सुमनांजली या काव्यसंग्रहातून…..
प्रयत्न मनाचा सदैव असे, भरारी घेण्याचा
उंच आकाशी तारांगणांना, भेट देण्याचा....१,
मनी आस ती राहत असते, उचलून त्यास न्यावे
शिखरावरती जाता क्षणी, स्थितीरूप घ्यावे...२,
प्रयत्नात साथ न मिळता, खाली कोसळते
विचार दबावापुढती त्याचे, काही न चालते...३,
विचार संस्काराचे वलय, मनाभोवती फिरे
निर्मळ पवित्र मन ते, अवलंबूनी विचारे...४
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
राहुनीया माणसांच्यातही साऱ्या
समाधान दाही दिशांनी फिरत होतो मनी बाळगुनी तळमळ ती कसे मिळेल समाधान ते विवंचना ही एकच होती धन दौलत ही हातीं असतां धुंडाळल्या त्या बाजार पेठा न मिळे समाधीन कोठें थकली पाऊले चालून वाटा देखिले निसर्गरम्य शिखरे आणिक कांहीं प्रार्थना स्थळे शिलकीमध्यें दिसे निराशा कारण त्याचे कांहीं न कळे

धरली कास तुझ्या पायी माझा विश्वास
मुखी नामघोष तुला भेटण्याची आस ।।1।।
चारी वेद तुला गाती
विश्वव्यापक तू कमळापती।।2।।
अठरा पुराणांच्या अंती
साधू संत तुला ध्याती ।।3।।
क्षणोक्षणी येते तुझी मला प्रचिती
सुख-दुःखात देवा तू माझा सांगाती।।4।।
संत तुक्यासाठी तू सखा पांडुरंग
नामयाच्या कीर्तनात गातोस अभंग ।।5।।
जनीसाठी दळण, कान्होपात्रेला क्षमादान
हेची तुझे गुण, ऐकून तृप्त झाले कान ।।6।।
नको आता आम्हा विषयाची गोडी
देई तरी देई नामाची आवडी।। 7।।
देवा आता ऐसे करी
जन्मोजन्मी व्हावी वारी
जन्मोजन्मी व्हावी वारी।।8।।
शब्दातून साकारलेला विठ्ठल लक्ष देऊन पाहा भगवान परमात्मा पांडुरंग दिसेलच.
- अमोल उंबरकर
निरोगी असतां तुम्ही,
नामस्मरण करा प्रभूचे,
ठेवू नका उद्या करीता,
महत्व जाणा वेळेचे ।।१।।
शरिराच्या नसता व्याधी,
राहू शकता आनंदी,
आनंदातच होऊ शकते,
चित्त एकाग्र ते ।।२।।
व्याधीने जरजर होता ,
चित्त होई अस्थीर,
स्थिरतेतत दडला ईश्वर,
जाणता येतो होऊनी स्थीर ।।३।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
आज लोपले शब्द ओठचे, भावनाच्या आकाशीं
प्रखर बनतां त्याच भावना, विचार जाती तळाशीं....१,
भावनेला व्यक्त करण्या, सांगड लागे शब्दांची
थोटके पडती शब्द सूर ते, गर्दी होता विचारांची...२,
भावनांचे झरे फुटूनी, विचार जलाशय झाले
विचारांचे बनूनी धबधबे, वाहू मग लागले.....३,
आकार देती शब्द भाषा, बांध घालूनी विचाराला
निश्चीत होतो वेग नी मार्ग, आकार देता भावनेला....४,
भाषेमधली शक्ती जावूनी, मूक बनविले तिने
उंचबळणाऱ्या विचार भावना, टिपल्या मात्र चेहऱ्याने....५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
सरडा चढला झाडावरती,
सर् सर् सर्, करीत ।
लक्ष्य त्यांचे फूलपाखरू,
फुलाभोवती होते खेळत ।।१।।
भक्ष्यकाची चाहूल मिळतां,
भर् भर् भर् गेले उडूनी ।
शोषीत असता गंध फुलांतील,
चंचल होते नजर ठेवूनी ।।२।।
व्याघ्र मावशी मनी ,
म्याँव म्याँव करीत आली ।
उंदीर मामा दिसता तिजला,
झेप घेण्या टपून बसली ।।३।।
शंका येता त्याला किंचित,
झर् झर् झर् तो बिळांत गेला ।
केवळ चित्त सावध असतां,
प्राण आपले वाचऊ शकला ।।४।।
निसर्ग देतो कला आगळी,
बचाव करण्या शत्रू पासूनी ।
सावध असतां जीव जीवाणू,
मारू न शकते त्याला कुणी ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
नाच ग घुमा
नाच ग घुमा
कशी मी नाचू
ह्या गावचा त्या गावचा
ऑर्केस्ट्रा नाही आला
रिदम नाही मला
कशी मी नाचू
ह्या कोपर्यावरचा
त्या कोपर्यावरचा
टेलर नाही खुला
नवा ड्रेस नाही मला
कशी मी नाचू
ह्या रोडचा त्या रोडचा
पार्लर नाही खुला
मेकप नाही मला
कशी मी नाचू
ह्या गावचा त्या गावचा
शूमार्ट नाही खुला
बूट नाहीत मला
कशी मी नाचू
चढत्या रात्री द्रव सोनेरी ।
चषकांमधली नशा बिलंदर ।
मंद सानुली ज्योत सांगते ।
हे नच अपुले नवसंवत्सर ।।
थाट चालतो माठ जिवांचा ।
किनाऱ्यावरी गर्दी कलंदर ।
पश्चिमेकडे झुकता झुकता ।
दिशादिशांतील वाढे अंतर ।।
उगा कशाला सदा वाहता ।
दास्यवृत्तीची मढी खांद्यावर ।
रूढी तोडुनी गढी गाडता ।
अभिमानाने फुलेल अंबर ।।
ब्रह्मध्वज हा तुमचा अमुचा ।
चैत्र पाऊली येई निरंतर ।
सरता तम , हे उजाडेल मग ।
सूर्य उद्याचा असेल सुंदर ।।
रचना : डॉ . श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी
९४२३८७५८०६
Copyright © 2025 | Marathisrushti