शब्दांविना संवादू,असंभव"" तो वाटतो,
किमया त्यांची न्यारी",
अर्थ मर्म दाखवतो,
शब्दांवाचून किती भाषा,
मानव नेमका वापरतो,
परंतु त्यांच्यासम हा ,
म्हणत म्हणत कसा,
वर्चस्व त्यांचे मानतो,--
स्पर्श बोले कधीकधी,
मात्र शब्दांसारखा,
तान्हुल्यांची खास सोय,
जाणे बाळ ममता, माय--!!!
, हाच स्पर्श जादू करे,
प्रेमभावना व्यक्त करे,--!!
आबालवृद्धां आधार वाटे ,
इतुका बोलका अगदी भासे,--
खाणा-खुणा करत लोक,
बोलती काही एकमेकांशी,
मूक सांकेतिक भाषा जणू,
मदत करे सार्थ अशी,--!!
चित्रलिपी केव्हातरी,
आंतरिक संवाद साधे,
मार्मिक प्रसंग रेखाटुनी,
हृदयांशी हृदये जुळवे,
कित्येक कलाही बोलती,
आत्मिक संवाद साधती,
खूण पटे आत्म्याला आत्मी, यथोचित अबोल भाषा साची,
नयनांची भाषा आगळी,
फक्त डोळ्यांमधुनी बोले,
कधी अनेक शब्द हारती,
असे भाव प्रदर्शित करे,--!!!
हिमगौरी कर्वे.©
जवळ वेळ आली ......तयारीस लागा
जवळ वेळ आली ......विलासास त्यागा/
फितूर दिसती येथले लोक छूपे
जवळ वेळ आली...... लढाईस जागा /
कल्लोळ कसला अन चर्चा या कशाला
जवळ वेळ आली...... शहाणेच वागा /
बंधुत्वाचं खूपच फसवं नातं चाले
जवळ वेळ आली..... तपासाच धागा /
निर्णयात क्षण दवळावा कशाला
जवळ वेळ आली.... कशालाच त्रागा /
@कौशल(श्रीकांत पेटकर )
२२/ ०२/ २०१९
खंत वाटली मनास
कळला नसे व्यवहार ।
शिकला सवरला
नाही जाणला संसार ।।१।।
पुढेच गेले सगे सोयरे
आणिक सारी मित्रमंडळी ।
घरे बांघूनी धन कमविले
श्रीमंत झाली सगळी ।।२।।
वेड्यापरी बसून कोपरी
रचित होता कविता ।
कुटुंबीय म्हणती त्याला
कां फुका हा वेळ दवडीता ।।३।।
सग्यांच्या उंच महाली
बैठक जमली सर्व जणांची ।
श्रेष्ठ पदीचा मान देवूनी
कौतुके झाली कवितांची ।। ४।।
व्यवहारी निर्धन जरी तो
विराजमान मनीं दुजांचे ।
ईश्वरी चैत्यन्न स्फुरले जे जे
गुंफूनी ठेविले हार तयांचे ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
आई ...!
तुझे आयुष्य म्हणजे...
आमच्या सुखी जीवनासाठी,
अनवानी पायाने...
निखाऱ्यातून ‘चालने’ होते.
दुष्काळाच्या आगीतून,
ताऊन-सुलाखून निघालेले,
चोवीस कॅरेट शुद्ध ‘सोने’ होते.
अंध्याऱ्या रात्रीतील...
शुभ्र, शीतल ‘चांदणे’ होते.
आम्हा सर्वांच्या सुखासाठी,
स्वतःच, दुःखाचे विष पिऊन,
विचारमंथनातून मिळवलेले,
कंठातील अनमोल ‘रत्न’ होते.
हाल-आपेष्ठा, अपमान सहन करून,
मनाच्या काळजावर कोरलेले,
विजयाचे सुंदर ‘स्वप्न’ होते.
आपल्या सुखी कुटुंबासाठी,
काबाड-कष्ट, उपास-तापास करून,
कणा-कणांनी घडवलेले ‘घर’ होते.
आपुलकी-जिव्हाळा-प्रेम, वात्सल्य-ममतेनी,
माणसाळलेले माणुसकीचे ‘घरदार’ होते.
बोचऱ्या थंडीतील उबीचे ‘चादर’ होते,
कोरडया विहीरीतील पाण्याचे ‘पाझर’ होते.
