(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • संकोचलेले मन

    मध्य रात्र झाली होती, सारे होते शांत ।

    रस्त्यावरती तुरळक व्यक्ती, वाटला एकांत ।।

    एक गाडी मंदिरीं थांबली, त्याच शांत वेळीं ।

    सूटामधली व्यक्ती कुणी एक, आली दारा जवळी ।।

    सारे होते नशिबात त्याच्या, धन संपत्तीचे सुख ।

    दिवस घालवी मग्न राहूनी, कार्ये पुढती अनेक ।।

    तर्कज्ञान तीव्र असूनी, आगळा बाह्य चेहरा ।

    परि अंर्तमन सांगत होते, सत्यास शोध जरा ।।

    केव्हां केव्हां विजय होई, सुप्त त्या विचारांचा ।

    संकोचल्या मनीं गाभारा बघे , रात्री मंदिराचा ।।

    डॉ, भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • वंदू तुजला गणराया !

    हे मयुरेश्वर, श्रीसिद्धिविनायक

    हेरंभ, लंबोधर शुभाय

    प्रगटलास विविध रुपा धरणीवर ह्या

    तुझ्या कृपेचा आशीर्वाद द्याया

    वंदू तुजला प्रथपुजीताय !

    बल्लाळेश्वर, वरदविनायक

    रूप तुझे मोहक सुंदर

    तुंदिल शोभे लंबोधर

    तुझीया दर्शना चिंता-कष्ट दूर

    वंदू तुजला गणाध्यक्षाय !

    चिंतामणी, गिरिजात्मक

    आम्हीं तुझी बालके अडाणी

    बोबडे बोल, आमुची वाणी

    शहाणे करण्या सत्वर येशी

    भक्ती-सेवेत आम्हां गुंतवीशी

    वंदू तुजला श्रीभक्तकल्याणाय !

    श्रीविघनेश्वर, महागणपती

    मोदकांवरी प्रीती भारी

    एकवीस नैवैद्याते अर्पण सत्वरी

    आनंदाने सर्व स्वाहीशी

    तृप्तीचे एकवीस ढेकर पिताश्री देती

    वंदू तुजला एकदंता, भालचंद्रा !

    काय वर्णाव्या तुझ्या लिला

    आमच्या अल्पमती बुद्धीच्या पलीकडल्या

    करुनिया अल्पश्या गुणसंकीर्तना

    ठेवितो तुझ्याया चरणी माथा

    वंदू तुजला शूर्पकर्णाय विकटाय !

    घेउनी पंचारती, मंजुळ वाजंत्री अनेक

    सहर्ष स्वागता आम्हीं सज्ज

    मानुनी घे मोदकापरी गोड

    भाद्रपद शुद्ध चतुर्थी दिस !

    जगदीश पटवर्धन

  • मायेचा बाप

    मायेचा बाप
    कष्टकऱ्या धाप
    आम्हाला सुखी माप....१

    कर्तव्य फार
    शिस्तिला हो धार
    लळा अपरंपार.......२

    घराचे छत
    गावात ही पत
    उद्योगी पारंगत.......३

    खर्च मोजून
    जावक योजून
    हौस भरभरून.......४

    समसमान
    वागवतो छान
    शिकविण्यास रान.....५

    अबोल फार
    महान विचार
    झाला नाही लाचार....६

    करू सन्मान
    सदा असो भान
    घरादाराची शान.....७

    हा ताणा बाणा
    भाव मनी जाणा
    हा संसाराचा कणा....८

    -- सौ. माणिक (रुबी)

