(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • पुंडलिकाचे दैवत

    आईबापाच्या सेवेमध्यें, पुंडलीक रंगला,
    उभा विठ्ठल दारावरती, हेच तो विसरला ।।धृ।।

    आईबाप हे दैवत ज्याचे,
    रुप पाही त्यांच्यात प्रभूचे ।
    सेवा करीत आनंद लूटतां, तल्लीन जो जहला
    उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला ।।१।।

    निद्रेमध्यें असतां दोघे,
    मांडी देऊनी आपण जागे ।
    कशी मोडू मी झोप तयांची, प्रश्न विचारी भगवंताला,
    उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला ।।२।।

    वीट देऊनी विठ्ठलासाठीं,
    उभे केले त्या जगजेठी ।
    आपण गेला घेऊन त्यांना, स्नानाकरीता चंद्रभागेला,
    उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला ।।३।।

    आठ्ठाविस युगे गेली उलटूनी,
    कटीवरती हात ठेवूनी ।
    पांडूरंग बघे वाट तयांची, भक्तितच जे विसरती जगाला,
    उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला ।।४।।

    डॉ. भगवान नागापूरकर

  • जपणुक भारतीय संस्कृतीची

    अध्यात्म ही भारतीयांची शक्ती, मानसिक स्वास्थ्य व आत्मिक बळ प्राप्त करून देणारं माध्यम ! जगात वैज्ञानिक क्रांती झाली, तरी भारतीयांनी आपली अध्यात्माची परंपरा सोडलेली नाही. कॅनडात आलेल्या बहूसंख़्य लोकांमध्ये पदवीधर त्यातही तांत्रिक शिक्षण घेतलेल्यांची संख्या अधिक…. नोकरीच्या निमित्तांने त्यांनी देश सोडला; परंतु आपली आध्यात्माची परंपरा कायम जतन केली.

  • अंमल

    व्यतिरीक्त सौंदर्याच्या पाहूण जे मी

    तुझ्या प्रेमात पडाव अस तुझ्यात काहीच नव्हत …….

  • ज्ञानेश्वराची चेतना

    जीवंतपणी घेई समाधी, ज्ञानेश्वर राजा ।

    दु:खी होऊनी हळहळली, विश्वामधली प्रजा ।। १

    सम्राट होता बालक असूनी, राज्य मनावरी ।

    हृदय जिंकले सर्व जणांचे, लिहून ज्ञानेश्वरी ।। २

    आसनीं बसत ध्यान लावता, समाधिस्त झाले ।

    बाह्य जगाचे तोडून बंधन, प्राण आंत रोकले ।। ३

    निश्चिष्ठ झाला देह जरी , बाह्यांगी दर्शनी ।

    जागृत आसती प्राण तयांचे, आजच्याही क्षणी ।। ३

    संचार त्यांच्या आत्म्याचा , सदैव होत राही ।

    ज्ञान भुकेल्या भाविकाला, चेतना ते देई ।। ५

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • भावशब्दी गीता

    तव स्मरणांचे गीत होते
    तूच गीता शब्दभावली
    तूच, प्रेरणा संवेदनांची
    भावशब्दात प्रसवलेली

    तुझ्या निरागस लोचनी
    भावप्रीती ओथंबलेली
    सोहळे रम्य ऋतुऋतुंचे
    लाजती मोदे तव गाली

    नभांगणी कृष्ण सावळा
    तू पावरी अंतरी घुमलेली
    तूच सुगंधा दरवळणारी
    ममहॄदयी या गंधाळलेली

    हवे काय, अजुनी जीवनी
    तुझ्या स्मरणी मती गुंतली
    क्षणक्षण ही अधीर स्पंदने
    तव भेटीसाठी आसुसलेली

    –वि. ग. सातपुते. ( भावकवी )

    9766544908

    रचना क्र. १८४

    ३१/७/२०२२

  • सिनेमाला चला

    नको जाणे सिनेमाला,
    गर्दीचा आहे पहिलाच दिवस
    याच विचाराने थिएटर पडले ओस
    चला जावू सिनेमाला, आजच्या दिवशी शेवटी.
    निराशली मंडळी, बघूनी हाऊस फूल पाटी

