ध्यानाने काय साधले
ऐका सगळे लक्ष्य देऊनी
हेच साधले ध्यान लावूनी ।।धृ।।
संसारांत रमलो,मोहांत गुंतलो
सुख दुःखात अडकलो
उकलोनी जीवन कोडे समर्पित झालो प्रभू चरणीं ।।१।।
हेच साधले ध्यान लावूनी
जाई पैशाच्या पाठीं देह सुखासाठीं
समाधानापोटीं
धडपडीतील चुक दिली दाखवूनीं ।।२।।
हेच साधले ध्यान लावूनी
धानाची समज उपदेशिला मज
ऐक मनाचा आवाज
तोड सर्व विचार चित्त एकाग्र करुनी ।।३।।
हेच साधले ध्यान लावूनी
एकाग्रतेची स्थिति ही ध्यानाची शक्ति
समाधान मिळविती
शांत करी मन देई चंचला घालवुनी ।।४।।
हेच साधले ध्यान लावूनी
सुख दुःखाची जाण,तीव्रता कमी करुन
देऊनी तर्क ज्ञान
करी मनाची समज वाढवूनी ।।५।।
हेच साधले ध्यान लावूनी
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
यात्रा चारीधाम नको, मज हवी पंढरीवारी
देवांचाही देव तिथें विठु , भक्तांचा कैवारी ।।
नेत्र मिटुनही अंत:चक्षू रूप पाहती त्याचें
झोपेमध्येसुद्धां विठ्ठलमूर्ती नयनीं नाचे
अखंड विठ्ठलमहिमा गाती या वाचा चत्वारी ।।
भान हरपलें, पाण हरखले, येतां भीमाकाठा
मान पळे, अभिमान गळाला, उरला नाहीं ताठा
पोचे चिन्मय-आनंदाच्या अक्षय मी कोठारीं ।।
हवी कशाला नश्वर दुनिया, हवी कशाला माया ?
हवी कशाला पळपळ मनिं भयकारी-मृत्यूछाया ?
जन्मांच्या चक्रातुन सुटका मिळते विठ्ठलदारीं ।।
- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz(W), Mumbai.
Ph-Res-(91)-(22)-26105365. M – (91)-9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
नाहीं रे मी विसरलो देवा तुजलो
संसारात अडकलो, वेळ ना मिळाला ।।१।।
तूंच गुंतविले, लक्ष्य मोहांत
चित्त देण्या सांगितले, तुझ्याच खेळांत ।।२।।
तुलाची हवे यश, तुझ्या खेळांतले
माझ्या कौशल्यास, तूं मार्गदर्शन केले ।।३।।
तुझ्याच साठीं, गुंतविले मन
बनोनी सोंगटी, फिरे पटावरी ।।४।।
काय दोष माझा, न दिले लक्ष्य मी
खेळवण्यातील मजा, आलो तिला कामीं ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@ gmail.com
पहिला पाऊस मुठीत पकडण्याचा निरर्थक प्रयत्न करत होतो … मुठीत सापडला पण ! निसटलाही अगदी तिच्यासारखा …
मन अथांग सागर, उफाळत्या लाटांचा,
मन आवर्तनी भोवरा,
सखोल पाणथळाचा, --||1||
मन बिंदूंचे अवकाश,
विस्तीर्ण मन पसरट,
भावनांचे उठती कल्लोळ,
अतुल आणि अलोट,--||2||
मन पाण्याचा डोंगर,
एकावर एक पार,
शुभ्रतम* भासे चढ,
*निळसर पण उतार,--||3||
मन किरणी प्रभाव,
झेलत साऱ्या दिनभर,
सोनेरी कलत, झुकत,
आभाळ उदंड त्यावर,--||4||
मन समुद्री वादळ,
वारे अखंड वाहत,
जीवाची नौका चालण्या,
शीड आत्म्याचे उभारत,--||5||
मन माशांचे घर ,
कधी गोंडस कधी घातक,
