कोण लागतात माझे, नाते ते ठावूक नाहीं
देऊनी जातात मात्र, बरेच मजला काहीं....१,
विठ्ठल- रामाचा नाद, गुंजन करितो येथें
पवित्र वातावरण, येण्यानी होवून जाते....२,
देवण घेवण आत्म्याची, आपसामध्यें चालती
शब्द फुलांची गुंफण, त्वरीत होऊन जाती....३,
फूले देऊनी मजला, हार गुफूंन घेतात
दोघे मिळूनी तो हार, प्रभूस अर्पूं सांगतात....४
अदृश्य असले नाते, असावे दोघांमध्ये
भाषा आत्म्याची जाणतां, मन नाचते आनंदे....५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
मी प्रेमात पडलो
की फक्त कविता लिहतो
पप्रेमाच्या नशेत...
नशा उतरल्यावर
तिच्या प्रेमाची
त्या एकदा वाचून बघतो...
तेव्हा मला कळत
मी नशेतही
बराच शुद्धीत असतो...
माझा प्रेमभंग
झाल्यावरही
मी फक्त कविताच लिहतो...
पण तेव्हा मी
पूर्ण शुद्धीत असतो...
माझ्या कविता
सतत वाचणाऱ्यानां
माझं प्रेमात पडणं
कधीच कळत नाही
पण माझा प्रेमभंग
मात्र लगेच कळतो...
माझ्या कविता
तिला कळतात
पण वळत नाहीत
म्हणून मी लिहतो...
ती कवितेत
भिजत राहते
मी कवितांचा पाऊस
पाडत राहतो...
कवी - निलेश बामणे ( बी डी एन )
ईश्वर आहे नामांत परि, नाम कुणाचे घेता?
विठ्ठल हरि पांडूरंग वा अल्ला येशू असतां ।।
असंख्य त्याची नामे असतां एकच आहे भगवान ।
कांहीही म्हणता येईल तो, त्याची करीतां आठवण ।।
आठवणीतच तो लपला आहे, दिसत नाही कुणा ।
रुप कुठलेही स्मरा, दिसेल तुमच्या नयना ।।
रंग रूप आणि आकार देणे, असते सोई साठी ।
एकाग्र करण्या चंचल चित्ता, सारे कामी येती ।।
निर्गुण निराकार भासतो, एकाग्र होता चित्त ।
नाम मार्ग हे लय आणूनी, हेच असते साधीत ।।
डॉ. भगवान नागापूरकर
एखाद्या प्रॉडक्टला संपवायचं असेल तर त्याच्या पेक्षा भारी प्रॉडक्ट बनवून संपवता येतं, बहिष्काराने नाही.
रामरक्षेची जागा आता Android ने घेतली,
त्या नादातच आजकालची कार्टी ऊशिरा झोपली....
माहीत नाही सीता कोण,भगवदगीता कोण,
मात्र प्रत्येक हातात Latest आय फोन....
पुस्तकाची PDF झाली,
रोज वेगळा BF
अन रोज नवी GF आली...
प्रगती होतेय सांगत
घडणारी / बिघडणारी
नवीन Online पीढ़ी आली...
अंगठे दुखतायत आता Type करून
मानसं भेटतायतं आता Skype वरुन...
पाहुण्यांना भेटणं,पत्र लीहिणं जुनं झालं आता,
काका,Plzz ज़रा तुमचा Email ID देता...
मॉर्निंग Walk कधीचाच बंद झालाय,
Android Market मध्ये Temple Run जो आलाय...
व्हर्चुअल जमान्यात लांबचे सगळे झाले 'Connected',
पण शेजारधर्म '. Totally Disconnected'...
आई वडिलांचे संस्कार सुद्धा Download केले जातील आता,
'देव देव' काय करता,पूजा करायचं पण App आलाय आता....
या 'Technology' मागे पळता पळता,
लोकांनी पळणंच बंद केलय आता....
विसरले सारे चव आईच्या भाजीची,
शुर गाथा शिवाजीची,
साथ पसरलीय सावध रहा
Latest आलेल्या 'Technology' ची...
तुळशी" ची जागा आता "Money Plant" ने
घेतलीय...!!
"काकी" ची जागा आता Aunt ने घेतलीय...!!
वडील जिवंतपणिचं"डैड" झाले,
अजुन बरचं काही आहे
आणि तुम्ही आत्ताचं Glad झाले....??
भाऊ "Bro" झाला आणि बहीण "Sis"...!!
दिवसभर मुलगा CHATTING चं करत,
नाही तर रात्री झोपताना Mobile वर SETTING पण करतो...!!
दुध पाजणारी आई जिवंतपणीचं "Mummy"
झाली...!!
घरची भाकरं आता कशी आवडणार हो... ५ रु. ची Maggi
आता किती"Yummy" झाली...!!
माझा मराठी माणूसच मराठी ला विसरू लागलाय....
बघा जमल्यास विचार करुन शेअर करा व
आपली संस्कृती.लोप पावण्यापुर्वी ती जपण्याचा प्रयत्न
करा ...!!!!!!!!!
फेसबुकवरुन फिरणारी ही कविता.. कवी अज्ञात..
प्रेषक - विनय साटम
वळून बघतां गतकाळाला, चकीत झाले मन ।
घटना घडल्या जीवनामध्यें, राही त्यांची आठवण ।।
चालत असतां पाऊल वाट, जीवन रेषे वरची ।
स्वप्न रंगवी मनांत तेंव्हा, भावी आयुष्याची ।।
परिस्थितीच्या भोवऱ्यामध्यें, पुरता गुरफटलो ।
फिरणाऱ्या त्या वर्तुळातूनी, बाहेर येवूं न शकलो ।।
कल्पिले होते नियतीनें, तेच घडविले तिनें ।
भंग पावले स्वप्नचि सारे, तिच्याच लहरीनें ।।
असेच घडते जीवनीं सदा, अघटीत-अवचित ।
समजूनी त्यासी ईश्वरी इच्छा, स्वीकारी आनंदात ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
मजला नव्हते ज्ञान कशाचे,
पद्यामधल्या काव्य रसाचे ।
कोठून येते सारी शक्ती,
काव्य रचना करूनी जाती ।।१।।
अवचितपणे विचार येतो,
भावनेशी सांगड घालीतो ।
शब्दांचे बंधन पडूनी,
पद्यरूप जातो देऊनी ।।२।।
सतत वाटते शंका मनी,
हे न माझे, परि येई कोठूनी ।
असेल कुणी महान विभूती,
माझे कडूनी करवून घेती ।।३।।
तळमळ आता एक लागली,
जाणून घ्यावी शक्ती आगळी ।
अर्पीन माझे प्राण त्याला,
स्फूर्ती देवता जो मज झाला ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
“सुमनांजली” या काव्यसंग्रहातून…
अनभिज्ञ बिकट वाटा
अगतिक जिद्दी पाऊले
ध्येय खंबीर वाटसरूंचे
अथक नित्यची चालले
वळणेही, वेडी वाकडी
अंदाज, सारेच आंधळे
साथ अनामिक वाटाडा
हातात हात धरुनी चाले
साक्षी,स्पर्श त्याचे ग्वाही
निःशंक! जगती चालले
चराचरी न कुणीही एकटे
रूप श्रीचे सोबती चालले
हेच अतर्क्य, अगम्य सारे
सुखनैव! चिरंजीव राहिले
-- वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. ३६.
५ - २ - २०२२.
Copyright © 2025 | Marathisrushti