(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • प्रितीची नवी ओळख 

    रिमझिम पाऊस आला
    सृष्टी रोमांचित झाली
    प्रेमाच्या वर्षावात
    दोघं होती नहाली

    थोडावेळ एकाच छत्रीत
    दोघं होती चालली
    स्पर्शाला टाळत नंतर
    आडोशाला स्थिरावली

    मी हलकेच नजर
    तिच्याकडे वळवली
    ओल्या गालावरून
    लाज होती घसरली

    सोसाट्याचा वारा तरी
    ती नाही घाबरली
    नकळत थोडीशी
    माझ्या बाजूला सरकली

    थंड वाऱ्याच्या स्पर्शाने
    जरी ती शहारली
    संयमाला टेकून
    हलकेच कुडकुडली

    मध्येच विज कडाडली
    ती नाही बिचकली
    थोडीशी हलली अन्
    कोवळ्या लाजेला बिलगली

    मी हलकेच मनाने
    तिला माझ्याजवळ ओढली
    माझी चलबिचल बघून
    ती नाजुक होती हसली

    कळल नव्हतं दोघांना
    ओढ ही कसली
    पण प्रितीला प्रितीची
    नव्याने ओळख पटली

    • डॉ.सुभाष कटकदौंड

  • एक अजून साल

    घालून पोतडीत
    काळ उगा धावतो आहे
    किती राहिली किती गेली
    याचा हिशेब मांडतो आहे
    एक सोनेरी आशा
    उद्या म्हणून
    वेडा जीव सुखावतो आहे
    उद्या कधीही येत नसतो
    आज हाच रोज उगवतो आहे
    एकेक क्षण
    प्रत्येकाच्या सुखदुःखाचा
    सोबतीनं वाहतो आहे
    हो प्रवाही सरितेसारखा
    डबक्यात बेडके चिकार आहेत
    एकेक दिस असा
    जगून घे
    जसा आज हाच अंत आहे
    लेऊन तारुण्य सळसळते
    वय हा फक्त आकडा आहे!!
    वय हा फक्त आकडा आहे!!
    -- वर्षा कदम.
  • भावना उद्‍वेग

    आकाशाला शब्द भिडले, हृदयामधले
    भाव मनीचे चेतविता, स्फोटक जे बनले

    देह जपतो हृदयाला, सदा सर्व काळी
    धडकन त्या हृदयाची, असे आगळी

    जमे भावना हलके तेथे, एकवटूनी
    सुरंग लागता तीच येई, उफाळूनी

    कंठ दाटता जीव गुदमरे आत
    रंग बदलती चेहऱ्यावरले, काही क्षणात

    उद्‌वेग बघूनी शरिर, कंपीत होते
    हृदयातील भाव जावूनी, मन हलके होते

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०

  • संतुलन

    बागेतील तारका-

  • तिच्याबद्दल त्याला

    तिच्याबद्दल त्याला
    आकर्षण खरे तर आधी
    नव्हते...पण काळानुरूप
    ते निर्माण झाले...
    अर्थात हे तुमच्या-आमच्या
    बाबतीत घडू शकते
    तसे त्याच्या बाबतीत घडले
    तिच्या बाबतीतही तसेच झाले....
    लहानपणी अनाहूतपणे
    बांधलेल्या राख्या आठवल्या
    वास्तविक पहाता ते दोघे
    सख्खे शेजारी....
    पण त्यांचे प्रेम जमले
    लहानपणीचा मूर्खपणा
    त्यांना जेव्हा आठवतो तेव्हा
    ते दोघे गंभीर होतात
    पण एकवेळ अशी येते
    त्या मूर्खपणाचे हसू ही येते...
    आणि मग प्रवास परत
    शांतपणे सुरु होतो...
    -- सतीश चाफेकर.
  • सत्य, अहिंसा, साधी राहणी

    सत्य, अहिंसा, साधी राहणी, . महात्मा गांधींची विचारसरणी तत्वांची सगळ्या किती हेटाळणी, ‌ कोण आणतो सांगा आचरणी, --!!!

    असत्याच्या आधाराने,
    हिंसक, मारक, वर्चस्वाने,
    वागतात पोकळ दिमाखाने, राष्ट्रपुरूषाची मनोरथे"च निराळी,-!

