क्षण क्षणाने रंगुन गेला,?
क्षण क्षणात भंगुन गेला,?
क्षण क्षणांत रोम दाटले,?
क्षण क्षणांचे मोती झाले !?
क्षण क्षणांचे गुलाम झाले,?️
क्षण क्षणांत गुंतुन गेले,?
क्षण क्षणात चिंब न्हाले,?
क्षण क्षणांत क्षणिक झाले !?
क्षण क्षणात क्षणभंगुर झाले,✨
क्षण क्षणांस ओझे वाटले,?️
क्षण क्षणात स्मृती भासले,?
क्षण क्षणात वाहत गेले !?️
क्षणात हसले , क्षणात रडले,?
क्षणात रडूनी हासू उडवले,?
क्षण क्षणांत मुरून विरले,?
क्षणात क्षणांचे क्षितीज झाले !?
-- श्वेता संकपाळ.
२७-०६-२०१९
आत्मा-ईश्वर, या शब्दांचा, अर्थ होई आई |
त्या मायेचा, थांग न लागे, इतुकी गहराई ||१||
आईवाचुनी, नसे वेगळा, जगात परमेश्वर |
स्वर्ग आणि सूर्य-चंद्रही, त्यापुढती नश्वर ||२||
सोशी वेदना, झेली यातना, नसे तया गणती |
स्वतः जळुनी, प्रकाशणारी, ऐसी ती पणती ||३||
चिमणचोचिने भरवी बाळा, राही स्वतः उपाशी |
होईल याची, तुलना कैसी, सांगा बरे कुणाशी? ||४||
लिंबलोण ती, नित्य उतारी, निजबाळावरूनी |
कळी काळाला, यम् राजाला, लावी ती परतुनी ||५||
काळीज कातरणारा ऐसा, कारुण्याचा स्वर |
स्वरातुनी या, जणु हाकारी, आई रुपात ईश्वर ||६||
कमलकरांचा, करुनी पाळणा, जोजवी लडीवाळा |
तिला भासते, बाळ तिचा जणु, पंढरीचाच नीळा ||७||
उत्सव कां तो, एक दिनाचा, करे साजरा कुणी ?|
क्षण क्षण सारे, जरी वेचले, तरिही शक्ति उणी ||८ ||
जीवन अवघे जरी अर्पिले, आईच्या चरणाशी |
तरिहि पुर्तता, कधी न होई, ऐश्या आशिषराशी ||९ ||
© कवी : उपेंद्र चिंचोरे
८ मे २०१६
कविता-गझल
ते जातील उडूनी पंख फुटता पाहत राहशील, डोळे भरुनी
आजवरी जे प्रेम दिले तू शक्ती त्याची उरी बाळगुनी
माया, वेडी कशी असे बघ वाटते तुजला तुझीच पिले ती
हसून, खेळून बागड्तील सदैव तुझ्या पदारा खालती
जेंव्हा पडले पाउल पहिले आधाराविण तुझ्या अंगणी
नांदी होती दूर जाण्याची तुजपासुनी त्याच क्षणी
परी दूर दृष्टी ही नव्हती तुजला मायेचा तो पडदा असता
टिपून घेशी अश्रू आज ते परिस्थितीची जाणीव होता
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
कशासाठी जगतो आपण, विचार तुम्हीं करतां कां ?
मृत्यू येई तो जगावयाचे, हेच धोरण समजतां कां ?
खाणे – पिणें वंश वाढविणे, हेच जीवन असते कां ?
ऐष आरामी राहूनी तुम्ही, देहासाठी सारे, हे मानता का ?
पाठीं लागूनी धनाच्या त्या, बरोबर संपत्ती न्याल कां ?
पैसा मुलांसाठी ठेऊन ही, शिव्या त्यांच्या चुकवाल कां ?
सारे कळूनी वळत नसते, तत्व हे जाणून घ्याल कां ?
उपयोग करूनी ज्ञानाचा, जीवन चांगले कराल कां ?
सारे आहे प्रभूचे समजून, शांत चित्ताने जगाल कां ?
दया क्षमा शांती हे गुण, अंगी आपुल्या बाणाल कां ?
