(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • प्रकट दिन

    असे कसे प्रकट होतात
    काही संतजन
    ज्यांना नसतात मायबाप
    नसते जन्मतारीखही
    प्रकटू देत त्यांचे त्यांना
    भेटू देत त्यांना भक्तही बापुडे हजारोंनी
    मला काय त्याचे....

    पण म्हणतो
    देशासाठी
    देशाच्या सिमेवरही
    प्रकट व्हा हो संतानो
    असेच युध्दाचे वेळी
    हजारो संख्येनी !

  • बॅड आयडिया (वात्रटिका)

    p-3759-bad idea

    -- सूर्यकांत डोळसे

  • मीरेची तल्लीनता

    नाच नाचती तालावरती
    मीरेची पाऊले
    चित्त ते हरीमय जाहले. - - - धृ

    लागला प्रभुचा ध्यास
    हरि दिसे नयनास
    चलबिचल नजर होऊन
    अंग सारे मोहरले - - -१
    चित्त ते हरीमय जाहाले

    न राही आपले भान
    झाली भजनी तल्लीन
    तनमन प्रभुचे ठायी जाता
    संसार ते विसरले. - - - २
    चित्त ते हरीमय जाहाले

    विषाचा घेता प्याला
    हरि तो त्यातची दिसला
    झेपावूनी गेली त्याच क्षणी
    घट घटा प्राशन केले. - - - ३
    चित्त ते हरीमय जाहाले

    जहाल होते विष
    मृत्युचा तो पाश
    प्रभूभक्तीच्या शक्तीने परि
    अमृत ते बनले - - - ४
    चित्त ते हरीमय जाहाले

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • देवाचिया दारीं

    देवाचिया दारीं, मनाचा मुजरा,

    झुकवूनिया मान, हासे तो चेहरा ।। धृ ।।

    जाई जेव्हां मंदिरी,

    घेतां प्रभू दर्शन,

    आनंदानें नाचते,

    हर्षित चंचल मन,

    नयन साठविती, त्या मंगल ईश्वरा,

    देवाचिया दारी मनाचा मुजरा ।।१।।

    नदीनाले धबधबा,

    उंच उंच वृक्ष वेली,

    कोकीळ गाती, मोर नाचे,

    इंद्रधनुष्याच्या खाली,

    रोम रोमातूनी शिरे, निसर्गाचा फवारा,

    देवाचिया दारी मनाचा मुजरा ।।२।।

    दु:खी – कष्टी दुबळा,

    दीनवाणा दिसे,

    प्रभूच्याच आज्ञेने,

    भोग भोगीत असे,

    जातां हृदय भरूनी, करि आसवांचा मारा,

    देवाचिया दारी मनाचा मुजरा ।।३।।

    -- डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • वातावरणाची निर्मिती

    वातावरण ते निर्मित होते, जसे जातां वागूनी

    हर कृतिची वलये बनती, तरंगे ती निघूनी...१,

    फिरत असती वलये तेथें, सारी अंवती भंवती

    चक्रे त्याची परिणाम दाखवी, इतर जनांवरती...२,

    जेव्हां कुणीतरी संत महत्मा, असे तुमच्या जवळी

    चांगुलपणाचे भाव उमटती, आपोआप त्यावेळी....३,

    जवळून जाता दुष्ट व्यक्ती ती, आपल्या शेजारूनी

    चलबिचल ते मन होते, केवळ सानिध्यानी.....४,

    याच लहरी घुसुनी शरिरी, मनी आघांत करती

    मनामध्ये तो बदल करूनी, तीच वृत्ती बनविती...५,

    विहीरी वरच्या दगडांनाही, खुणा पडती जेथे

    कसे टिकेल तन मन तेथे, नाजूक जे असते...६

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • गिरनार यात्रा (भाग – १)

    अद्वयच्या बारशाचा दिवस होता. मी 12-12.15 ला धावत-पळत उमा नीलकंठ मध्ये पोहोचले. दारातच अरूताई, जिजाजी आणि नरेन बोलत असतानाचे शब्द कानावर आले.’

