(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • काव्यानुभव

    फळ आज हे मधूर भासते, तपोबलातील अर्क असे,
    कष्ट सोसले शरिर मनानें, चीज त्याचे झाले दिसे ।।१।।

    बसत होतो सांज सकाळी, व्यवसाय करण्या नियमाने,
    यश ना पडले पदरी. पाठ फिरविली नशीबाने ।।२।।

    निराश मन सदैव राहूनी, मनीं भावना लहरी उठती,
    शब्दांना आकार देवूनी, लेखणी मधूनी वाहू लागती ।।३।।

    लिहिता असता भाव बदलले, त्यात गुरफटलो पुरता,
    छंद लागूनी नशाच चढली, जीवनामधील रंग बघता ।।४।।

    त्या रंगाच्या छटा उमटल्या, फुला फुलातूनी दिसूनी येती,
    सप्त रंगाचे मिलन दिसले, आकाशाच्या क्षीतीजावरती ।।५।।

    काव्यावरती जगेल कोण, हवी भाकरी जगण्यासाठी,
    मानहानी ती सदैव होई, केवळ अल्पशा पैशापोटी ।।६।।

    मदत कुणाची मिळत होती, आला दिवस जाई निघूनी,
    काव्यातील आनंदात , डुबता सारे विसरूनी ।।७।।

    विवंचना आणि सुख दु:खे, बनली होती स्फूर्ती देवता,
    अनुभवले जे जे आजवरी, चित्रीत झाले बनूनी कविता ।।८।।

    अनुभव होता तनामनाचा, म्हणूनी भासले सत्य काव्य ते,
    उचलून घेतले जनसामान्यांनी, मनास त्यांच्या पटले होते ।।९।।

    लपली असती कला एक ती, सर्व जणांच्या अंतरंगी,
    परिस्थितीशी झगडा देऊनी, बाहेर आणती कुणी प्रसंगी ।।१०।।

    गेलो विसरूनी उदास दिन , आज उमटले चित्र निराळे,
    सरस्वती नि लक्ष्मी दोघी, आशीर्वाद त्यांचा मिळ ।।११।।

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      June 19, 2016


  • किती पाहुणे उडून येती

    किती पाहुणे उडून येती,
    या देशातून त्या देशात,
    स्थलांतर त्यांचे असे पाहुनी,
    चकित होतो आपण मनात,--!!

    हजारोंची संख्या त्यांची,
    एकरंगी नि एकढंगी,
    सारखेच सगळे दिसती,
    सारख्याच त्यांच्या ढबी,--!!!

    आभाळातून उडताना,
    बहुतेकांना ना थकवा,
    हे पाहुणे असती वेगळे,--
    वेळेवरती-- आपुल्या गावा,--!!!

    आगळेपण त्यांचे उठून दिसे,--!!!
    किती पिढ्या गेल्या तरी,
    हजारो वर्षे येती ते,
    दरवर्षी परिपाठ असे,--
    मार्ग त्यांना कसे सापडती,
    कोण दिशादर्शक म्हणे,? --!!!

    कोण त्यांना घड्याळ दाखवी,
    नि कोण त्यांचे मार्गदर्शक,
    ऋतू त्यांना कसे समजती,
    कसे ठेवती दिवसांचा हिशोब,--?

    सामान कुठले ना बरोबर,
    ना कुठले साहित्य सवे, आत्मविश्वास केवळ घेऊन ,
    प्रवास आपुला करती बरवे,--!!!

    हिमगौरी कर्वे.©

      June 19, 2019


  • खेळ केवढा चाललेला

    खेळ केवढा चाललेला,
    या दुनियेच्या पटावरती,
    पर्याय नसे सोंगट्यांना,
    कळसूत्री बाहुल्या हलती,--!!!

    जेजे घडे, मागे त्या,
    कर्ता करविता असतो कोणी, दिसत नाही आपल्या डोळ्यांना, जाणिवे नेणिवेच्या पल्याडही,--!

    कोण घडवी सगळ्या घटना,
    मदत करी अडल्या प्रसंगी,
    असंख्य रूपे तुझी देवा,
    दिसती आम्हा समयी समयी,--!!!

    करुणा शांती क्षमा, प्रेम, दया,
    भावनांचे किती प्रकार असती, सिद्ध करत आपुला देवपणा,
    देवमाणसे तत्परता दाखवती,-!

    माया, ममता,आपुलकी,जिव्हाळा,
    सद्भावना ना मरते कधी,
    वाहे झरा माणुसकीचा,
    तूच नांदतशी त्यांच्या हृदयी,--!!!

