कृष्ण कमळ –
प्रभूंनी बँक काढली उघडा खाते
ठेवा पूंजी आपली आणा सुख जीवनाते ।।१।।
जेवढे गुंतवाल मिळेल व्याजा सहित
दरा विषयीं तो आहे अगणित ।।२।।
ही बँकच न्यारी तुम्हां न दिसेल कोठे
धुंडाळूं नका संसारी होईल दुःख मोठे ।।३।।
पाप पुण्याची ठेव जमा करिते बँक
जसा असेल भाव तशी देईल सुख दुःख ।।४।।
गरज पडतां धन मिळणे हे आपल्याच हातीं
परि कामीं येणें पुण्य हें प्रभूचे इच्छांती ।।५।।
जमता पुण्याच्या राशी चांगली कर्मे करुनी
नाते जडतां ईश्वरासी जाल तुम्हीं उद्धरुनी ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
पहाट झाली,
चिव चिवते चिमणी
उमज येईना,
उठविले तिजला कोणी.....१,
आई आहे कां ?
जी उठवी शाळेसाठी,
गुदगुदल्या करूनी
कुरवाळिते हळूंच पाठी....२,
घड्याळ उठवी
घण घण करूनी नाद
घरट्यामधुनी,
नाही ऐकला असा निनाद.'..३,
' उषाराणी येते,
साऱ्यांची आई बनूनी
प्रेमानें मोडी झोंप,
नाजूक करकमलांनी.....४,
घड्याळ आमचे,
दवबिंदू पडतां पानावरूनी
चाळविती निद्रा,
टपटप आवाज करूनी' .....५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
ही कविता एका मुलीच्या जीवनातील विविध आव्हाने आणि समाजाच्या अपेक्षांचे दर्शन घडवते. मुलीला तिच्या कृतींमध्ये संतुलन साधावे लागते. जास्त बोलल्यास उद्घट आणि कमी बोलल्यास शांत समजले जाते. हसल्यास उसे अनाड, तर कमी हसल्यास संस्कारी मानले जाते. स्वावलंबी बनल्यास गर्विष्ठ, अवलंबून राहिल्यास अबला म्हणून पाहिले जाते. तिच्या स्वप्नांच्या मागे धावल्यास बंधन आणि पुरुषप्रधानतेला आव्हान दिल्यास अहंकारी समजले जाते. समाजाच्या विविध नियमांनुसार वागले तरी तिला मर्यादित मानले जाते. हे सगळे एकत्र सांभाळून जगणे, मुलीचे जीवन इतके सोपे नाही. ही कविता एका मुलीच्या जीवनातील विविध आव्हाने आणि समाजाच्या अपेक्षांचे दर्शन घडवते. मुलीला तिच्या कृतींमध्ये संतुलन साधावे लागते. जास्त बोलल्यास उद्घट आणि कमी बोलल्यास शांत समजले जाते. हसल्यास उसे अनाड, तर कमी हसल्यास संस्कारी मानले जाते. स्वावलंबी बनल्यास गर्विष्ठ, अवलंबून राहिल्यास अबला म्हणून पाहिले जाते. तिच्या स्वप्नांच्या मागे धावल्यास बंधन आणि पुरुषप्रधानतेला आव्हान दिल्यास अहंकारी समजले जाते. समाजाच्या विविध नियमांनुसार वागले तरी तिला मर्यादित मानले जाते. हे सगळे एकत्र सांभाळून जगणे, मुलीचे जीवन इतके सोपे नाही. ही कविता एका मुलीच्या जीवनातील विविध आव्हाने आणि समाजाच्या अपेक्षांचे दर्शन घडवते. मुलीला तिच्या कृतींमध्ये संतुलन साधावे लागते. जास्त बोलल्यास उद्घट आणि कमी बोलल्यास शांत समजले जाते. हसल्यास उसे अनाड, तर कमी हसल्यास संस्कारी मानले जाते. स्वावलंबी बनल्यास गर्विष्ठ, अवलंबून राहिल्यास अबला म्हणून पाहिले जाते. तिच्या स्वप्नांच्या मागे धावल्यास बंधन आणि पुरुषप्रधानतेला आव्हान दिल्यास अहंकारी समजले जाते. समाजाच्या विविध नियमांनुसार वागले तरी तिला मर्यादित मानले जाते. हे सगळे एकत्र सांभाळून जगणे, मुलीचे जीवन इतके सोपे नाही. एका मुलीच्या जीवनातील विविध आव्हाने, समाजाच्या अपेक्षा आणि तिच्या स्वतंत्रतेच्या संघर्षाचे चित्रण केले आहे. तिच्या प्रत्येक कृतीला समाजाच्या विविध दृष्टिकोनातून कसं पाहिलं जातं, हे स्पष्टपणे व्यक्त केले आहे
नाव आहे गाव आहे ....आणखी का जोडणे रे ?
साम आहे दाम आहे.....आणखी का ओढणे रे ?
माणसांनी माणसाला वाटले आपापल्यापरि
जात आहे , पात आहे.....आणखी का तोडणे रे ?
राहण्याला झोपण्याला पाहिजे जागा किती तर
दोन आहे,चार पाहे......आणखी का लोढणे रे ?
केवढ्या चालीरिती ....चाली दलालांच्या असे या
शाप आहे ,पाप आहे.....आणखी का खोडणे रे ?
देवळे जास्तीच झाली आन मार्गावर नमाजहि
राम आहे,रहिम आहे......आणखी का पूजणे रे ?
#कौशल (श्रीकान्त पेटकर )
व्योमगंगा.....व्रुत्त
गालगागा गालगागा गालगागा गालगागा
नवरा-बायकोच्या नात्यांची अलगद गुंफण करणारी कविता काल वाचनात आली.
आईबापाच्या सेवेमध्यें, पुंडलीक रंगला
उभा विठ्ठल दारावरती, हेच तो विसरला ।।धृ।।
आईबाप हे दैवत ज्याचे
रुप पाही त्यांच्यात प्रभूचे
सेवा करीत आनंद लूटतां, तल्लीन जो जहला ।।१।।
उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला
निद्रेमध्यें असतां दोघे
मांडी देऊनी आपण जागे
कशी मोडू मी झोप तयांची, प्रश्न विचारी भगवंताला ।।२।।
उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला
विट देवूनी विठ्ठलासाठीं
उभे केले त्या जगत्जेठी
आपण गेला घेवून त्यांना, स्नानाकरिता चंद्रभागेला ।।३।।
उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला
आठ्ठाविस युगे गेली उलटूनी
कटीवरती हात ठेवूनी
पांडूरंग बघे वाट तयांची, भक्तितच जे विसरती जगाला ।।४।।
उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail – bknagapurkar@gmail.com
-- डॉ. भगवान केशवराव नागापूरकर
आकाशातील चंद्र
आकाशातील चंद्र एकदा अचानक लपूनच बसला
वेड्यासारखा मी त्याला रात्रभर शोधला
Copyright © 2025 | Marathisrushti