कर पडले चरणीं
भाव जाण देवा ।।धृ।।
देह झुकला पुढती
लिनतेनें मान वाकती
मनाची करूनी एकाग्रता
भावनेला वाट देतां
अश्रू दाटले नयनी अंतरीचा दिसे ओलावा १
कर पडले चरणी भाव जाण देवा,
प्रथम येई भावना,
जागृत करते मना
मनाचा ताबा देहावरी
तच तुजला प्रणाम करी
घे प्रभू जाणूनी अत:करणातील ठेवा २
कर पडले चरणी भाव जाण देवा
मुखी नाम तुझे घेई
देह सारा शहारून जाई
आनंदाची फूटते उकळी
नाचते मन सर्व काळी
मनाचा चंचल स्वभाव समजोनी तू घ्यावा ३
कर पडले चरणी भाव जाण देवा
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
येत्या १५/२० वर्षात एक पिढी हे जग सोडून जाणार आहे ! कटू पण खरेच सांगत आहे…..
तिच्या फाटलेल्या, फाडलेल्या अथवा फाडून घेतलेल्या जीन्समधून तिच्या गोऱ्या मांडया दिसत होत्या...
पुरुषांच्या नजरा त्यावर खिळल्या होत्या पण त्या नजरेत वासना नव्हती एक प्रश्न होता...
हिला भीक लागलेय की भिकेचे डोहाळे लागलेत...
फक्त गोंदलेल गोंदण दिसावं म्हणून ती काय काय दाखवत होती...न बोललेलं बर ...
मग म्हणणार पुरुषांच्या नजरेत वासना आहे...
मला वाटत पुरुषांनी आपल्या डोळ्यावर आता असा चष्मा लावावा ज्यातून फक्त कपडे दिसतील ...
मग असा चष्मा लावणाऱ्यानाच बायका आज सभ्य समजतील...
ती म्हणत होती जणू मी माझ्या कपड्यांना आवर घालणार नाही तुम्ही तुमच्या नजरेतील वासनेला आवर घाला...
माझी नजर मग तिच्या मांड्यावरून तिच्या चेहऱ्यावर गेली ...
पाहतो तर काय ही तर तीच मुलगी होती आपल्यासमोर चड्डीत फिरणारी...
आता तर मी तो चष्मा लावणारच...
कवी - निलेश बामणे
एक विनोदी लेखक, कवी म्हणून सुरु झालेला अत्रेंचा प्रवास, आक्रमक वक्ता, विडंबनकार, नाटककार, संपादक, पत्रकार, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक, परीक्षक, चित्रपट पटकथा-संवाद लेखक आणि अखेर सयुंक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रेसर राजकारणी अश्या अनेक वळणावरून ४० वर्षे अविरत पणे सुरु राहिला.
भाकरी साठी वणवण
फिरलो दाही दिशा
चंद्र -तारे चमकती डोळ्यासमोर
अशी झाली माझी दशा
-- सौ. माणिक दिलीप शूरजोशी
प्लास्टिकचा गैरवापर ही आपली क्षुद्र मनोवृत्ती आहे. पर्यटनाच्या नावाखाली तसेच देवदर्शनाच्या नावाखाली अनेकजण, बसेस, खासगी वहानाने जातात. खाणे-पिणे झाल्यावर, जवळपास सर्व कचरा फेकून देतात. त्यात रिकाम्या पाण्याच्या बाटल्या, इतर पदार्थ, पेले वगैरे असतात. हे सर्व कचरापेटीत टाकणे त्यांच्या लक्षात येत नाही की हे मुद्दाम होते, हे समजत नाही. एकाने एका ठिकाणी कचरा केला की दुसऱ्याला त्याचा फायदाच होतो. तो त्या ठिकाणी परत कचरा टाकतो. अशा रीतीने कचऱ्याचे ढीग निर्माण होतात, ते ढीग काढण्याकरिता एक यंत्रणा राबवावी लागते.
नकोस बोलू, मीही सारे जाणतो
न उरले, काहीच बोलण्यासारखे
जाणतो मी, तुझ्या मौनी वेदनांना
आज नां काहीच विसरण्यासारखे
जे जे अव्यक्त! कसे व्यक्त करावे
सांगनां! तूं काय सावरण्यासारखे
जे, जे घडले, ते, ते हृदयस्थ सारे
सत्य! कोणते व्यक्त करण्यासारखे
तूच सांगनां, काय कसे घडले होते
जगी जगलो साऱ्यांच्या मनासारखे
आज हा असा विरही दुरावा भाळी
यावीण कोणते दुःख भोगण्यासारखे
व्याकुळ अतरंगी, अस्वस्थ दग्धता
तरी सारेच तुझ्याशी बोलण्यासारखे
आता तरी, तूं सोड हा वेडा अबोला
होवू दे, आता तरी थोडे मनासारखे
-- वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र ६०
२७ - २ - २०२२.
हे शारदे ! रूसलीस कां तू, माझ्या वरती ।
लोप पावली कोठे माझी, काव्याची स्फूर्ती ।।
दिनरात्रीं तव सेवा केली, मनोभावें ।
कळले नाहीं आज शब्द ओठचे, कोठे जावे ।।
दिसत होते भाव मजला, साऱ्या वस्तूमध्यें ।
उचंबळूनी जाई मन तेव्हां, नाचत आनंदे ।।
तेच चांदणे तारे गगनी, आणिक लता वेली ।
पकड येईना टिपण्या सौंदर्य, परि या वेळी ।।
जागृत केली मम हृदयांतील, सुप्त जी शक्ति ।
अखंडित वाहूं दे शब्द प्रवाह, हे श्री सरस्वति ।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Copyright © 2025 | Marathisrushti