    कठोर, क्रूर, निर्घृण, भयंकरा,
    मात देण्या प्रवृत्त करशी,
    भयानक, भीषण, भयावह प्रसंगा, चीत करण्या मार्ग दाखवशी,--!!

    छळती मानवा यातना वेदना,
    संहार त्यांचा करावया पाही,
    अशा संकटांचा सामना करण्या,
    हे ईश्वरा तूच बळ देई,--!!!

    नको कुठली सुखे अनंता,
    पाखर सतत तुमची रहावी,
    दुसरे काही मागणे ना, नाअपेक्षा दुसरी काही,--!!!

    © हिमगौरी कर्वे.

      October 12, 2019


  • गरज आहे, एकत्र येऊन खच्चून बोंब ठोकण्याची!

    अनेक ठिकाणी किंवा प्रत्येक ठिकाणी शेवटी शेतकरीच नागविला जातो. त्याला कारण शेतकर्‍यांमध्ये एकी नाही, दूरदृष्टी नाही, हिंमत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बोंबा मारण्याची शक्ती नाही. सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सरकारविरुद्ध एल्गार पुकारला तर सरकारला शेवटी झुकावेच लागेल. उत्तरप्रदेशातील शेतकर्‍यांनी केंद्र सरकारला भूसंपादनचा नवा कायदा तयार करण्यास भाग पाडले ते आपल्या संघटीत आंदोलनाच्या जोरावरच; किमान त्यापासून तरी इकडच्या शेतकर्‍यांनी धडा घ्यावा!

      September 11, 2011


  • मयुरा तूं आहेस गुरु

    मयुरा तूं आहेस गुरु, तुला आम्हीं वंदन करु ।।धृ।।

    नदी कांठच्या वनीं,
    थुई थुई नाचूनी,
    पिसारा फुलवुनी,
    तुझे पाहूनी नृत्य, ताल धरु
    मयुरा तूं आहेस गुरु तुला आम्हीं वंदन करु ।।१।।

    मोरपिसे सुंदर,
    रंग बहारदार,
    दिसे चमकदार,
    बघुनी रंगाची विविधता, कुंचल्यांनी सप्तरंगी छटा भरुं,
    मयुरा तूं आहेस गुरु तुला आम्हीं वंदन करु ।।२।।

    रुप डौलदार,
    चाल ऐटदार,
    भासे रुबाबदार,
    बघुनी तुझा आनंद, सुखी जीवनाची कला अंगीकारुं,
    मयुरा तूं आहेस गुरु तुला आम्हीं वंदन करु ।।३।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      December 25, 2015


  • प्रभू मिळण्याचे साधन

    ध्येय मिळण्या तुमचे योग्य लागते साधन

    कष्ट होतील व्यर्थचे चूक मार्ग अनुसरुन ।।

    अंतराळातील शोध महान बुद्धीचे प्रतीक

    घेण्या अचूक वेध अवकाशयान असे एक ।।

    अनंत दूरचे तारे न दिसती डोळ्यानी

    दुर्बिणीच्या नजरें बघती सर्व कौतूकानी ।।

    सूक्ष्म जंतूंचे अवलोकन, चक्षु घेण्या असमर्थ

    त्याचे मिळण्या ज्ञान लागते सूक्ष्मदर्शक यंत्र ।।

    यंत्र असे साधन जाणण्या कांहीं गोष्टी

    इंद्रियाना मर्यादा असून न बघे सारी सृष्टी ।।

    तसेंच आहे प्रभूचे जाणण्या त्याचे आस्तित्व

    साधन पाहिजे तपाचे देऊनी परीक्षा सत्व ।।

    दया क्षमा शांति ठरे श्रेष्ठ गुण

    सत्य तप भक्ती, प्रभू मिळण्याचे साधन ।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      June 21, 2020


  • गावाकडची खाद्य संस्कृती

    आजकाल प्रत्येक गृहिनीला संध्याकाळी कोणती भाजी करावी. किंवा कोणता स्वयंपाक करावा हा मोठा प्रश्न असतो.शहरात तर सुट्टी असेल तर सर्रास लोक ढाब्यावर जेवायला जातात. त्यात मीही एक.

    ढाब्यावर जायला नकोच वाटते.त्याच त्या पनीरच्या भाज्या?? कोल्हापुरी व्हेज,व्हेज तिरंगा,स्टार्टरला पनीर चिल्ली,सोयाबीन चिल्ली,मसाला पापड. ... . नुसता विचार जरी आला तरी असलेली भुक निघुन जाते.परंतु घराच्या किंवा मित्रांच्या आग्रहामूळे जावेच लागते.

