ऑफिस रूटीन नेहमीप्रमाणे चालू होते. पहिल्याच आठवड्यात मी अल्पर्टनला जाउन तिथलं सिम घेतलं होतं. त्यामुळे आता माझ्याकडे मोबाईल होता. हळू हळू तिथे आसपास राहणाऱ्या आणि आमच्या कलिग्ज् बरोबर काम करणाऱ्या इतर लोकांशी, कुटुंबीयांशी ओळखी झाल्या.
दया प्रेम हे भाव मनी, जागृत कर तू भगवंता
तुला जाणण्या कामी येईल, हृदयामधली आद्रता
शुश्क मन हे कुणा न जाणे, धगधगणारे राही सदा
शोधत असता ओलावा हा, निराश होई अनेकदा
पाझर फुटण्या प्रेमाचा तो, भाव लागती एक वटूनी
उचंबळणारे ह्रदय तेथे, चटकन येईल मग दाटूनी
दया प्रेम या भावांमध्ये, दडला आहे ईश्वर तो
मनांत येता हेच भाव ते, दर्शन त्याचे घडवूनी जातो
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
मी प्रेमात पडलो
की फक्त कविता लिहतो
पप्रेमाच्या नशेत...
नशा उतरल्यावर
तिच्या प्रेमाची
त्या एकदा वाचून बघतो...
तेव्हा मला कळत
मी नशेतही
बराच शुद्धीत असतो...
माझा प्रेमभंग
झाल्यावरही
मी फक्त कविताच लिहतो...
पण तेव्हा मी
पूर्ण शुद्धीत असतो...
माझ्या कविता
सतत वाचणाऱ्यानां
माझं प्रेमात पडणं
कधीच कळत नाही
पण माझा प्रेमभंग
मात्र लगेच कळतो...
माझ्या कविता
तिला कळतात
पण वळत नाहीत
म्हणून मी लिहतो...
ती कवितेत
भिजत राहते
मी कवितांचा पाऊस
पाडत राहतो...
कवी - निलेश बामणे ( बी डी एन )
शांत नितळ सागरातलं वादळ तसा तुझा बासरीचा सूर..
घनगंभीर तरी मोहक, व्ययातील तारकामंडलाला व्यापणारा...
कोटी स्वर भास्करांचा महामेरू सहज पेलणारा...
कित्येक युगांची तृषा जागवणारा...
माझ्या स्पदनांनी ही अंतराय निर्माण करणारा...
मंञमुग्ध करणं ही जादूगिरी तुझी..
त्या अनवट स्वरांवर अलवार हींदोळे
घेणं भाग्य जन्मांतरीच...
कुठे शोधायचं तुला?कसं रोखायचं स्वतः ला..?
पापण्यांचे कवडसे एकदा तरी खुले कर....
प्रत्येक वेळा मीच का हृदयात बंदीस्त करायचं तुला..?
सौ.लीना देशपांडे.
29/7/18-10.30
एकलव्यापरीं शिकलो विद्या, गुरुद्रोणा विना ।
काव्यामधल्या जाणून घेतल्या, साऱ्या खाणाखुणा ।।१।।
शोधू लागलो प्रथम गुरुला, पद्य रचनेसाठीं ।
कुणी न शिकवी कला श्रेष्ठ ही, राहून माझे पाठी ।।२।।
उठत होती भाव तरंगे, अन आकाशी भिडती ।
शब्दांनी परि पकड न येता, निष्टूनी ती जाती ।।३।।
मार्गदर्शक तो भेटत नाही, खंत लागे मना आता ।
व्याकूळ झाला जीव बघूनी, मनाची ही दुर्बलता ।।४।।
गोविंदाग्रज नि केशवसूत, आणिक ग.दि.मा. ।
तांबे- बोरकर- यशवंत, सर्वजण आले कामा ।।५।।
ग्रंथ तयांचे सारे जमवूनीं, एकत्र ठेवियले ।
शब्द भावना यांची सांगड, मन घालू लागले ।।६।।
द्रोण मूर्तिपरी भासूं लागली, त्यांची ग्रंथ संपदा ।
काव्यामधली स्फूर्ति मिळूनी, आनंदी झालो सदा ।।७।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
देणाऱ्याने देत जावे
घेणाऱ्याने घेत जावे ॥ धृ ॥
सत्तेवरल्या मंत्र्याकडून
भले मोठे पोट घ्यावे
मऊ मऊ खुर्चीसाठी
डावपेच त्यांचेच खेळावे ॥ १ ॥
गरीबशा लोकांकडून
गरीबीची दु:खे घ्यावी
पोटातल्या आगीसाठी
हातचलाखी शिकावी ॥ २ ॥
भडकलेल्या आगीवरुन
तडकण्याचा गुण घ्यावा
भरलेल्याशा 'खिशा'कडून
आपला तेवढा 'हप्ता' खावा ॥ ३ ॥
मेलेल्याने मरत रहावे
खाणाऱ्याने खात जावे
नरकातल्या जागेविषयी
'खाऊबा'ने निश्चिंत रहावे ॥ ४ ॥
(कवी विंदा करंदीकरांची 'देता' कविता, जी आमच्या शालेय अभ्यासक्रमात होती, ती प्रस्तुत कवितेची स्फूर्ती आहे.)