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
हाडे, मांस, रक्ताने,
शरीर बनविले छान,
सौंदर्य खुलते त्या देहाचे,
जर असेल तेथे प्राण ।।१।।
प्राण नसे कुणी दुजा हा,
परि आत्मा हेची अंग,
विश्वाचा जो चालक,
त्या परमात्म्याचा भाग ।।२।।
ईश्वरी सेवा, संकल्प मनीं,
प्रेमभरे देह भजावा,
अंतर बाह्य शुद्धता राखी,
समर्पणाचा भाव असावा ।।३।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
सासू : अगं अगं सूनबाई
सून : काय म्हणता सासूबाई?
सासू : माझा गाऊन तू, काय गं केला ?
सून : भांडीवाल्या बाईच्या मुलीला दिला.
सासू : अगं अगं सून बाई
सून : काय म्हणता सासूबाई?
सासू : माझं घड्याळ तू, पाहिलेस का गं ?
सून : चुन्याची डबी रोज जातं मागं.
सासू : अगं अगं सूनबाई
सून : काय म्हणता सासूबाई?
सासू : माझा विग तू, काय गं केला ?
सून : क्लबच्या नाटकात हिरॉईनला दिला.
पदार्थाचे गुण जाणता, एक गोष्ट दिसून येते,
सूक्ष्म भाग अणू असूनी, त्यांत सुप्त शक्ती असते...१,
या शक्तीची तीन रुपे, तीन टोकावर राही,
अधिक उणे नी सम, विद्युतमय प्रवाही....२,
हेच तत्त्व निसर्गाचे , तीन गुणांनी बनले,
उत्पत्ती लय स्थिती, यांनी सर्वत्र व्यापिले...३,
ब्रह्मा विष्णू महेश, प्रतिकात्मक ही रुपे
अणूरेणूच्या भागांत, समावताती स्वरूपे...४,
याच विद्युत शक्तीला, चेतना म्हणती कुणी,
अणूरेणूत लपलेली, ईश्वरमय गुणांनी...५
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
दिवस रात्र मम नयनी वसते
स्वप्नात येऊनी मला छळीते
सांग रमणी हे सांग मला ग
तुझे नी माझे हे कसले नाते ।
जरी न दिसशी मला कधी तू
सैरभैर मन हे होऊनि जाते
तुला पाहिल्यावर मन हे माझे
सांग का ग आनंदीत होते ।
असशी जरी दूरवर तू तेथे
मम हृदयी तुझेच रुप येथे
आहे खरोखरी किती मधूर
तुझे नी माझे हे प्रेमळ नाते ।
-- सुरेश काळे
मो. 9860307752
सातारा.
२१ आक्टोंबर २०१८
नाही कशी म्हणू,
पगार जास्त देते थांब,
परी माझे काम सोडून
जाऊ नको लांब.. !
नाही कशी म्हणू तुला,
तुझा काढते वीमा, फंड
पण विरोधात नको माझ्या
पुकारुस बंड.. !
नाही कशी म्हणू तुला,
T.V. पहा दूपारी,
परी आधी माझे काम आणि,
मग जा शेजारी.. !
नाही कशी म्हणू तुला,
वर्षाकाठी साडी,
परी सोसायटीमधल्या मला,
सांग भानगडी.. !
नाही कशी म्हणू तुला,
महिन्याला दोन घे 'सुट्ट्या'
पण अचानक दांडी मारुन
पाडू नकोस पिट्ट्या
माझा पाडू नकोस पिट्ट्या.. !
-- सौ. अलका वढावकर
जगण्या झाले कठीण क्षण, अन्यायाने सीमा गाठली ।
चक्र आहे दैव गतीचे, समजूत कुणीतरी मना घातली ।।
जीवन मार्ग सरळ असता, फेरे पडती नशीबाचे ।
अनेक वाटा दिसून येता, भटकणे मग होई जीवाचे ।।
विसरूनी जातो मार्ग आपला, तंद्रीमध्ये भटकत असता ।
बोलफूकाचे देत राही, नशीब दैव म्हणता म्हणता ।।
असंख्य वाटा अनेक ध्येये, मिळेल एकची विश्वासानी ।
नशीबाला परी दोष न देता, चालत राहा एकाग्रतेनी ।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Copyright © 2025 | Marathisrushti