  • उघडेल कधी दरवाजा

    उघडेल कधी दरवाजा,पक्षी पिंजऱ्यातून उडेल,
    संपतील तणाव चिंता,
    स्वातंत्र्य असे उपभोगेल आनंदाच्या त्या क्षणा, ----
    मोल देत कसा नाचेल ,
    भरारी घेत आभाळा,
    उराशी आपुल्या कवटाळेल, स्वातंत्र्याची नुसती कल्पना,
    सतत रुंजी घालत राहील,--- इवल्याशा त्याच्या मनात,
    *मुक्तीचा आनंद भरेल,
    विश्वास ठेवू तरी कसा,
    मनी भावना उफांळेल,---
    सुटली ही भयानक कारा
    ज्याक्षणी त्याला आंकळेल, भोवतालच्या साऱ्या जगां,
    आता आपल्या कवेत घेईल, झुगारून तुटक्या बंधनांना,
    जगावर साऱ्या राज्य करेल,---
    आता कशा असंख्य वाटा,
    जीव कसा आनंदेल,
    स्वर्गीय स्वरूपीं समाधानां,
    हृदयात तो सांभाळेल,---
    अवलोकत पूर्ण क्षितिजा ,
    कसा‌ मग तो भिरभिरेल,
    पाहून येईल मोक्षद्वारा ,
    जिथे जाणे अंती असेल,--!!!

    © हिमगौरी कर्वे.

  • मोह होता सहज मनाला

    मोह होता सहज मनाला
    दोष मग कोणा द्यावा
    सुकल्या काही फुलांचा
    बाजार कुणी पहावा
    मन व्यापले निर्मोही
    वेडे भाव ते सारे
    गुंतले धागे मोहाचे
    बहर अबोल क्षणांचे
    भावनेचा खेळ सारा
    नकळत मन मोहून जाता
    गहिवरले भाव अलगद
    हळवे चांदणे मूक आता
    मायेचा खेळ हा सारा
    जीवन न कळते कधी केव्हा
    मिटल्या पाकळ्या सुकून गेल्या
    कोणी त्या न आल्हाद फुंकरिल्या
    कळले नाही मन बावरे
    शब्दांचा छल तो झाला
    तुटले मन नकळत शब्दांनी
    अस्तित्व पुसून टाक जरा
    व्यवहारी दुनियेत या
    मायेचा खोटा बाजार खुला
    नकळत मिटले नयन ते
    भाव मनात रडवून जाता
    -- स्वाती ठोंबरे.
  • सुखाचा डब्बा

    जगातील वस्तू, वाटे आकर्षक
    देह सुख देण्या, समजे त्या ठिक...१

    प्रत्येक गोष्टीला, डब्याचा आकार
    सुखाचे वेष्ठन, ते चमकदार...२

    चमक बेगडी, फसवी सर्वाला
    काय डब्यामध्ये, कळेना कुणाला...३

    झाकण उघडा, दुःख दिसे आंत
    लपून बसले, प्रत्येक गोष्टीत...४

    हात लावताच, दुःख हाती येई
    भासलेले सुख, नष्ट होत जाई...५

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • चण्याची पुडी

    माझे मन आहे चण्याची पुडी
    जड विचारांची तळाशी बुडी
    भरले आहेत चणे फुटाणे
    तेच चव साधती साधेपणे
    मावत नाही काजू अक्रोड
    कशास हवी ती डोकेफोड ?
    लांब ठेविले बदाम मनुके
    यास्तव मन हे हलके फुलके
    चणा वाटतो आपलाच सहज
    बाकी भासती किंमती ऐवज
    नको बेदाणे खारीक पिस्ते
    तेच घडविती विवाद नस्ते
    चघळत बसतो एक चणा
    मुरवत त्यातील साधेपणा .

    -अजित देशमुख .

  • देहाला कां शिणवितां ?