    पूर्वी लोकांना खायला नीट मिळत नव्हते.आणि आता सुग्रास ? भोजन असूनही भुक लागत नाही.

    एकदा असाच निवांत बसलो असता लहानपनाच्या अनेक आठवणी डोळ्या समोरून तरळून गेल्या.

    मला आठवतंय ग्रामीण भाग तेव्हा स्वयंपूर्ण होता.आमच्या कडे भाताची व नाचणीची लावणी झाल्यावर लोक बऱ्या पैकी निवांत असायचे. गणपती मध्ये पाऊस बऱ्यापैकी कमी झालेला असायचा.माझा नाना व इतर गावातील लोक मुरमाड असलेली किंवा डोंगर उतारावरील जमीन नांगरून त्यामध्ये हूलगे पेरत असत.कुणी उडीद,खुरासनी (काळे तीळ),भुईमुग पेरत असत. तर भात निघाल्यावर हरभरा,वाटाणा,मसूर,गहू पेरत असत.त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याकडे भाता बरोबरच भरपूर कडधान्ये होत असे.

    गावाकडे हूलग्याच्या पिठापासून शेंगोळी सर्रास बनवली जात असत.माझी आई परातीच्या बूडावर खुप छान शेंगोळीचे वेढे बनवत असे.शेंगोळीच्या वेढ्याचे झणझणीत कालवण,भाकरी व कांदा ही एक वेगळीच फर्माईश असे.शेंगोळयाचा रस्सा भाताबरोबरही तितकाच चविष्ट लागत असे.दोन घास सरस अन्न पोटात जात असे.

    हूलग्याचे कढाण (वरण) नुसते मीठ टाकून देखील छान चव लागायची.

    अजून एक चविष्ट पदार्थ गावाकडे हमखास असायचा.तो म्हणजे हरबरा डाळ भिजत घालायची.नंतर पाट्यावर सरभरीत वाटायची.तव्यावर त्याचे छोटे छोटे सांडगे थोड्या तेलात परतायचे. नंतर त्याचे कालवण (रस्सा) बनवायचे.खूपच अप्रतिम चव असायची.

    शेतातील कामासाठी जर माणसे असतील तर दुपारच्या जेवणाची मोठी लगबग असायची.मसूराची झणझणीत घट्ट आमटी,नाचणी किंवा तांदळाच्या भाकरी,गावाकडील बनवलेले पापड,कांदा आणि खडक्या किंवा रायभोग तांदळाचा भात हे जेवण मोठ्या पाटीतून शेतातील झाडाखाली आणले जाई.

    लोक काम थांबवून ओढ्यात हातपाय धुऊन झाडाच्या थंडगार सवलीत पंगती करुन बसत असत.पितळीमध्ये भरपूर आमटी वाढली जाई.सोबतीला कांदा,लसणाची चटणी,पापड असे.लोक आमटीत भाकरी चुरुन खात असत.शेतात झाडाच्या सावलीला पंगतीत जेवण्याची मजा काही औरच असायची.

    त्या काळी गरिबी असल्यामूळे अनेक महिला घरात अगदीच काही नसल्यास नुसत्या कांद्याचे (कांदवणी) कालवण करत असत. काही लोक मुद्दाम घरधनीनला आठवण करुन देत असत.आज कांदवणी कर बरका !.कांदा चिरायचा. तो तेलात तळायचा. त्यात मीठ मसाला घालायचा. पाणी घालायचे दोन उकळ्या आल्यावर कालवण तयार.तर मला हे कांदवणी खूपच आवडायचे.

    हरबरे भिजत घालून ते भिजले की तव्यावर मीठ घालून परतायचे. चांगले खरपूस भाजायचे. हे भाजलेले हरबरे खाताना खुप चविष्ट लागायचे. खाक्या चड्डीच्या खिश्यात हारबरे भरून मी चवीचवीने हारबरे खात असे.

    हे हरबरे खाता खाता मोठ्या माणसांच्या गप्पांच्या मैफली रंगत. त्यात रात्री भुतांच्या गप्पा ऐकताना मी भेदरुन जात असे. तरीही भुतांच्या गप्पा संपूच नयेत असे वाटे.

    गावी रात्री आम्ही खेकडे पकडायला जात असू.नदीच्या किंवा ओढ्याच्या भल्या भल्या काळ्या खेकडी आम्ही आणत असू. काही खेकडाच्या कुड्या व नांगोडे तव्यात मिठाच्या पाण्यात शिजवून आम्ही सर्वजण त्यावर ताव मारत असू.ह्या कुड्या नांगोड्याची अप्रतिम चव अद्यापही जशीच्या तशी आहे.

