(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मोक्षदायी जलधारा

    सरिता ही एक पुण्यप्रदा
    अखंडित समांतर किनारा
    ध्यास सागरी समर्पणाचा
    मोक्षदायीनी ती जलधारा...

    झुळझुळते संथ अविरत
    प्रवाह निश्चिंती वाहणारा
    घेते कवेत, सुखदुःखांना
    पापक्षालनी ती जलधारा...

    तमा न पर्वा तिला कशाची
    फुलवीते, दुतर्फा वसुंधरा
    नदिकाठ तो सर्वांगी सुंदर
    राऊळमंदिर गोपुर गाभारा...

    अध्यात्मी,भक्तीभावरंगला
    श्रध्येय, मुक्ती गंगाकिनारा...
    भगीरथाच्या गंगेचे गंगोदक
    जन्मी आत्मशांतीचा निवारा...

    --वि.ग.सातपुते .( भावकवी )

    9766544908

    रचना क्र.२३५

    १५ /९/२०२२

  • देह बंधन – मुक्ती

    बंधन मुक्तीसाठीं असतां,
    बंधनात ते पाडी
    कर्मफळाचे एक अंग ते,
    टिपे दुसरे बाकी ।।१।।

    साध्य करण्या जीवन ध्येय,
    देह लागतो साधन म्हणूनी,
    सद्उपयोग करूनी घेतां,
    साध्य होईल हे घ्या जाणूनी ।।२।।

    हिशोब तुमचा चुकून जाता,
    तोच देह बनतो मारक,
    विनाश करीतो मागें लागतां,
    मिळविण्यास ते ऐहिक सुख ।।३।।

    बंधन पडते आत्म्याभोंवती,
    शरिरांतल्या वासने पायी,
    वासनेच्या आहारी जातां,
    बंधनास ती बळकटी येई ।।४।।

    तपसाधनेचे कष्ट करूनी,
    देह करीतो आत्म्यास मुक्त,
    देहाचे बंधन पडते,
    जेव्हां बनतो वासनायुक्त ।।५।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • कोण जिंकलं…..!

    युद्ध संपलं…
    शत्रूवर विजय मिळाला…
    सगळीकडे फटाके… जल्लोष…
    चार दिवस सगळेच 'विजयोत्सव' साजरा करतील…
    नेताजी मंचावर उभे राहून घोषणा देतील –
    "हे आपल्या पराक्रमी सैन्याचं यश आहे!"
    ...आणि त्या यशाचं भांडवल करून
    निवडणुकीची रणधुमाळीही जिंकतील!
    आणि डिप्लोमॅटीक जगात रमतीलही......!

    पण...
    तिकडे, एखाद्या दूर, दुर्लक्षित गावात...
    वृद्ध आई वडील–
    डोळ्यांत आसवं, हातात फोटो घेऊन....
    विरपुत्राच्या आठवणीत हरवलेली
    दुचीत बसलेली आई......
    अन् सोललेल्या खावंदावर शहादत मलम लेपुन,
    शून्यात नजर लावून बसलेले वडील.......!

    एक अनाथ मुलगा –
    बाबांच्या कुशीत खेळण्यासाठी रडतोय,
    तळमळतोय.....
    आईला वारंवार विचारतोय....
    "बाबा कधी घरी येणार ...!"
    "मला त्यांच्या कुशीत खेळायचं" म्हणतोय.....
    पण ती कुशी तर आता फक्त आठवणीतच उरली आहे...

    ...आणि ती,
    ती वीरपत्नी –
    जिचं कुंकू उजडलंय...
    भकास जिनगीचे चटके अंगावर सहन करत....
    ती जिवंत मरण जगते आहे,
    कधीही न भरावं असं दुःख घेऊन...

    आपण?
    आपणही चार दिवसात त्यांना विसरून जाऊ,
    फेसबुकवर "जय जवान" लिहून पुढची पोस्ट पाहू...!

    पण एक प्रश्न तसाच उरतोच...
    हो, त्यांनी मातृभूमी वाचवली…
    ते लढले आपल्यासाठी....
    त्यांनी शौर्यही गाजवलं…
    ...पण
    " कोण जिंकलं हो ?"