    स्वातंत्र्याचा वाईट अर्थ,
    सगळे स्वैराचाराचे भक्त,
    माणसाचे वागणे नि:सत्व,
    गांधींच्या तत्वांना तडा जाई,--!!

    सोदाहरणाने राष्ट्रपित्याने, स्वच्छतेचा मार्ग शिकवला,
    आम्ही घाणीच्या बुजबुजाटाने,
    समतोल निसर्गाचा बिघडवला,-!
    घर , गाव शहर परिसरां,
    "अस्वच्छ" बघा किती ठेविती,--!!!

    बोलू बघू ऐकू नका ,
    असे सांगती तीन माकडे,
    कोण पाळते तत्त्वांना या,
    गिरवती अनिती"चेच धडे,
    माणूस म्हणुनी माणसाला,
    किंमत मुळी ना देती,--!!!

    हिमगौरी कर्वे.

  • सुरवातीला तिच्या माझ्यात

    सुरवातीला तिच्या माझ्यात
    काहीच अंतर नव्हते...
    पण ते कधी निर्माण
    व्हायला सुरवात झाली
    हे लक्षातच आले नाही...
    लक्षात आले तेव्हा
    बऱ्यापैकी होते
    मग मात्र..
    ताण जाणवयाला लागला
    रबर कोण हेच काही
    कळेना...
    दोघेही दोन टोके
    सोडत नव्हते..
    शेवटी कुणीतरी ते सोडलेच
    परत शांत झाले
    वादळे पेल्यातच राहिली...
    अंतर कमी झाले नाही
    पण जास्तही झाले नाही..
    आत्ता सगळे आलबेल आहे....

    -- सतीश चाफेकर.

  • पाऊस गातो गाणे

    vinod_11

  • साले म्हणू नका

    ताल नाही तंत्र नाही
    जिभेवर नाही ताबा
    उठले सुटले भाषण देती
    शेतकऱ्यांनाच दाबा

    कापूस गेला तुर गेली
    कोणीच देईना भाव
    "साले"म्हणून शिव्या देती
    असे का करता राव?

    आम्ही पिकवतो तुम्ही खा
    तक्रार आमची नाही
    चूल पेटेल एवढेच द्या
    जास्त तर मागत नाही

    मोठी झाली लग्नाची
    लहान बारावी पास
    तुरीला मिळेल भाव तर
    काम जमेल हो खास

    कर्जाचा हा डोंगर मोठा
    मी कोसळून जाणार नाही
    संकटाला घाबरून भाऊ
    गळफास घेणार नाही

    एक वात हिमतीची मी
    कष्टाने पेटविलं पुन्हा
    काळ्या आईच्या कुशीत
    बीज उगवून दाखवील तुम्हा

    सत्काराचे चार शब्द
    कधीतरी आम्हा बोला
    भूमिपुत्र म्हणायचा तो
    कधिच काळ गेला

    कष्टाचे चारच रुपये
    वर टीप देऊ नका
    जमलं तर दोन हाना
    पण "साले"म्हणू नका

    रचना-रमाकांत द.मांढरे।
    9657356696

  • पंढरीचा राणा – ९ : मज हवी पंढरीवारी

    यात्रा चारीधाम नको, मज हवी पंढरीवारी
    देवांचाही देव तिथें विठु , भक्तांचा कैवारी ।।

    नेत्र मिटुनही अंत:चक्षू रूप पाहती त्याचें
    झोपेमध्येसुद्धां विठ्ठलमूर्ती नयनीं नाचे
    अखंड विठ्ठलमहिमा गाती या वाचा चत्वारी ।।

    भान हरपलें, पाण हरखले, येतां भीमाकाठा
    मान पळे, अभिमान गळाला, उरला नाहीं ताठा
    पोचे चिन्मय-आनंदाच्या अक्षय मी कोठारीं ।।

    हवी कशाला नश्वर दुनिया, हवी कशाला माया ?
    हवी कशाला पळपळ मनिं भयकारी-मृत्यूछाया ?
    जन्मांच्या चक्रातुन सुटका मिळते विठ्ठलदारीं ।।

    - सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
    सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz(W), Mumbai.
    Ph-Res-(91)-(22)-26105365. M – (91)-9869002126
    eMail : vistainfin@yahoo.co.in
    Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com