आम्हा वारकऱ्यांचा प्रश्न कुठे शोधिशी काशी अन कुठे शोधिशी रामेश्वर म्हणत शेतमजुरी करताकरता मुखी तुझे नाव घेवूत सावंता माळ्या सारखे.
आई तू माझी जननी
वात्सल्याची मुर्ती कशी
सांभाळ केला आमचा
आकाशाची घार जशी...१
आकाशाची घार जशी
चित्त तुझे बाळा पाशी
भरवी आम्हा लापशी
जेव्हा लढा आजाराशी.. २
सौ.माणिक शुरजोशी
पहाटेतून भाट जागे झाले तेव्हा
मान उंच करुन
चंद्रीचा कोंबडा आरवला
खाजणाकडील काला वारा
अंगाला झोंबू लागला
त्याची पर्वा न करता
आसमंताला जाग आली
काळोखाचे कांबळे दूर सारीत
अवनी जागी झाली
कराडी कुटुंबाची वस्ती
विझल्या रॉकेलच्या बुदल्या
मातीच्या चुलीत अंगार फुलला
आणि झावळीच्या झोपडींतून
धुराचे ढग उसळले.
न बाळगलेली कराड्यांची
कलकलणारी कुत्री
रात्रभर जागल्याने
गटारात घोरत होती
रवी किरणांनी झाडांचा
आश्रय घेत घेत
जमिनीवर पाय टेकले
घोटभरच्या आणि भाकरी खाऊन
चंद्री बुगानी बाजाराकडे धाव घेतली
श्री. सुभाष गजानन दिघे
मुरुड
घड्याळ होते भिंतीवरती
टिक टिक करुन चाले
सतत दिसली चाल काट्यांची
एकाच दिशेने हाले
धावत होता एक तुरु तरु
दुजा हळूच धांवे
छोटा जाड्या मंद असून
पळणे ना ठावे
पळत असती पुढे पुढे
समज देती काळ-वेळेचा
किती राहीला शिलकीमध्ये
प्रवास आपुला जीवनाचा
जीवन चक्रापरि फिरती
घड्याळ्यामधले सारे काटे
जाणीव करुन देती सतत
आपण कोठे अन् जीवन कोठे
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
दिपूनी गेले नयन त्या क्षणी
बघता तिची सोज्वळ मुर्ती ।
हाक निघाली अंतःकरणीं
तुझ्याचसाठी निर्मीली कृती ।।
जरी बघीतल्या अनेक सुंदरी
ठाव मनाचे हिने जींकले ।
सहचारीणी ही होईल तुझी
अंतरमनी शब्द उमटले ।।
अनामिक जे होते पूर्वी
साद प्रेमाची ऐकू आली ।
योग्य वेळ ती येता क्षणी
ह्रदये त्यांची जुळुनी गेली ।।
शंका भिती आणि तगमग
असंख्य भाव उमटती मनी ।
विजयी झाले ऋणानूबंधन
बांधले होते भावबंधनी ।।
उचंबळूनी दाटूनी आला
ह्रदयामधला ओलावा ।
स्नेह मिळता प्रेम मिळाले
जगण्यासाठी दुवा ठरावा ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
चमकत लपकत आली
कडकडाट करुनी गेली
प्रकाशमान केले जगासी
सारुनी दूर अंधारासी
भयाण होता अंधःकार
लख्ख प्रकाश देई आधार
घेई सर्वांच्या मनाचा ठाव
भिती असूनही, प्रसन्न भाव
करुनी शक्तीचे भव्य प्रदर्शन
निर्माण झाला मनी अभिमान
परि दुःखी होते तीचे मन
'क्षणिक' लाभले तिला जीवन
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
कापलेले पंख अन्,
तोडलेले हातपाय,
विचारेना इथे कुणी,
देईना धरणी ठाय,--!!!
काय करू, जाऊ कुठे ,
मन विषण्ण होई,---
सांगायाची कोणाला
आपुली कर्मकहाणी,--!!!
जग सारे पसरलेले,
चालते आहे एकटी,
स्थिती अगदी अनवाणी,
रणरणत्या वाळवंटी,--!!!
पाखरा किती गोंडस तू,
गोडुली तुझी वाणी,
आधार देई मम बुडती'ला,
देऊन काडी काडी,--!!!
*निराशेच्या गगनीही,
आशेचा पक्षी उडे,
संगतीला मी तुझ्या,
शांत हो राजसबाळे*,--!!!
दूर क्षितिजावरती,
प्रकाशकिरण चमचमती,
तुझ्या जीवनपथावरही,
डोकावेल तो एक दिनी,--!!!
सुमार"" नसेल आनंदाला,
इतुके सुख येईल जीवनी,
हे घेऊ की ते घेऊ,---
सुख वाटशील भरभरूनी,--!!!
एवढी खिन्नता कशाची,
काळोख दाटे का मनी,
आनंद जगाला वाटसी,
खूण पटेल समाधानी,--!!!
गर्तेत उदासीनतेच्या,
का अशी जाऊन पडशी,
पुन्हा पंख फैलावुनी,
आसमंती घे भरारी,--!!!
कितीदा तरी दुःखे,
मानवाला मागे लोटती,
परंतु बाहू फैलावुनी,
नव्हत्याचे होते करती,--!!!
हिमगौरी कर्वे.©
ग्रामीण भागामध्ये पुष्कळ पुष्कळ लिहिण्यासारखे असे असते. सोबतीला हिरवागार निसर्ग पशुपक्षी ओढे-नाले आणि वेगवेगळ्या स्वभावाची माणसे सुद्धा भेटतात.
लोचनातुनी ओघळता मौन तुझे
प्रीत अर्थवाही अश्रुतुनी पाझरते
तूं ही अशीच अबोली सुंदर मुग्धा
तुला शोधण्या ही नजर भिरभीरते
ग्रहगोलांच्या अवकाशी भास तुझे
संध्याछायेत तुझेच रूप ओसंडते
मनगवाक्षी कवडसेच तव प्रीतीचे
अंतरंग माझे भावस्पर्शी दरवळते
जन्मोजन्मीचे नाते ऋणानुबंधी
मनांतराला अलवार कुरवाळीते
अशीच सुंदर मौनी प्रीत लाघवी
या श्वासाला शांत जगवित रहाते
*********
--वि.ग.सातपुते.(भावकवी)
(9766544908)
रचना क्र. 321
6/11/2022
“सुमनांजली” या काव्यसंग्रहातून…
Copyright © 2025 | Marathisrushti