-यतीन सामंत
ऋणानुबंध या कविता संग्रहातून
(१९७४)
दुष्काळ आणि पाणीटंचाईने पोळणाऱ्या महाराष्ट्राला जलसमृद्ध करण्यासाठी सुधाकरराव नाईक यांनी जलक्रांतीची बिजे रोवली. स्वतंत्र जलसंधारण खाते निर्माण करून जलसंधारणाच्या कामांना गती देत राज्याला जलसमृद्धीची दिशा दिली. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांचा स्मृतिदिन "जलसंधारण दिन' म्हणून महाराष्ट्र शासन राज्यभर साजरा करते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
आमचं अन्न, आमची माती
आमचं धान्य, आमची शेती
कळेनाच कोणालासुद्धा
कुठून कोठे जाती !
-
आमच्या विहिरी, आमच्या सरिता,
आमचे निर्झर अन् सरोवरें
पडतिल कधि कोरडेठाक हे,
कोणां ना ठाऊकच रे !
-
वितळतील कां नद्या हिमाच्या
चढेल वरवर सागर-पाणी ?
बुडतिल कां काठाची शहरें ?
विचार हृदयीं कंपन आणी !
-
‘घडलें नाहीं असें आजवर
म्हणुनच, ना घडणार उद्याही’,
व्यर्थच आहे सें बोलणें
घटित उद्या कळणारच नाहीं !
-
ज़रा बघा रे होउन जागे,
भूमातेच्या नयनीं पाणी,
‘मला वाचवा’, भिक्षा मागे,
‘तऽरच टिकेल मनुष्यप्राणी’ !
*
आपली माणसं, आपली नाती
हलवुन उठवूया सर्वांना
पिढ्या-उद्याच्या ज़गण्यांसाठी
जिवंत ठेवूं पर्यावरणा .
- सुभाष स. नाईक
आठविते ते सारे आता
स्मृतींचीही कमाल आहे
गात्रे जरी झाली मलुल
मन, मात्र उत्साही आहे
अनुभवलेले जीवन सारे
जपुन पाऊले टाकित आहे
काय मिळाले अन हरविले
आता विसरून गेलो आहे
घडायाचे ते ते घडूनी गेले
अजूनी काय घडणार आहे
अंतरात वादळ गतस्मृतींचे
आज मात्र घोंगावते आहे
ललाटीच्या त्या रेषा साऱ्या
संचिताचे भगवंती दान आहे
आता व्हावे केवळ अंतर्मुख
विरक्तित खरा आनंद आहे
-- वि. ग. सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र.१४२.
२६ - ५ - २०२२.
पुण्यामधलंच स्थळ हवं ।
मुंबईला सेकंड ऑप्शन ।
लिकर पी कर विकएन्ड ।
लाईफसाठी हीच कॅप्शन ।।
शनवारवाडा , वैशाली हे ।
आऊटडेटेड झाले पॉईंट्स ।
गोल ऍचिव्ह करण्यासाठी ।
शोधते मी नव्या हाईट्स ।।
मल्टिप्लेक्स , मॉल मध्ये ।
टाईमपास भारी होतो ।
सिंहगड पर्वतीवर ।
आता कोण जातो येतो ?
फेबु ट्विटर मेसेंजरवर ।
अपडेट्सचा धूर अन् जाळ ।
मेमरी होते फुल तरीही ।
नेटवरचा येतोच गाळ ।।
जेवण घरचं बेचव सालं ।
हवा यार पिझ्झा बर्गर ।
पब क्लब डान्सफ्लोअर ।
सच तो है ये हुक्का पार्लर ।।
बाईकवरची नशाच न्यारी ।
गच्च धरावं बॉयफ्रेंडला ।
तोंडावरती स्कार्फ बांधून ।
थेट घुसावं लॉंग ड्राइव्हला ।।
चॅटिंग डेटिंग करण्यासाठी ।
फार्म हाऊस पॅकेजवाली ।
ब्रेकअप , पॅचअप इव्हेंट्ससाठी ।
तिथेच होते पार्टी ओली ।।
ऑनलाइन मिटिंगमधल्या ।
पोझिशन्स अँड कमिटमेंट्स ।
एमबीए चं येडं पकवतं ।
रिझल्ट्स, मॉरल , एटिकेट्स ।।
स्थळाला दे होकार बये ।
आई रडते रोज घरी ।
' वय वाढतं ' बोअर करते ।
पॅनिक होते घरीदारी ।।
नकोच मुलं , नकोच नाती ।
डस्टबीन्स तर नकोच घरी ।
ऑकेजनली ड्रग्ज साठी ।
लिव्ह इन चा ऑप्शन भारी ।।
चौकट नको , स्पेस हवी ।
त्यासाठीच तर धावाधाव ।
माझं पॅकेज , माझं शहर ।
मीच ठरविन , माझी हाव ।।
* * * *
पस्तिसाव्या वाढदिवशी ।
कुणी नाही विश केलं ।
अजून तिला कळलं नाही ।
क्षितीज किती दूर गेलं ।।
अजून तिला वाटत राहतं ।
पुण्यामधलंच स्थळ हवं ।
आरसा हसतो हळूच गाली ।
तिला नसतं भान नवं ।।
- डॉ. श्रीकृष्ण जोशी, रत्नागिरी
Copyright © 2025 | Marathisrushti