उत्साही ते खळाळत,
कल्पना-साम्राज्य पूरक,--||6||
मन लाटेवरचे उधाण,
संजीवनी अपार स्त्रोत,
जीवघेण्या केव्हा तुफानात, नयनातून सागरी बरसात,--||7||
मन तुला न कळत,
मन मला न आकळत,
मन मनुजा न गवसत,
उलघाल सगळी अंतरात,--||8||
© हिमगौरी कर्वे
बालकांनी खावा
छान छान मेवा
वाटावा त्यांना
सदा हवा हवा
शाब्दिक मेवा
बुध्दीचा ठेवा
येता-जाता
खावा खावा खावा
मित्र-मैत्रिणींना
द्यावा द्यावा द्यावा
-- सुधा नांदेडकर
चार कविता सुंदर रचिल्या, काव्य वाचन केले त्याचे
रसिक जनाची स्तुति ऐकूनी, स्वप्न रंगविले कालीदासाचे....१,
कॉलेजातील रंगमंचावरी, तल्लीन होवूनी भूमिका केली
टाळ्याचा तो कडकडाट ऐकूनी, नटसम्राटाची आठवण झाली....२,
जमले होते शंभर श्रोते, भाषण ज्यांचे समोर केले
श्रोत्या मधली स्फुर्ति बघूनी, गांधी नेहरूसम होवूं वाटले...३,
यश जेंव्हां पदरी पडते, भारावूनी जातो आम्ही त्यावेळी
कर्तृत्व शक्तीचे मूल्यमापन, करीत राहतो चूक सगळी...४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
आहे ती लहान परि किर्ती महान,
छोटे येऊन शिकले मोठे होऊन गेले ।।१।।
आले घेऊन पाटी अ आ इ ई लिहिण्यासाठी,
लिहून वाचून ज्ञानी बनले देशांत नांव कमविले ।।२।।
शहर चालते, देश चालतो महान बनले लोकांमुळे
बीजांचे वृक्ष झाले त्या केवळ शाळेमुळे ।।३।।
कुणी बनला डॉक्टर काळजी घेई आरोग्याची,
कुणी झाला इन्जिनियर देई बांधून सर्वा घर ।।४।।
शिक्षक झाले कुणी केले सर्वा शहाणे,
ज्ञान मार्ग अनेक शाळाच त्याचा पाया एक ।।५।।
आईसम प्रेम करतो आपल्या शाळेवरी,
जो कोण घडला ह्याची उकल शाळाच करी ।।६।।
जन्म देते आई परी शाळा घडवी जीवन,
कधीही न फिटे ह्या जन्मी तिचे ऋण ।।७।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
मुके बसा
कायी सांगु नोका
मायीत हाये आमाले।
गांधी बाबा चा..किती..
पुळका हाये तुमाले।
कायी सांगु नोका..
ते गांधी बाबा चे तीन माकडं।
तुमचं न त्यायचं त
भल्ल हाये वाकडं।
बस झाले तुमचे ते
सूत अन चरखे।
मायीत हाये..गांधीजी
किती आपले न परके।
कायी सांगू नोका..की
गांधीजी हात नोटावर।
रोज लावता थुका...
घेऊन दोन बोटावर।
कायी नोका सांगू आमाले
सत्त्याग्रह अन मिठाचं।
कायले करता कौतुक
काढेल टपाल तिकिटाचं।
कायी हाये तुमी ...
म्हणता देश स्वच्छ करू।
अन त्या नावाखाली..
सोताचेच खिसे भरू।
गांधीजीच नाव घेऊन
जाता मतं मांग्याले।
तुमाले तरी समजले का गांधी...
चालले मोठे ..आमाले सांग्याले।
आबे गांधीजी का कोणी माणुस हाये..
ते त विचार धन हाये।
आमचा जीव की प्राण...
आन आमचं मन हाये।
-- नारायण जाधव, खामगाव.
प्रदीप निफाडकरांची गझल
Copyright © 2025 | Marathisrushti