(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मुक्त अनुवाद

    मागेन हिशोब तुझ्याकडे,
    कधीतरी माझ्या एकटेपणाचा, सुरकुतलेली पुस्तकातली फुले, देतील साक्ष;
    नि सांगतील तुलाच ,
    आपल्या ओठांवर,
    बघ ते गुलाब ठेवून,
    सुगंधित निघेल ग अत्तर, सुरकुतलेल्या पाकळ्यांमधून ,
    आपल्या प्रेमाचं,
    त्या विफल प्रेमाचा,
    करून टाक सौदा,
    प्रेमातल्या आणाभाकांचाच व्यवहार*,---!!!

    हिमगौरी कर्वे.©

  • नदीवरील बांध

    विषण्यतेने बघत होतो भिंतीवरच्या खुणा
    काळ जाऊन वर्षे लोटली आठवणी देती पुन्हा

    बसत होतो नदीकांठी बालपणीच्या वेळी
    पात्र भरुनी वहात होती गोदावरी त्या काळी

    सदैव पूर येउनी तिजला गावास वेढा पडे
    गांव वेशीच्या घरांना मग पाण्याचे बसती तडे

    चित्र बदलले आज सारे पात्र लहान होई
    बांध घातला धरणावरी पाणी अल्पसे येई

    खिन्नपणे खूप भटकलो भोवतालच्या भागी
    चकित झाले मन बघूनी हिरवळ जागोजागी

    इच्छित दिशेने पाणी वाही बांध घातल्यामुळे
    सारे जीवन प्रफुल्ल करीं आनंदमय सगळे

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • जीवनाची उपयोगिता

    अल्प वर्षे राहिली, उम्मीदपणाच्या हालचालीची ।

    मना वाटते आगळे करावे, उरली वर्षे जीवनाची....१,

    वृधत्वाचा काळ गांजता, साथ न देयी शरीर कुणाला ।

    मना मारूनी बसावे लागे, एक जागी सर्वाला....२,

    निसर्गरम्य स्थळ निवडूनी, मर्यादेत जगावे जीवन ।

    दुजास कांहीं येईल देता हेच ठरवावे आजमावून...३,

    बरेच केले स्वत:साठीं, समाधान परि नाहीं लाभले ।

    दुजास मिळतां आनंद येई, खरे तत्त्व आज जाणले....४,

    जेंव्हां असते स्वत: करीता, स्वार्थी भाव लपला असे ।

    दुजासाठी करीता सारे , स्वार्थी भाव राहील कसे ?....५,

    शेवटचे सरते जीवन, ईश चरणी समर्पण व्हावे ।

    अंतिम विनंती हीच, दुजाच्या सेवेतच निघून जावे...६

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • दु:खाने शिकवले

    रंग बदलले ढंग बदलले,
    साऱ्या जीवनाचे ।
    बदलणाऱ्या परिस्थितीने,
    तत्व शिकवले जगण्याचे ।।१।।

    कैफ चढूनी झेपावलो,
    नभात स्वच्छंदे ।
    यश पायऱ्या चढत असतां,
    नाचे मनीं आनंदे ।।२।।

    धुंदीमध्यें असता एका,
    अर्थ न कळला जीवनाचा ।
    आले संकट दाखवूनी देई,
    खरा हेतू जगण्याचा ।।३।।

    दु:खामध्ये होरपळून जाता,
    धावलो इतरांपाठीं ।
    अनेक दु:खे दिसून येता,
    झालो अतिशय कष्टी ।।४।।

    दु:ख आपले निवारण्याते,
    आनंद वाटे मनीं ।
    इतर जणांची दु:खे हटविता,
    द्विगुणीत झाला ।।५।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • अश्रू नदीचे

    मी नदी...
    तुमच्या आईसारखीच...
    फरक एवढाच,
    तिने तुम्हाला जन्म दिला,
    आणि मी तुम्हाला जगवलं...

    हिमशिखरांच्या कुशीत जन्म घेऊन,
    डोंगरदऱ्यांतून धावत आले.
    तुमच्या सुखासाठी माझे आयुष्य,
    हसत-हसत मी वाहत राहिले.

    माझ्या कुशीत खेळलात तुम्ही,
    माझ्याच पाण्यात वाढलात तुम्ही.
    माझ्या काठी स्वप्नं पेरून,
    सोन्याची शेती फुलवलात तुम्ही.

    तहान तुमची मीच भागवली,
    भूक तुमची मीच हरवली.
    तुमच्या प्रत्येक आनंदासाठी,
    माझी प्रत्येक लाट झिजत गेली.

    पण...
    आज माझ्याच लेकरांनी,
    माझ्या कुशीत विष कालवलं.
    कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली,
    माझं ममत्वच गाडून टाकलं.

    आज माझ्या लाटा वाहत नाहीत,
    त्या तर निःशब्द रडत आहेत.
    प्रत्येक लाटेच्या हुंदक्यात,
    हजारो वेदना दडल्या आहेत.

    माझे मासे तडफडून मेले,
    पक्ष्यांनी माझी साथ सोडली.
    हिरवीगार किनाऱ्यांची शाल,
    आज विराण वाळूत हरवली.

    मी कधीच काही मागितलं नाही,
    फक्त तुमच्यावर प्रेम केलं.
    तुमच्या सुखासाठी आयुष्यभर,
    स्वतःचं अस्तित्व अर्पण केलं.

    आज मात्र एकच प्रश्न विचारते...

