला, माझ्या सासरची
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
जगलो जरी सारे खेळ प्राक्तनाचे
तरी अर्थ जीवनाचा कळला नाही
भाळीचे, भोग भोगले जरी सारे
हव्यास मनीचा अजूनी सरला नाही
जडली नाती, जगता जीवन सारे
गूढ नात्यांचे आजही उकलले नाही
सत्य ! जन्मदात्यांचेच ऋणानुबंध
अन्य रक्ताची नाती कळलीच नाही
सारेच माझे, म्हणता संपला काळ
ओढ प्रीतीची ती जाणवलीच नाही
सांगा, या मनालाच कसे सावरावे
काहूर ! वेदनांचे कधी शमले नाही
जखमा साऱ्याच अजूनही ओल्या
लेप प्रीतचंदनी कुठे भेटलाच नाही
शोधीतो, मीच वाट आत्मसुखाची
रुसली पाऊले, तरी थांबणार नाही
-- वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. ४८.
१५ - २ - २०२२.
Copyright © 2025 | Marathisrushti