दूरदेशीच्या मुसाफिरा तू दूर जरी जाशी विसरु नको या मातृभूमिला विसरु नको तव काशीइथेच आहे पंढरपूर तव इथेच आहे स्थान इथेच विसरी तव पत्रास्तव तुझीच माता भान ।।
येता इकडे परतुनि जेव्हा श्रमुनि थकल्या गात्री कुशीत घेऊनी तुलाच राजा अंगाई गातीदमल्या तुझीया चरणी लावी गाऊनी मंजुळ गीत हस्तस्पर्श हा ह्रदय खरोखर असली वेडी प्रीत ।।
आज अशी तु उडुनी पाखरा पंख तुझे पसरले काळ चालला त्यास पकडण्या झेपावित चालेपरंतु तुझिया नेत्रा येईल जळ जेव्हा डवरून टाक अश्रू हे झोळी माझ्या जा तर उडून फिरुन
-- जयंत वैद्य
October 4, 2025
सतत नाम घेण्यासाठीं, बुद्धी दे रे मजला
आठवण तुझी ठेवण्याची, वृत्ती दे रे मनाला ......।।धृ।।
श्वासात प्राण म्हणूनी, अस्तित्व तुझेच जाणी
श्वास घेण्याची शक्ती, तुझ्याचमुळे असती
जीवनातील चैतन्य, तुजमुळेच मिळते सर्वांना.....१
सतत नाम घेण्यासाठी बुद्धी दे रे मजला
अन्नामधले जीवन सत्व, तूच ते महान तत्व
सुंदर अशी सृष्टी, बघण्या ते दिली दृष्टी
आस्वाद घेण्या जगताचा, जागृत ठेवी भावनेला...२
सतत नाम घेण्यासाठी, बुद्धी दे रे मजला
निनादाच्या लहरी, तन्मयतेने श्रवण करी
आभार मान्यता मति, परि शब्दही कमी पडती
जगणेच कठीण वाटते, क्षणभर तुजविण कुणाला...३
सतत नाम घेण्यासाठी बुद्धी दे रे मजला
जाणून तव उपकार, मानावे सदैव आभार
ही भावना येते मनी, जावे तुझ्यात समावूनी
रोम रोमातूनी माझ्या, नामाच्या दे गतिला....४
सतत नाम घेण्यासाठी बुद्धी दे रे मजला
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
June 21, 2017
कृपा होऊनी शारदेची,
कवित्व तुजला लाभले
शिक्षणाच्या अभावांतही,
भावनांचे सामर्थ्य दिसले ।।१।।
कुणासी म्हणावे ज्ञानी,
रीत असते निराळी,
शिक्षणाचा कस लावती,
सर्व सामान्य मंडळी ।।२।।
कोठे शिकला ज्ञानोबा,
तुकोबाचे ज्ञान बघा,
दार न बघता शाळेचे,
अपूर्व ज्ञान दिले जगा ।।३।।
जिव्हेंवरी शारदा,
जेव्हा वाहते प्रवाही,
शब्दांची गुंफण होवूनी,
कवितेचा जन्म होई....४
भाव शब्दांचा सुगंधी हार,
माझी अंबिका भवानी
वाहत रहा आनंदाने,
यशस्वी होशील जीवनी ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
February 25, 2021
जयदेवी जयदेवी जय निद्रादेवी
तुजविना करमेना मज होई लाही
जयदेवी जयदेवी ......... !!