    नागपंचमीला महिला वरईच्या पीठाचे गुळाचे पाणी घालून लाडू करत. हे लाडू सुध्दा खुप चविष्ट लागत असत.

    सर्वात आवडता पदार्थ कोणता असेल तर तो म्हणजे पेजवळया. (घावने) तांदूळ भिजवून सावलीत वाळत घालायचे.नंतर ते जात्यावर दळायचे.पेजवळ्या करण्यासाठी एक खास लोखंडी भांडे असायचे त्याला कहाल म्हणत असत. या कहाली मध्ये पेजवळ्या बनवल्या जाई. मटणाचा रस्सा बोंबील किंवा वाकटीचे कालवण पेजवळ्यां बरोबर खूपच छान लागत असे. काही लोक गुळवण्या बरोबर पेजवळ्या खात असत.

    गावाकडे त्याकाळी अनेक देवलशी असत.कुणावरूंन तरी बकरे कोंबड्या ठरलेल्या असत. शिवाय लोक देवाला,शेतात किंवा रानात दरवर्षी कोंबड्या,बकरे कापत असत. रात्री बेरात्री आम्ही त्याठिकाणी जात असू.

    भगताच्या अंगातील देव लोकाना सूचना देत असे. त्याप्रमाणे उतारा ठेवला जाई. पोटात भुकेचा डोंब उसळे. कधी एकदा जेवतोय असे होई. सर्व आटोपल्यावर पंगती बसत.त्या भयाण अंधाऱ्या रात्री नीरव शांततेत आम्ही मटणाचा रस्सा भरपूर मटनासह भाताबरोबर खात असू.काय सांगू? या रानातल्या रश्शाची चव काही औरच असायची.

    गावाला सगळ्याकडे बोंबील,वाकट,सुकट,ढोमेली व खारामासा हे सर्रासअसायचे. दर आठवडयाला काही बाया हे सर्व विकायला घेऊन येत असत. हे सर्व भातावर खरेदी केले जाई.

    बोंबलाची चटणी खुपच टेस्टी असायची.आम्ही बोंबलाचे तुकडे चुलीतल्या आहारात भाजून खात असू.शिवाय तव्यावर तळलेला खारामासा भाकरी बरोबर खाताना वेगळीच चव रेंगाळत असायची.

    लसणाची चटणी हा एक फेवरेट atam असायचा. लसणाच्या पाकळ्या व लाल मिरची व मीठ पाट्यावर बारीक वाटून ते मिश्रण अगदी थोड्याशा तेलात तव्यावर तळायचे. झाली लसणाची चटणी तयार.खूपच छान चव होती.

    गावात लग्न किंवा पूजा असेल तर आमटी भात व जोडीला शाकभाजी असायची. गावठी हारबरे,वाटणे,बटाट्याच्या फोडी इत्यादी पासून बनवलेली शाकभाजी आमटी भाताबरोबर छानच लागायची.

    तव्यावर केलेली डाळीच्या पिठाची वाटोळी भाजी तांदळाच्या भाकरी बरोबर खाताना वेगळीच मजा यायची.

    उखळ।त काळे तीळ,लाल मिरची व मीठ कुटून बनवलेली कोंड तोंडी लावण्यासाठी छानच असायची.

    तव्यावर केलेले मोकळं (सुक्क) बेसन हा एक अप्रतिम चवीचा पदार्थ असायचा.

    उकडलेल्या अंड्यांचे कालवण सुध्दा beshच असायचे.

    पूर्वी दुपार नंतर कातकरनी नदीचे मासे गावात विकायला घेऊन यायच्या. छोट्या पानावर वाटा असायचा. त्यावर नदीचे छोटे छोटे (चिंगळया) मासे असायचे. हे मासे तव्यावर बनवले जात असत. या माशांची चटणी भाकरी बरोबर छानच लागत असे.

    हळद मीठ लाऊन मडक्यात मुरत ठेवलेल्या कैऱ्या भाकरी बरोबर खाण्यात वेगळीच खुमारी होती.

    गावाला अनेक भाज्या केल्या जात असत.कौदरीच्या सोंडग्याची भाजी,भोकरीच्या कोवळ्या पानांची मुटकी,कुर्डूची भाजी,वाळवलेल्या भोकराची भाजी,चिलुची भाजी,सायरीच्या फुलांची भाजी,ते-याची भाजी,चैताची भाजी अशा अनेक रानभाज्याची चव छानच असायची.

