विसरून जा भूतकाळ तो,
नजर ठेवूनी भविष्यावरी,
वर्तमानी राहून प्रवाही,
जीवन सारे यशस्वी करी ।।१।।
व्यर्थ होतील प्रयत्न तुझे,
उगाळता गत आठवणी,
खीळ पडेल उत्साहाते,
अपयश आले हे जाणूनी ।।२।।
ज्ञान जगाचे मिळूनी तुला,
जन्म जहाला आजच खरा,
अनुभवी नव बालक तूं,
वाहून नेई जीवन धुरा ।।३।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
उचंबळूनी येतील शब्द, हृदयामध्ये दडले जे ।
संदेश असता सर्वांसाठी, कुणी न म्हणतील ते माझे ।।
जे जे काही स्फूरूनी येते, जेव्हा अवचित समयी ।
हृदयामधली हाक असे, ठरते आनंद दायी ।।
‘आनंद’ आहे कोणता हा, अन् येई कोठूनी ।
अंतर्यामी सर्वांच्या , सदैव राही बैसूनी ।।
बाहेर पडूनी झेप घेई दूजा हृदयावरी ।
तेथेही जो आनंद बैसला. स्वागत त्याचे करी ।।
पटे मनाला विचार , रूचणारा जो असे ।
हृदयामधला हाच आनंद, स्फूर्ती देवता भासे ।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
काही अटळ गोष्टी कधीच होऊ नयेत असतात आशा वेड्या
येतात ते क्षण सामोरे जेव्हा उडतात भ्रमाच्या चिंधड्या चिंधड्या
नसते तयारी मनाची , बीभत्स विद्रुप सत्याला भिडण्याची
समूळ उन्मळण्याची , उरी फुटण्याची , आत्यंतिक आक्रंदनाची
धडपड संपण्यापूर्वी , अखंड असहाय तुम्ही धडपडताना
वाटतं प्रचंड वैषम्य की येऊ शकलो नाही तुमच्या कामाला
बाळगाव्या उरी बोचणाऱ्या वांझ वेदना की निरंतन घुसमटवणारी जाणीव
की करावी आपल्याच आपण potent न्यूनतेची उसासून कीव
If you couldn't be helped in your intensely weak moments When I was around watching , desperately helpless well I guess , I ought to be guilty by choice , for life
अगतिकतेच्या कडेवरुन भासतो भास्करही तो त्रयस्थ अन् दुबळा
काळीज चिरीत निघालेला काळोख व्यापुन उरतो विश्वाला सगळ्या
आसवांच्या साठवांना तेव्हा बांध विवेकाचा नाही पेलत
येतात अचानक प्रवाहाचा घेऊन वेग प्रचंड , ओसंडत
सुटला नाही अजून आतड्यांना आतून पडलेला पिळ
उठवते वारंवार काळजात एक परिचित खोलवर कळ
जागत्या ठुसठुसणाऱ्या वेदना नि गद्गद्णारे हुंदके
भळभळणाऱ्या जखमा नि बापुडवाणी पोकळी व्याकुळ
बऱ्याच झाल्या बेरजा वजाबाक्या तरीही आयुष्यफळा भासतो मोकळा
त्रैराशिक हुकले जगण्याचे , चुकलाच आमचा वेळेचा ताळा
काही असतील झाल्या तरीही बऱ्याच उरल्या होत्या गप्पा
स्पंदनांना काही फुटलेले पाय ; उरल्या होत्या तरीही आंतरिक कळा
भेटू आपण जेव्हा होऊन एकदा एकदम गोळा
होऊ या मोकळे मनसोक्त रडून गळ्यात घालून गळा
घंटेच्या घनगंभीर नादाने भानावर आलो जेव्हा
रात्र टळून गेली होती .....
सुकत आलेले जडावलेले डोळे मी उघडले तेव्हा
कोवळी सूर्यप्रभा नुकती पसरत होती
खूप काळ उलटून गेला असावा
कोंबडाही केव्हाचा आरवला असावा
आता उठायलाच हवे , नाही का ?