    ©गोडाती बबनराव काळे, लातूर
    9405807079

  • दयावंताला पाझर फुटला

    दयावंताला पाझर फुटला ,
    पक्षी पिंजऱ्यातून सोडला,
    विहंगम तो आनंदला,
    भरारी घेऊनी, उडाला,--!!!

    निळे आसमान ते,
    खुणावत सारखे होते,
    पिंजऱ्याच्या बंधनाला,
    मूक मन झुगारत होते,--!!!

    कोण येईल पुढे अन्
    स्वातंत्र्य देई मजला,
    देवाचा दूतच तो,--
    मज तेव्हा तो वाटला---!!!

    कोण आहे त्राता माझा,
    मज स्वातंत्र्य देणारा,
    वाट पाहतो जीव सारखा,
    उडायाला आसुसला,--!!!

    बोलावे मज हिरवी धरा,
    झाडे वृक्ष वेली लता,
    प्राण येथेच सोडेन मी,
    इथून सुटका नसतां--!!!

    दुःख माझे कोण जाणेल,
    हात देईल मदतीचा,
    जागेत संकुचित या,
    जीव घुसमटे हो माझा,--!!!

    कोण आला जवळी हा,
    दरवाजा उघडे पिंजऱ्याचा,
    माणूस निष्ठुर भारी ना,
    नको, नको रे धरू बाबा,--!!!

    घेऊन कुठे चालला हा,--?
    निघाला का मारावया,
    भीती वाटे मज फार,
    मारतील धरून गळा,--!!!

    मी मागे थरथरत उभा,
    काळीज हाले लपालपा,
    दयावान तो पुढे येता,
    दार उघडतो बघतां-बघतां,--!!!

    बाहेर येता जीव थोडा,
    जागचा की हाललो,--
    उडालो सरळ गगनांतरी,
    घेतली मोठीच भरारी
    देवा त्याचे कल्याण करी,
    हीच विनंती तुज खरी,--!!!

    हिमगौरी कर्वे.©

  • चंद्रिका

    “सुमनांजली” या काव्यसंग्रहातून…

  • निवृत्तीच्या उंबरठ्यावर !

    कां व्हावे निवृत्त मी ?
    कुणी सांगतो म्हणूनी
    निसर्गालाच सांगू द्या
    वय झाले समजूनी

    कार्यक्षमता माझ्या मधली
    मोजमाप हे कुणी करावे ?
    विकलांग होईल केंव्हा शरीर
    निसर्गालाच हे ठरवूं द्यावे

    सहजची जगतो ऐंशी वर्षे
    संसार सागरी पोहता पोहता
    स्थिरावले मन विचार करुनीं
    निवृत्तीची जाणीव येता

    सर्वासंगे जगता जगता
    शेवटचा तो श्वास ठरु दे
    हासत खेळत आनंदाने
    ह्या जगाचा निरोप घेऊं दे

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • वलय

    सतत फिरत राही, चक्र जीवनाचे

    विविधता पाही , रंग आयुष्याचे ।।१

    सुख दुःखाच्या भावना, उठवूनी लहरी

    देह आणि मना, परिणाम करी ।।२

    लोभ अहंकार निराशा, सारे मनाचे विकार

    आनंद समाधान आशा, करी भावना साकार ।।३

    जीवन विषयाचे, बनत असे वलय

    रस शोधितां त्याचे, जीवन वहात जाय ।।४

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • ईश्वरी गुप्तधन

    होता एक गरीब बिचारा ।
    किडूक मिडूक ते जगण्या चारा ।।
    कौलारु जुनी पडवी निवारा ।
    जन्म दरिद्री दिसे पसारा ।।१।।

    परिस्थितीनें गेला गंजूनी ।
    आर्थिक विवंचना पाठी लागूनी ।।
    शरीर जर्जर झाले रोगांनी ।
    जगण्याची आशा उरे न मनीं ।।२।।

    अवचित घटना एके दिनीं ।
    धन सापडे जमिनीतूनी ।।
    मोहरांचा तो होता रांजण ।
    गेले सारे दारिद्य निघूनी ।।३।।

    जन्मभर ते त्याने भोगले ।
    घरांत लक्ष्मी, परी सोसले ।।
    अज्ञानातची हे घडले ।
    असून पाण्यांत तरी तहानेले ।।४।।

