(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • तारकांचे पुंज माळून

    तारकांचे पुंज माळून, वाटते तुझ्या कवेत यावे,
    दुःखांच्या आभाळीही,
    मुक्त बघ जरा हिंडावे,--!!!

    घायाळ जीव तो आंत आंत,
    तो कोणा कसा कळावा,-? आत्म्यानेच आत्म्याला,
    दिलासा कसा कुशीत द्यावा,--!!

    ओढ नसावी शरीरातून,
    असावी प्रीत मनामनांची,
    धागे एकमेकांत गुंफत,
    वीण गुंतावी काळजांची,--!!!

    तुझे दुःख माझ्या उरात सले,
    माझे व्हावे ना रे तुझे,
    अश्रू माझे गाली सांडताना,
    राजा,अंतर मात्र तुझे उले,--!!!

    बंबाळलेली दोन्ही हृदये,
    हाक परस्परांना देती,
    प्रेमावाचून संकेतांची,
    ताकदवान भाषा कोणती,--!!!

    दुनिया केवढी निष्ठूर असे, निरपराधास शासन मिळे,
    जो करतो काम प्रामाणिक,
    त्याची कदर ठेवत नसे,--!!!

    हुंदके दाबून ठेवलेले,
    तुझ्या मिठीतच सांडावे, सामर्थ्यशाली बाहू तुझे,
    वाटते मला भोवती असावे,-

    जग तूच केवळ माझे,
    तुझ्या सुखी जर आंच येते,
    टेकडीसमान खंबीर मी, कोसळल्यागत पाहत राहते,--!!!

    मिलन व्हावे दोन जिवांचे, एकरूपता अशी यावी,
    तुझ्या मिठीत मरण सुखे एकमेव आंस माझ्या हृदयी,--!!!

    शृंगाराची पूजा निव्वळ,
    वासनेचा लवलेश नसे,
    मुक्त त्या प्रणयक्रिडांत,
    प्रेम ओतप्रोत असे,--!!!

    तुझे भरले डोळे पुसुनी,
    त्यावर ओठ टेकत आपुले,
    दुःखच सारे घेईन पिऊनी,
    खुशाल जगास मग झिडकारले,--!!

    © हिमगौरी कर्वे

  • संत संगती

    ललाटी ज्यांच्या जे जे लिहिले,

    संत जाणती दिव्य दृष्टीने,

    नियतीच्या ह्या हलचालींना,

    दिली जाती आवाहने ।।१।।

    जाणून घेता भविष्यवाणी,

    जीवन मार्ग हे ज्यांना कळती,

    तपशक्तीने संत महात्मे,

    योग्य मार्ग ते दाखवूनी देती ।।२।।

    कर्माने जरी भाग्य ठरते,

    सुख दुखःच्या गुंत्या भोवती,

    त्या गुंत्यातील धागा शोधूनी,

    सुसाह्य त्याचे जीवन करीती ।।३।।

    कृपा होता संत जनाची,

    चुकला-मुकला जाई ठिकाणी,

    घनदाट त्या जंगलामधली,

    पाऊलवाट ते देई दाखवूनी ।।४।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • मतदार

    झालो मी अठरा वर्षांचा

    म्हणुन मिळे अधिकार नामी.

    मत देण्याचा.

    या दिवशी मी आहे राजा

    ताजा ताजा.

    उलथिन मी नेत्यांची तख्तें

    बदलिन मी नावांचे तक्ते.

    -

    तख़्त - सिहासन

    -- सुभाष स. नाईक

  • पल्याड नेते कधी कधी..

    स्वामी निश्चलानंदांची एक कविता

  • आयुष्य लढा

    चोखपणे तू हिशोब राहू दे, आपल्या जीवन कर्माचा

    कुण्याही क्षणी पाढा वाचणे, भाग बनेल तो नशीबाचा...१

    घीरट्या घालीत फिरत राही, आवतीभवती काळ

    क्षणात टिपून उचलून घेतो, साधूनी घेता अवचित वेळ..२

    सदैव तुमच्या देहाभवती, त्या देहाचे कर्मही फिरते

    आत्मा जाता शरीरही जाई, कर्मवलय परि येथेच घुमते....३

    पडसाद उमटती त्या कर्माचे, सभोवतालच्या वातावरणी

    वेचूनी त्यातील भलेबुरे , मागे राहतील विविध आठवणी....४

    हाच हिशोब जीवनाचा, दुजा वाचतो इथेच पाढा

    इतरांसाठी जगता जेव्हां, सार्थकी होतो आयुष्य लढा...५

    -- डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • दुःख

    दुःख असे मानव निर्मित

    जाणती हे सगळे

    परि दुःखात शोक करिती

    हे कुणा न कळे ।।१।।

    आपण कर्म केलेले

    आपणचि भोगतो

    फळ कर्माचे आलेले

    तेच आपण चाखतो ।।२।।

    आहे तुजसी हे ज्ञान

    माहीत सर्वाना

    खंत द्यावी सोडून

    नको दाखवूं भावना ।।३।।

    इतरांसाठीं आहे

    ती भावना उदरीं

    सहानुभूती पाहे

    इतर जनांचे पदरी ।।४।।

    शोक भावना दाखवी

    तुझ्या दुःखाची

    नसतां तुज निर्दयी ठरवी

    हीच भीति जनाची ।।५।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    e-mail- bknagapurkar@gmail.com

