(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • रे हिंद बांधवा !

    रे हिंद बांधवा, थांब या स्थळी
    अश्रू दोन ढाळी
    ती पराक्रमाची ज्योत मावळे
    इथे झाशीवाली । धृ ।।

    तांबे कुलवीरश्री ती
    नेवाळकरांची कीर्ती,
    हिंदभूध्वजा जणु जळती
    मर्दानी राणी लक्ष्मीबाई
    मूर्त महाकाली ।।१।।

    घोड्यावर खंद्या स्वार,
    हातात नंगी तरवार
    खणखणा करित ती वार
    गोऱ्यांची कोंडी फोडित पाडित
    बीर इथे आली ।।२।।

    कडकडा कडाडे बिजली,
    शत्रुचि लष्करे थिजली,
    मग कीर्तीरुप ती उरली,
    ती हिंदभूमीच्या पराक्रमाची
    इतिश्रीच झाली ।३।।

    मिळतील इथे शाहीर,
    लववितील माना वीर
    तरु, झरे ढाळतिल नीर
    या दगडा फुटतिल जिभा
    कथाया कथा सकळ काळी ।!४॥।

    रे हिंद बांधवा, थांब या स्थळी
    अश्रू दोन ढाळी
    ती पराक्रमाची ज्योत मावळे
    इथे झाशीवाली ।।५।।

      June 11, 2026


  • दुःख

    दुःख असे मानव निर्मित
    जाणती हे सगळे
    परि दुःखात शोक करिती
    हे कुणा न कळे ।।१।।

    आपण कर्म केलेले
    आपणचि भोगतो
    फळ कर्माचे आलेले
    तेच आपण चाखतो ।।२।।

    आहे तुजसी हे ज्ञान
    माहीत सर्वाना
    खंत द्यावी सोडून
    नको दाखवूं भावना ।।३।।

    इतरांसाठीं आहे
    ती भावना उदरीं
    सहानुभूती पाहे
    इतर जनांचे पदरी ।।४।।

    शोक भावना दाखवी
    तुझ्या दुःखाची
    नसतां तुज निर्दयी ठरवी
    हीच भीति जनाची ।।५।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    e-mail- bknagapurkar@gmail.com

    -- डॉ. भगवान केशवराव नागापूरकर

      March 10, 2014


  • कळेना कसे जडले रे मन (गीत)

    कळेना कसे जडले रे मन
    आज हरपले माझे रे भान।।धृ।।

    फुलात दिसतो,मनी हसतो
    क्षणात जीव उगाच
    फसतो
    मन अजुनही आहे रे सान
    आज हरपले माझे रे भान।।१।।

    घरात होतसे तुझाच भास
    दिलवरा श्वासात तुझी आस
    साद ऐकण्या आतुरले कान
    आज हरपले माझे रे भान।।२।।

    तळमळ वाढे उगाच जीवा
    हळहळ दाटे मनात प्रिया
    कंठात दाटूनी आले रे प्राण
    आज हरपले माझे रे भान।।२।।

    -- सौ.माणिक शुरजोशी
    नाशिक

      February 17, 2020


  • काठी म्हातारपणाची…..

    कष्ट करुनी अपार शिकवीतात
    मुलांना
    करुनी स्वप्नांचा चुराडा
    वाढवतात मुलांना
    बघतात ते स्वप्न मधुर
    मुलगा त्याच्या शिकवता॑ना
    किती शोभुन दिसेल मुलगा आपला
    मोठ्या खुर्चीवर बसतांना
    वाटतें त्यांना आधार मुलगा
    आपल्या म्हातारपणाची काठी
    मग हेच मुलं लावतात आपल्या
    आई वडिलांना वृद्धश्रमाच्या वाटी
    दुःखाच्या सागरात त्यांनां आठवतात ते क्षण
    यांच्याच साठी हिंडलो आपण वनवन
    अश्या विश्वास घातने तुटते त्यांचे मन
    दुःखाच्या ओझ्याने आता नकोसे झाले त्यांनां जीवन
    आर्त विनंती तुम्हा नका देऊ त्यांना त्रास
    तेच आहेत आपल्या जीवनाचा खरा भास
    द्या त्यांना प्रेम द्या त्यांना प्रेमाचा घास
    तृप्त करा त्यांचे प्रेमाने मन

    -- अॅड विशाखा समाधान बोरकर
    पातूर ता.पातूर जी अकोला

      June 21, 2019


  • शिक्षक

     

      September 2, 2013


  • समत्व बुद्धी

    एका टोंकावरती जातां, शांत न राही झोका तेथें
    विलंब न करता क्षणाचा, जायी दुजा टोका वरती,

    जीवनांतील झोके देखील, असेच सदैव फिरताती
    बऱ्या वाईटातील अंतर, नेहमी चालत असती

    समाधान ते मिळत नसे, जेव्हां बघता तुम्हीं भोग
    त्यांत देखील निराशा येते, मनीं ठरविता जेव्हां योग

    जवळपणाच्या नात्यामध्यें दुरत्वाचे अंकूर फूटते
    दूर असता कुणी तरी, जवळ करावे वाटते,

    संतूलन करूनी मनाचे, समत्व बुद्धी ठेवावी
    टोकावरती जाण्याची भूमिका, सदैव टाळीत रहावी,

    मध्य बिंदू तो साधतां, निवड न राही एकाची
    स्थिरत्व येईल जीवनाचे, टोके जातां सुख दु:खाची.