उरलेले अश्रू गोठवून मनाचा दगड करुन उठताना
मी जेव्हा माझ्या क्षौर केलेल्या डोक्यावरुन हात फिरवला तेव्हा
छोटे छोटे सफेद केस त्यावर केव्हाचे उगवले होते
-यतीन सामंत
काही असले नसले,तरी आनंदातच जगावे,
काय आणले, काय न्यायचे, सर्वांनाच आहे ठांवे ,--!!!
,मी मी करत करत,
कमरेला बांधून गोष्टी,
पैसाअडका, सोने-नाणे,
सारे ठेवायाचे पाठी ,--!!!
शेतीवाडी, जमीनजुमला,
भाईबंद हक्क सांगती,
भाऊबंदकी होऊन निव्वळ,
तुटतात सगळी नाती गोती,--!!!
हे माझे ते तुझे,
कशासाठी, आपपरभाव,-?
स्वार्थ आपमतलब शेवटी,
करून दु:खी होतो मानव,--!!!
सख्खे, सख्खे न राहती, परस्परांच्या जिवांवर उठती,
आपल्या पोळीवर तूप ओढुनी, दुसऱ्यास वाईट ठरवती,-!!!
काय मिळते असे करून,
जीवनी फक्त ताण तणाव,
शरीर मन नसते धड,
दुखण्यानाही चढतो भाव,--!!!
जगण्यातलानिखळआनंद निसर्गात खूप दडला असे,
पदोपदी शिक्षण देई ,
निसर्गासारखा गुरु नसे,--!!!
प्रत्येक घटक त्याचा,
त्याग समर्पण शिकवे, माणूस राही किती अडाणी, त्याचीभाषा समजत नसे,
हिमगौरी कर्वे.©
स्वातंत्र्यदिनी मातृभूचे आक्रंदन
घामेजले शरीर, भडका दिशांत झाला
दूषित भूमी झाली, वारा विषारी झाला
तोडुनी वृक्षराई, डोंगर उजाड केला
निसर्ग कोपूनिया दुष्काळ माथी आला
स्वातंत्र्यतेज आमुचे, सारे दूषित झाले
आम्हीच हे स्वहस्ते, ऐसे अघोर केले
ऐशा कुकर्मी आज,जनताच त्रस्त सारी
स्वातंत्र्य हे कशाचे? ना संपली गुलामी
सारे विषारी अन्न,भाजीत विष मिळते
पाणी नदीतले ही, सारे अशुद्ध झाले
ही स्वैरता अघोरी, कैसा विकास झाला
स्वातंत्र्य भोगताना, हा सर्व घात झाला
संस्कारहीनतेसी, येथे मिळे प्रतिष्ठा
ढोंगीच तज्ञ बनती, तज्ञां मिळे उपेक्षा
सेंद्रिय नासवोनी, करतात रोज हत्या
ही लादली गुलामी,कैसी स्वतंत्र जनता
ही आजची अवस्था नाही उगाच झाली
सात्विक वारशाची आम्हीच हानी केली
स्वातंत्र्य गर्जताना, स्वार्थां जतन केले
आम्हीच मातृभूला, ऐसे उजाड केले
स्वैराचारी जमते जनता
एकच त्यांचा असतो गलका
मोफत सारे द्या द्या म्हणती
धोंडे मारत दंगे करती
कर्जे घेऊनी फेड न करती
स्वैराचारे व्यसने करती
राष्ट्रहिताचा विचार सोडूनी
संविधान हे सहजी मोडिती
जनसेवेची करूनी चेष्टा
उपभोगिती जे सदैव सत्ता
निवृत्तीचे वेतन घेती
पुन्हा पुन्हा जरी निवडून येती
या स्वैरतेस आज देण्यास तीव्रधक्का
येणार कोण बोला, येणार कोण बोला
तोंडात एक भाषा, पोटात देशद्रोह
राष्ट्रास तोडणारे , ऐसे अभद्र भाव
निसर्ग आणि भूमी,केली उजाड ऐशा
ढोंगीजनांस आता, देण्यास तीव्रधक्का
येणार कोण बोला, येणार कोण बोला
रचनाकार : देशभक्तकोशकार चंद्रकांत शहासने.
