(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • पंख फुटता !

    ते जातील उडूनी पंख फुटता पाहत राहशील, डोळे भरुनी
    आजवरी जे प्रेम दिले तू शक्ती त्याची उरी बाळगुनी

    माया, वेडी कशी असे बघ वाटते तुजला तुझीच पिले ती
    हसून, खेळून बागड्तील सदैव तुझ्या पदारा खालती

    जेंव्हा पडले पाउल पहिले आधाराविण तुझ्या अंगणी
    नांदी होती दूर जाण्याची तुजपासुनी त्याच क्षणी

    परी दूर दृष्टी ही नव्हती तुजला मायेचा तो पडदा असता
    टिपून घेशी अश्रू आज ते परिस्थितीची जाणीव होता

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • अनुराग

    अनुराग

    “अनुराग” ही मराठी प्रेम कविता आपल्यासाठी सादर करीत आहे.

  • हिरवाई – पेढ्याचा भैरोबा

    सह्यगिरीच्या डोंगररांगा
    हिरवाईने नटून बहरल्या |

    रंगबिरंगी रानफुले गोजिरी
    भाळावरती त्यांनी माळीली |

    संततधारा शिरी बरसात होत्या
    मेघातुनी अलवारश्या रेषा |

    झाकोळून गर्द रंग हा गहिरा
    घननीळ नभातच मिसळून गेला |

    वेध लागले सहस्त्ररश्मीला
    कधी पाहतो शृंगार धरेचा |

    हळूच बाजूला करुनी ढगांना
    थोपविल्या त्या झरझर धारा |

    अलगद पसरली रवी किरणेही
    सोन पाऊली धरणीवर उतरली |

    उघडून निळी आभाळाची छत्री
    प्रतिबिंब पडे नदीच्या पात्री |

    व्योमाच्या या लख्ख उजेडात
    सातारा माझा उजळुन निघाला |

    सृष्टीच्या ऐकून या काव्या
    भैरोबा पेढ्याचा हसला ||

    ?मी सदाफुली

    ©✍️संध्या प्रकाश बापट

  • गोपाळ काला

    श्रीकृष्ण जयंतीचे दुसरे दिवशी हा साजरा केला जातो. याला काला, दही-हंडी अशीही नांवे आहेत. श्रीकृष्णांनी व्रजमंडलात गायी चरविताना सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करून खाद्यपदार्थांचा काला केला व सर्वांसह भक्षण केले. या कथेला अनुसरुन हा काला व दही हंडी फोडण्याची प्रथा सुरु झाली असावी.

    सध्या याला काही ठिकाणी विकृत स्वरूप येत आहे. कोणत्याही रंगाच्या हंड्या बांधतात, त्या फोडतात. त्यामुळे तो रंग एक-तर दोन-तीन दिवस जात नाही तर काही वेळा त्याचे नको ते परिणाम भोगावे लागतात.