तुझ्या प्राप्तीसाठी मी खाई अॅस्प्रो
किंवा जाऊनी बैसे रॉक्सीत वा मेट्रो
डोळ्यावर बांधुनी पाण्याच्या पट्ट्या
तरीही झोपेचा झाला बोलबट्ट्या
जयदेवी जयदेवी..... ।।१।।
अर्धांगी गायी ते अंगाई गीत
होईल त्यामाजी बिल्डिंग जागृत
अखेरी वाचीत बसतो कविता
तुझ्यासाठी खाव्या मी किती खस्ता
जयदेव जयदेवी.... ।।२।।
व्हिस्कीचे रिचवुनी पोटात पेले
बेरके कवडे काहीही बोले
परंतु तुजला दयेचा लेश
तुजला लाजला शिव महेश
जयदेवी जयदेवी .......।।३।।
आता मात्र बाबा कमाल झाली
निद्रेवाचून होई जीवाची लाही
घेऊन हातात कवितेचे बाड
माझेच बसलो करीत लाड
जयदेवी जयदेवी ..... ।।४।।
लागली लागली तुझी चाहूल
तुझ्याविना माझा जीव व्याकूळ
वाचीत वाचीत झोपून गेलो
दिव्याची आठवण विसरून गेलो
जयदेवी जयदेवी ..... ।।५।।
-- द्वारकानाथ शं. वैद्य (जयंता)
October 4, 2025
जीवनात नाहीच ,माझ्या जागा त्याला कोठेही
धावावे लागतेच मला उगाच त्याच्यासाठी...
नसत्या माझ्या गरजा, जर साऱ्याच निगडीत त्याच्याशी
तरी जगलो असतो, जीवनच मी राजेशाही...
विनाकारणच नसता, झाला माझा संघर्ष कोणाशी
बळी द्यावाच नसता, लागला मज प्रेमाचाही...
माझ जगणंच झालाय , आज ते तर निगडीत त्याच्याशी
त्याच्याच शिवाय जगण , घंटा ठरतेय धोक्याची...
त्याच्या मागे धावत, अखेर ही होणार जीवनाची
मागचे साधतीलच, मग की जवळीक त्याच्याशी...
कवी - निलेश बामणे
December 17, 2013
रुजविता बियाणें
अंकूर फुटती
असतील दाणे जसे
तेच उगवती
पेरता आनंद
आनंदचि मिळे
प्रेमाची बियाणें
प्रेम आणी सगळे
शिवीगाळ करुनी
आदर येई कसा
शत्रुत्त्वासंगे नसे
मैत्रीचा ठसा
घृणा दाखवूनी
कसे येई प्रेम
क्रोधाच्या मोलाचे
शांती नसे दाम
पेरावे तसें उगवतें
नियम हा निसर्गाचा
सुख दुःखाला कारण
स्वभाव ज्याचा त्याचा
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
November 20, 2019
नाच नाचती तालावरती
मीरेची पाऊले
चित्त ते हरीमय जाहले. - - - धृ
लागला प्रभुचा ध्यास
हरि दिसे नयनास
चलबिचल नजर होऊन
अंग सारे मोहरले - - -१
चित्त ते हरीमय जाहाले
न राही आपले भान
झाली भजनी तल्लीन
तनमन प्रभुचे ठायी जाता
संसार ते विसरले. - - - २
चित्त ते हरीमय जाहाले
विषाचा घेता प्याला
हरि तो त्यातची दिसला
झेपावूनी गेली त्याच क्षणी
घट घटा प्राशन केले. - - - ३
चित्त ते हरीमय जाहाले
जहाल होते विष
मृत्युचा तो पाश
प्रभूभक्तीच्या शक्तीने परि
अमृत ते बनले - - - ४
चित्त ते हरीमय जाहाले
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
August 25, 2019
जिथे ईश्वरालाही सोडून दिलं जातं,
तिथे माणसांनी साथ द्यावी अशी अपेक्षा कशाला?
दुःखात ज्याच्या दारी धाव घेतात,
सुखात त्यालाच मागे सोडून जातात,
जे ईश्वराशीही नातं निभावू शकत नाहीत,
त्यांच्याकडून कायमच्या सोबतीची अपेक्षा तरी कशाला?
इथे नात्यांनाही ऋतू असतात,
कधी फुलांसारखी बहरतात,
तर कधी पानांसारखी गळून जातात,
आणि काही चेहरे...