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • जीवन म्हणती याला

    त्याची एकता करूण कहाणी, डोळे भरून आले पाणी

    हृदय येता उंचबळूनी, निराश झाले मन

    आघात होता त्याच्या जीवनी, तो तर नव्हता माझा कुणी

    तरी का आले प्रेम दाटूनी, उमजेना काही

    दु:ख दुजाचे समोर आले, मनास ज्याने कंपीत केले

    दोन जीवांच्या हृदयामधले, अदृष्य हे धागे

    मानव धर्म एक बिजाचा, वाढत गेला गुंता त्याचा

    ओढत असता धागा टोकाचा, दुजा हळहळतो

    राग लोभ वा प्रेम भावना, बांधूनी ठेवते एकमेकाना

    हिच असे निसर्ग योजना, जीवन म्हणती याला

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • आत्मविश्वास

    आत्मविश्वास जागृत ठेवूनी, कार्य घेवूनी तडीस नेती ।

    कधीही न राही अवलंबूनी, मदतीसाठी दूजा वरती ।।

    ईश्वर करीतो मदत तयांना, मदत करी जे आपले आपण ।

    आपल्यातची तो ईश्वर आहे, असते याची जयास जाण ।।

    विश्वासाने हुरूप येई, जागृत करीती अंतर चेतना ।

    लक्ष्य सारे केंद्रीत होता, यश चमकते प्रयत्नांना ।।

    -- डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • वठलेल्या वडाला मोह

    वठलेल्या वडाला मोह
    आम्रतरुचा झाला आहे
    काष्ठवत फांद्यांवर पर्ण
    पिसारा फुलून आहे..
    मनातील सारे न कळून आहे
    प्रेमाच्या सावलीत भाव रडून आहे
    दुःखाच्या मागे व्यथा निःशब्द आहे
    वठलेला वड आज फकीर आहे..
    न कळत्या दुःखाना वेदनेची
    अस्पष्ट करुण किनार आहे
    मरणाची वाट जवळ येईल कधीही
    अंतरात दुःख विरजून अनामिक आहे..
    आम्रतरुचा झोका मदमस्त
    एकाकी वड उन्मळून आहे
    मोहाच्या मिठीत अलगद
    पालापाचोळा मन व्यथित आहे..
    सांज गूढ सावल्यांना
    क्षितिजाची आस आहे
    न कळत्या मनातला मोहर
    का पुन्हा एकाकी दुःखी आहे..
    दूर कुठे गातो फकीर गाणे
    बोल त्याचे अंतरी ठाव आहे
    सगळेच अर्थ न उलगडतात
    शब्दांचे खेळ काव्यांत बहरुन आहे..
    मोहरल्या आम्रतरुच्या प्रेमात
    वठलेला वड एकांती आहे
    स्वार्थ न कसला गंधाचा तो
    आम्रतरुचा मोह मन फुलून आहे..
    उन्मळून पडेल वड एकाकी
    सावलीत पांथस्थ न कोण आहे
    वडाचे दुःख मिटून हलकेच
    मोहरणाऱ्या आम्रतरुत आहे
    न सोसवतो वारा बेफाम
    न वादळ सोसते आहे
    पर्णाचे दुःख अंतरी आल्हाद
    वेगळे दुःख पाचोळ्याचे आहे..
    प्रत्येक शब्दांचे अर्थ भावार्थ
    वेगवेगळे वेढून काव्यांत आहे
    विस्तीर्ण वडाचे दुःख एकाकी
    मोहरल्या आम्रतरुत अव्यक्त आहे..
    -- स्वाती ठोंबरे.
  • विसरून साऱ्या ताणतणावां

    विसरून साऱ्या ताणतणावां ,देवा तुझ्या कुशीत यावे,
    करून निश्चिंत आपुल्या मनां, वरूनच पृथ्वीला बघावे,--!!!

    कलंदर वावरणाऱ्या ढगां,
    सोबत घेत दूरवर हिंडावे,
    चहूकडे अन् चहूदिशांना,
    आनंदाने गात फिरावे,--!!!

    ताऱ्यांसवे फेर धरतां,
    गगनाला मुठीत घ्यावे,
    पिऊन आधी रजतकणां,
    धरणीकडे अभिमानें बघावे,--!!!

    नकोत भय भीती चिंता,
    विद्युतलतेसह हिंडावे,
    कुणी कुठे दहशत माजवतां, लख्खकन कसे चमकून उठावे,-!

    पाहण्या सूर्य चंद्राला,
    मेघांच्या मऊ दुलईत शिरावे,
    पिट पिट करती जेव्हा पापण्या, प्रखर तेजाने भानही विसरावे,--!

    वार्‍याबरोबर दाही दिशा, आपणही सुसाट सुटावे ,
    झुगारत सगळ्याच बंधना,
    अतुल वेगे मस्त फिरावे,--!!!

    वादळासह पृथ्वीवर फेरा,
    मनमुराद जिकडेतिकडे घुसावे भयकंपित करत साऱ्या जनां, दराऱ्यात कसे बांधून ठेवावे,

    हिरवा गार पसरला गालिचा, नभातून विहंगम दृश्य दिसावे
    शक्य तेवढे वसुंधरेला,
    वरून प्रदूषणमुक्त करावे,--!!!

    © हिमगौरी कर्वे