  • बाप बाप म्हणजे काय

    बाप बाप म्हणजे काय
    कसा असतो ठाव नाय !

    व्हते मी पाळण्यात जव्हा

    देवा घरी गेला तो तव्हा !

    शेजारला व्हती मैत्रीण चिऊ

    तिचा बाप आणत व्हता खाऊ !

    माला वाटे तिचा हेवा

    मालाबी बाप हवा !

    डोळे माझे पाणावलेले असत
    माय कड जाय मी पुसत !

    तक्रार एकच व्हती माझी , "का नाय माला बी बाप "?

    कुरवाळुनी माय म्हणे
    "मीच तुझी माय मीच तुझा बाप!"

  • जागतिक नागरी संरक्षण दिन

    International Civil Defence Organisation च्या जनरल असेंब्लीमध्ये हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. नागरी संरक्षण म्हणजे देशाच्या, राज्याच्या नागरिकांना हल्ल्यांपासून, मोठ्या संकटांपासून आणि नैसर्गिक आपत्तींपासून बचावणे.

  • जीवन आनंद

    ह्या जीवनाच्या अस्तित्वाचे, ध्येय कोणते खरे ।
    उत्तर याचे कुणा मिळेना, आज पावतो बरे ।।

    संतसाधू आणि ज्ञानीजन, बहूत ते झाले ।
    समाधानी परि एक मताचे, उत्तर नाही दिले ।।

    खेळखेळणे उड्या मारणे, अन् खाणे पिणे ।
    बालपणीच्या आनंदाला, नव्हते काही उणे ।।

    विसरून जाता खेळ उड्या अन् , प्रेम करू लागलो ।
    यौवनाच्या उंबरठ्यावरी, बहरून गेलो ।।

    संसार करिता कळले आम्हा, जीवन दुजासाठी ।
    प्रौढवयाची वर्षे घालविली, समाज सेवेपोटी ।।

    वृद्धत्वाचा काळ येता, ओढ लाभली प्रभूची ।
    आहिक सुख त्याग करुनी, जीवन मुक्तीची ।।

    एक एक ती पायरी चढलो, जीवन शिडीवरी ।
    शोधीत होतो 'आनंद' तेथे, मिळेल काहीतरी ।।

    हर घडीला रूप निराळे, होते आनंदाचे ।
    गुंतले होते संबंध तेथे, तन मनाचे ।।

    ओढ प्रभूची लागली, जेंव्हां थकूनी गेला देह ।
    संसारातील सर्व सुखाचा, निघून गेला मोह ।।

    मृत्यूच्या जवळी जाता, विरून जाईल तमनम ।
    कोठून आला कोठे गेला, याची न येई जाण ।।

    आता त्याचा आनंद कोठे, असेल तो गुंतला ।
    देहमनाचे वेष्टन नव्हते, ज्या घटकेला ।।

    हा तर आहे केवळ ‘आनंद’ दुजा नसे काही ।
    ‘आत्मा’ ‘मुक्ती’ अशा परि यालाच नावे देई ।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • १६ – जीवनपथ सुकर करा

    जीवनपथ सुकर करा गणदेवा हो

    सूखशिखरीं दु:खदरीपासुन न्या हो ।।

    गडबडतो धडपडतो मी, पडतो मी

    बडबडतो कुढतो चिडतो रडतो मी

    अजुन घडा कच्चा, परिपक्व हवा हो ।।

    अंध तरी, वा लोचन बंद करी मी

    मंदबुद्धि आहे, मदमत्त परी मी

    अक्षय प्रज्वलित करा ज्ञानदिवा हो ।।

    नि:पाता माझ्या मनिंची चंचलता

    निश्चल मन होइ, नाम तुमचें घेतां

    विफल-जीवनास मिळे अर्थ नवा हो ।।

    त्यजिन पदीं मदमत्सर विषयवासना

    काम क्रोध लोभ मोह त्यजिन ‘मीपणा’

    होउन कृतकृत्य पूर्ण, त्यजिन भवा हो ।।

    - - -

    भव : जग

    -

    -- सुभाष स. नाईक