धागा धागा मिळून,
बांधले,खास घरटे,
फांदीचा आधार घेऊन,
उभ्या झाडास लटकवले,
एक चोंच करी किमया,
केवढी मोठी कारागिरी,
पिल्लांस सुरक्षित करण्यां,
माय बापाची चाले हेरगिरी,
घर मोठे प्रशस्त हवेशीर,
वारा चारी बाजूंनी वाहे,
निसर्ग सान्निध्यातले,
वाटते मोठे आरामशीर,
अंडी घालून ती उबवती,
वाट जन्माची पाहती,
कारागीरच ते नव्या उमेदी,
दार घरट्याचे असे बांधले,
सहजी कोणी उतरू नये,
पण साप नागांचा दहशतीने,
रक्षणास तत्पर दोन पाखरे,
चहूबाजूंनी घरट्याला चौकोनी,
असे जाळीदार नक्षी,
आखीवरेखीव जाळ्याला ,
केले कसे त्रिशंकूकृती ,
दुनिया सारी घरातच वसे,
संसार मांडला आगळा,
समर्थ नर मादी दोघे,
परंतु नशिबाचा खेळ वेगळा,--!
हिमगौरी कर्वे.©
मग्न राही सतत आपल्याच कामीं
अन्नासाठी तूं फिरे दाही दिशानी १
जमवितेस कणकण एकत्र करुनी
दूर द्दष्टीचा स्वभाव दिला तुज कुणी २
सुंदर तुझी वास्तूकला वारुळ केले छान
सहस्त्रांच्या संखे राहतेस आनंदानं ३
कष्ट करण्याचा गुण दाखवी साऱ्याना
कष्टाला पर्याय नसे ह्या जीवना ४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
प्रेम म्हणजे चांगूलपणा कळणं असतं
प्रेम म्हणजे सुखी स्व—जिवाला उगीचंच छळणं असतं !
प्रेम म्हणजे तिने हाय म्हणताच कळवळणं असतं
प्रेम म्हणजे तिने बाय म्हणताच तळमळणं असतं !
प्रेम म्हणजे उगीचंच तिच्यामागे पळणं असतं
प्रेम म्हणजे बोलायच्या वेळीच बोबडी वळणं असतं !
प्रेम म्हणजे खिसा रिकामा होईस्तोवर पिळणं असतं
प्रेम म्हणजे अापण मित्रंच अाहोत हा मूग गिळणं असतं !
प्रेम म्हणजे अापल्या भावना अंतापर्यंत पाळणं असतं
प्रेम म्हणजे स्मितातून नेमका विशाद गाळणं असतं !
प्रेम म्हणजे अावडतीला परकी , पण सुखी पहाणं असतं
प्रेम म्हणजे मिळालेल्या माणसाची अावड जपणं असतं !
प्रेम म्हणजे मधुबालाचं निर्व्याज हसणं असतं
अाणि.....
प्रेम म्हणजे बायकोच अापली मधुबाला हे असणं असतं !
कवी : उदय गंगाधर सप्रेम
ठाणे
WhatsApp वरील संजीव वेलणकर यांच्या संगीत संगीत आणि फक्त संगीत या ग्रुप वर आलेली कविता साभार प्रकाशित
विश्वास माझा तव चरणी, भाव अपिर्तो तुझ्यावरी,
जगदंबे अवती-भवती, राहून माझे रक्षण करी ... ।। ध्रु ।।
सावध नसे निद्रेच्या काळी, धीर देते राहूनी जवळी,
झोपेमध्ये जगा विसरता, सर्ववेळी तू जाग्रण करी...।।१।।
जगदंबे अवती –भवती, राहून माझे रक्षण करी,
धावपळीत चाले जीवन, संकट भोवऱ्यात फिरून
दुर्घटनेची चाहूल देवून, मनास आमच्या दक्ष करी...२
जगदंबे अवती -भवती राहून माझे रक्षण करी,
पसरता दु:खाचा सागर, सुख रत्ने कशी शोधणार,
किरण दाखवून आशेचे, दु:ख आमचे दूर करी...३,
जगदंबे अवती –भवती, राहून माझे रक्षण करी
अगणित प्रश्न संसाराचे, कसे करू उकलन त्यांचे,
सोडविण्यासाठी सारे प्रश्न, मदत आम्हांला तूच करी..४,
जगदंबे अवती –भवती, राहून माझे रक्षण करी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
माहोल हा प्रसन्नतेचा
तृप्त! कृतार्थ लोचने
आभाळ सप्तरंगलेले
ब्रह्माण्ड! सारे देखणे।
मनांतरी, मीरा! राधा!
कृष्ण! कृष्ण! अंतरी
हृदयांतरी, माधुर्यभक्ती
मंत्रमुग्ध! नाद सुस्वरी।
निरभ्र! या निलांबरी
लपंडाव, भास्कराचा
साक्षी! लोभस निसर्ग
खेळ हाच दयाघनाचा।
रूप! निरागस निर्मल
भाव! मधुरम मधुरम
नेत्री कनवाळू कैवल्य
मुक्ती मोक्षाचा सागर।
सांजआभाळ, तुष्टलेले
मेघ आठवांचेच लोचनी
भास! सोज्ज्वळ हृदयी
ब्रह्मानंदी सोहळा जीवनी।
-- वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. १५५.
१७ - १२ - २०२१.
गर्दी गर्दी गर्दी,
सर्वत्र त्रस्त करून टाकणारी गर्दी.
गर्दीला पांगविण्याची, कला मला सापडली
वही घेवून संग्रहातील कविता मी वाचली
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
ही दया कुणाची झाली, सापडे शब्दांचा झरा,
उपसतो जरी सतत, होत नसे निचरा....१,
गोड पाणी शब्दांचे, ओठी अमृत वाटे,
पेला भरता काठोकाठ, काव्य हृदयी उमटे....२,
पेला पेला जमवूनी, कलश भरून आला,
नाहून जाता त्यात, देह भान विसरला....३,
सांडता पाणी वाहे, पसरते चोहीकडे,
आस्वाद घेई जो जो, विसर जगाचा पडे....४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
प्रभा मुळे यांची एक बालकविता…
कोकणातलो पाऊस मिरगाचो
बांधावर बळी नारळ कोंब्याचो
पेरणीचे दिवस इले
शेतकरी कामाक लागले
पावस इलो कोपऱ्यात
मांगराच्या पत्र्यात, अळवाच्या पानात
मनाचो झोपाळो झुललो
मातयेच्या वासान, नाच नाचान गेलो
म्हातारी आजी, भाजता काजी,
आता रूजतली कुरडू भाजी
कोपऱ्यात, व्हाळात माझे चढले
राजो, सोनो आक्या घेवन धावले
बघता बघता सांज झाली,
कोकणातल्या पावसाक सुरवात झाली
- आर्या सापळे
इयत्ता तिसरी जि.प. शाळा नं. 5, हरकूळ बुद्रुक,
ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग.
9423513604
Copyright © 2025 | Marathisrushti