मोबाईल : ९८८१३७३५८५
करुनी दयेची बरसात
पावन करीतो दुष्टाला
तुझ्या मनाचा ठाव
उमजला नाहीं कुणाला
वाल्या होता खूनी
पापांनी भरले रांजण
परि तुझ्या दयेद्वारे
गेला तो उद्धरुन
कालीदास होता ऐष आरामी
राहात होता वेश्येघरीं
महाकवी बनवूनी त्याला
किमया तूंच करी
बहकला होता पुंडलीक
पत्नीच्या विपरीत नादानें
उभे केले तुला विटेवरी
आईबाप सेवा शक्तिनें
क्षमा करुनी पाप्यांना
पावन तूं करितो
कळले नाहीं आम्हांला
काय कसोटी लावतो.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@mail.com
कसे आले कुणास ठाऊक नाणे माझे हाती
गर्दीमधल्या कुण्या प्रसंगी खोटा शिक्का येती
प्रयत्न सारे व्यर्थ जाऊनी कुणी घेईना त्यातें
कसा आला नशिबी निराशा मनी येते
अंध व्यक्तीचे स्टॉल बघूनी तिकीट एक घेतले
लॉटरीसाठी घातला रुपया अंधाचे हाती दिले
मनी चरकलो शब्द ऐकूनी त्या अंध व्यक्तीचे
नशीब तुमचे थोर असूनी यश येईल तिकीटाचे
केवळ त्याने स्पर्श करुनी जाणले माझे नशिब
भाग्यवान ठरवूनी सांगे मिळेल धनलाभ
खोटा शिक्का घेऊन देखील शब्द बोलला प्रेमाने
नीच मनाचा असून मी पचविले ते हसण्याने
टिपून ठेवला नंबर त्याचा एका कागदावरी
कोटाच्या खिशांत ठेवले तिकीट जपून भारी
निकाल वाचूनी नाचू लागतो आनंदाने पुरता
लाखाचे ते बक्षिस लागूनी लाखोपती बनता
धावत गेलो ऑफिसातूनी तिकीट घेण्या घरी
कोट नव्हता दिसत तेथे रोजच्या जागेवरी
इतर कपड्यामध्ये टाकला धूण्या परीटाकडे
धावत सुटलो नदीवरती शोधण्या तो तिकडे
सुकवलेल्या कपड्यातूनी कोट काढला
तुकडे बघूनी त्या तिकीटाचे मुर्च्छा आली मला
खरय़ा शिक्क्यासम चालले नशिबही वेगाने
खोटेपणाची जाण येता थांबून गेले त्वरेने
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
प्रभूची लीला न्यारी विश्वाचा तो खेळ करी
कुणी न जाणले तयापरी हीच त्याची महिमा ।।१।।
जवळ असूनी दूर ठेवितो आलिंगुनी पर भासवितो
विचित्र त्याचा खेळ चालतो कोणी न समजे त्यासी ।।२।।
मोठे मोठे विद्वान त्यांत कांहीं संतजन
अध्यात्म्याचे ज्ञान घेऊन विश्लेषन करिती प्रभूचे ।।३।।
कांहीं असती नास्तिक कांही असती आस्तिक
त्यांत कांही ज्ञानी मस्तक चर्चा करिती प्रभूची ।।४।।
सत्य परिस्थीती ऐसी कुणी न जाणले प्रभूसी
सर्वांची चालना तर्कासी प्रभू अस्तित्वा विषयीं ।।५।।
फक्त एकमुखी वाच्यता असे ती सर्वता
महान शक्ति असता त्या ब्रह्मांडामध्यें ।।६।।
सर्वानी जाणले एक 'अपूर्व शक्ति' ह्याचा चालक
त्याच उर्जेचे हे प्रतीक सारे विश्वमंडल ।।७।।
कुणी नाहीं दुजा भाव समजोनी त्या शक्तीची ठेव
ज्ञान विज्ञान देती नाव निरनिराळे त्या शक्तिसी ।।८।।
कुणी म्हणती राम कुणी म्हणे रहीम
कुणी संबोधती गौतम येशू असे कुणाचा ।।९।।