गरज संपताच अनोळखी होऊन जातात.
ज्यांना आपलं समजून जपलं,
तेच कधी दूर निघून गेले,
काही जखमा शब्दांनी दिल्या,
तर काही निःशब्द अंतरांनी दिल्या.
पण म्हणून तुटून जाऊ नका,
स्वतःला कुणासाठी हरवू नका,
कारण जिथे ईश्वरालाही सोडून दिलं जातं,
तिथे स्वतःची किंमत कमी लेखू नका.
एक दिवस आरशात स्वतःकडे पाहाल,
डोळ्यांत अनुभवांची चमक असेल,
आणि ओठांवर एक शांत हसू...
कारण सगळे सोडून गेले तरी,
तुम्ही स्वतःची साथ कधी सोडली नसेल.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
July 2, 2026
ठेचकळे आंधळा मी काळोख्या पथात
आधाराचा हात देई पंढरीचा नाथ ।।
चुकीचाच धरला रस्ता, असा चालतो मी –
विषयवासनांच्या पंकीं अजुन लोळतो मी
मद-मत्सर-मोह यांचा संग नसे जात ।।
जरी मी न जाऊं शकलो कधी पंढरीला
मंदिरीं न पाहूं शकलो विटेवर हरीला
भाग्यवंत परि मी, विठ्ठल भेटला मनात ।।
पाडुरंगनाम येतां एकदाच माझ्या तोंडीं
स्वर्गानंदाच्या स्पर्शें पावन झाली कुडी
झरा अमृताचा अक्षय प्रगटला मुखात ।।
जगत्-भान हरपे माझें, अंतरीं निवालो
पाप सर्व जळलें माझें, पुण्यवंत झालो
जन्मचक्र-भीती विठ्ठल तोडतो क्षणात ।।
-- सुभाष स. नाईक
पंढरीचा राणा
July 2, 2017
ह्या जीवनाच्या अस्तित्वाचे, ध्येय कोणते खरे ।
उत्तर याचे कुणा मिळेना, आज पावतो बरे ।।
संतसाधू आणि ज्ञानीजन, बहूत ते झाले ।
समाधानी परि एक मताचे, उत्तर नाही दिले ।।
खेळखेळणे उड्या मारणे, अन् खाणे पिणे ।
बालपणीच्या आनंदाला, नव्हते काही उणे ।।
विसरून जाता खेळ उड्या अन् , प्रेम करू लागलो ।
यौवनाच्या उंबरठ्यावरी, बहरून गेलो ।।
संसार करिता कळले आम्हा, जीवन दुजासाठी ।
प्रौढवयाची वर्षे घालविली, समाज सेवेपोटी ।।
वृद्धत्वाचा काळ येता, ओढ लाभली प्रभूची ।
आहिक सुख त्याग करुनी, जीवन मुक्तीची ।।
एक एक ती पायरी चढलो, जीवन शिडीवरी ।
शोधीत होतो 'आनंद' तेथे, मिळेल काहीतरी ।।
हर घडीला रूप निराळे, होते आनंदाचे ।
गुंतले होते संबंध तेथे, तन मनाचे ।।
ओढ प्रभूची लागली, जेंव्हां थकूनी गेला देह ।
संसारातील सर्व सुखाचा, निघून गेला मोह ।।
मृत्यूच्या जवळी जाता, विरून जाईल तमनम ।
कोठून आला कोठे गेला, याची न येई जाण ।।
आता त्याचा आनंद कोठे, असेल तो गुंतला ।
देहमनाचे वेष्टन नव्हते, ज्या घटकेला ।।
हा तर आहे केवळ ‘आनंद’ दुजा नसे काही ।
‘आत्मा’ ‘मुक्ती’ अशा परि यालाच नावे देई ।।
--डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
April 13, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti