लग्नाचा पन्नासावा वाढदिवस

पन्नास वर्षे एकत्र नांदलो
आयुष्यातील मार्गप्रवाही
कसा काळ निघुनी गेला
केव्हांच समजले नाही ।।१।।

काळ विसरलो, वेळ न विसरे
क्षणाक्षणाच्या प्रसंगाची
सुखदुःखानी भरलेल्या
अनेक अशा घटनांची ।।२।।

सैल झाला जीवन गुंता
कधीतो गेला आवळूनी
उकलणार नाही कधीच तो
जाणीव आली मनी ।।३।।

हेच असेल विधी लिखित
जिंकणे वा हारणे
आयुष्याचा मार्ग खडतर
समजुनी त्याला घेणे ।।४।।

सुख अथवा दुःखमय लहरी
विचारांच्या चेतना
मीच करतो, मीच अनुभवतो
हीच दैवी योजना ।।५।।

तुटू न देता आयुष्य दोर
जगणे व्हावे वर्षे शंभर
असेच जगु एकत्र मिळूनी
काळ चालतो भराभर ।।६।।

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com



पन्नास वर्षे एकत्र नांदलो
आयुष्यातील मार्गप्रवाही
कसा काळ निघुनी गेला
केव्हांच समजले नाही ।।१।।

काळ विसरलो, वेळ न विसरे
क्षणाक्षणाच्या प्रसंगाची
सुखदुःखानी भरलेल्या
अनेक अशा घटनांची ।।२।।

सैल झाला जीवन गुंता
कधीतो गेला आवळूनी
उकलणार नाही कधीच तो
जाणीव आली मनी ।।३।।

हेच असेल विधी लिखित
जिंकणे वा हारणे
आयुष्याचा मार्ग खडतर
समजुनी त्याला घेणे ।।४।।

सुख अथवा दुःखमय लहरी
विचारांच्या चेतना
मीच करतो, मीच अनुभवतो
हीच दैवी योजना ।।५।।

तुटू न देता आयुष्य दोर
जगणे व्हावे वर्षे शंभर
असेच जगु एकत्र मिळूनी
काळ चालतो भराभर ।।६।।

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

Author