वेलींना आधार होता,
वृक्ष वाटला दणकट परि
बुंधा ज्याचा किडूनी गेला,
कोसळणार मग कधीतरी
नष्ट करिल तरूवेलींना,
धरणीवरती आडवा होता
सौंदर्य दिले लताफूलांनी,
सारे कांहीं विसरूनी जाता
वेलींनो आणि झुडपानों,
सोडूनी घ्या आधार पोकळ
स्वतंत्रपणे तुम्ही जगण्या ,
स्वावलंबनाचे टाका पाऊल
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com