- ©️ प्रा. शिवाजी आर. कांबळे
☎️ मो.न. 8830800335 ====================================
Follow me on my Blog ID: https://kshivraj83.blogspot.com/ ===================≈================
तपसाधनेतील परिक्षा
(काव्य स्फूर्ती)
पूजित होतो प्रभूसी ध्यान एकाग्र करुनी
भाव भक्तिने तल्लीन होत असे भजनी ।।१।।
काव्यस्फूर्ति देऊनी कवि बनविले मजला
शब्दांची फुले गुंफवूनी कवितेचा हार बनवविला ।।२।।
सुंदर सुचली कविता आनंदी झाले मन
ध्यास मज लागता गेलो त्यांतच रमून ।।३।।
पुजेमधले लक्ष्य ढळले काव्याच्या मागे जावूनी
भजनांतील चित्त वेधले तपोभंग तो होऊनी ।।४।।
मधाचे बोट चाटवूनी मोहात ओढले मजला
दूर सारुनी अमृत घट परिक्षा घेता झाला ।।५।।
अडथळे येऊनी तप साधनेत कस लावतो सत्वाची
हीच आहे प्रभूची रीत परिक्षा घेई भक्ताची ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
गरिब सुदामा बालमित्र , आला हरीच्या भेटीला
बालपणातील मित्रत्वाची, ओढ येवूनी मनाला....।।
छोटी पिशवी घेवूनी हाती, पोहे घेतले त्यात
फूल ना फुलाची पाकळी घ्यावी, हीच भावना मनांत....।।
काय दिले वहीनींनी मजला, चौकशी केली कृष्णाने
झडप घालूनी पिशवी घेई, खाई पोहे आवडीने....।।
बालपणातील अतूट होते, मित्रत्वाचे त्यांचे नाते
मूल्यमापन कसे करावे, उमगले नाही कृष्णाते....।।
समोर असता सुदामा, काही न दिले त्याते
द्विधा होऊनी मन:स्थिती, परत पाठवी रिक्त हस्ते...।।
देवूनी ऐश्वर्याच्या राशी, सुदाम्याच्या माघारी
मित्रत्वाच्या प्रेमभावाची, भेट देई श्री हरी....।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
अकारण कां नांवे ठेवता सदैव कैकयीला ।
चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्ही राजमातेला ।।धृ।।
जेव्हां दशरथ युद्धास जाई ।
कैकयी त्याच्या सेवेत राही ।।
राजनीति अन् युद्धनीति ही ।
अवगत झाली सारी तिजला ।।१।।
चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्हीं राजमातेला
नजीकच्या त्या देशामधूनी ।
रावणादी असुरी शक्ती वाढूनी ।।
सामान्य जनाला जर्जर करुनी ।
हा हाः कार तो माजविला ।।२।।
चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्हीं राजमातेला
परिस्थितीला जाणून घेतां ।
केवळ चौदा वर्षाकरीता ।।
राम वनी तो पाठवी माता ।
तोड नसे त्या दूरदृष्टीला ।।३।।
चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्हीं राजमातेला
माता आणि राजधुरंदर ।
दुहेरी भूमिका ही शिरावर ।।
निर्णय घेऊनी अतिशय खडतर ।
इतिहास जिने घडविला ।।४।।
चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्ही राजमातेला
रावणवृत्ती महा असूरी ।
नष्ट केली तिनेच खरी ।।
मार्ग निवडले जरी कांटेरी ।
यशस्वी केले रामप्रभुला ।।५।।
चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्ही राजमातेला
धाडीला नसतां राम वनीं ।
मारीला असता रावण कुणी ?
स्वतःचे शिरीं कलंक घेवूनी ।।
धरणीवरचा पाप भार रोकला ।।६।।
चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्ही राजमातेला
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
मनाची भाषा मनास उमगते
जीवनातील परमानंद,
केंव्हां लाभतो त्या जीवना ?
मातेच्या त्या उदरामध्ये,
शांत झोपला असताना ।।१।।
असीम ‘आनंद’ अनुभव,
घेत असे तो जीवात्मा
सोsहं निनाद करूनी,
सांगतो मीच परमात्मा ।।२।।
आनंदाने नाचू लागतो,
मनांत येता केंव्हां तरी,
मातेलाही सुखी करती,
त्याच्याच आनंदी लहरी ।।३।।
पुढे त्याचे प्रयत्न होती,
मिळवण्या तोच आनंद
सुख, दु:खाच्या चक्रामध्ये,
विसरूनी जातो तो नाद ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
जे होणार ते ते विधिलिखित आहे
म्हणुनी कां काही करायचेच नाही
देईल हरि मला माझ्या खटल्यावरी
हा साक्षात्कार अजुनी झाला नाही
श्वास हे जीवनी कायमचे विरणारे
हरविलेला क्षण कधी परत येत नाही
संदिग्ध वाटेवरी चालावेच लागते
रेखा भाळीची बदलता येत नाही
जीवन सुखदुःख वेदनांचेच सरोवर
सामर्थ्याने तरण्याविना पर्याय नाही
मन, भावनांच्या लाटांशी खेळणारे
प्रारब्धाच्या गतीविना झुलत नाही
मन:शांती सात्विकी सदविचारांची
विवेकी सत्कर्माविना मुक्तीच नाही
*********
--वि.ग.सातपुते.(भावकवी)
(9766544908)
रचना क्र. ३२४
7/12/2022
Copyright © 2025 | Marathisrushti