    -श्री करंदीकर गुरुजी

  • चोरी कृष्णाने केली दंड हि कृष्णाला मिळाला

    न्यायाधीश, पेंद्या तुला चोरी करताना रंगे हात पकडले आहे. तू चोरी केली हे तू कबूल करतो का? न्यायाधीश महोदय, मी चोरी केली नाही. 'करता करविता स्वयं भगवान कृष्ण आहेत'. जे घडले ते भगवंताच्या इच्छेने. शिवाय मी रोज सकाळी भगवंताची पूजा करताना आपल्या सर्व कर्मांची फळे भगवंताला अर्पित करतो. ॐ श्री कृष्णार्पणमस्तु. मी चोरी केली हे जरी सिद्ध होत असेल तरीही त्या चोरीची शिक्षा भगवंताला मिळाली पाहिजे मला नाही.
    न्यायाधीश म्हणाले, पेंद्या मग बोलव तुझ्या कृष्णाला. विचार तुझ्या कृत्याची शिक्षा भोगायला तो तैयार आहे का? पेंद्या उतरला, साहेब मी चोरी केली नाही. भगवंताने केली आहे. भगवंत नेहमीच आपल्या भक्तांच्या मदतीला येतात, ते गजेंद्रच्या मदतीला आले होते, माझ्या मदतीला का नाही येणार. न्यायाधीश म्हणाले पेंद्या एक वेळ तू म्हणतो म्हणून मान्य करतो, पण कृष्णाला इथे बोलावणार कसे, तो तर स्वर्गात राहतो, तिथे समन पाठविता येत नाही.
    पेंद्या त्यावर म्हणाला, साहेब भगवंताच्या नावानी पुकारा करा बघ कसा धावत येईल आपल्या भक्ताच्या मदतीला. कोर्टाने भगवंताच्या नावानी पुकारा केला, भगवंत हाजीर हो. काय आश्चर्य, भगवंत साक्षात न्यायाधीश महोदया समोर उठे ठाकले. न्यायाधीश म्हणाले, तुम्ही भगवंत आहात, सर्वज्ञाती आहात. पेंद्या म्हणतो, चोरी तुम्ही केली, चोरीच्या गुन्ह्याची सजा हि तुम्हाला मिळाली पाहिजे. पेंद्याचा आरोप तुम्हाला मान्य आहे का? भगवंत हसत म्हणाले, मला गुन्हा स्वीकार आहे. न्यायाधीश म्हणाले, चोरीच्या गुन्ह्याची शिक्षा पाठीवर ५० कोडे मारण्याची आहे. नाईलाजाने मला ती शिक्षा तुम्हाला द्यावी लागेल. भगवंत म्हणाले, मी निराकार अविनाशी आहे, माझे हे जे रूप तुम्ही बघत आहात, आभासी आहे. माझ्या,आभासी शरीरावर कुणी कोडे मारले तर तो कोडा माझ्या शरीरातून आरपार होऊन मारणार्यालाच लागण्याची शक्यता आहे. सत्य हेच मला कुठला हि दंड देणे शक्य नाही. न्यायधीश महोदय म्हणाले, कायदा सुव्यवस्थित राखण्यासाठी चोराला दंड देणे गरजेचे, अन्यथा राज्यात अराजकता माजेल. आता तुम्हीच सांगा मी तुम्हाला दंड कसा देऊ. भगवंत हसत म्हणाले, मी सर्वव्यापी आहे. प्रत्येकाच्या देहात माझे वास्तव्य आहे. जे भक्त मला आपले चांगले कर्मफळ मला समर्पित करतात. त्या चांगल्या कर्मांचे फळ मी भक्तांच्या देहाच्या माध्यमाने भोगतो. माझ्या इच्छेने पेंद्याने चोरी केली. चोरीचे कर्मफळ हि मला अर्पित केले. चोरीच्या कर्माचे फळ मी पेंद्याच्या शरीराच्या माध्यमाने भोगणार आहे. तुम्ही पेंद्याच्या शरीराला कोडे मारण्याचे आदेश द्या, कोडे त्याला लागतील, कष्ट मला होईल. भगवंताचे म्हणणे ऐकताच हातवारे करत पेंद्या जोरात ओरडला, भगवंता हि तर चक्क फसवणूक आहे. तुला कर्मफळ अर्पित करण्याचा फायदा काय. पण भगवंत केंव्हाच अदृश्य झाले होते.
    न्यायाधीश महोदयाने शिक्षा सुनावली. भगवंतानी चोरीचा गुन्हा कबूल केला. ते हि शिक्षा पेंद्याच्या शरीराच्या माध्यमाने भोगतील. पेंद्याला ५० कोडे मारले जावे.
    बेचारा पेंद्या त्याची चतुराई, काही कामी आली नाही. गुन्ह्याची शिक्षा त्याला भोगावी लागली.

  • आले पावसोजींच्या मना !

    आले लहरी पावसोजींच्या मना

    सुट्टीत जावे मामाच्या गावा,

    फोनवरून झालं बोलणं

    दिवस ठरला एकदाचा,

    गाड्या सगळ्या फुल झाल्या

    पेच पडला तिकिटाचा !

    पाऊसोजी म्हणाले आईला

    काळजी नसावी, आपले आहेना ‘मेघ’ विमान,

    आई म्हणाली पावसोजीला

    प्रवास खूप दूरचा, सांभाळून चालव वाहान !

    ठेव जवळ जलाचा साठा

    वाटेत लागली तहान जर

    जलाचा आहे तुटवडा

    ऐकले होते वसुंधरेवर !

    झाला होता प्रवास बरेच तास

    लागली होती भुकेची आस,

    सगळी धरणी झाली तप्त

    हवामान नव्हते वाहन उतरवण्या रास्त !

