ते जातील उडूनी पंख फुटता पाहत राहशील, डोळे भरुनी
आजवरी जे प्रेम दिले तू शक्ती त्याची उरी बाळगुनी
माया, वेडी कशी असे बघ वाटते तुजला तुझीच पिले ती
हसून, खेळून बागड्तील सदैव तुझ्या पदारा खालती
जेंव्हा पडले पाउल पहिले आधाराविण तुझ्या अंगणी
नांदी होती दूर जाण्याची तुजपासुनी त्याच क्षणी
परी दूर दृष्टी ही नव्हती तुजला मायेचा तो पडदा असता
टिपून घेशी अश्रू आज ते परिस्थितीची जाणीव होता
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
“अनुराग” ही मराठी प्रेम कविता आपल्यासाठी सादर करीत आहे.
सह्यगिरीच्या डोंगररांगा
हिरवाईने नटून बहरल्या |
रंगबिरंगी रानफुले गोजिरी
भाळावरती त्यांनी माळीली |
संततधारा शिरी बरसात होत्या
मेघातुनी अलवारश्या रेषा |
झाकोळून गर्द रंग हा गहिरा
घननीळ नभातच मिसळून गेला |
वेध लागले सहस्त्ररश्मीला
कधी पाहतो शृंगार धरेचा |
हळूच बाजूला करुनी ढगांना
थोपविल्या त्या झरझर धारा |
अलगद पसरली रवी किरणेही
सोन पाऊली धरणीवर उतरली |
उघडून निळी आभाळाची छत्री
प्रतिबिंब पडे नदीच्या पात्री |
व्योमाच्या या लख्ख उजेडात
सातारा माझा उजळुन निघाला |
सृष्टीच्या ऐकून या काव्या
भैरोबा पेढ्याचा हसला ||
?मी सदाफुली
©✍️संध्या प्रकाश बापट

श्रीकृष्ण जयंतीचे दुसरे दिवशी हा साजरा केला जातो. याला काला, दही-हंडी अशीही नांवे आहेत. श्रीकृष्णांनी व्रजमंडलात गायी चरविताना सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करून खाद्यपदार्थांचा काला केला व सर्वांसह भक्षण केले. या कथेला अनुसरुन हा काला व दही हंडी फोडण्याची प्रथा सुरु झाली असावी.
सध्या याला काही ठिकाणी विकृत स्वरूप येत आहे. कोणत्याही रंगाच्या हंड्या बांधतात, त्या फोडतात. त्यामुळे तो रंग एक-तर दोन-तीन दिवस जात नाही तर काही वेळा त्याचे नको ते परिणाम भोगावे लागतात.
-श्री करंदीकर गुरुजी
आले लहरी पावसोजींच्या मना
सुट्टीत जावे मामाच्या गावा,
फोनवरून झालं बोलणं
दिवस ठरला एकदाचा,
गाड्या सगळ्या फुल झाल्या
पेच पडला तिकिटाचा !
पाऊसोजी म्हणाले आईला
काळजी नसावी, आपले आहेना ‘मेघ’ विमान,
आई म्हणाली पावसोजीला
प्रवास खूप दूरचा, सांभाळून चालव वाहान !
ठेव जवळ जलाचा साठा
वाटेत लागली तहान जर
जलाचा आहे तुटवडा
ऐकले होते वसुंधरेवर !
झाला होता प्रवास बरेच तास
लागली होती भुकेची आस,
सगळी धरणी झाली तप्त
हवामान नव्हते वाहन उतरवण्या रास्त !
प्रत्येकाच्या तोंडी एकच वाक्य
पावसोजी कधी येऊन करी आम्हां तृप्त,
झाले अनकूल हवामान
पावसोजीने मामाच्या अंगणात उतरविले विमान !
आनंदली आजोळची मंडळी
विचारती, वाटेत झाला नाही ना त्रास,
भेटली मामा-मामी आणि आप्त
म्हणती मुक्काम ठेव काही महिने निवांत !
-- जगदीश पटवर्धन
कल्लोळ मनभावनांचा
सावट, निमिष वेदनांचे
अंतरंगात, सावळबाधा
नेत्री उपवन भावफुलांचे ।।
ऋतूगंधली, कुसुमसुमने
गंधाळ सारा प्रीतभारला
उमलता, नित्य शब्दफुले
प्रणयगंधी गुछय फुलांचे ।।
शब्दाशब्दात, भास तुझा
मनी भावनांचे चंद्रचांदणे
ओठी झरते काव्यप्रतिभा
भावनांत थेंब गंगाजलाचे ।।
देहात नांदते, तूं कुमुदिनी
आळविता मीच प्रतिभेला
शृंगारुनी, प्रसवे शब्दगीता
भाग्यच! हेची मम भाळीचे ।।
-- वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. २३.
२३ - १ - २०२२.
कुठे नाही स्वरूप देवा, बघायला मिळत आम्हा,
काळीज नमते तुज पाहता,
चराचरातील या घटका, ---
निसर्ग मज वाटतो,
तुझेच रुप देवा,
तिथेच आम्ही तुला मानतो,
स्वरूप कोणते का असे बा,
ना तू कुठल्या देवळा,
ना कुठल्या मंदिरी,
प्रत्येकाच्या हृदयी
बसशी,असशी तू हरी,----
प्रेम, माया, ममता,
आपुलकी, जिव्हाळा,
कुठे तू नसशी
फक्त सांग मज गा ,---!!!!
माणुसकी जे जपती,
त्यांच्या मनोमनी तू ,
दया करुणा अहिंसा,
दाखवीत प्रगटशी तू,--!!!.
अनोळखी हात करता,
निरपेक्ष ती सहाय्यता,
बापुड्या दीन -दुबळ्या,
जिवांचा तू रक्षण कर्ता,--!!!
संकटात कोण पुढे येई,
कोण देईल अमोल दिलासा,
कोण आपला हात देई,
असता कुठली अवघड वेळा,--!!!
वैविध्य अन् वैचित्र्य ,
पाहुनी माणूस चकित होई,
कोण नेई शेवटास,
जिंकता जरी कुठली लढाई,--!!!
नीतिमत्तेची चाड नसता,
कोण ओढे फटकारे,
आत्म्यातला परमात्माच दाखवी, आपुले अस्तित्व बरे,--!!!!
© हिमगौरी कर्वे.
-- स्वाती ठोंबरे.
Copyright © 2025 | Marathisrushti