    शोधा ईश्वरी गुप्त धनाचा सांठा ।
    लपला आहे अंतर्यामीं मोठा ।।
    नसेल तेथे आनंदा तोटा ।
    मिळतील सदैव यश वाटा ।।५।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • समत्व बुद्धी

    एका टोंकावरती जातां, शांत न राही झोका तेथें,
    विलंब न करता क्षणाचा, जाई दुजा टोका वरती ।।१।।

    जीवनांतील झोके देखील, असेच सदैव फिरताती,
    बऱ्या वाईटातील अंतर, नेहमी चालत असती ।।२।।

    समाधान ते मिळत नसे, जेव्हां बघता तुम्हीं भोग,
    त्यांत देखील निराशा येते, मनीं ठरविता जेव्हां योग ।।३।।

    जवळपणाच्या नात्यामध्यें दुरत्वाचे अंकूर फूटते,
    दूर असता कुणी तरी, जवळ करावे वाटते ।।४।।

    संतूलन करूनी मनाचे, समत्व बुद्धी ठेवावी,
    टोकावरती जाण्याची भूमिका, सदैव टाळीत रहावी ।।५।।

    मध्य बिंदू तो साधतां, निवड न राही एकाची,
    स्थिरत्व येईल जीवनाचे, टोके जातां सुख दु:खाची ।।६।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • शनिवारचं साहित्य : अव्यक्त…

    तुझा ऑफिस मधला तो शेवटचा दिवस होता
    हात खांद्यापर्यंत वर उचलत आणि हालवत
    तू माझ्याकडे पहिलं, हसलीस
    आणि हळू आवाजात म्हणालीस
    “बाय”
    मीही तुझ्याकडे पहिलं
    हात खांद्यापर्यंत वर उचलत
    आणि आतल्या आवाजात म्हणालो
    “बाय”
    मी पूर्णपणे व्यक्त होऊ शकलो नाही
    चूक माझीच होती

    नंतर बर्याहच दिवसाने बस थांब्यावर
    तू अचानक भेटलीस
    तू अगदी फुललेल्या चेहर्याथने
    हासत माझ्याकडे पाहिलस
    आपली भेट झाल्याचा उत्साह
    तुझ्या चेहरायवर साफ दिसत होता
    मलाही तू भेटल्याचा तेव्हढाच
    आनंद झाला होता
    मीही भयंकर उत्साहित होतो... ‘मनात’
    मी फार वेळ लावतोय हे पाहून
    तूच म्हणालीस
    कॉफी प्यायला जायचं?
    मी पूर्णपणे व्यक्त होऊ शकलो नाही
    चूक माझीच होती

    तू मला तुझा फोन नंबर दिलास
    मग आपल नेहमीच
    भेटणं होऊ लागलं
    त्याच हॉटेलात आपण भेटायचो
    तू मला बरेच प्रश्न विचारायचिस
    मी तुला एकच प्रश्न विचारायचो
    काय घेणार?
    कधी डोसा कधी उत्तपा खायचो
    शेवटी ‘बाय’ म्हणत निघून यायचो
    मी पूर्णपणे व्यक्त होऊ शकलो नाही
    चूक माझीच होती

    शेवटी एकदा
    तू तुझ्या होणार्या नवर्या् बरोबर आलीस
    त्याच हॉटेल मध्ये भेटलो
    त्याच्याशी माझी ओळख करून दिलीस
    मला त्याचा हेवा वाटत राहिला
    आणि तू मला विचारलस
    काय घेणार?
    मागण्यासारख आता काहीच नव्हतं
    मी पूर्णपणे व्यक्त होऊ शकलो नाही
    चूक माझीच होती

    जीवनात आपआपल्या वाटेवर
    आपण आता फार पुढे निघून आलोत
    मी सभ्यतेच्या मर्यादा पळणारा आणि
    जपणारा माणूस आहे, त्यामुळे
    मी आता ही
    पूर्णपणे व्यक्त होऊ शकत नाही
    चूक.....माझीच आहे

    -- विनायक आनिखिंडी, पुणे
    मो ९९२२९७०३१७