    शरीरातील अवयव सारे, यंत्रवत् असती ।

    आपल्यापरी कार्य करुनी, कार्यारत राहती ।।

    यंत्रामधल्या मुख्य गाभ्याला, आत्मा म्हणती कुणी ।

    अविरत मिळे चैत्यन्य शरीराला, त्याचे कडूनी ।।

    शुद्ध अशुद्ध संस्कार सारे, अवयवी घडती ।

    त्याच रुपें आत्म्याकरवी, परिणाम होती ।।

    खाणें शुद्ध पिणे शुद्ध विचार निर्मळ, पवित्र ते ।

    संगम होता योग्य साऱ्यांचा, शुद्धीकरण घडते ।।

    उपास तापास करुनी कांहीं, शिणविती देहाला ।

    हट्टयोग साधूनी कित्येक, दमविती शरीराला ।।

    देह असे साधन केवळ, प्रभूकडे जाण्याचे ।

    साध्य होईल त्याच आधारें, इप्सित जीवनाचे ।।

    खाद्यपाणी हे तर इंधन, असे शरीर यंत्राचे ।

    अभावी त्याचे कसे चालेल, जीवन मग तुमचे ।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • बोलणं

    बोलणं म्हणजे काय तर मनातील
    भावना व्यक्त करणं!अगदी साधं,
    सहज,सुंदर,रागाचं,लोभाचं
    कसही असावं,पण बोलणं असावं.
    शब्द आणि त्याचे अर्थ इतके सुंदर असतात.
    की मोह पडावा असे.माणसाने प्रत्येक वेळेला व्यक्त व्हायला हवे असही काही नाही.कधी समोरच्याचे विचार,बोल ऐकणं हे पण खूप सुंदर असतं....
    प्रत्येकाला मन असतं,आणि त्या मनात सतत
    काहींना काही चालू असत.
    वेगवेगळ्या भावनाचं कल्लोळ होणं म्हणजे मन गुंतण. तुम्ही जसे मनात विचार कराल तसे त्याचे पडसाद बाह्य रुपावर दिसतात. अतिशय नितळ,तरल,स्वच्छ मन असलं की तुमचं बाह्य रुप पण तितकंच सुंदर दिसतं.शांत भाव चेहेऱ्यावर उमटतो.तरीही प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या भावना असतात.त्या व्यक्त होतात, कधी अव्यक्त राहतात.....
    अंतर मन ही तर एक तरल, सुरेख जाणीव असणारी प्रकिया.त्यात फक्त भाव आणि प्रेम हेच असतं. आपण कुणाच्या मनात असणं फार सुंदर असत.आपल्या मनात अनेकांना जागा द्या! चागल्या रुपात,नक्कीच तुम्ही पण दुसऱ्याच्या हृदयात
    व्यक्त होतात......
    हृदय तरी असत, पण मन हा अवयव नसतो.पण मनाने जो वागतो तो मनाचा राजा.जिथं शब्दांचे सूर अलवार गुंफले जातात तिथंच हळुवार भावना जुळतात.मग शब्दांचीही गरज पडत नाही.
    भाव सांगुन जातात.'शब्दावाचुन कळले सारे शब्दांच्या पलीकडले प्रथम तुला पाहियले आणि घडू नये ते घडले'. खरच अतीशय सुंदर भाव की अश्या क्षणी शब्दांची गरज नसतेच....
    काढला तर अर्थ नाहीतर अनर्थ,
    दिसलं तर सुंदर नाहीतर कुरुप.
    शोधला तर आनंद नाहीतर दुःख.
    काय मिळेल जीवनात हे प्रत्येकाच्या
    नशिबानुसार असतं. पण काय मिळवायचं हे तर आपल्या मनात असतं....
    मन आणि अंतर मन ह्यात कुणाला स्थान द्यायचं हे एकदा ठरवलं की जीवनात आनंद मिळतो आनंद घ्यायचा, द्यायचा असतो.कधी व्यक्त होऊन कधी अव्यक्त राहून,मनातील तरल भावना ज्यात फक्त आपण आपले गुंततो तिथं व्यक्त नाही झालं तरी सहज, सुंदर असतं....
    -- स्वाती ठोंबरे.
  • जबरदस्त मराठी मोटिवेशनल कविता

    https://youtu.be/VZ1bm7L9OdE