एकाग्रतेने जगा

जगण्या झाले कठीण क्षण, अन्यायाने सीमा गाठली ।

चक्र आहे दैव गतीचे, समजूत कुणीतरी मना घातली ।।

जीवन मार्ग सरळ असता, फेरे पडती नशीबाचे ।

अनेक वाटा दिसून येता, भटकणे मग होई जीवाचे ।।

विसरूनी जातो मार्ग आपला, तंद्रीमध्ये भटकत असता ।

बोलफूकाचे देत राही, नशीब दैव म्हणता म्हणता ।।

असंख्य वाटा अनेक ध्येये, मिळेल एकची विश्वासानी ।

नशीबाला परी दोष न देता, चालत राहा एकाग्रतेनी ।।

-- डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com



जगण्या झाले कठीण क्षण, अन्यायाने सीमा गाठली ।

चक्र आहे दैव गतीचे, समजूत कुणीतरी मना घातली ।।

जीवन मार्ग सरळ असता, फेरे पडती नशीबाचे ।

अनेक वाटा दिसून येता, भटकणे मग होई जीवाचे ।।

विसरूनी जातो मार्ग आपला, तंद्रीमध्ये भटकत असता ।

बोलफूकाचे देत राही, नशीब दैव म्हणता म्हणता ।।

असंख्य वाटा अनेक ध्येये, मिळेल एकची विश्वासानी ।

नशीबाला परी दोष न देता, चालत राहा एकाग्रतेनी ।।

— डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

Author