रिमझिम पाऊस आला
सृष्टी रोमांचित झाली
प्रेमाच्या वर्षावात
दोघं होती नहाली
थोडावेळ एकाच छत्रीत
दोघं होती चालली
स्पर्शाला टाळत नंतर
आडोशाला स्थिरावली
मी हलकेच नजर
तिच्याकडे वळवली
ओल्या गालावरून
लाज होती घसरली
सोसाट्याचा वारा तरी
ती नाही घाबरली
नकळत थोडीशी
माझ्या बाजूला सरकली
थंड वाऱ्याच्या स्पर्शाने
जरी ती शहारली
संयमाला टेकून
हलकेच कुडकुडली
मध्येच विज कडाडली
ती नाही बिचकली
थोडीशी हलली अन्
कोवळ्या लाजेला बिलगली
मी हलकेच मनाने
तिला माझ्याजवळ ओढली
माझी चलबिचल बघून
ती नाजुक होती हसली
कळल नव्हतं दोघांना
ओढ ही कसली
पण प्रितीला प्रितीची
नव्याने ओळख पटली
आकाशाला शब्द भिडले, हृदयामधले
भाव मनीचे चेतविता, स्फोटक जे बनले
देह जपतो हृदयाला, सदा सर्व काळी
धडकन त्या हृदयाची, असे आगळी
जमे भावना हलके तेथे, एकवटूनी
सुरंग लागता तीच येई, उफाळूनी
कंठ दाटता जीव गुदमरे आत
रंग बदलती चेहऱ्यावरले, काही क्षणात
उद्वेग बघूनी शरिर, कंपीत होते
हृदयातील भाव जावूनी, मन हलके होते
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
बागेतील तारका-
सत्य, अहिंसा, साधी राहणी, . महात्मा गांधींची विचारसरणी तत्वांची सगळ्या किती हेटाळणी, कोण आणतो सांगा आचरणी, --!!!
असत्याच्या आधाराने,
हिंसक, मारक, वर्चस्वाने,
वागतात पोकळ दिमाखाने, राष्ट्रपुरूषाची मनोरथे"च निराळी,-!
स्वातंत्र्याचा वाईट अर्थ,
सगळे स्वैराचाराचे भक्त,
माणसाचे वागणे नि:सत्व,
गांधींच्या तत्वांना तडा जाई,--!!
सोदाहरणाने राष्ट्रपित्याने, स्वच्छतेचा मार्ग शिकवला,
आम्ही घाणीच्या बुजबुजाटाने,
समतोल निसर्गाचा बिघडवला,-!
घर , गाव शहर परिसरां,
"अस्वच्छ" बघा किती ठेविती,--!!!
बोलू बघू ऐकू नका ,
असे सांगती तीन माकडे,
कोण पाळते तत्त्वांना या,
गिरवती अनिती"चेच धडे,
माणूस म्हणुनी माणसाला,
किंमत मुळी ना देती,--!!!
हिमगौरी कर्वे.
सुरवातीला तिच्या माझ्यात
काहीच अंतर नव्हते...
पण ते कधी निर्माण
व्हायला सुरवात झाली
हे लक्षातच आले नाही...
लक्षात आले तेव्हा
बऱ्यापैकी होते
मग मात्र..
ताण जाणवयाला लागला
रबर कोण हेच काही
कळेना...
दोघेही दोन टोके
सोडत नव्हते..
शेवटी कुणीतरी ते सोडलेच
परत शांत झाले
वादळे पेल्यातच राहिली...
अंतर कमी झाले नाही
पण जास्तही झाले नाही..
आत्ता सगळे आलबेल आहे....
-- सतीश चाफेकर.

ताल नाही तंत्र नाही
जिभेवर नाही ताबा
उठले सुटले भाषण देती
शेतकऱ्यांनाच दाबा
कापूस गेला तुर गेली
कोणीच देईना भाव
"साले"म्हणून शिव्या देती
असे का करता राव?
आम्ही पिकवतो तुम्ही खा
तक्रार आमची नाही
चूल पेटेल एवढेच द्या
जास्त तर मागत नाही
मोठी झाली लग्नाची
लहान बारावी पास
तुरीला मिळेल भाव तर
काम जमेल हो खास
कर्जाचा हा डोंगर मोठा
मी कोसळून जाणार नाही
संकटाला घाबरून भाऊ
गळफास घेणार नाही
एक वात हिमतीची मी
कष्टाने पेटविलं पुन्हा
काळ्या आईच्या कुशीत
बीज उगवून दाखवील तुम्हा
सत्काराचे चार शब्द
कधीतरी आम्हा बोला
भूमिपुत्र म्हणायचा तो
कधिच काळ गेला
कष्टाचे चारच रुपये
वर टीप देऊ नका
जमलं तर दोन हाना
पण "साले"म्हणू नका
रचना-रमाकांत द.मांढरे।
9657356696
यात्रा चारीधाम नको, मज हवी पंढरीवारी
देवांचाही देव तिथें विठु , भक्तांचा कैवारी ।।
नेत्र मिटुनही अंत:चक्षू रूप पाहती त्याचें
झोपेमध्येसुद्धां विठ्ठलमूर्ती नयनीं नाचे
अखंड विठ्ठलमहिमा गाती या वाचा चत्वारी ।।
भान हरपलें, पाण हरखले, येतां भीमाकाठा
मान पळे, अभिमान गळाला, उरला नाहीं ताठा
पोचे चिन्मय-आनंदाच्या अक्षय मी कोठारीं ।।
हवी कशाला नश्वर दुनिया, हवी कशाला माया ?
हवी कशाला पळपळ मनिं भयकारी-मृत्यूछाया ?
जन्मांच्या चक्रातुन सुटका मिळते विठ्ठलदारीं ।।
- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz(W), Mumbai.
Ph-Res-(91)-(22)-26105365. M – (91)-9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
Copyright © 2025 | Marathisrushti