एक होता कप
एक होती बशी
दोघांची जमली गट्टी खाशी
पांढरा शुभ्र त्यांचा
रंग चमकदार
त्यावर नाजूक फुलांची
नक्षी झोकदार
दिसायचे ऐटदार
आणि आकार डौलदार
सकाळ-संध्याकाळ
गोड किणकिण चालायची फार
कपाने ओतायचा
बशीत चहा सुगंधी
तिने हळूहळू प्यायची
साधायची संधी
एक दिवशी फुटली बशी
झाले तिचे तुकडे
कपाचा ही कान तुटला गेले त्याचे रुपडे
बशीचे तुकडे
दिले फेकून
कपाला ही दिले
अडगळीत भिरकावून
एक दिवस आले
एक पाहुणे
त्यांना दाढीसाठी हवे
गरम पाणी म्हणे
अडगळीतून काढला का
दिले त्यात पाणी भरून
पाहुण्याने केली दाढी घोटून
आरशात पाहिले रूप न्याहाळून
कपाचे जिणे झाले केविलवाणे
कुठे सुगंधी चहा कुठे हे लाजिरवाणी जिणे?
-- विनायक अत्रे.
मज अजुन नाही कळले
मी तुझ्यात कसा गुंतलो
ज्या क्षणी तुज पाहिले
मी तुझ्यात हरवुन गेलो
न कधीच व्यक्त जाहलो
तुजला निरखित राहिलो
तुही मनीचे जाणले होते
मी मनांत समजूनी गेलो
घायाळ, होताच कटाक्षी
तव काळजात विरघळलो
जे घडले ते ते घडूनी गेले
स्मृतींना उलगडित राहिलो
रुतला अंतरी तव अबोला
मी मना समजवित राहिलो
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र.२२८
७/९/ २०२२
देह मनातील, तफावत दिसून येते ।
चंचल असूनी मन सदैव, शरीर परि बदलत राहते...१,
चैतन्ययुक्त मन सदा, स्थिर न राहते केव्हांही ।
जन्मापासूनी मृत्यूपर्यंत भाग दौड ती चालत राही...२,
परिस्थितीच्या चौकटीमध्यें, विचारांचा दबाव राहतो ।
शरीराच्या सुदृढपणाचा, मनावरती परिणाम होतो...३,
दिसून येते केव्हां केव्हां, मन अतिशय उत्साही ।
परि शरीराचा अशक्तपणा, मनास त्याक्षणी साथ न देई....४
विचित्र होते वातावरण ते, जेव्हां मनास साथ ना मिळे ।
विचारांच्या चुका होऊनी, दु:खी होते जीवन सगळे...५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
अरे, एव्हाना ती यायला हवी होती !
अजून कशी उगवली नाही ती गवताची पाती !
ती आल्यावर प्रार्थनेचे सुर उमटतात.
आसमंत उजळून निघतो, लता वेली डोलू लागतात.
सुरू होते पूजा अर्चना
आणि सरस्वतीची आराधना.
मध्येच पोटात कावळ्यांचा कलकलाट.
खाऊ झालाच समजा सफाचाट.
कधी कधी ऐकू येतो गलका.
माझ्या कानांना मस्त बसतो दणका.
थोड्या वेळाने परतायची वेळ होते.
आमचं मन खट्टू होते.
मी पुन्हा एकदा नव्याने उजळणी करते.
आणखी एक आवर्तन पूर्ण होते.
उद्याच्या पुनर्भेटीचा संकल्प ठरतो
आणि सुर्य पश्चिमेला मावळतो.
पण आता सगळं सुनसान आहे.
सर्वत्र स्मशानकळा आली आहे.
सगळीकडे जमली आहेत कोळीष्टके.
सगळे आयत, चौरस झाले आहेत ओकेबोके.
इकडे आणि तिकडे जमले आहेत धुळीचे थर.
माणसाचा कुठे उरला आहे इकडे वावर.
त्यामुळेच मनात काहूर उठलंय
की ती आता कधीच येणार नाहीत की काय ?
कधीची उभी आहे मी निष्पर्ण वृक्षासारखी.
मी एकटी, मी एकाकी.
प्रत्येक गावा गावातील शाळा.
प्रत्येक शहरा शहरातील शाळा.
-- शरद दिवेकर
कल्याण
70457 30570
मी जगतोच, तसा एकांती
आभाळ मनाचे येते भरुनी
झरती निष्पाप भाव अंतरी
अतरंग भक्तीत जाते दंगुनी
अस्ताचली, भावरंग केशरी
त्यावरी कृष्णछाया सांत्वनी
जणु भासते समोर सावळा
कृतार्थी तृप्तता या लोचनी
झुळझुळते माय गंगायमुना
पावन तुषारी जातो भिजूनी
एकांती प्रहर सारे आत्मरंगी
कृपावंता स्मरत राहू जीवनी
-- वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. ८४.
१७ - ३ - २०२२.
घर -दार
ऑफिस- बिफीस
पोरं-सोरं
लोकल -बिकल
रीक्षा -बिक्षा
रोज दिवसभर
जा- ये
पुन्हा
तसंच
ये -जा
लोकल- बिकल
परत -फिरत
घर -बार
जेवण- खावण
जीवन -बिवन
चालत राहतं
वेळ कुठे
कविते-बिवितेसाठी?
ती तर
सतत--सोबत
पाठी- पाठी
मुखी -ओठी///
# कौशल
श्रीकांत पेटकर
९७६९२१३९१३
१० वर्ष आईची.. पुढली
१० बाबांची.
१० दिली नवऱ्याला..
१० दिली मुलांना..
सर्वार्थाने केवळ त्यांची.
आता मात्र मुक्त हो...
ही १० स्व:तःची...
वाच, नाच, मौज कर...
हवे ते ते स्वैर कर.
पुढील १० आहेत मग
त्याच्या-आपल्या तब्येतीची...
त्या पुढील १० वानप्रस्थ...
संसारातून निवृतिची.
म्हणून म्हणते...
हीच १० वर्षे फक्त तुझी
नाहीत दुसऱ्या कुणाची
सूनेच्या संसारातही
नाक न खुपसण्यायची
आताच मस्त जगून घे
खळखळून हसून घे
प्रेमात पड स्वतःच्याच
लाड कर स्वतःचेच
स्वतःवरच रुसून घे
नवऱ्याला मार काखोटीला
जग सारे फिरुन घे
देव करो तुला मिळावी
१० वर्षे स्वैर सुखाची.
देव करो तुला कळो
महती स्वत:च्या एका क्षणाची....
वेलींना आधार होता,
वृक्ष वाटला दणकट परि
बुंधा ज्याचा किडूनी गेला,
कोसळणार मग कधीतरी
नष्ट करिल तरूवेलींना,
धरणीवरती आडवा होता
सौंदर्य दिले लताफूलांनी,
सारे कांहीं विसरूनी जाता
वेलींनो आणि झुडपानों,
सोडूनी घ्या आधार पोकळ
स्वतंत्रपणे तुम्ही जगण्या ,
स्वावलंबनाचे टाका पाऊल
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Copyright © 2025 | Marathisrushti