    **आईचं दूध विषारी झालं तर,
    लेकरं कशी जगतील?
    नदीचं पाणीच मेलं तर,
    माणसं तरी कशी वाचतील?**

    अजूनही माझ्या डोळ्यांत आशा आहे,
    अजूनही तुमच्यावर विश्वास आहे.
    माझे अश्रू पुसा...
    माझ्या जखमा भरा...
    माझ्या प्रवाहाला पुन्हा
    निर्मळ श्वास द्या...

    कारण...

    *मी फक्त नदी नाही...
    मी तुमचा श्वास आहे...
    मी तुमचं भविष्य आहे...
    मी जिवंत राहिले तरच,
    तुमचं उद्याही जिवंत राहील...*

    •ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
    मो:- 9011841212

  • सत्यदृष्टांत

    शब्दभावनां,मौनात आता
    सत्यही, अंतरीचे कोंडलेले
    वैखरीही, जाहली निःशब्द
    सुरही, संवादांचे बावरलेले

    बेचैनी घुसमट जीवाजीवांची
    नेत्री अश्रु,उदास ओघळलेले.
    कुणी कुणाला कसे सावरावे
    उराशी, हातही घट्ट बांधलेले

    उध्वस्त मने, बंधने वास्तवाची
    सर्वत्र भितीपोटी राक्षस जागले
    आज अस्वस्थ, बेजार स्पंदने
    क्षण! भेटीचेही धास्तावलेले

    ऋतूऋतुही, जाहले बेभरोसी
    आकांत, इथे साऱ्या जीवांचा
    वास्तव, जगती सारे अस्वस्थ
    चिंतेत सारेच जग अडकलेले

    सारीपाट हा या कालियुगाचा
    खेळ बेभरोसी जीवनाचा चाले
    जाणतो सारे, एक अनामिक
    सत्यस्वप्न! जीवनाचे भंगलेले

    -- वि.ग.सातपुते.(भावकवी)

    9766544908

    रचना क्र. ९७.

    ३० - ३ - २०२२.

  • मालवणी माणसां

    मालवणी माणसांची वैशिष्ट्ये सांगणारी कविता 

  • मातृभू तुझ्या करता

    मातृभू तुझ्या करता,
    सर्वस्वाचे देतो दान,
    रक्षणासाठी केवळ तुझ्या,
    सज्ज माझे पंचप्राण,---!!!

    कितीतरी बघ आजवर,
    झाले तुझसाठी अर्पित,
    बिमोड करून शत्रूचा,
    निनाद तुझा गर्जत,---!!!

    भारत माते तुझी माती,
    आम्हा प्रिय प्राणाहून,---
    "पाईक" आहोत तुझे आम्ही,
    त्रिवार वंदन तुजसी करुन---!!!

    वाचवू आम्ही तुला,
    करुन जिवाची कुरवंडी,
    तीच खरी तुझी सेवा,
    बांधल्या आम्ही खुणगाठी,---!!!

    हिम्मत जर कोणी,
    करेल माईचा लाल,
    वचने तुला आमुची,
    दाखवू त्याला माती,---!!!

    ध्येय श्रेयस प्रेयस सगळे,
    कडेकोट तुझीच निगराणी
    निर्भय निडर निर्धास्त असावे,
    हीच तुला एक विनवणी,---!!!

    किती आले किती गेले,
    तुझा घास बळकावण्यां,
    परास्त होऊन परत फिरले,
    मायदेशी तोंड लपवण्या,---!!

    आपली धर्मसंस्कृती कधीही,
    आम्ही सोडली नाही,
    तुझेच संस्कार मनी,
    काढावा किंतु सर्वांनी,---!!!

    चांगल्याची चांगले आम्ही,
    वाईटांशी बनू कर्दनकाळ,
    जगानेही ध्यानी ठेवावे,
    देशसेवक इथले हर बाळ,--!!!

    माता वाट्याला कुणाच्या,
    कधीच गेली नाही,
    जो येईल तिच्या मार्गी,
    त्याची कधीच खैर नाही,---!!!

    हिमगौरी कर्वे.©

  • जातीची दांडगाई आणि ज्ञानेश्वरांची मराठी

    ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभवात सहाव्या अध्यायात माउलींनी मराठी भाषेची महती सांगताना ” माझ्या मराठाचिया बोलू कौतुके “अशी सुरवात करून ओव्या रचल्या .ज्ञानेश्वरांनी जाणीव पूर्वक मराठीचिया या शब्दा ऐवजी मराठाचिया हा शब्द प्रयोग केला होता . या मधे मराठी बोली बोलणारा तो मराठा हा हेतू असावा .परंतु आज मराठी भाषाच जणू जातीभेदांनी झाकोळून गेली आहे.

  • स्थिर वा अस्थिर

    स्थिर आहे जग म्हणूनी,

    अस्थिर आम्ही जगू शकतो ।

    अस्थिर आहे जग म्हणून,

    स्थिर आम्ही जगू शकतो ।।१।।

    पोटासाठी वणवण फिरे,

    शोधीत कण कण अन्नाचे ।

    थकला देह विसावा घेई,

    कुशीत राहूनी धरणीचे ।।२।।

    धरणी फिरते रवि भोवतीं,

    ऋतूचक्र हे बदलीत जाते ।

    जगण्यामधला प्राण बनूनी,

    चैतन्य सारे फुलवून आणते ।।३।।

    पूरक बनती गुणधर्म,

    स्थिर वा अस्थिर ते ।

    विश्वचक्र फिरवित राहणे,

    निसर्गाचे तत्वची असते ।।४।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com