  • जागतिक पोलिओ दिन

    जगातून पोलिओच्या उच्चाटनात जोनस सॉल्क यांचं काम खूप मोठं आहे. त्यांनी आणि त्यांच्या टीमने पोलिओची पहिली लस शोधून काढली होती.

  • ध्यास

    मज नाही अजुनही कळले
    नाते, तुझे नी माझे कसले...
    परी नित्य ध्यास तुझा अंतरी
    हेच सत्य, निरागस मनातले...

    श्वासा श्वासात तूच सांगाती
    सावलीत रूप तुझे सांडलेले...
    बैचन करते हे गूढ अनामिक
    सांगु कुणास, मी हे मनातले...

    तुही अशीच निःशब्द अबोली
    मौनातच मन घट्टघट्ट बांधलेले...
    तुझ्या लोचनीच्या प्रीतभावनां
    सहजी सांगुनी जाती मनातले...

    पुण्यपावनी दान, दैवी प्रीतीचे
    जन्मी, ऋणानुबंधी लाभलेले...
    जे आहे,जे घडले ईछ्या त्याची
    ते सुख, मी ओंजळीत झेललेले...

    –वि.ग.सातपुते.( भावकवी )

    9766544908

    रचना क्र.२०६

    १८/८/२०२२

  • गीत गा

    अंधार पडला आहे
    उजेडाचे गाणे गा
    वेदना असह्य आहे
    सुखाचे गीत गा

    रडणे आता भाग आहे
    हसण्याचे गाणे गा
    समोर नागफणा आहे
    स्तब्धतेचे गीत गा

    अपघात अटळ आहे
    सावरण्या गाणे गा
    मरणा जवळ आहे
    जीवनाचे गीत गा

    युद्धाचा ढग आहे
    शांतीचे गाणे गा
    निस्तेज मन आहे
    प्रसन्नतेचे गीत गा

    गाण्यांना संगीत आहे
    मानवता रीत जगा
    निसर्ग ढळतो आहे
    समर्पणाचे गीत गा

    -- विठ्ठल जाधव.

    संपर्क: ९४२१४४२९९५

    शिरूरकासार, बीड.

  • काव्यानुभव

    फळ आज हे मधूर भासते,
    तपोबलातील अर्क असे
    कष्ट सोसले शरिर मनानें,
    चिज तयाचे झाले दिसे.....

    बसत होतो सांज सकाळी,
    व्यवसाय करण्या नियमाने
    यश ना पडले पदरी.
    केव्हा मान फिरविता नशीबाने....

    निराश मन सदैव राहूनी,
    मनीं भावना लहरी उठती
    शब्दांना आकार देवूनी,
    लेखणी मधूनी वाहू लागती...

    लिहीता असता भाव बदलले,
    त्यात गुरफटलो पुरता
    छंद लागूनी नशाच चढली,
    जीवनामधील रंग बघता...

    त्या रंगाच्या छटा उमटल्या,
    फुला फुलातूनी दिसूनी येती
    सप्त रंगाचे मिलन दिसले,
    आकाशाच्या क्षीतीजावरती....

    काव्यावरती जगेल कोण,
    हवी भाकरी जगण्यासाठी
    मानहानी ती सदैव होई,
    केवळ अल्पशा पैशापोटी...

    मदत कुणाची मिळत होती,
    आला दिवस निघून जाई
    काव्यातील आनंदात परि,
    डुबता सारे विसरून जाई

    विवंचना आणि सुख दु:खे,
    बनली होती स्फर्ती देवता
    अनुभवले जे जे आजवरी,
    चित्रीत झाले बनूनी कविता,

    अनुभव होता तना मनाचा,
    म्हणूनी भासले सत्य काव्य ते
    उचलून घेतले जनसामान्यांनी,
    मनास त्यांच्या पटले होते....

    लपली असती कला एक ती,
    सर्व जणांच्या अंतरंगी
    परिस्थितीशी झगडा देवूनी,
    बाहेर आणती कुणी प्रसंगी....

    गेलो विसरूनी उदास दिन ते,
    आज उमटले चित्र निराळे
    सरस्वती आणि लक्ष्मी दोघी,
    आशीर्वाद त्यांचा मजला मिळे

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०