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      February 13, 2019


  • आज मन आनंदले

    आज मन आनंदले,
    सुखाच्याही पा--र गेले,
    भंवसागरी तरणे खासे,
    आता सोपे वाटले,--!!!

    दुनियादारी निभावणे,
    असते किती कठीण,
    तरीही तावून-सुलाखणे,
    सहजी कसे जमले,--!!!

    मनमोर थुई थुई नाचे,
    पदन्यासाची तऱ्हा वेगळी, डोळ्यातून दोन थेंब सुखाचे समस्यांची असून चलती,--!

    खंबीर,धीरगंभीर राहणे,
    तटस्थभूमिका निभावावी,
    येऊ देत वारे--वादळे,
    मात्र एक झुंज द्यावी,--!

    तुझ्यापेक्षा मी सरस,
    म्हणत त्यांन भिडावे,
    संकटांचे सतत घोर,
    जिवामुळी लावू न घ्यावे

    एक दत्तगुरु पाठीराखे,
    राहावे निर्धास्त लेकराने, गुरुमाऊलीच्या कुशीत सगळे,
    आपुले दुःख सांगावे,--!!!

    ते असतां मागे,
    त्यांची जाणीव ठेवावी,
    एक त्यांचे स्मरण,
    सारी दुनिया विसरावी,--!!!

    आनंदाच्याही डोही बुडावे,
    ओलेत्याने राहावे कोरडे,
    पाणी जाताना नाकी तोंडी,
    दत्तगुरूंनीच फक्त वाचवावे,--!!

    हिमगौरी कर्वे.©

      May 18, 2019


  • एक अजून साल

    घालून पोतडीत
    काळ उगा धावतो आहे
    किती राहिली किती गेली
    याचा हिशेब मांडतो आहे
    एक सोनेरी आशा
    उद्या म्हणून
    वेडा जीव सुखावतो आहे
    उद्या कधीही येत नसतो
    आज हाच रोज उगवतो आहे
    एकेक क्षण
    प्रत्येकाच्या सुखदुःखाचा
    सोबतीनं वाहतो आहे
    हो प्रवाही सरितेसारखा
    डबक्यात बेडके चिकार आहेत
    एकेक दिस असा
    जगून घे
    जसा आज हाच अंत आहे
    लेऊन तारुण्य सळसळते
    वय हा फक्त आकडा आहे!!
    वय हा फक्त आकडा आहे!!
    -- वर्षा कदम.

      March 8, 2022


  • उर्जा अर्पण

    करा सर्वस्व प्रभूसी अर्पण त्यांतच मिळेल समाधान
    जीवन अग्नी पेटत राही उर्जा निघे त्याचे ठायीं

    उर्जेचे होते रुपांतरण साधत असे कार्य त्यातून
    भावनेचा आविष्कार देई जीवना आकार

    व्यक्त करण्या भावना उर्जा लागे त्यांना
    एकाग्र करा मना सोडूनी सारी भावना

    एकाग्र चित्त हेच ध्यान प्रभू मिळण्याचे साधन
    सारी उर्जा ध्यानांत जाई तीच प्रभूसी अर्पण होई

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      January 3, 2017


  • ती आल्यावर

    ती आल्यावर

    बाग बहरली ,घेत उखाणे ती आल्यावर
    सुरू जाहले ,नवे तराणे ती आल्यावर

    मीच टाळतो,पितही नाही,पाजत नाही
    सरले सारे ,जुने बहाणे ती आल्यावर

    मुलगा गेला हातामधुनी माय सांगते
    चालू झाले हे गाऱ्हाणे ती आल्यावर

    पदरी पडले रत्न देखणे तिच्या सारखे
    घरही झाले असे शहाणे,ती आल्यावर

    किती जाळले सूर्याने मज ती नसताना
    नभात जमले मेघ दिवाणे ती आल्यावर

    मनात माझ्या गीत हरघडी नवे जन्मते
    सहज बोलणे,होते गाणे,ती आल्यावर

    ती आली अन सुचू लागली मला शायरी
    पंख लाभलेली उड्डाणे,ती आल्यावर

    © जयवंत वानखडे,कोरपना
    भ्रमणध्वनी ९८२३६४५६५५

      December 19, 2018