परी तत्व नसे वेगळे नांवे होत निरनिराळे
सामान्यास ते न कळे हीच खरी शोकांतिका ।।१०।।
सारे जीवन निघून जाई परी त्या शक्तीचा बोध न होई
विश्लेषण करीत राही त्याच्या अस्तित्वाविषयी ।।११।।
जाणावी ती शक्ति रुप आकार त्यासी नसती
शक्ति समजोनी करावी भक्ति आदरभाव ठेवून ।।१२।।
मानवजन्म श्रेष्ठ ठरविला विशेष बुद्धी मिळून त्याला
विचार शक्ति उमजण्याला सर्वप्राण्यामध्ये ।।१३।।
बहूत झाले विद्वान कर्तव्याने मिळवी मान
मानव जातीची ती शान ह्या संसारी ।।१४।।
मार्ग निरनिराळे दाखवी सारे मिळती एक ध्येयी
सर्वार्पण त्या शक्ती होई ध्येय मिळतां जीवनाचे ।।१५।।
विचार करा मनाशी वैर आपले आपणाशी
नसते केंव्हां प्रभूशी हेच मूळ दुःखाचे ।।१६।।
वाद नसतो ध्येयापरी चर्चा असे मार्गापरी
हीच मानव निर्मिती खरी सर्व सुख दुःखाची ।।१७।।
तथा कथीत पंडित सामान्यात विद्वान होत
ज्ञान त्यांचे थोडेसे ज्यास्त बहूजनांपेक्षां ।।१८।।
वापरुन ज्ञान शक्ति सामान्यजनास वाकविती
आपले अस्तित्व स्थापती प्रभू शक्तिसी विसरुन ।।१९।।
तर्क शक्ति थोर आहे चा नाही करणार
नाहीं ला आहे म्हणणार ज्ञानाचा खेळ करुनी ।।२०।।
मार्गाचा करुनी भेद करीत राही वाद
जीवन करी बरबाद विसरुनी ध्येयासी ।।२१।।
ध्येय असे महान मार्ग हे साधन
साधनास साध्य समजून वाया जाई आयुष्य ।।२२।।
साध्य नका समजू साधनासी ठेवा विश्वास साध्यासी
कोणत्याही साधनाने गेल्यासी साधका प्राप्त होई साध्य ।।२३।।
निरनिराळ्या मार्गाचे प्रयोजन ज्ञान शक्ती वापरुन
स्व अस्तित्व ठेवण्या टिकवून केले असे ।।२४।।
आस्तित्वाची भावना मोठी प्रत्येक झगडतो त्यासाठीं
आयुष्य खर्ची त्या पोटी सकळजन ।।२५।।
न कळे त्यास देवपण भांडण्यांत जाई विसरुन
आयुष्य मातीमोल करुन टाकीत असे ।।२६।।
विसरुन जा सर्व भेद मिटवा वादविवाद
लहान मोठ्यांचा संवाद नष्ट करा त्वरीत ।।२७।।
सारेच आहे समान न कुणी मोठे न लहान
घ्या सारे समजून असती सारे मानवनिर्मित ।।२८।।
ज्ञात धर्म होत अनेक हे मानवनिर्मीत प्रतिक
सर्व मार्गाचे ध्येय एक न कळे अज्ञानामुळे ।।२९।।
मानव शक्ति तीच ईश्वर दुसरा नसे कोणी वर
आपणची देतो त्यासी आकार सगुण रुप देऊनी ।।३०।।
मानवता हाच धर्म खरा आपसातील भेद विसरा
प्रभू देई तयाना आसरा जीवन सुखी करण्या ।।३१।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
क्रियेला प्रतिक्रिया, ध्वनीला प्रतिध्वनी
तत्व ते सनातन, दिसे नित्य जीवनी
फेकतां जोराने, आदळे भिंतीवरी
प्रवास परतीचा, होई तुमचे उरीं
शिवी वा अपशब्द, दिले कुणासाठी
येवूनी धडकतील, तुमचेच पाठीं
प्रेमाने बोलणे, सुंगध आणिते
आनंदी लहरी, मनां सुखावते
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Copyright © 2025 | Marathisrushti