    प्रत्येकाच्या तोंडी एकच वाक्य

    पावसोजी कधी येऊन करी आम्हां तृप्त,

    झाले अनकूल हवामान

    पावसोजीने मामाच्या अंगणात उतरविले विमान !

    आनंदली आजोळची मंडळी

    विचारती, वाटेत झाला नाही ना त्रास,

    भेटली मामा-मामी आणि आप्त

    म्हणती मुक्काम ठेव काही महिने निवांत !

    -- जगदीश पटवर्धन

  • दहीहंडी

     

  • शब्दगीता

    कल्लोळ मनभावनांचा
    सावट, निमिष वेदनांचे
    अंतरंगात, सावळबाधा
    नेत्री उपवन भावफुलांचे ।।

    ऋतूगंधली, कुसुमसुमने
    गंधाळ सारा प्रीतभारला
    उमलता, नित्य शब्दफुले
    प्रणयगंधी गुछय फुलांचे ।।

    शब्दाशब्दात, भास तुझा
    मनी भावनांचे चंद्रचांदणे
    ओठी झरते काव्यप्रतिभा
    भावनांत थेंब गंगाजलाचे ।।

    देहात नांदते, तूं कुमुदिनी
    आळविता मीच प्रतिभेला
    शृंगारुनी, प्रसवे शब्दगीता
    भाग्यच! हेची मम भाळीचे ।।

    -- वि.ग.सातपुते.(भावकवी)

    9766544908

    रचना क्र. २३.

    २३ - १ - २०२२.

  • कुठे नाही स्वरूप देवा

    कुठे नाही स्वरूप देवा, बघायला मिळत आम्हा,
    काळीज नमते तुज पाहता,
    चराचरातील या घटका, ---

    निसर्ग मज वाटतो,
    तुझेच रुप देवा,
    तिथेच आम्ही तुला मानतो,
    स्वरूप कोणते का असे बा,

    ना तू कुठल्या देवळा,
    ना कुठल्या मंदिरी,
    प्रत्येकाच्या हृदयी
    बसशी,असशी तू हरी,----
    प्रेम, माया, ममता,
    आपुलकी, जिव्हाळा,
    कुठे तू नसशी
    फक्त सांग मज गा ,---!!!!

    माणुसकी जे जपती,
    त्यांच्या मनोमनी तू ,
    दया करुणा अहिंसा,
    दाखवीत प्रगटशी तू,--!!!.

    अनोळखी हात करता,
    निरपेक्ष ती सहाय्यता,
    बापुड्या दीन -दुबळ्या,
    जिवांचा तू रक्षण कर्ता,--!!!

    संकटात कोण पुढे येई,
    कोण देईल अमोल दिलासा,
    कोण आपला हात देई,
    असता कुठली अवघड वेळा,--!!!

    वैविध्य अन् वैचित्र्य ,
    पाहुनी माणूस चकित होई,
    कोण नेई शेवटास,
    जिंकता जरी कुठली लढाई,--!!!

    नीतिमत्तेची चाड नसता,
    कोण ओढे फटकारे,
    आत्म्यातला परमात्माच दाखवी, आपुले अस्तित्व बरे,--!!!!

    © हिमगौरी कर्वे.

  • तुझ्या मिठीत सख्या

    मी बेधुंद जराशी व्हावी
    स्पंदने हलकेच अधरी
    अंतरात उलघाल व्हावी
    घेशील मज तू कवेत जेव्हा
    चांदण सडा अंगणी बरसला
    लाजेल मी अलगद गाली तेव्हा
    तू ही सख्या हलकेच मोहरला
    स्पर्शीले तन आल्हाद तू
    बहरल्या रोमांचित खुणा
    ओठ ओठांनी टिपले तू
    साखर चुंबनाचा गुलाबी गोडवा
    अलवार मिठीत तुझ्या
    वेढून घे अलगद तू मजला
    स्पर्श मलमली गुंतून मोहक
    मखमली उरतील भावस्पर्शी खुणा
    नकोच शब्द तेव्हा काही
    शहारे तन पुन्हा पुन्हा
    सोडून येते मी वाट वेगळी
    गंधाळते मी तुझ्यात तेव्हा
    वाट तुझी पाहता सख्या
    चंद्र टिपूर आकाशी सजला
    तारकांच्या नभांगणात रंगला
    दोन मनाचा गंधित अत्तरी केवडा

    -- स्वाती ठोंबरे.