    गावात लहान मुलाचे नाव ठेवायच्या वेळी किंवा वीर (देव) नाचवायच्या वेळी मीठ घालून उकडलेले गहू सुध्दा छानच चवदार लागायचे.

    पूर्वी लोक घराच्या पाठीमागे भाज्या लावत.अळू,डांगर भोपळा,दोडका,कारली,घोषाळी,काकडी यांचे बी पेरत.यापैकी कोवळया काकडीचे कळे खायची मजा औरच असायची.शिवाय भोपाळघारी,भोकाचे वडे,काकडीचा गर तांदळाच्या पिठात गुळ कालऊन हाळदीच्या पानात बनवलेले पातोळे खुपच छान असायचे.

    फास्ट फूडच्या जमान्यात मात्र हे सर्व पदार्थ नामशेष झाले किंवा होत आहेत.त्यामुळे मात्र हार्ड,रक्तदाब,बद्धकोष्ठ,शुगर अपचन वेगवेगळे पोटाचे आजार मात्र ओढऊन घेत आहोत. कळतंय पण वळत नाही.असेच म्हणावे लागेल.

    श्री.रामदास तळपे मंदोशी

      July 27, 2024


  • सूर

    तु ऐकतेस तो नवा सूर आहे..
    जवळचा भासतो तरी दूर आहे..

    वेगाने वाहते पाणी आताच सारे
    म्हणून साचलेला जणू पूर आहे...

    नव्यानेच वाचले पान हे जगाचे
    जगण्याची कसब येथे जरुर आहे..

    जळणे संपत नाही दिवस रात्रीचे
    धुमसला कोठून मग असा धूर आहे..

    जखमांची खोल काळजात उरते
    वेदनांचा हिशोब मात्र पुरेपूर आहे..

    थकशील जेव्हा लढताना एकट्याने
    तुझ्या शिवाय सांग कोण शूर आहे

    प्रतिभा चौगले यांच्या प्रतिभास या कवितासंग्रहाच्या इ-पुस्तकातील ही कविता.
    हे इ-पुस्तक आपण खालील लिंकवर खरेदी करु शकता.

    किंमत : रु.८०/-
    सवलत किंमत : रु.५०/-

    https://marathibooks.com/books/pratibhas-by-pratibha-chougale/

      June 28, 2026


  • दिव्य शक्ति

    व्याकूळ झाला जीव प्रभू तुझ्या दर्शना
    अर्पितो मी भाव तुझीया चरणा //१//

    तेजांत लपले तुझे दिव्य स्वरुप
    नयना न जमले टिपण्या ते रुप //२//

    निनादाच्या स्वरी तुच आहेस संगीत
    कर्ण अवलोकन न करी ऐकण्या तुझे गीत //३//

    पुष्पातील सुवास तुंच आहेस सुगंध
    न येई घ्राणेद्रियास ओळखता तो आनंद //४//

    मधुर रसाची फळे सर्वात तु बसलास
    जिव्हेला मात्र न कळे तुझा सहवास //५//

    स्पर्शांत आहेस तूं माझ्या अवती भवती
    समज न येई परंतु तुझी अस्तित्व शक्ति //६//

    इंद्रिये असमर्थ असूनी न शोधती तुला
    ये मानव रुप घेऊन दर्शन देई मजला //७//

    अथवा दे मजलागी अपूर्व दिव्य शक्ति
    समरस व्हावे तुझ्यांत हिच माझी विनंती //८//

    डॉ. भगवान नागापूरकर
    9004079850
    bknagapurkar@gmail.com

    -- डॉ. भगवान नागापूरकर

      April 5, 2014


  • नाहीं विसरलो देवा

    नाहीं रे मी विसरलो देवा तुजलो
    संसारात अडकलो, वेळ ना मिळाला ।।१।।

    तूंच गुंतविले, लक्ष्य मोहांत
    चित्त देण्या सांगितले, तुझ्याच खेळांत ।।२।।

    तुलाची हवे यश, तुझ्या खेळांतले
    माझ्या कौशल्यास, तूं मार्गदर्शन केले ।।३।।

    तुझ्याच साठीं, गुंतविले मन
    बनोनी सोंगटी, फिरे पटावरी ।।४।।

    काय दोष माझा, न दिले लक्ष्य मी
    खेळवण्यातील मजा, आलो तिला कामीं ।।५।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    e-mail- bknagapurkar@gmail.com

      November 30, 2014